Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

रिकामटेकड्या लोकांसोबत राहू नको, असे बोलल्याने एकाने बोलणाऱ्या तरुणाच्या डोक्यात लोखंडी तवा मारुन दुखापत केल्याची घटना आदर्श नगरात शनिवार, २० ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील गणपती नगर परिसरातील आदर्श नगर येथे भूषण नारायण खडके वय ३४ हे वास्तव्यास आहेत. शनिवारी कुशल भरत राणे हा आदर्शनगरात खडके यांच्या घराजवळ उभा होता, यावेळी भूषण हे कुशल यास रिकामटेकड्या लोकांसोबत राहू नको, असे बोलले, त्याचा राग आल्याने कुशल राणे याने भूषण यांना चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच कुशल याने लोखंडी तवा भूषण यांच्या डोक्यात मारुन दुखापत केली, अशा…

Read More

जळगाव शहरातील बीबा नगर येथील घरात शनिवार २० ऑगस्ट रोजीच्या मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी घरातून दागिण्यांसह रोकड असा एकूण ४३ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल लांबविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ,बीबानगर येथे प्रमिला सुधाकर चौधरी वय ५६ या वास्तव्यास आहेत. शुक्रवारी रात्री त्यांनी घराचा मागच्या खोलीचा रुमचा लोखंडी व लाकडी दरवाजे उघडे ठेवून प्रमिला चौधरी या झोपल्या होत्या. पहाटे १ ते साडेपाच वाजेच्या सुमारास चोरट्याने घराचे दरवाजे उघडे असल्याची संधी साधत घरातील ११ ग्रॅमचा सोन्याचा हार, ३ ग्रॅमचे कानातले, ५ ग्रॅमची सोन्याची अंगठी, ३ ग्रॅमचे मणी मंगळसूत्र, १० ग्रॅमचा चांदीचा शिक्का,…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील शिवकॉलनी परिसरात दारू अड्ड्याजवळ दोघांमध्ये झालेल्या वादातून एकाला चॉपरने भोसकून खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. या गंभीर हल्ल्यात अक्षय अजय चव्हाण वय-२३ रा.पिंप्राळा दुखापत झाल्याने तरुणाचा मृत्यू झाला. सविस्तर वृत्त असे की, रविवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास शिवकॉलनी स्टॉपसमोर दारूच्या अड्ड्यासमोर मोबाईलच्या वादातून दोन तरुणांमध्ये वाद झाला.वाद वाढल्याने दोन्ही गटातील १०-१५ तरुणांमध्ये चांगलीच हाणामारी झाली. भारत बंडू राठोड या प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, ५.३० च्या सुमारास मोबाईलच्या जुन्या वादातून काही तरुणांचा वाद झाला. मी मध्यस्थी करण्यासाठी गेलो असता आणखी तरुण त्यात पडले. अक्षय चव्हाण या तरुणाने बाळू पवार याच्या भावाच्या डोक्यात दगड मारला. भावाला मारल्याच्या रागातून…

Read More

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. यावेळी फेसबुकवर मेसेजद्वारे पोस्ट टाकून शिरच्छेद करण्याची धमकी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना धमकीची माहिती मिळाल्यानंतर पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. फेसबुक पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, शिरच्छेद करणाऱ्याला दोन कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाईल. तसेच ज्या फेसबुक पेजवरून सीएम योगी यांना धमकावण्यात आले आहे, त्यांचे नाव आत्मा प्रकाश असून यांनी स्वत: पोलिसांना ही माहिती दिली. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस विभागासह इंटेलिजन्स युनिट आणि जेडो विभागही सक्रिय झाला आहे. आत्मा प्रकाश नावाच्या व्यक्तीचे फेसबुक अकाउंट हॅक करण्यात आले होते, त्यानंतर मुरादाबाद पोलिस नावाचे फेसबुक पेज तयार…

Read More

राज्यात पावसाचा जोर वाढणार असून आता राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जळगाव जामोद तालुक्यातील निमकराळ येथे वीज पडून दोघांचा मृत्यू झाला. एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना २० ऑगस्स्ट रोजी घडली. घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. विदर्भासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच विजांच्या गडगडाटासह वादळी आणि मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. जळगाव येथील निमकराळ भागातील आडोळ, मांडवा, तिवडी, गीलखेड, दादुलगाव या परिसरात शनिवारी दुपारी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. सध्या शेतातील कामे सुरू असल्याने निमकराळ येथील अमोल रघुनाथ पिसे (वय २२ वर्ष ) मधुकर तुळशीराम उगले (वय ५६ वर्ष) आणि त्यांच्या पत्नी…

Read More

कोरोनाची लाट ओसरता आता ठाण्यात स्वाइन फ्लूचं संकट ओढावलं आहे. गेल्या काही दिवसांपासून स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. तर ठाण्यात तब्बल 400 रुग्णांची वाढ झाली आहे. . राज्यात कोरोनानंतर आता स्वाइन फ्लूने हाहाकार माजला आहे. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. जुलै महिन्यापासून मुंबईसह महाराष्ट्रात स्वाइन फ्लूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होता ना दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यालाही स्वाइन फ्लूने घेतला आहे. ठाण्यात गेल्या महिन्याभरापासून स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. आतापर्यंत 400 रुग्ण आढळून आले आहे. मागील 15 दिवसांमध्ये तब्बल 14 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्याची राजधानी असलेल्या मुंबईमध्येही 138 रुग्ण…

Read More

हिमाचल प्रदेशातील रायपूर-कुमालदा परिसरात तसेच मंडी जिल्ह्यात अन्य ठिकाणी शनिवारी पहाटे ढगफुटी झाली. त्यामुळे विविध भागात महापूर, भूख्खलन आणि अपघातामध्ये तब्बल 21 जणांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे उत्तराखंडच्या विविध भागात ढगफुटीच्या मालिकेत 4 जणांचा मृत्यू झाला, तर १० जण बेपत्ता झाले. नदीचे किनारे फुटले आणि पूल वाहून गेले, नदीच्या काठावरील प्रसिद्ध शिवमंदिर असलेल्या टपकेश्वराच्या गुहेतही पाणी शिरले. ढगफुटीमुळे आलेल्या पुरात आतापर्यंत १३ जण मरण पावल्याचे सांगितले जात आहे. सॉन्ग नदीवरील पूल वाहून गेला आणि मसुरीजवळील लोकप्रिय पर्यटन स्थळ असलसेल्या केम्पटी फॉल्स धोकादायक रीतीने वाहू लागला आहे. ढगफुटीने खेड्यांतील घरांमध्ये चिखल व पाणी घुसले. ज्यामुळे राज्य आपत्ती प्रतिसाद दलाने बाधित लोकांना…

Read More

शिंदे-फडणवीस सरकारने दहीहंडीचा उत्सव जल्लोषात साजरा करण्यास परवानगी दिली. त्यावेळी, दहीहंडीचा अधिकृतरीत्या खेळात समावेश केला असून, गोविंदांना आता क्रीडा कोट्यातील ५ टक्के शासकीय नोकरीत आरक्षणचा लाभही मिळणार असल्याचं सांगितलं. अजित पवार यांनी सरकारच्या प्रो-गोविंदाच्या निर्णयावरुन शिंदे-फडणवीस सरकारला चांगलंच फटकारले आहे. अजित पवार अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना मुख्यमंत्र्यांनी भावनिक निर्णय घ्यायाचा नसतो, अशा शब्दात त्यांनी आपलं मत मांडलं. जिल्ह्यातील मेळघाट, धारणी या आदिवासी भागाला ते भेट देताऐ, यावेळी दहीहंडी पथकातील गोविंदांना सरकारी नोकरीत आरक्षणाचा लाभ देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावरिल विचारावर त्यांनी भूमिका मांडली. मला विम्याचा मुद्दा पटला. मृत्यूमुखी पडणाऱ्यांच्या कुटुंबीयांना १० लाखांचा विमा देण्याची घोषणा सरकारने केली. कायमचं अपंगत्व आलं…

Read More

राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये नवीन वैद्यकीय महाविद्यालये उभारण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी घेतला आहे. राज्यातील १२ जिल्ह्यांत वैद्यकीय महाविद्यालय करता वैद्यकिय शिक्षण विभागासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली आहे. राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये नवीन वैद्यकीय महाविद्यालये उभा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात महाविद्यालये उभारण्यासाठी एशियन डेव्हलपमेंटकडून चार हजार कोटींचं कर्ज दिलं जात आहे. या कामांना लवकरच सुरुवात होईल. केंद्र सरकारकडूनही निधी लवकरच उपलब्ध करून दिला जाईल, असं आश्वासन गिरीष महाजन यांनी माध्यमांशी बोलताना दिले. आमची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली आहे. मागिल पाच वर्षात एकाही मेडीकल कॉलेजला परवानगी दिली नाही. परंतु, खासगीपेक्षा सरकारी मेडिकल कॉलेजचा नागरिकांना फायदा होईल.…

Read More

जळगाव प्रतिनिधी । युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा पाचोरा तालुक्यातील पाथरी गावात माजी सरपंच निलेश प्रेमसिंग पाटील यांच्यासह गावकऱ्यांनी जल्लोषात स्वागत करून सत्कार करण्यात आला. युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे हे शिवसंवाद यात्रे निमित्त जळगाव जिल्हा दौऱ्‍यावर असतांना पाचोरा कडे जात असतांना पाथरी या गावातील माजी सरपंच निलेश प्रेमसिंग पाटील, संतोष नेटके तसेच राहुल अरुण पाटील यांनी युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला यावेळी उपस्थित देवेंद्र चव्हाण, निलेश कडु पाटील, हिरामण आण्णा,बाळु कासे, गोविंदा धनगर व दिपराज जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. या सत्कार प्रसंगी पाथरी येथील राहुल अरुण पाटील यांनी माजी मुख्यमंत्री…

Read More