Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

जळगाव जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला असून अमळनेरचे माजी आमदार शिरीष चौधरी यांना नंदुरबार पोलिसांनी अटक केली आहे. चौधरी यांच्यावर दरोडा तसेच अॅट्रोसिटी (अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा) अंतर्गत गुन्हा दाखल असल्याने ही कारवाई करण्यात आली. या अटकेमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. नगरपालिका निवडणुकीनंतर माजी आमदार शिरीष चौधरी यांचे पुत्र प्रथमेश चौधरी यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाली होती. या निवडीनंतर काढण्यात आलेल्या विजय मिरवणुकीदरम्यान दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला. वादाचे रूपांतर पुढे हाणामारीत झाले आणि परिस्थिती चिघळली. याच घटनेनंतर रात्री संतप्त जमावाने शिरीष चौधरी यांच्या निवासस्थानी तोडफोड केल्याची घटना घडली होती. या प्रकरणानंतर दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात पोलिस…

Read More

धरणगाव | प्रतिनिधी“गावचा विकास हाच आमचा ओळख” या ब्रीदवाक्याला अनुसरून धरणगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर विकासकामांचा शुभारंभ करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. गुलाबराव पाटील यांच्या शुभहस्ते रविवार, १८ जानेवारी २०२६ रोजी भव्य भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.या भूमिपूजन सोहळ्यात तालुक्यातील सोनवद, अहीरे बु., चामगांव, बाभुळगाव आदी गावांमध्ये रस्ते काँक्रिटीकरण, ग्रामपंचायत कार्यालये, समाजमंदिरे, स्मशानभूमी रस्ते, गटारे, पथदीप व इतर मूलभूत सुविधांच्या विकासकामांचा शुभारंभ होणार आहे.कोट्यवधींच्या विकासकामांना मंजुरीया कार्यक्रमांतर्गत विविध गावांमध्ये सुमारे १ कोटी १५ लाखांपासून ते ९ कोटी रुपयांपर्यंत अंदाजित खर्चाच्या विकासकामांचे भूमिपूजन होणार आहे. यामध्ये ग्रामांतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण,स्मशानभूमी व…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र विजय पाटील : १६ जानेवारी – जळगाव महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीला घवघवीत यश मिळाले असून या विजयामागे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली प्रभारी म्हणून जबाबदारी सांभाळणारे आमदार मंगेशदादा चव्हाण व शहराचे आमदार राजुमामा भोळे या जोडगोळीच्या माध्यमातून करण्यात आलेले अचूक नियोजन निर्णायक ठरले आहे.मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व मंत्री गिरीशभाऊ महाजन यांनी जळगाव महापालिका निवडणुकीची जबाबदारी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्याकडे सोपवली होती. यापूर्वी जिल्हा दूध संघात सत्तांतर घडवत भाजपाची सत्ता प्रस्थापित करणे तसेच जिल्हा बँक नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत मिळवून दिलेले यश, या पार्श्वभूमीवर त्यांच्या संघटन कौशल्यावर विश्वास ठेवून…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज जळगाव | प्रतिनिधीजळगाव तालुक्यातील भोलाणे गावातील बस स्थानकाजवळ सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास बाळू सदाशिव कोळी (वय 38) यांचा निर्मम खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या खुनामागे त्यांच्याच जवळच्या मित्राचा हात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गंभीर अवस्थेत असलेल्या बाळू सदाशिव कोळी यांना जळगाव शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.या प्रकरणात आकाश नामक यांच्यावर संशय व्यक्त केला जात असून, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेऊन पंचनामा केला आहे.दरम्यान, खुनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलिसांकडून आरोपीची चौकशी…

Read More

जळगाव / नवी दिल्ली | १३ जानेवारी २०२६ —“अनेर नदी आमची माता आहे, मात्र आज याच नदीवरील पूल प्रशासकीय अनास्थेमुळे आमच्यासाठी कर्दनकाळ ठरत आहे,” अशी आर्त हाक चोपडा तालुक्यातील दगडी बु॥. येथील रहिवासी व दिल्ली विद्यापीठात कायद्याचे शिक्षण घेणारे गौरव संजय पाटील यांनी दिली. आपल्या परिसरातील नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी त्यांनी पुकारलेला कायदेशीर लढा अखेर यशस्वी ठरला असून, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) जळगाव जिल्हा प्रशासनाला आठ आठवड्यांच्या आत अनेर नदीवरील धोकादायक पुलाचा प्रश्न निकाली काढण्याचे कडक आदेश दिले आहेत. चोपडा तालुक्यातील मोहीदे आणि शिरपूर तालुक्यातील होळनांथे गावांना जोडणारा अनेर नदीवरील हा पूल गेल्या काही वर्षांपासून अत्यंत जीर्ण व धोकादायक अवस्थेत आहे.…

Read More

धरणगाव नगर परिषदेच्या स्वीकृत नगरसेवकपदी विनय उर्फ पप्पू भावे यांची निवड करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच धरणगाव शहराची नगरपालिका निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत पप्पू भावे यांच्या सौभाग्यवती वैशाली विनय भावे या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी महायुतीच्या उमेदवार होत्या. मात्र, त्यांना या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतरही नेतृत्व आणि कार्याचा योग्य सन्मान राखत, राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी विनय उर्फ पप्पू भावे यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड केली. या निर्णयामुळे भावे यांना योग्य तो न्याय मिळाल्याची भावना शहरात व्यक्त होत आहे. “गड आला पण सिंह गेला” असे म्हणत असतानाच, आता पप्पू भावे यांची पुन्हा एकदा नगरपालिकेत धडाकेबाज एन्ट्री झाली…

Read More

जळगाव प्रतिनिधी : धरणगाव तालुक्यातील सोनवद–अहिरे रस्त्यावर आज दुपारी एक भीषण अपघात घडला असून, या अपघातात बाभूळगाव येथील एकनाथ दयाराम मराठे या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या मातीने भरलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली आल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सोनवद परिसरातील वीटभट्ट्यांसाठी माती वाहतूक करण्यासाठी या रस्त्यावरून दिवसभरात पन्नासहून अधिक ट्रॅक्टर ये-जा करत असतात. आजही मातीने भरलेला एक ट्रॅक्टर भरधाव वेगात जात असताना रस्त्यावरून जात असलेल्या एकनाथ मराठे यांना धडक बसली. धडकेनंतर ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे चाक थेट त्यांच्या पोटावरून गेल्याने ते गंभीर जखमी झाले आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला.धरणगाव तालुक्यातील सोनवद–अहिरे रस्त्यावर झालेल्या भीषण अपघाताची माहिती…

Read More

घराघरातून मिळणाऱ्या पाठिंब्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण जळगाव (प्रतिनिधी):जळगाव शहर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असताना प्रभाग क्रमांक ९ मध्ये जयश्री राहुल पाटील यांना मतदारांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रचारादरम्यान नागरिकांकडून मिळणारा सकारात्मक प्रतिसाद, उत्स्फूर्त स्वागत आणि थेट संवादामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे.प्रभागातील विविध भागांत सुरू असलेल्या प्रचार फेऱ्या, घरभेटी आणि कॉर्नर सभांमधून जयश्री राहुल पाटील विकासाचा स्पष्ट अजेंडा मांडत असून, स्थानिक प्रश्नांवर ठोस उपाययोजनांचे आश्वासन देत आहेत. नागरी सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि महिलांसाठी सुरक्षिततेसह सर्वांगीण विकासाचा मुद्दा मतदारांना भावताना दिसत आहे.प्रचाराच्या प्रत्येक टप्प्यावर मतदारांचा वाढता ओढा पाहता, कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास अधिकच बळावला असून ‘प्रभाग…

Read More

जळगावच्या तापी महामंडळाच्या अधिकाऱ्याविरुद्ध पोलीस तक्रारजळगाव: माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागवलेल्या माहितीमध्ये चक्क बनावट पावती पुस्तके आणि खोटी , अपूर्ण कागदपत्रे पुरवून शासनाची व जनतेची दिशाभूल केल्याचा गंभीर प्रकार जळगावात उघडकीस आला आहे. याप्रकरणी तापी खोरे सर्वेक्षण व अन्वेषण विभागाचे जन माहिती अधिकारी तथा सहाय्यक अभियंता श्रेणी-१ श्री. निलेश दे. बाविस्कर यांच्या विरोधात जिल्हापेठ पोलीस स्टेशनमध्ये अजय बढे यांनी तक्रार दिली आहे.नेमके प्रकरण काय?जळगाव येथील कंत्राटदार श्री. अजय भागवत बढे यांनी मौजे आव्हाणी (ता. धरणगाव) येथील ‘बोदवड परिसर उपसा सिंचन योजने’ अंतर्गत २०१७ ते २०२४ या कालावधीत झालेल्या वाळू उपसा, वाहतूक आणि गौण खनिज खरेदीबाबत माहिती मागवली होती. यापूर्वी याच विषयावर…

Read More

महापालिका रणसंग्राम…जळगाव – शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीचे वातावरण तापू लागले असून प्रभाग क्रमांक ७ मध्ये उमेदवार चंद्रशेखर प्रकाश अत्तरदे यांच्या प्रचार मोहिमेचा प्रारंभ रविवारी सकाळी करण्यात आला. गणेश कॉलनीतील गुरुदेव दत्त मंदिर परिसरात सकाळी १० वाजता नारळ फोडून या प्रचाराचा शुभारंभ झाला. या वेळी आमदार राजूमामा भोळे तसेच दिनकर गुरुजी उपस्थित होते. दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रभाग क्रमांक ७ मध्ये अ मधून दीपमाला मनोज काळे, ब मधून अंकिता पंकज पाटील आणि क मधून विशाल सुरेश भोळे हे बिनविरोध निवडून निश्चित झाले आहेत. मात्र प्रभाग ड मध्ये अत्तरदे हे निवडणूक रिंगणात उतरले असून त्यांचा प्रचार जोमाने सुरू झाला आहे. आमदार राजूमामा…

Read More