नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना शहर पोलीकडून अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सहा वेगवेगळ्या कंपन्यांचे 65 हजार रुपये किमतीचे मोबाईल हस्तागत करण्यात आले आहेत. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला गर्दीचा फायदा घेत चोरीच्या उद्देशाने दोन चोरटे दाणा बाजार परिसरात फिरत असल्याची गुप्त माहिती डीबी पथकातील कर्मचाऱ्यांना मिळाली. त्यानुसार सापळा रचत शहर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी दाणा बाजार परिसरातून आरोपी सर्वजीत कुमार अर्जुन महतो (वय 24 रा. नया टोल कल्यानी महाराजापूर बाजार ता. तालझरी जि. साहेबगंज झारखंड) व सनी कुमार महेंदार नोणी या (वय 23 रा. नया टोल कल्यानी महाराजापूर बाजार ता. तालझरी जि. साहेबगंज झारखंड )या दोघांना…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
लाईव्ह महाराष्ट्र न्युज तालुक्यातील एका गावात भरदिवसा एका दरोडेखोराने वृध्दाचे हातपाय बांधून चाकूचा धाक दाखवत कपाटातून ६ लाखाची रोकड आणि ३० ग्रॅम सोन्याचे दागिन्यांचा मुद्देमाल जबरी लूट केल्याचा धक्कादायक प्रकार आज दि २९ रोजी दुपारी घडला आहे. मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील दुसखेडा येथील रहिवासी ८७ वर्षीय वृद्ध एकनाथ पांडू पाटील गुरुवारी २९ डिसेंबर रोजी दुपारी १.३० सुमारास त्यांचा मुलगा शेतात कामाला असताना तर घरातील महिला गल्लीत एका महिलेकडे पापड बनवण्याचे काम करताना व्यस्त होते. त्यामुळे वृध्द बाबा हे घरात एकटेच पलंगावर झोपलेले होते. दुपारी दीड वाजेच्या सुमारास एक दरोडेखोर त्यांच्या घरात घुसला. त्यावेळी त्याने हाताला मोजे आणि तोंडाला रूमाल…
तर जिल्हा मोती बिंदू मुक्त करणार – वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांचे प्रतिपादन मुदतीत व दर्जेदार बांधकाम व सुंदर वास्तू उभारल्याबद्दल मंत्री महोदयांनी केले कौतुकनशिराबाद/जळगाव, दिनांक २५ (प्रतिनिधी ) : नशिराबाद हे बाजारपेठेचे व व लोकवस्तीचे मोठे शहर असून बेरोजगारांच्या गरजा लक्षात घेता नशिराबाद – उमाळा परिसरात मोठा प्रकल्प उभारण्याचा मानस आहे. ते पुढे म्हणाले की, नशिराबादच्या विकासासाठी आपण भरीव निधी दिला असून यातील नगर विकास व डीपीडीसी मधून १० कोटींची कामे सुरु आहेत. CRF व बजेट अंतर्गत नशिराबाद ते सुनसगाव या ५ किमीच्या रस्त्यासाठी १५ कोटी निधी मंजूर आहे. यात गावाजवळील भातातील दोन्ही बाजूला कॉन्क्रीट गटारी व काँक्रीट…
जळगाव – महापालिकेची महासभा महापौर जयश्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली. व्यासपीठावर उपमहापौर कुलभूषण पाटील, आयुक्त देविदास पवार होते. विषयपत्रीकेवरील प्रस्ताव सुरू करण्यापूर्वीच उपमहापौरांवर ठेकेदाराना कामे न करू देण्याबाबतचा आरोप त्याच्यावर करत महासभेच गदारोळ झाला. भाजपच्या नगरसेविका ऍड. शुचिता हाडा यांनी आरोप करत शिवसेनेचे उपमहापौरांनी प्रभु श्रीरामचंद्र यांचा उपमहापौरांनी अपमान केला असून रामा पेक्षा रावण त्यांना श्रेष्ठ वाटत आहे. त्यांना त्यांच्या पदावर बसण्याचा अधिकार नसून त्यांनी त्या खुर्चीवर व व्यासपीठावर बसू नये, शिवसेनेचे इतर सदस्य त्यांना पाठराखण करत आहे असे आरोप केले. तसेच उपमहापौर यांच्या विरुद्ध घोषणाबाजी केली. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला प्रभु श्रीरामचंद्र यांचा अपमान करण्याचा कोणताही उद्दीष्ट…
लाईव्ह महाराष्ट्र न्युज – महापालिकेची महासभा महापौर जयश्री महाजन यांच्या आज अध्यक्षतेखाली झाली. व्यासपीठावर उपमहापौर कुलभूषण पाटील, आयुक्त देविदास पवार, नगरसचिव सुनील गोराणे उपस्थित होते. महासभेच्या सुरवातीला महापौरांनी सदस्यांनी आयत्या वेळी प्रश्न उपस्थित करण्याच्या मांगण्यावर चार दिवसात प्रस्ताव पाठवून लगेच महासभेची तारीख निश्चीत करून ते प्रस्ताव त्यात घेण्याची सांगितले. विषयपत्रीकेवरील प्रस्ताव सुरू करण्यापूर्वीच उपमहापौरांवर ठेकेदाराना कामे न करू देण्याबाबतचा आरोप त्याच्यावर करत महासभेच गदारोळ झाला. गदारोळ वाढत गेल्याने महापौरांनी महासभा अनिश्चीत काळासाठी सभा तहकुब केली. तर भाजपचे सदस्यांनी सभागृहात थांबून सभा सुरू होण्याची वाट पाहत होेते. सभागृहात ऑडीओक्लिप आणि उडाली खळबळ उपहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर भाजपने आरोप करीत ते सत्तेचा…
ग्राम पंचायत निवडणुकीत एकतर्फी यश : १९ पैकी बाळासाहेबांची शिवसेनेचे १६ पंचायतीमध्ये भगवा ! ३ अपक्षही सेनेच्या संपर्कात : वराड बु. येथे पहिल्यांदा यश : १९ ग्रामपंचायतीत १४३ पैकी तब्बल १२५ सदस्य बाळासाहेब सेनेचे जळगाव प्रतिनिधी :- जळगाव व धरणगाव तालुक्यातील १९ ग्रामपंचायतीसाठीची निवडणूक नुकतीच पार पडली. १९ पैकी २ ग्राम पंचायती याआधीच बिनविरोध झाल्यामुळे मंगळवारी १७ ग्राम पंचायतीचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये जळगाव तालुक्यातील १२ पैकी १० तर धरणगाव तालुक्यातील ७ अशा ६ अश्या १९ पैकी १६ ग्राम पंचायतीमधील जनतेने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर आपला विश्वास कायम ठेवत, बाळासाहेबांची शिवसेनेच्या उमेदवारांचा दणदणीत विजय झाला आहे.त्यामुळे पुन्हा एकदा…
जळगाव : प्रतिनिधी राज्यात सर्वत्र ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर विजय व पराभवाचे चित्र पहावयास मिळत आहे. परंतु, जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील टाकळी येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकाल लागल्यानंतर दोन गट आमनेसामने येत त्याच्यात राडा झाला आणि वाद वाढत तुफान दगडफेक झाली. यात भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. राज्यातील बहुतांश ग्रामपंचायतींवर भाजपने विजय मिळविला आहे. यात जामनेर तालुक्यातील ग्रामपंचायतींवर देखील भाजपचे वर्चस्व राहिले आहे. जामनेर तालुक्यातील टाकळी खुर्द येथील ग्रामपंचायत निवडणुक निकालानंतर विजयी झालेल्या उमेदवारांनी गावात प्रवेश करताच त्यांच्यावर पराभुत झालेल्या विरोधकांकडुन तुफान दगडफेक केली. पोलीसांनी संशयीतांची धरपकड करून सुमारे २०-२५ जणांना ताब्यात…
पोलीस उपविभागीय अधिकारी ऋषिकेश रावले यांची मतदान केंद्राला भेट जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज सकाळपासून सरपंच पदासाठी प्रत्येक गावात मतदान प्रक्रिया सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर धरणगाव तालुक्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर चोपडा विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी ऋषिकेश रावले यांनी भेट देत पाहणी केली.नेहमीप्रमाणे ग्रामीण भागातील निवडणूक ही जोरदार रंगत असते त्यातच वादविवाद टाळण्यासाठी नेहमी पोलीस प्रशासन सज्ज असते त्याचाच एक भाग म्हणून जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात होत असलेल्या ग्रामीण भागातील सरपंच पदासाठी आज सकाळपासून मतदानाची प्रक्रिया जोरदार सुरू आहे यावेळी प्रत्येक गावातील उमेदवारांनी सरपंच पदाचे माळ गळ्यात पडण्यासाठी मोठे प्रयत्न केले आहे आज त्यांचे भवितव्य मतदान पेटीत बंद होणार आहे. धरणगाव…
लाईव्ह महाराष्ट्र न्युज जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून पशुधानाच्या चोरीत वाढ झालेली होती, त्याबाबत पोलिसात गुन्हे दाखल होती. याबाबत एलसीबीच्या पथकाने जळगावसह मालेगाव व धुळे येथील ७ जणांची टोळीला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी २२ गुन्ह्यांची कबुली मिळाली असून २ स्कॉर्पिओसह मोबाईल पोलिसांनी जप्त केले होते. जळगाव जिल्ह्यात गुरे चोरीच्या गुन्हयांत सातत्याने वाढ होत असल्याने पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांना सूचना व मार्गदर्शन केले होते. चोरट्यांचा शोधार्थ किसनराव नजनपाटील यांनी पोलीस उपनिरीक्षक गणेश चोभे, सहाय्यक फौजदार रवी नरवाडे, युनूस शेख, पोहेकॉ संजय हिवरकर, पोहेका राजेश मेढे, पोहेको…
लाईव्ह महाराष्ट्र न्युज : राज्यात विधान परिषदेच्या पदवीधर मतदार संघ निवडणुकीची सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी केली जात असून, या निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे व माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी माजी पालकमंत्री व जिल्हा बँकेचे चेअरमन अप्पासाहेब गुलाबराव देवकर यांच्याशी चर्चा केली. पदवीधर मतदार संघासाठी महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार आमदार तांबे यांनी उत्तर महाराष्ट्रातील मतदार व मविआच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेणे सुरू केले आहे. त्यासाठी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना आमदार तांबे व बाळासाहेब थोरात यांनी आज आप्पासाहेब देवकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन निवडणुकीच्या तयारी संदर्भात साधक-बाधक चर्चा केली. मविआच्या नेत्यांची या निवडणुकीत महत्त्वाचे भूमिका राहणार असून, आपल्या…

