जळगाव : प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल. तर जळगावचे पालकमंत्रीपद पुन्हा एकदा गुलाबराव पाटील यांच्याकडे आले आहे. मुख्यमंत्री पदाची तर फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ ३० जूनला घेतली होती. ९ ऑगस्टला भाजपच्या ९ तर शिंदे गटाच्या ९ कॅबिनेट मंत्र्यांचा शपथविधी झाला होता. तेव्हापासून पालकमंत्रीच नियुक्त न झाल्याने अनेक अडचणी येत होत्या.
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
एरंडोल प्रतिनिधी । वडीलोपार्जीत घराच्या जागेवरून मोठ्या भावाने लहान भावाचा मुसळी मारून खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे जळगाव जिल्हा हादरला आहे. याबाबत कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, एरंडोल तालुक्यातील भातखंडेच्या जवळ गिरणा नदीपात्रात एका इसमाचा मृतदेह आढळून आला होता. हा व्यक्ती तालुक्यातील उत्राण (गु.ह.) येथील सत्यवान धोंडू महाजन यांचा असल्याची ओळख पटली. त्यांचा मृत्यू गिरणेच्या पाण्यात वाहून गेल्याने झाला नव्हता, तर त्याचा खून झाल्याची धक्कादायक माहिती तपासात निष्पन्न झाली. या प्रकरणी सत्यवान महाजन यांना त्यांचाच मोठा भाऊ भगवान धोंडू महाजन याने संपविल्याची माहिती मिळाली. यानंतर त्याला बेड्या ठोकण्यात आल्या…
जळगाव-प्रतिनिधी । एमआयडीसी हद्दीलत हॉटेल कस्तूरीजवळ एका खड्ड्यात गायीचा पडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार १६ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजता उघडकीला आली आहे. प्रशासनाच्या कारभारामुळे अनेकांना अपघातास सामोरे जावे लागत आहे. जळगाव शहरातील खड्डे हे सर्वश्रृत आहे. जळगाव शहरातील एकही रस्ता असा नाही तो चांगला असेल. शहरातील रस्ते तयार व्हावे अशी मागणी अनेक वर्षापासून आहे. परंतू अद्यापही शहरातील गल्लीतील रस्ते तर सोडाच मुख्य रस्ते देखील होण्यास तयार नाही. शासकीय कामांचे नावे सांगून आहे ते रस्त्यांमध्ये खड्डे केले जात आहे. असे असतांनाच एमआयडीसी हद्दीतील हॉटेल कस्तूरी जवळ पाण्याच्या पाईप लाईनच्या दुरूस्तीसाठी केलेल्या खड्ड्यात एका गायीचा पडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी १६…
पाचोरा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक किसनराव नजन-पाटील यांच्याकडे जळगाव एलसीबीचा पदभार सोपविण्यात आला आहे. याबाबतचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी गुरूवारी १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी काढले आहेत. मराठा समाजाच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांचे रिक्तपदावर आता पाचोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किसनराव नजन-पाटील यांची नियुक्त करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ प्रविण मुंढे यांनी काढले आहे. पोलीस अधिक्षकांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, पाचोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किसनराव नजन-पाटील यांनी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचा अतिरिक्त पोलीस निरीक्षक पदाचा पदभार पुढील आदेश येईपर्यंत आहे. तसेच पाचोरा…
कोळंबा येथे जाऊन साडी चोळी देऊन केला गौरव कोळंबा (ता चोपडा) : बिबट्यापासून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तापी नदीत उडी घेतलेल्या कोळंबा येथील लताबाई बाविस्कर यांचा आज जिल्हा बँकेचे चेअरमन तथा माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी साडी चोळी देऊन सत्कार केला. चार दिवसांपूर्वी शेतात लताबाई दिलीप बाविस्कर या शेंगा तोडत असताना बिबट्या त्यांच्या दिशेने येताना दिसला. त्यावेळी एकीकडे काटेरी झुडपे तर दुसरीकडे तापीमाई असल्याचे त्यांना दिसले. क्षणाचाही विलंब न लावता लताबाई यांनी तापी नदीमध्ये उडी घेतली. दुपारी चार वाजेला घडलेल्या या घटनेनंतर केळी खांबाच्या सहाय्याने त्या दुसऱ्या दिवशी पोहोत पोहत अमळनेर तालुक्यातील नीम गावाच्या पांथ्यापर्यंत पोहोचल्या होत्या. त्या ठिकाणी ग्रामस्थांनी त्यांना…
जळगाव प्रतिनिधी । कुटुंबिक वादातून संतापाच्या भरात कुणाला काहीही न सांगता ३२ वर्षीय विवाहिता शिवकॉलनीतून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत रामानंदनगर पोलीसात घटनेची नोंद करण्यात आली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, वैशाली ज्ञानेश्वर पाटील (वय-३२) रा. शिवकॉलनी, जळगाव हे आपल्या कुटुंबियासह वास्तव्याला आहेत. ५ सप्टेंबर रोजी घरात झालेल्या कौटुंबिक वादातून कुणाला काहीही न सांगता बेपत्ता झाल्या आहेत. त्याच्या नातेवाईकांसह पती ज्ञानेश्वर पाटील यांनी विवाहितेचा सर्वत्र शोध घेतला परंतू अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही. याबाबत रामानंद नगर पोलस ठाण्यात धाव घेवून हरविल्याची खबर दिली. याबाबत रामानंद नगर पोलीसात नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सुनिल पाटील करीत आहे.
जळगाव: शहरातील अजिंठा चौकातील बाफना शोरून समोरून एका तरूणाची २५ हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैभव हरीदास निंबाळकर (वय-२४) रा. कानळदा रोड, शिवाजी नगर, जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. रविवार ६ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास वैभव निंबाळकर हा (एमएच १९ सीएस ४०७१) क्रमांकाची दुचाकी घेवून अजिंठा चौकातील बाफना कंपनीच्या समोर आला होता. त्यावेळी दुचाकी पार्क करून लावली होती. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेल्याचे उघडकीला आले. वैभवने सर्वत्र दुचाकीचा शोध घेतला परंतू त्याला दुचाकी कुठेही मिळाली नाही.पाच दिवसानंतर…
एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल मेहरुण परिसरातील सारा हॉस्पिटलजवळून आयशर ट्रक लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील मेहरुण परिसरातील रामनगरात जावीद लतिफ पटेल हा तरुण वास्व्यास असून त्याच्याकडे (एमएच १९ सीवाय ४८४६) क्रमांकाचा आयशर ट्रक आहे. हा ट्रक चालवून तो कुटुंबाचा उदनिर्वाह करतो. दि. ८ रोजी रात्री ११ वाजता नाशिकहून आल्यानंतर त्यांनी आपला ट्रक सारा हॉस्पिटलच्या मुख्य रस्त्यावर लावला होता. दरम्यान, मध्यरात्रीच्या सुमारास त्यांचा ट्रक अज्ञात चोरट्यांनी लांबवून नेला. सकाळी जावीद यांचे वडील दूध घेण्यासाठी गेले असता, त्यांना आपल्या मुलाचा ट्रक याठिकाणी दिसून आला नाही. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत…
जळगाव प्रतिनिधी । नवीन बसस्थानकाच्या पाठीमागे असलेल्या ओमकारनगरात झाड कोसळल्याने एका चार चाकी वाहनाचे नुकसान झाले आहे. रविवारी ११ सप्टेंबर रोजी मध्यरात्री जळगाव शहरात मुसळधार पाऊस झाला. यावेळी शहरातील ठिकठिकाणी रस्त्यांवर वाहतूकीची कोंडी झाली होती. तर नवीन बसस्थानकाच्या पाठीमागे असलेल्या ओमकार नगरातील के.के. हॉस्पिटल समोर आलेले मोठे झाड कोसळले आहे. या मध्ये एका चार चाकी वाहनाचे नुकसान झाले आहे. या घटनेत सुदैवाने कुणालाही दुखापत झालेली नाही. मोठे झाड कोसळल्याने रस्त्यावरील वाहतूक थांबविण्यात आली होती. जळगाव महानगरपालिकेच्या वतीने पडलेले झाड बाजूला करण्याचे काम हाती घेतले होते.
एमआयडीसी पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल जळगाव प्रतिनिधी । शिरसोली दापोरा रोडवर काहीही कारण नसताना तरुणाशी वाद घालून चौघा भावांनी बेदम मारहाण करून दुखापत केल्याची घटना शुक्रवार ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता घडली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, अतुल अशोक ढवळे (वय-३८) रा. ल हनुमान मंदिर शेजारी दापोरा जळगाव हा आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शुक्रवार ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता शिरसोली ते दापोरा रोडवर असलेल्या एका ठिकाणी काहीही कारण नसताना अतुल ढवळे याच्याशी नाना दशरथ देवरे यांनी वाद घातला. त्यानंतर नाना दशरथ देवरे, रवींद्र दशरथ देवरे, बंडू…

