महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. राज्यातल्या नव्या शिंदे फडणवीस सरकारचे हे पहिलंच अधिवेशन आहे. गेली अडीच वर्षे विरोधी बाकावर बसणारं भाजपा आता सत्ताधारी बाकावर बसलेलं पाहायला मिळाले. तर शिवसेनेतल्या अभूतपूर्व बंडानंतर शिंदे आणि ठाकरे दोन्ही गट आमनेसामने येणार आहेत. चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधी पक्षाने टाकलेला बहिष्कार, वादग्रस्त नेते, आमदार, निर्णयांना दिलेली स्थगिती, ओल्या दुष्काळाची मागणी अशा सगळ्या कारणांमुळे यंदाचं अधिवेशन वाद होण्याची शक्यता आहे.एकनाथ शिंदे अधिवेशनासाठी दाखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अधिवेशनासाठी विधिमंडळात दाखल झाले आहेत. विरोधी पक्षनेते आदित्य ठाकरे येणार नसल्याच्या चर्चांदरम्यान त्यांनी विधिमंडळात हजेरी लावली आहे. आजपासून पावसाळी अधिवेशनात खरा मुख्यमंत्री कोण हे जनतेला दिसून आलंय, असा टोला…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
माजी आमदार आणि शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या अपघाती निधनाने पुन्हा एकदा नवीन धक्कादायक घटना घडलीय. महाराष्ट्रातील कामगीरी करणारा साहसी नेता गमावल्याने नव्या सरकार नाराज झाले आहेत. विनायक मेटेच्या गाडीला अपघात लवकर उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं माहिती समोर आहे. विनायक मेटेच्या गाडीच्या अपघात झाल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. चालकाने ही लवकर मदत न मिळाल्याचं माहिती दिली. एक्सप्रेस वे वर एअर एम्ब्युलन्सची सुविधा लवकरच उपलब्ध आशक्यता आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे यंत्रणेची देखील कसून चौकशी केली जाणार आहे.मंत्री मंडळात देखील चर्चा झाली. राज्य सरकार लवकर या घटनेनंतर महत्त्वाचा निर्णय जाहीर करणार आहे. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूनंतर…
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा हजरजबाबी विधानांमुळे अडचणीत देखील सापडल्याची उदाहरणं दिसून येतात. शिवसैनिकांना ठोकून काढा. शिवसैनिकांचे हात तोडा, तंगडी तोडा, आरेला कारे म्हणा, कोथडा काढा. अरे काय ही पद्धत?, असं अजित पवारानी टीका केली आहे. उद्यापासून होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांच्या पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार बोलत असताना अशाच एका प्रश्नावर त्यांनी दिलेलं उत्तरावर उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला. “शेतीच्या नुकसानाचे पंचनामे अनेक ठिकाणी प्रलंबित आहेत. विरोधी पक्ष कमकुवत असल्यामुळे शेतकऱ्यांना मदतीसाठी एवढी वाट पाहावी लागत आहे का?” असा पवारांनी टोला लगावला. “तुम्हाला कुणी सांगितलं विरोधी पक्ष कमकुवत आहे? त्यांच्यावर प्रभाव पाडायला आम्ही आता काय केलं…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे वरिष्ठ आमदार आणि विधीमंडळाचे पक्षप्रतोद सुनील प्रभू यांना पत्र पाठवल्याने एकच खळबळ उडालेली आहे.प्रथमच शिवसेना नेत्यांशी संपर्क साधला आहे, तोही पत्राद्वारे. अनेक प्रश्न निर्माण झाले असून नक्की काय होणार र याकडे लक्ष लागले आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या चहापानाचे निमंत्रण या पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला दिले आहे. शिवसेनेत उभी फूट पाडली असताना हे दोन्ही गट गेल्या काही दिवसांपासून एकमेकांवर अक्षरशः तुटून पडत आहेत. एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. मात्र, अचानक मुख्यमंत्री म्हणून बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे यांनी प्रथमच पत्राद्वारे शिवसेना नेत्याशी संवाद साधला आहे. शिवसेनेचे पक्षप्रतोद प्रभू यांना अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथिगृहावर…
कोल्हापूर जिल्हा पन्हाळा तालुक्यातील दरेवाडी आसुर्ले येथे घरगुती कारणावरून पतीनेच पत्नीच्या डोक्यात वरवंटा घालून खून केल्याची धक्कादायक घटना सोमवारी घडली.पोलिसांनी संशयित आरोपी बाबासो ताब्यात घेतले आहे. अनिता बाबासो जाधव (वय ४६) असे मृत पत्नीचे नाव आहे. याप्रकरणी संशयीत आरोपी बाबासो बळवंत जाधव (वय ४९) याला पन्हाळा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बाबासो जाधव याला दारूचे व्यसन असून तो काही काम धंधा करत नसल्याने त्याचे घरात नेहमी पत्नी अनिता व मुलाबरोबर वाद होत होते. सोमवारी रात्री त्यांच्यातील वाद विकोपला गेला. यामध्ये बाबासो याने अनिताच्या डोक्यात दगडी वरवंटा घातला. यामध्ये अनिता यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची फिर्याद तेजस बाबासो जाधव याने…
लैंगिक अत्याचार प्रकरणात न्यायलयीन कोठडीमध्ये असलेल्या एका तरुणाने जेलमध्ये गळफास घेतला पंढरपूरमध्ये घडली आहे. न्यायालयाने या तरुणाला जामीन नाकारला होता, त्यानंतर मध्यरात्री त्याने जेलमध्ये गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. या घटनेने पोलीस दलासह तालुक्यात खळबळ उडाली. सुनील तानाजी किसवे (वय 21) असं या आरोपी तरुणाचं नाव आहे. तानाजी याच्यावर लैंगिक अत्याचारासह इतर अनेक गुन्हे दाखल आहेत. सुनीलवर लैंगिक अत्याचार प्रकरणात पोस्को गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे त्याला मंगळवेढा कारागृहात ठेवण्यात आले होते. मंगळवेढा न्यायालयाने जामीन नाकारल्याने सब जेलमध्ये ठेवण्यात आले होते.नातेवाईक घटनास्थळी हजर झाले सुनील तानाजी किसवे याच्यावर पोस्को अंतर्गत गेल्या दीड महिन्यांपूर्वी गुन्हा दाखल झाला होता. तो सध्या मंगळवेढा येथील…
शिवसेनेतून बंड करून आल्यानंतरही महत्त्वाचे खाते न मिळाल्याने या मंत्र्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.मनाजोगे खाते न मिळाल्याने शिंदे गटाचे मंत्री नाराज आहेत.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आली आहेत. कमी महत्त्वाची खाती मिळाल्यामुळे अनेक मंत्री नाराज असल्याचे म्हटले जात आहे. त्यावरून विरोधकांनी शिंद-फडणवीस सरकारवर जोरदार टीका सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनीही या नाराज असलेल्या मंत्र्यांची खिल्ली उडवली आहे. आजकाल बायको जेवढी फुगत नसेल तेवढे मंत्री फुगत आहेत. हे हस्यास्पद आहे, अशी खिल्ली सुप्रिया सुळे यांनी उडवली आहे. अडीच वर्षात आमची सत्ता गेली. पुढील अडीच वर्षानंतर निवडणुका लागतील. मात्र, सध्या शिंदे-भाजप यांच्या संयुक्त सरकारमधील मंत्र्यांमध्ये रुसवे-फुगवे आहेत.मंत्रीपद…
माझा तिसरा डोळा उघडला तर… गौरव पाटील प्रतिनिधी : राज्यात सत्ता संघर्षानंतर शिंदे सरकारने कॅबिनेट मंत्री मंडळाचा विस्तार केला व त्यामध्ये खान्देशची मुलुख मैदान तोफ आ.गुलाबराव पाटील यांचा ही कॅबिनेट मंत्रीपदी निवड करून खान्देशला मंत्री मंडळात सामील केले. त्यानंतर ना.पाटील हे प्रथमच मंत्री झाल्यावर जिल्हात जंगी स्वागत कार्यकर्त्यांनी केले. यावेळी ना.पाटील बोलतांना म्हणाले की, मी मंत्री होऊ नये म्हणून थेट गल्लीतून दिल्लीपर्यंत तक्रार केली. काही जणांनी देवाजवळ नारळ बुडून ठेवले होते. पण मी तिसऱ्यांदा मंत्री झालो. मिरवणुकीत हजार गाड्या होत्या, पैसा कितीही असला तरी बाजारात माणूस विकत घेता येत नाही, 35 वर्षांची माझी ही तपश्चर्या आहे. माझ्याकडे जातीचे भांडवल नाही,…
मराठा समाजाचा बुलंद आवाज हरपल्यानं हळहळ लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: विनायक मेटे विधानपरिषदेचे माजी सदस्य आणि शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचा मोठा अपघात झाला आहे. या अपघातात विनायक मेटे यांच्यावर पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान त्यांचे निधन झाले आहे. विधानपरिषदेचे माजी आमदार असलेल्या विनायक मेटे यांचा खोपोली येथील बोगद्याजवळ अपघात झाला होता. या अपघातानंतर विनायक मेटे यांना पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. यामध्ये त्यांचा मुलगाही जखमी झाला असल्याचं समोर येत आहे.विनायक मेटे यांच्या अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते प्रविण…
पाचोरा : प्रतिनिधी एका २० वर्षीय विवाहितेने रक्षाबंधनानिमित्त माहेरी आली असता तीने पहाटे स्वयंपाकघरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेली माहिती अशी की, तालुकयातील शेवाळे येथील नानू शिवदास फादगे यांची एकुलती एक मुलगी उमा नानू फादगे (वय – २०) हिचा विवाह जळगांव शहरातील खंडेराव नगर येथील रहिवाशी सनी प्रेमनाथ उमप यांचेशी दि. १८ मे २०२२ रोजी शेवाळे येथे मोठ्या थाटात पार पडला. दरम्यान रक्षाबंधन सणासाठी आपल्या दोन भावंडांना राखी बांधण्यासाठी यावे म्हणुन दि. १२ आॅगस्ट २०२२ रोजी उमा हिचे वडिल नानू फादगे हे उमाला माहेरी घेऊन आले…

