लाईव्ह महाराष्ट्र: चंपाषष्ठी निमित्त जळगाव जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. याच पद्धतीने मंगळवारी एरंडोल तालुक्यातील तळई येथे चंपाषष्ठी निमित्त बारागाडे ओढण्याचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात तळई गावातील ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. या गर्दीत राहूल पाटील हा देखील त्यांच्या मित्रासोबत उभा होता. यावेळी बारा गाड्यांजवळून गर्दीत पळताना पायात पाय अडकल्याने राहूल बारागाड्यांच्या समोर आला. या दुदैवी घटनेत त्याच्या पोटावरून चाक गेल्याने राहुल गंभीररित्या जखमी झाला होता त्याला रुग्णालयात उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला आहे. एरंडोल तालुक्यातील तळई गावात हि धक्कादायक घटना घडली आहे. हि घटना मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजता घडली. या तरूणाचा जळगाव जिल्हा शासकीय…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
लाईव्ह महाराष्ट्र न्यूजजिल्हा दुध संघाची निवडणूक गेल्या दोन दिवसापासून जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापवून टाकले होते. त्यावर राजकीय नेते मंडळींनी बऱ्याच टिकाटिपण्णी केल्या पण आज सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने काढलेल्या जीआरनुसार जिल्हा दुध संघाची निवडणूक 20 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात येत असल्याची खात्रीलायक वृत्त आहे. शासनाच्या परिपत्रकात म्हटले आहे की, राज्य निवडणूक आयोगाने दिनांक 09.11.2022 रोजीच्या आदेशान्वये दिनांक 18.11.2022 ते दिनांक 20.12.2022 या कालावधीत राज्यातील 7751 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहिर केला असून, यामध्ये निवडणूकीची नोटीस प्रसिद्ध करणे, नामनिर्देशन मागवून छाननी करणे, नामनिर्देशन मागे घेणे. मतदानाचा दिनांक, मतमोजणी व निकाल घोषीत करण्याचा दिनांक नमूद केला आहे. सदर 7751 ग्रामपंचायतींचा निकाला दिनांक 20.12.2022…
Live maharashtra: भरधाव अज्ञात वाहनाने मोटरसायकलला धडक दिल्याने मोटरसायकल वरील एक जण जागेवरच ठार झाला तर एकाचा जळगांव येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना भडगाव रोडवरील अंकीत काॅटन जिनिंग जवळ घडली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, गोपाल गोवर्धन पुजारी (वय – ४०) रा. बाहेरपुरा, पाचोरा व खुशाल अर्जुन सोनार (वय – २५) रा. संभाजी नगर, पाचोरा हे दि. २८ नोव्हेंबर रोजी आमडदे ता. भडगाव येथे यात्रेत व्यवसायासाठी जागा सांभाळण्यासाठी दि. २७ नोव्हेंबर रोजी आमडदे येथे गेले होते. २७ रोजी रात्री उशिरा आमडदे येथुन मोटरसायकलने पाचोरा येथे येण्यासाठी निघाले. दरम्यान रात्री १२ ते १ वाजेच्या सुमारास भडगाव ते पाचोरा दरम्यान…
एरंडोल : शहरातील रेणुका नगरात अंघोळ करताना गिझरमधून गॅसची गळती झाल्याने गुदमरून साई उर्फ यश वासुदेव पाटील (16) या मुलाचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना सोमवार, 21 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली.गॅस गळतीमुळे जागीच झाला मृत्यूएरंडोल शहरातील रा.ती. कावरे विद्यालयाचा विद्यार्थी यश पाटील हा सोमवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास अंघोळीसाठी गेला मात्र बराच वेळ झाल्यामुळे तो बाथरूममधून बाहेर न आल्यामुळे आई-वडिलांना चिंता वाटल्याने त्यांनी दरवाजा ठोठावला असता काही एक प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी दरवाजा तोडण्यात आला असता तो बेशुद्धावस्थेत आढळल्याने त्याला खाजगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. यावेळी आई-वडिलांनी एकच हंबर्डा फोडला. हे वृत्त…
लाईव्ह महाराष्ट्र :हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दीन निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते बाळासाहेब हे अमर राहितील त्याचे विचार आजही जिवंत आहे बाळासाहेब म्हणजे हिंदुत्व देशात बाळासाहेब ठाकरे यांचे वेगळे च वलय होते मराठी माणसाला न्याय मिळाव म्हणून ते लढत राहीले असे मत प्रतापराव पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी भाजपचे ओ बी सी सेल जिल्हा अध्यक्ष संजय महाजन भाजपचे मा गटनेते कैलास माळी सर माजी नगराध्यक्ष पी एम पाटील सर यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी उपस्थित जि.प.सदस्य प्रतापराव पाटील, अॅड.संजय महाजन, पी.पाटील, मोतीआप्पा पाटील, सुनील चौधरी, कैलास माळी, विजय महाजनविलास महाजन, कडू महाजन, अॅड.वसंतराव भोलाणे,…
धरणगाव प्रतिनिधी गौरव पाटील: तालुक्यातील विविध गावातून शहरात शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना आज दि.17 रोजी सांयकाळी 5 वाजेला शाळा सुटल्यानंतर ही बस उपलब्ध न झाल्याने घटनास्थळी ठाकरे गटाचे गुलाबराव वाघ व निलेश चौधरी यांनी बस आगार प्रमुखांशी चर्चा करून रात्री 7.30 वाजेच्या सुमारास बस आल्याने विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला होता. शाळेत शिक्षण घेण्यासाठी धरणगाव तालुक्यातील विविध गावातून विद्यार्थी हे धरणगाव शहरात येत असतात, तालुक्यातील विद्यार्थी हे बसने प्रवास करीत असून शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घरी जाण्याची ओढ लागले असतांनाच बस वेळेवर न आल्याने विद्यार्थी कंटाळून जात असतात. गेल्या काही दिवसापासून किमान दोन ते तीन दिवस बस वेळेवर येत नसल्याने विद्यार्थ्यांना बस…
शहरातील शिव कॉलनी रेल्वे उड्डाण पुलाजवळ भरधाव डंपरने दुचाकीला जोरदार धडक देताच दुचाकीवर बसलेल्या तरुणीचा जागीच ठार झाल्याची घटना आज दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली आहे. जळगावकडून धुळ्याकडे जाणारा डंपर क्रमांक (एमएच १९ सीवाय ३३११) हा शिव कॉलनी कडून रेल्वे उड्डाणपुलाकडे जात होता. त्यावेळेस पुढे जाणारी मोपेड दुचाकी (एमएच १९ सी ७१६९) याला डंपरने मागून जोरदार धडक दिली. यात दुचाकीवर बसलेल्या मनस्वी उर्फ ताऊ सुभाष सोनवणे (२०) रा. खोटे नगर, जळगाव या तरुणीचा जागीच मृत्यू झाला. तर या अपघातात तरुणीचा भाऊ नचिकेत सुभाष सोनवणे (२५) रा. खोटे नगर, जळगाव हा थोडक्यात बचावला आहे. ही दुर्घटना आज दुपारी ४ वाजेच्या सुमारास…
दिल्ली हत्याकांड सध्या देशभरात चर्चेचा विषय बनला आहे. श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करून आफताबने ते फ्रीजमध्ये ठेवले होते. यानंतर आफताब एका डेटिंग App च्या सहाय्याने नवीन प्रेयसीच्या शोधात होता. या प्रकरणात आफताब पूनावाला या नावाच्या मुलाने त्याची गर्लफ्रेंड असलेली श्रद्धा वॉकरची निर्घृणपणे हत्या केली. तिची हत्या करून तो थांबला नाही. तर, हत्या केल्यानंतर अत्यंत क्रूर व निर्दयीपने मृतदेहाचे तुकडे करून काही दिवस फ्रीजमध्ये ठेवले. कुणालाही याबाबत माहित किंवा शंका होऊ नये या उद्देशाने तो हळू-हळू मृतदेहाचे तुकडे जंगलात फेकून दिले. या प्रकरणात सातत्याने नव-नवीन धक्कादायक महित् समोर येत आहेत. आफताबने मृतदेहाचे ३५ तुकडे करून अनेक दिवस फ्रीजमध्ये ठेवले होते. आफताब याने…
राष्ट्रवादीच्या नेत्यांतर्फे निवासस्थानी सत्कार…! लाईव्ह महाराष्ट्र न्यूज ; दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशनच्या संचालक मंडळ निवडणुकीत जळगाव जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर यांची नाशिक विभागातून बिनविरोध निवड झाली आहे. त्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती, माजी खासदार वसंतराव मोरे, माजी आमदार दिलीप वाघ, राष्ट्रवादी सहकार विभागाचे जिल्हाध्यक्ष वाल्मीक पाटील, संजय गरुड आदींनी श्री देवकर यांच्या निवासस्थानी त्यांचा सत्कार केला. राज्य सहकारी बँक असोसिएशनच्या संचालक मंडळासाठी 21 पैकी दहा संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित जागांसाठी 22 नोव्हेंबरला मतदान, तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मतदार संघातून नाशिक विभागाकडून जळगाव जिल्हा बँकेचे…
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जळगाव जिल्ह्यात घरफोडी, दुकान फोडीच्या गुन्ह्यांत वाढ झाल्याने पोलीस अधीक्षक एम.राज कुमार व अपर चाळीसगाव पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांना त्याप्रमाणे सूचना व मार्गदर्शन केले. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांना दि. १३ रोजी गुप्त बातमीदार मार्फत बातमी मिळाली की, भडगाव तालुक्यातील कजगाव येथील मिथुनसिंग मायासिंग बावरी याने पाळधी ता, धरणगाव येथील एका पज्याचे दुकानाचे कुलूप तोडून त्यातील मोबाईलव इतर चार्जिंगवस्तु चोरी केल्या असून त्यातील रियलमो कंपनीचा मोबाईल हॅण्डसेट त्याचे ताब्यात असून तो मोबाईल तो वापरत असल्याची माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोनी. किसन…

