अमळनेर प्रतिनिधी । अमळनेर पोलिसांनी तालुक्यातील कामतवाडी गावाच्या परिसरात सोमवारी सायंकाळी मोठी कारवाई करत अवैधरित्या गांजाची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे लाखो रुपये किंमतीचा साडेचार किलो वजनाचा प्रतिबंधित गांजा आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, अमळनेर पोलिसांनी अवैध धंद्यांविरुद्ध कठोर भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना गोपनीय सूत्रांकडून माहिती मिळाली होती की, अमळनेर ते कामतवाडी दरम्यानच्या रस्त्यावर दुचाकीवरून गांजाची वाहतूक होणार आहे. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक निकम यांनी तात्काळ एक विशेष पथक तयार करून कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार, पोलिसांनी कामतवाडी गावाजवळ…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
पहलगाम दुर्घटनेतील राज्यातील चार पार्थिव मुंबई विमानतळ येथे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वीकारून पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहिलीजम्मू व काश्मीर येथील पहलगाम येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यातील चार जणांचे पार्थिव हवाई मार्गे मुंबईला आणण्यात आले. पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विमानतळ येथे आलेल्या पार्थिवाला पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली.उर्वरित दोन पार्थिव दिल्ली मार्गे पुणे येथे पाठविण्यात येणार असल्याची माहिती जम्मू व काश्मीर प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे. दिल्ली येथे येणाऱ्या पार्थिवांसोबत असलेल्या नातेवाईकांशी दिल्लीतील राजशिष्टाचार कार्यालयातील अधिकारी सतत संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले.या दुर्घटनेत अतुल मोने, हेमंत जोशी,…
धरणगाव तालुक्यातील विहीरफाटा येथे घडली घटना धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील विहीरफाटा येथे गोळीबार करीत एकाचा खून झाल्याची खळबळजनक बातमी समोर आली आहे. घटनास्थळी पाळधी पोलीस स्थानकाचे पोलीस पोहचले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील विहीरफाटा येथे आज दि.२२ एप्रिल रोजी सायकाळी ७.३० ते ८ वाजेदरम्यान विहीरफाटा चौफुलीवर काही अनोळखी इसमांनी गोळीबार एका तरुणाचा खून केल्याची घटना समोर आली आहे. यावेळी गोळीबार झाल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
एकनाथराव खडसे करणारा आज विधान परिषद मध्ये अधिकारी व ठेकेदार, लोकप्रतिनिधींच्या सिंडिकेटची चिरफाड जळगाव, सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये जवळपास 99% टेंडर आहे जादा दराने दिले गेले आहे या टेंडर मध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाला असून शासनाची जवळपास 400 कोटी ची तिजोरी लुटली गेली आहे. ही रक्कम अधिकारी व ठेकेदारांकडून वसूल करा अशी मागणी करण्यात येणार असून विशेष म्हणजे आज विधान परिषदेच्या सभागृहामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे हे भ्रष्टाचाराची चिरफाड करणार आहेत. विधान परिषदेच्या लक्षवेधीमध्ये चौथ्या क्रमांकाची लक्षवेधी एकनाथराव खडसे यांची आज लागले आहे. जळगाव सार्वजनिक बांधकाम विभाग मोठ्या प्रमाणात चर्चेत आले असून एकनाथराव खडसे व माजी जि प सदस्य सुभाष…
लाईव्ह महाराष्ट्र न्युज : जळगाव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांच्या बदलीचे आदेश दिनांक 18 रोजी सकाळी 11 वाजता मंत्रालयातून निघाले विशेष म्हणजे एकनाथराव खडसे यांनी तात्काळ कार्यमुक्त करा यासाठी मंत्रालयात तळ ठोकून बसल्याने रात्री दहा वाजता नाशिक विभागाचे मुख्य अभियंता विभागाचे अधीक्षक जेऊरकर यांच्या स्वाक्षरीने तातडीने प्रशांत सोनवणे यांना कार्यमुक्त करण्याचे आदेश जारी केले आहेत. सत्ता आणि विरोधी पक्ष हे काय काम करतात हे या प्रकारावरून लक्षात येते. या निमित्ताने पुन्हा जळगाव जिल्ह्यात खडसेंचा वरचष्मा झाला आहे. अधिकाऱ्यांमध्ये पुन्हा या निमित्ताने मोठी खळबळ उडाली आहे.
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात पुष्पक एक्सप्रेसच्या एका कोचला आग लागल्याच्या भीतीने प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी रेल्वे रूळावर उड्या घेतल्या मात्र त्याचवेळी समोरून येणार्या बंगळुरू एक्सप्रेसने अनेक प्रवाशांना चिरडले. ही घटना पाचोराजवळील परधाडे रेल्वे स्थानकाजवळ बुधवारी दुपारच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत नेमक्या किती प्रवाशांचा मृत्यू झाला वा जखमी झाले याबाबतची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही मात्र या घटनेने रेल्वे प्रशासनासह जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली असून स्थानिक पोलीस प्रशासनासह जिल्हाधिकारी तसेच रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.मिळालेल्या माहितीनुसार पुष्पक एक्सप्रेसच्या एका कोचमधून धूर येत असल्याने कोच आग लागल्याचे वाटून काही प्रवाशांनी उड्या…
चाळीसगाव प्रतिनिधी । चाळीसगाव शहरातील पोद्दार इंटरनॅशनल स्कूल जवळ मंगळवारी ७ जानेवारी रोजी रात्री अज्ञात व्यक्तींनी हवेत गोळीबार करत घरावर दगडफेक करण्यात आली. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात दुचाकीवरील अज्ञात ६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी दिली आहे.पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, सारंग अशोक बेलदार वय ४९ रा. पोतदार हायस्कूल चाळीसगाव याच्या घरासमोर मंगळवारी ७ जानेवारी रोजी ११.४५वाजेच्या सुमारास तीन दुचाकींवर सहा जण आले. सर्वांनी तोंडाला रूमाल बांधलेला होता. बुलेट मोटारसायकलवर मागे बसलेल्या एकान हवेत गोळीबार केला. तर सारंग बेलदार याच्या घराच्या पार्चमध्ये उभ्या असलेल्या दुचाकीवर दगड टाकून नुकसान…
जळगाव प्रतिनिधी । विद्यापीठात मेस चालविणारे पंकज शालीग्राम शर्मा (वय ५५, रा. प्रेमनगर) यांना मागून भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रॅक्टरने धडक दिली. या अपघातात शर्मा यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास खोटेनगर ते मानराजपार्कदरम्यान, उड्डाणपुलावर घडली. यावेळी मिटींग आटोपून जळगावात येत असलेल्या जिल्हा परिषदेचे सीईओ श्री.अंकीत यांना अपघात झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ रुग्णवाहिकेतून जखमीला जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. परंतू याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत मयत घोषीत केले.जळगाव तालुक्यातील बांभोरी येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात मेस चालविणारे पंकज शर्मा हे नेहमीप्रमाणे बुधवारी रात्री काम आटोपून विना क्रमांकाच्या बुलेटने घराकडे निघाले. खोटे नगर उड्डाणपुलावरुन…
मुक्ताईनगर प्रतिनिधी । मुक्ताईनगर पोलिसांनी गुरांची निर्दयतेने वाहतूक करणाऱ्या प्रकरणात महत्त्वपूर्ण कारवाई करून एक संशयित आरोपीस अटक केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. प्राण्यांवरील अत्याचारांबाबत जनतेत जागरूकता वाढवण्याची गरज या घटनेने पुन्हा अधोरेखित केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, वाहन क्रमांक (एमएच ४८ एवाय ०३५६) या चारचाकी वाहनामध्ये बैलांना निर्दयतेने वाहतूक केली जात होती. गुरांना वाहनात कोंबून ठेवून त्यांची सुरक्षितता धोक्यात टाकण्यात आली होती. मुक्ताईनगर ते मलकापूर राष्ट्रीय महामार्गावर खडसे फार्म हाऊस जवळ वाहनाची तपासणी करण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला होता. गोपनीय माहितीवर तातडीने कारवाई करत, पोलिसांनी वाहनाला थांबवले आणि वाहनातून निर्दयतेने कोंबलेल्या बैलांची सुटका केली. या घटनेतील मुख्य आरोपी…
मुक्ताईनगर प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे. कालच जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील तलाठ्याला ३ हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली होती. आज, मुक्ताईनगर तालुक्यातील काकोडा येथे ५ हजार रुपयांची लाच घेताना तलाठी आणि त्याच्या दोन खाजगी साथीदारांना रंगेहात पकडण्यात आले आहे.लाचेची मागणी:तक्रारदार हे जळगाव शहरातील रहिवासी असून, त्यांचे मूळ गाव कुऱ्हा (ता. मुक्ताईनगर) आहे. 1997 मध्ये त्यांच्या आजोबांच्या निधनानंतर त्यांच्या वडील, काका, आत्या आणि इतर नातेवाईकांची नावे 7/12 उताऱ्यावर नोंदवण्यात आलेली नव्हती. या कामासाठी तलाठी प्रशांत प्रल्हाद ढमाळे (वय-42, रा. चिखली, ता. मलकापूर, जि. बुलढाणा) यांनी शासकीय शुल्क भरण्याऐवजी…

