पहिलेच पावसाळी अधिवेशनात शिंदे-फडणवीस सरकार आजचा चौथ दिवस असून, विधानसेभेच्या पायऱ्यांवर आंदोलनावेळी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये गदारोळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे. राष्ट्रवादीचे नेते महेश मिटकरी आणि महेश शिंदे यांच्यामध्ये हा राडा झाल्याने समोर आले आहे. सत्ताधाऱ्यांनी उद्धव ठाकरेंविरोधात आंदोलन केले. त्याचवेळी विरोधकदेखील पायऱ्यांवर घोषणाबाजी चालू होती. अचानक एकनाथ शिंदे गटातील महेश शिंदे आणि राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांच्या सुरुवातीला शाब्दीक वाद झाले आणि त्यानंतर हे प्रकरण थेट धक्काबुक्कीपर्यंत गेले. दरम्यान, अजित पवार यांनी समजुतीचा मार्ग काढत सुरू असलेला वाद थांबवला. या वादात अमोर मिटकरी यांनी महेश शिंदे यांची कॉलर पकडली असल्याचे दिसून आले. त्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. मिटकरांनी…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
अतिवृष्टी व पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील महानगरपालिका अंतर्गत रस्ते, ग्रामीण मार्ग व गावांतर्गत असणारे रस्ते अत्यंत खचले आहेत. करता हसनमुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे तर या जिल्ह्यातील ग्रामीण रस्त्यांचे मोठ्या प्रमाणावर खच्चीकरण झाल्याने योग्य निधी उपलब्ध करून देण्याचे मागणी करण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांचीही मोठी गैरसोय होत असल्याने सदर रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करणे अत्यंत आवश्यक आहे. आमदार पी. एन. पाटील, ऋतुराज पाटील, हसन मुश्रीफ, राजूबाबा आवळे, प्रा. जयंत आसगावकर यांच्यासह मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन याबाबतचे निवेदन देण्यात आले. रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी राज्य शासनाच्यावतीने कोल्हापूर महापालिकेसाठी ५० कोटी, इचलकरंजी पालिकेसाठी २५ कोटी आणि जिल्ह्यातील अन्य रस्त्यांसाठी १०० कोटी असा एकूण १७५…
अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले . नियमित कर्जफेड केलेल्या शेतकऱ्यांना 50000/- प्रोत्साहन अनुदान वाटप सप्टेंबर महिन्यात सुरू केले जाईल अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तसेच राज्यातील पूरग्रस्तांना 15 हजारांची तात्काळ मदत करणार अस आश्वासनही एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिले. पिक नुकसान भरपाईसाठी विमा कंपनीकडे फोन करुन सूचना देण्यात येतात. कृषि कार्यालय, तहसिल कार्यालय किंवा ज्या बँकेत विमा भरलेला आहे अशा ठिकाणी नुकसानीची सूचना,अर्ज स्वीकारले जातील व हे अर्ज ग्राह्य धरले जातील अशा लेखी सूचना विमा कंपन्यांना देण्यात येतील. नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीसंदर्भातील मदतीची रक्कम बाधितांना देण्यासाठी होणारा विलंब कमी करण्यासाठी यापुढे पंचनाम्यासाठी मोबाईल अँपचा वापर…
नवं सरकार सत्तेत आल्यानंतर राजकीय समीकरणं पालटले आहे राज्यपाल नियुक्त 12 नावांवरुन महाविकास आघाडी सरकार असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष पाहायला मिळाला होता. राज्यपाल नियुक्त या आमदारांची गेल्या दीड वर्षापासून खुपच चर्चा होत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्याकडून 12 नावं राज्यपालांना पाठवण्यात आले . आमदारांचं एकूण भाजपला 12 पैकी 8 तर शिंदे गटाला 4 जागा मिळण्याची शक्यता आहे. या 12 नावांमध्ये नेमकी कोणाची नावे असणार याकडे लक्ष लागले आहे. या चार जागांसाठी शिंदेगटातील माजी मंत्री रामदास कदम, विजय शिवतारे, अर्जुन खोतकर, नरेश म्हस्के, चंद्रकांत रघुवंशी, आनंदराव अडसूळ, अभिजित अडसूळ यांची नावं आघाडीवर…
विनायक मेटेंच्या अपघात हा चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करताना ही घटना घडली . मात्र गंभीरबाब म्हणजे मेटेंच्या चालकाने फोन केल्यानंतरही वेळेत मदत पोहचली नाही त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. चालकाने सांगितल्याप्रमाणे नवी मु़ंबई व रायगड पोलिस त्यांच्या रस्त्यात शोध घेत होते. मात्र एक प्रवासी मदतीसाठी थांबला. मात्र ही यंत्रणा चुकीची आहे. विनायक मेटेंच्या अपघातानंतर पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर वाढत्या अपघातांकडे लक्ष वेधले गेले आहे. भविष्यात काही अपघात घडल्यास त्या ठिकाणी तात्काळ मदतीसाठी लोकेशन मिळण्या करता पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर इंटेलिजंट ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टिम प्रणाली बसवली जाणार आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ट्रक चालकांना एका लाईनमध्ये जाण्यास सांगितले तरी ते…
बेळगांव महात्मा गांधी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आज (सोमवार) सकाळी बिबट्याचे दर्शन झाले. यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव बसवराज नालतवाड यांनी या रस्त्यावर भरणाऱ्या 22 शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.वारंवार याचा परिसरात बिबट्या नागरिकांना निदर्शनास येत असल्याने रात्रीची गस्त वाढविण्याची तयारी वनखात्याने केली आहे. बेळगावातील गोल्फ मैदान आणि पर्यावरण पार्कमध्ये गेली महिनाभर बिबट्याचे अधूनमधून दर्शन होत आहे. यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे . सहाच्या सुमारास एका वाहनचालकाला बिबट्याचे दर्शन झाल्यामुळे पुन्हा या परिसरातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये बेळगाव शहरातील 12 आणि ग्रामीण भागातील 9 शाळांचा समावेश आहे. गेल्या आठ दिवसांपासून पोलीस आणि वनविभागाच्या…
राज्यात सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना चांगलीच सक्रीय झाल्याचं पाहायला मिळत आहे. राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरेही आता आक्रमक झालेल्या दिसून आले. महागाईच्या मुद्द्यावरुन त्यांनी केंद्रीय मंत्र्यांवर टीका केली आहे. ठाकरे घराण्यातील वाद बाजूला ठेवून एकत्र येऊ असे देखील स्पष्ट केले. पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या’गणपती आमचा किंमत तुमची 2022′ या आयेजित उपक्रमाचे शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते उद्धाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली . शिवसेना कोणाची, उद्धव राज एकत्र येणार का, अशा विविध मुद्द्यांवर त्यांनी टीकाटिप्पण्या केल्या. देशभरातल्या महागाईच्या मुद्द्यावरुन त्यांनी केंद्रीय मंत्र्यांवर टीकाही केली आहे. शर्मिला ठाकरे म्हणाल्या की, त्यांना जे कँटीनमध्ये तिथे फ्री मिळतं ते आधी बंद…
मुंबई प्रतिनिधी | विनायक मेटे यांच्या बीड येथील निवासस्थानी छत्रपती संभाजी राजे यांनी मेटे कुटुंबियांचे सांत्वन केले. शिवसंग्राम संघटने’ला राजकीय ताकद देण्यासाठी विनायक मेटे यांच्या पत्नीला आमदार करा, अशी मागणी माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. मराठा समाजासाठी संपूर्ण आयुष्य काम करणाऱ्या नेत्याच्या कुटुंबीयांच्या मदतीने महाराष्ट्रातल्या तमाम गरीब मराठ्यांना न्याय मिळेल. राजकीय पाठबळ मिळाल्यास त्यामुळेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विनायक मेटे यांच्या पत्नी डॉ. ज्योती मेटे यांना राज्यपाल प्रणित किंवा इतर कोट्यातून आमदारकी द्यावी, असे मत संभाजी राज्यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असून शिवसंग्रामच्या शिष्टमंडळानेही त्यांची भेट घ्यावी.…
मुंबई नाशिक महामार्गाच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घ्यावे. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार छगन भुजबळ यांनी केली आहे. नाशिक मुंबई महामार्गाची अवस्था बेकार झाली. मुंबई नाशिक प्रवासासाठी पूर्वी अडीच ते तीन तास इतका वेळ लागत होता. आता मात्र पाच ते सहा तासाहून अधिक वेळ लागत असल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. याकडे शासनाने तातडीने लक्ष दयावे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात हिंदू सण साजरे होतात की नाही असे वाटत होते आता मात्र सर्व सण साजरे होतील असे वक्तव्य भाजप नेत्यांकडून करण्यात आले आहे. महाविकास आघाडी सरकारने कष्टकरी, मजूर, गोरगरिबांच्या हितासाठी शिवभोजन ही अतिशय महत्वाची योजना सुरू केली होती. गोरगरीब…
शहरातील शाहू नगर परिसरातील ट्राफीक गार्डन येथे हातागाडी लावण्यावरून तरूणाला शिवीगाळ व जीवेठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी शनिवारी २० ऑगस्ट रोजी शहर पोलीस ठाण्यात एकावर अदाखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शरीफ सत्तार भिस्ती (वय-३६) रा. शाहूनगर हा आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शनिवारी २० ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास शाहू नगरातील रोझ गार्डन येथे हातगाडी लावण्यावरून त्याची आणि वैशाली प्रविण पाटील रा. शाहू नगर, जळगाव याच्या वाद झाला. दरम्यान शरीफ भिस्ती याला महिलेने शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात रात्री १० वाजता शरीफ भिस्ती याने दिलेल्या फिर्यादीवरून महिलेवर अदखलपात्र…

