जळगाव;- शहरातील नवीन बस स्थानकासमोरील रस्त्यावर सुप्रीम कंपनीच्या सहकार्यातून नियोजित अत्याधुनिक सुलभ शौचालय निर्माण केले जाणार आहे. हे शौचालय क्रीडा संकुलाजवळ पोलीस मल्टीपर्पज हॉलबाहेर स्थलांतरित करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अर्बन सेलच्या जिल्हाध्यक्षा डॉ.अश्विनी विनोद देशमुख यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी केली आहे. यासंदर्भातील निवेदन त्यांनी उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांना पाठविले आहे. राष्ट्रवादी अर्बन सेलतर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अत्याधुनिक शौच्यालयाच्या बांधकामाला प्रथम दर्शनी कोणाचा विरोध नाही. परंतु ज्या ठिकाणी सुप्रीम कंपनीच्या सहकार्यातून अत्याधुनिक शौचालयचे बांधकाम नियोजित आहे. त्या जागेवर बांधकाम होवू नये ही जनभावना आहे. अत्याधुनिक शौचालयाचे बांधकामासाठी निश्चित करण्यात आलेल्या नवीन बसस्थानकासमोरील जागेजवळ नागरिकांचे श्रद्धास्थान असलेले “चिमुकले राम मंदिर…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
जळगाव ;- जिल्ह्यात क्रोरोना आजाराचा संसर्ग कमी झालेला असून जिल्ह्यातील विविध ठिकाणी २८ रुग्णांवर उपचार सुरु असून आज ३ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून ५ जण बरे होऊन घरी परतले आहेत . जळगाव शहरात ३ बाधित रूग्ण तर उर्वरित सर्व तालुका निरंक असल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ४२ हजार ६७८ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार ७५ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर २८ बाधित रूग्ण जिल्ह्यातील विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आजवर जिल्ह्यात एकुण २ हजार ५७५ बाधित रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे .
जळगाव;- शहरातील वसंतस्मृती भाजपा कार्यालय येथे भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा ग्रामीणची महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत येत्या आगामी निवडणूका जिल्हा बँक, दूध संघ, नगरपालिका, जिल्हा परिषद पंचायत समिती जळगाव जिल्ह्यात माजी मंत्री गिरिष महाजन यांच्या नेतृत्वाखाली लढवणार असे जिल्हाध्यक्ष आ.राजुमामा भोळे यांनी समारोप प्रसंगी सांगितले. या बैठकीत मा. डॉ. राजेंद्र फडके व माजी आ. स्मिताताई वाघ यांनी संघटनात्मक विषयात मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे संघटनात्मक आढावा जिल्हा सरचिटणीस सचिन पानपाटील यांनी केले व जिल्हा परिषदेच्या सूचना जिल्हा सरचिटणीस मधुभाऊ काटे यांनी केल्या. आभार जिल्हा सरचिटणीस हर्षल पाटील यांनी केले. या बैठकीला आ. मंगेश चव्हाण, जिल्हा परीषद अध्यक्षा ना. रंजनाताई पाटील, उपाध्यक्ष…
जळगाव ;- भारतात असलेल्या तरूण मनुष्यबळाचा वापर कशा पध्दतीने करता येतो याचा परिपाठ विद्यापीठाने कोविडच्या या काळात ज्येष्ठ नागरिक सहाय्यता दूत तयार करून घालून दिला असल्याचे प्रतिपादन शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन व अध्ययन व विस्तार विभागाच्यावतीने सुरू असलेल्या ‘ज्येष्ठ नागरिक सहाय्यता दूत’ प्रशिक्षण शिबीराचे आयोजन दि.१७ ते दि.२१ ऑगस्ट या कालावधीत विद्यापीठाच्या अधिसभागृहात करण्यात आले. त्याचा आज समारोप झाला. समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्र-कुलगुरू प्रा.बी.व्ही.पवार होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती रंजना पाटील, व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद, यांची उपस्थिती होती. डॉ.…
जळगाव;- डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाची वैष्णवी किशोर लोखंडे हिने राहत्या घरी आत्महत्या केल्यानंतर महाविद्यालयात आज तिला श्रध्दांजली सभेतून शोक भावना व्यक्त करण्यात आल्यात व परिसरात तिची आठवण राहावी म्हणून वृक्षरोपण करण्यात आले. यावेळी संस्थाध्यक्ष माजी खा. डॉ उल्हास पाटील, अधिष्टाता एन एस आर्विकर,स्त्रीरोग तज्ञ माया आर्विकर, डॉ. सी. डी. सारंग, डॉ विठठल शिंदे, डॉ. बापूराव थिटे, डॉ विजय मोरे, प्रशासन अधिकारी प्रमोद भिरूड इ मान्यवर उपस्थीत होते. यावेळी वैष्णवी ही सर्व मित्र मैत्रीणीची लाडकी होती तिच्या अचानक जाण्याने अनेकांना धक्का बसला. तिच्या आठवणीसाठी एक वृक्ष लावून संगोपन करण्यात येणार असल्याचे डॉ. बापुराव थिटे यांनी मनोगतातून सांगितले .…
जळगाव ;- येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या द्वितीय वर्षात एमबीबीएसचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. वैष्णवी किशोर लोखंडे (वय २२) असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. वैष्णवी लोखंडे ही समर्थ कॉलनी, एम जे कॉलेज पाठीमागे राहत होती. वैष्णवी अभ्यासामध्ये हुशार होती. ती नेहमी सर्वांशी मनमिळावूपणे वागायची, असे तिच्या मित्र-मैत्रिणींनी सांगितले. तिचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आले. सीएमओ डॉ. नीता भोळे यांनी तिला तपासून मृत घोषित केले. याबाबत पुढील तपास रामानंद नगर पोलीस करीत आहेत. मृत वैष्णवीच्या पश्चात आई, वडील व लहान भाऊ आहे.
जळगाव ;- केंद्र सरकारने गॅससह पेट्रोल-डीझेल, खाद्य तेल आदींची दरवाढ केली आहे. या महागाईविरोधात आज जळगावमधील टॉवर चौकात राष्ट्रवादी काँग्रेस महिलाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी गॅस सिलेंडरला हार चढवून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी गॅस दर वाढ विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. मोदी सरकारने अच्छे दिनाचे स्वप्न दाखविले होते. मात्र, अच्छे दिन न येत महागाईत वाढ झाली असल्याचा आरोप महिला आघाडी महानगरध्यक्षा मंगला पाटील यांनी केला. गॅससह पेट्रोल-डीझेल, खाद्य तेल आदींची दरवाढ मागे घेतली नाही तर नागरिक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असे त्यांनी पुढे सांगितले. यानंतर टाॅवर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत…
जळगाव ;- यावल तालुक्यातील दहीवद येथील व्यापाऱ्याला गॅसची डिलरशीप देण्याचे आमिष दाखवून १० लाख ३० हजाराची ऑनलाईन फसवणूक करणारेदोन भामट्याना सायबर पोलीसांनी अटक केली आहे.संशयित आरोपी सुनिल कुमार सहानी पिता ब्रम्हदेव उर्फ अनिल कुमार वय-३८ रा. गुनाबस्ती पोस्ट तेजपूर जिल्हा समस्तीपुर (बिहार), कन्हैय्या सहानी पिता राजेंदर सहानी वय-४३ रा. बेलीया घाट मेन रोड कलकत्ता यांना अटक केलेल्यांची नावे आहेत . यावल तालुक्यातील दहीगाव येथील रहिवाशी कालीदास विलास सुर्यवंशी वय-३३ रा. दहीगाव ता. यावल जि.जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह राहतात. १८ डिसेंबर २०२० ते ३० डिसेंबर २०२० दरम्यान एका अनोळखी नंबरवरून फोन येवून आशितोष कुमार असे बनावट नाव सांगून उज्जवला गॅस एजन्सीची…
जळगाव ;- विवेकानंद प्रतिष्ठान संचलित प्राथमिक शाळा वाघ नगर येथे प्राथमिक व माध्यमिक विभागात दिनांक २१/०८/२०२१ वार शनिवार रोजी रक्षाबंधन निमित्त ऑनलाइन झूम ॲप च्या माध्यमातून इयत्ता १ ली ते इयत्ता ९ वी च्या विद्यार्थ्यानी बनवलेल्या राख्यांचे ” राखी प्रदर्शनी” चे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापक श्री. हेमराज पाटील सर यांना राखी बांधून करण्यात आली. तसेच प्रदर्शनी चे उद्घाटन मा. मुख्याध्यापक सरांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उपलब्ध असलेल्या साहित्यापासून सुरेख राख्या बनवल्या. राखी’ ह्या शब्दातच “रक्षण कर’ “राख म्हणजे सांभाळ’ हा संकेत आहे. रक्षण करणे हा धर्म आहे. या वाक्यांप्रमाने वृक्ष आपले संरक्षण करत आले आहेत आपण अस्तित्वात आहोत…
जळगाव ;- राखी एक प्रेमाचं प्रतीक राखी एक विश्वास आहे हाच विश्वास रक्षाबंधनाच्या पूर्वसंधेला गुरुवर्य प. वि. पाटील प्राथमिक विद्यामंदिर ,जळगाव येथे इ. २ रीच्या विघार्थ्यांनी दाखविला. घरी राहून विद्यार्थ्यांनी रक्षाबंधन या सणानिमित्त टाकाऊ पासून टिकाऊ कसे तयार करावे याचेच एक उदाहरण म्हणून सुंदर अशा राख्या तयार केल्या या राख्यांमध्ये विद्यार्थ्यांनी स्ट्रॉ, कापूस, दोरा, लोकर, रंगीत मणी या अशा विविध सामानापासून राख्या तयार केल्या . या उपक्रमांतून विद्यार्थ्यांचे दोन उद्देश सफल झाले एक म्हणजे घरातील निरुपयोगी वस्तूंपासून आपणही एक चांगली व उपयोगी बनवू शकतो व दुसरे म्हणजे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाला कार्यक्रमाचे मार्गदर्शन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. रेखा पाटील यांनी केले.…

