छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील सभेतील घटना धरणगाव-प्रतिनिधी । शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने धरणगाव शहरात युवासेनेच्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आले आहे. याठिकाणी गर्दीतून मोबाईल व पाकीट मारणाऱ्यास नागरीकांना पोलीसांच्या हवाली केले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेनेच्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी आदीत्य ठाकरे हे दौऱ्यावर असून धरणगाव मतदार संघाच्या धरणगाव शहरात त्यांची मोठी सभा होत आहे. या सभेच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज चौकात नागरीकांनी प्रचंड गर्दी केली आहे. दरम्यान या गर्दीचा फायदा घेवून मोबाईल व पाकीट मारणारा चोरट्याला नागरीकांनी पकडले आहे. त्याला पुढील कारवाईसाठी धरणगाव पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील साळवा येथे सेवा संस्थेच्या वतीने महिला शेतकरी मेळावा घेण्यात आला. यावेळी महिला शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. महिला मेळाव्यात प्रकल्प समन्वयेक महेंद्रसिंग रावल यांनी सेवा संस्था राबवित असलेल्या पीएससीपी या प्रकल्पाची माहिती देवून मार्गदर्शन केले. धरणगाव तालुक्यातील साळवा गावात सेवा संस्थेतर्फे महिला शेतकऱ्यांसाठी मेळावा घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी सेवा संस्थेचे प्रकल्प समन्वयक महेंद्रसिंग रावल, शैलेश मांडे, कृषी विशेषज्ञ आशिष शहारे, लेखापाल ममता पाटील, कृषी सखी सिमा नेहते, लिना कोल्हे यांच्यासह गावातील महिला शेतकरी मोठ्या संख्यने उपस्थित होते.
माजी अध्यक्षा आणि संचालक मंडळ अडचणीत येण्याची शक्यता जळगाव प्रतिनिधी | जिल्हा दूथ संघाच्या मुख्य दुग्धशाळा विस्तारीकरण व आधुनिकीकरणासह दुग्धजन्य पदार्थ विस्तारीकरण व आधुनिकीकरणासाठी विहीत डीपीआरनुसार काम न केल्याने तब्बल ९ कोटी ९७ लाख रूपयांची अनियमितता आढळून आली आहे. राज्याचे सहकारी संस्था यांच्या उपसचिवांनी याबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. यामुळे आता माजी अध्यक्षा आणि संचालक मंडळाला चौकशीचा सामना करावा लागणार आहे. जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाला राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या अंतर्गत मुख्य दुग्धशाळा विस्तारीकरण व आधुनिकीकरणासह दुग्धजन्य पदार्थ विस्तारीकरण व आधुनिकीकरणासाठी प्रत्येकी २४.७० कोटी म्हणजेच एकूण ४९ कोटी ४० लक्ष रूपयांची मदत प्रदान करण्यात आली होती. याची अंमलबजावणी करतांना…
आदित्यला ठाकरेंच्या दौऱ्याने जळगाव ग्रामीण मतदार संघातील समीकरणे बदलणार Live Maharashtra news- युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर २० रोजी येत असून पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदार संघातील धरणगाव येथे राष्ट्रवादीचे माजी मंत्री गुलाबराव देवकर हे राष्ट्रवादीतर्फे आदित्य ठाकरे यांचा दुपारी १ वाजता जाहीर सत्कार करणार असल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत . गुलाबराव पाटील आणि गुलाबराव देवकर हे विधानसभा निवडणुकीत एकमेकांविरुद्ध लढून विजयी व पराभूत झाले आहेत . त्यामुळे राष्ट्रवादीचे माजी मंत्री गुलाबराव देवकर हे आदित्य ठाकरे यांचा जाहीर सत्कार करणार असल्याने यात धरणगाव तालुका हा गुलाबराव पाटील यांचा बालेकिल्ला मानला जात असल्याने त्यांना शह…
जळगाव प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील विटनेर गावातून मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी पशूधनाची चोरी केल्याची घटना सकाळी उघडकीला आली आहे. याबाबत पोलीसात अद्याप कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही. याबाबत अधिक माहिती अशी , एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या म्हसावद पोलीस दुरक्षेत्र हद्दीच्या अतंर्गत असलेल्या जळगाव तालुक्यातील विटनरे गावातून मंगळवारी १६ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १ ते२.३० वाजेच्या सुमारास गुरांची चोरी झाली. हा प्रकार बुधवारी १७ ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीला आला. गेल्या अनेक दिवसांपासून विटनेगा गावासह म्हसावद पोलीस दुरक्षेत्र हद्दीत चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. विटनेर गावातील भवानी नगरात राहणारे सेवानिवृत्त पोस्टमन सुभाष गिरीधर जाधव यांच्या मालकीचे दोन गुरे चोरीस गेल्याचे निदर्शनास आले आहे. वारंवार होत असलेल्या…
महाराष्ट्रात नव्याने स्थापन झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वयाची 75 वर्षे पूर्ण झाल्याने ज्येष्ठ नागरिकांनसाठी हा निर्णय घेण्यात आला. आज या मंत्रिमंडळाची बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यापैकीच एक निर्णय म्हणजे पंच्चाहतरी पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना मोफत एसटी प्रवास करता येणार आहे. तसेच राज्य सरकारमधील कर्मचाऱ्यांचा तीन टक्के पगारवाढ करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. पंच्चाहतरी पूर्ण केलेल्या ज्येष्ठांना मोफत एसटी प्रवास स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन सेवेच्याबसेस मधून मोफत प्रवास करता येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
जळगाव प्रतिनिधी| औरंगाबाद शहरात एक धक्कादायक घटना समोर आली. एका युट्यूब पत्रकाराने तरुणीचा खून करून मृतदेह घेऊन जात असतांना परिसरातील नागरिकांनी घरात रक्ताचा सडा पाहता आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अंकिता श्रीवास्तव असे मृत महिलेचा नाव असून, सौरभ लाखे असे आरोपीचे नाव आहे. सौरभ आणि अंकिता यांचे प्रेमप्रकरण होते. सौरभ हा औरंगाबादच्या शिऊर गावी राहायचा. तसेच तो एका युट्यूब चैनलला पत्रकार म्हणून काम करायचा. प्रेम प्रकरणातून हा खून झाला असल्याचे बोलले जात आहे. सौरभ हा तीन दिवसांपूर्वी अंकिताच्या रूमवर आला होता. त्यावेळीच त्याने खून केला असल्याचा संशय आहे. कारण गेली तीन दिवस या रूमला बाहेरून कुलूप लावलेला होता.तरुणीची गळा चिरून…
जळगाव प्रतिनिधी | भुसावळ शहरातील सातारा चौकातील रस्त्याची अत्यंत बेकार अवस्था झाली आहे. या ठिकाणी प्रचंड खड्डे पडल्याने नागरिकांना वाहन काढण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागतो. यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. याकरिता धिरज पाटील यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांच्याकडे तात्कळ रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. जामनेर रोडवरून जळगाव रोडवर येण्यासाठी जुना सातारा मुख्य चौकातून वाहतूक होत आहे. भुसावळातील हंबर्डीकर चौक ते लोखंडी ब्रिज रस्ता काँक्रिटीकरण कामामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. सतत चालू असलेला वाहतूक मार्ग यावल, रावेरकडे जाण्यासाठी हा एकमेव मार्ग असल्याने या रस्ते निकामी झाले. सर्व प्रकारची अवजड वाहनेसुद्धा याच चौकातून वाहतूक करीत आहे.…
नेहमीच वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे चर्चेत असणारे अभिनेते शरद पोंक्षे यांनी नुकतेच व्याख्यानात आणखी काही वादग्रस्त विधानं केली होती. त्यावरून पोंक्षेंवर सर्वच स्थरातून टीका केली जात आहे. आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनीही टीका आज केली आहे. अमोल मिटकरी म्हणाले कि, शरद पोंक्षेंविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी देखील त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. शरद पोंक्षेंसारखे लोक अशी वादग्रस्त वक्तव्य फक्त प्रसिद्धी साठी करतात. “जो व्यक्ती राज्यभर नथुराम गोडसेच्या नाटकाचे प्रयोग करत फिरत असेल.तो हिंदूंना नपुंसक म्हणत असेल तरतो व्यक्ती मुळातच हिंसक असणार यात काही वाद नाही. हिंदू धर्म हा सहिष्णू धर्म आहे. हिंदू धर्माने सर्व जातींतील लोकांना सामंत…
शिरूर तालुक्यातील अपघातात काळाने कुटुंबावर केला घाला, पुणे-नगर महामार्गावर शिरूर तालुक्यात येथे भीषण अपघात झालाय यात एकाच कुटुंबातील पाच जण जागीच ठार तर एकजण जखमी झालाय. विरुद्ध दिशेने आलेल्या कंटेनर ने चारचाकी धडक दिली अपघातात मृतांमध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे. कुटुंब उद्ध्वस्त झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघातात सर्व कुटुंबातील अहमदनगर जिल्ह्यातील आवाने बुद्रुक येथील रहिवासी आहेत. अपघातात संजय मस्के(वय-५३)रामा मस्के(वय -४५)राजू मस्के-(वय ०७) हर्षदा मस्के (वय -०४),विशाल मस्के (वय-१६) मृत झाले असून साधना मस्के जखमी झाल्या आहेत. या मृतांमध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे. पुणे-अहमदनगर मार्गावर एक ट्र चुकीच्या बाजूने आला. ट्रक अचानक रस्त्याच्या मधे…

