Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

नवी दिल्ली वृत्तसंस्था ;- कोरोना काळात (देशभरात घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये प्रवासी गाड्या बंद होत्या. दरम्यान या काळात मध्ये रेल्वेने रेल्वे परिसरातील भंगार साहित्यातून कोट्यवधींची कमाई केली आहे. मध्य रेल्वेने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 2020-21 मध्ये मध्य रेल्वेने वेगवेगळ्या परिसरातील भंगार साहित्य विकून 391 कोटींपेक्षा जास्तची कमाई केली आहे. मध्य रेल्वेने केली मोठी कमाई मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊन दरम्यान विविध रेल्वे परिसरातील स्क्रॅप विकून मध्य रेल्वेने केवळ 391 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली आहे असं नाही तर यामुळे रेल्वे परिसर स्वच्छ ठेवण्यात खूप मदत झाली आहे. यामध्ये मध्य रेल्वेच्या अनेक विभागांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे…

Read More

नवी दिल्ली: (वृत्तसंस्था ) ;- सर्वोच्च न्यायालयाने आज ऐतिहासिक निकाल दिला आहे. नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये महिलांना प्रवेश घेण्यासाठी परीक्षेला बसण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. एनडीएची परीक्षा 5 सप्टेंबर रोजी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने महिलांना संधी देण्याला विरोध करणाऱ्यांना चांगलेच सुनावले आहे. याशिवाय संबंधित घटकांनी त्यांची भूमिका बदलण्याबाबतही फटकारले आहे. तर, न्यायालयाने आदेश दिल्याशिवाय आपण काही करणार नाही का?, अशी विचारणा देखील केली आहे. नॅशनल डिफेन्स अकॅडमी आणि इंडियन नावल अकॅडमीमध्ये महिलांना प्रवेश देण्यात यावा, यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये अ‌ॅड. कुश कार्ला जनहित याचिका दाखल झाली होती. त्या याचिकेवर मार्च महिन्यात सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या बेचसमोर सुनावणी झाली होती. सरन्यायाधीश बोबडे निवृत्त…

Read More

जळगाव;- – जिल्ह्यात कालपासून पावसाचे दमदार आगमन झाले असून मंगळवारी (17 ऑगस्ट)जिल्ह्यात 50 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून काल सर्वाधिक 80.7 मिमी पाऊस पारोळा तालुक्यात झाला असून सर्वात कमी पाऊस 28.8 मिमी पाऊस मुक्ताईनगर तालुक्यात झाल्याचे कृषि विभागाने प्रसिध्दीस दिलेल्या अहवालात म्हटले आहे. कृषि आयुक्तालयाच्या सुधारित नियमावलीनुसार जळगाव जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान 719.7 मिलीमीटर इतके आहे. ऑगस्ट महिन्याचे सरासरी पर्जन्यमान हे 196.1 मिलीमीटर इतके असून आजपर्यंत जिल्ह्यात 67.9 मिलीमीटर म्हणजेच ऑगस्ट महिन्याच्या सरासरीच्या 34.6 टक्के इतका पाऊस पडला आहे. जिल्ह्यासाठी जून महिन्याचे सरासरी पर्जन्यमान 123.7 मिलीमीटर, जुलै 189.2 मिलीमीटर, ऑगस्ट 196.1 मिलीमीटर तर सप्टेंबर महिन्याचे सरासरी पर्जन्यमान हे 123.6 मिलीमीटर…

Read More

जळगाव प्रतिनिधी: भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त शनीपेठेतील दलाल परिवारातर्फे भारत मातेचे पूजन करण्यात आले. देशभक्तीपर गीतांना परिसर दुमदुमला होता.७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शनीपेठेत दलाल परिवारातर्फे भारत माता पूजनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाप्रसंगी दीप प्रज्वलन शनीपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक विठ्ठल ससे व माजी माजी नगराध्यक्ष चत्रभुज सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. गणेश पूजन माजी नगरसेवक सुनील माळी यांनी तर भारत माता पूजन होमगार्डचे माजी वरिष्ठ अधिकारी आर.सी.दलाल, कल्पना दलाल यांनी केले. भारताचा भव्य नकाशा तयार करून त्यावर पुष्प अर्पण करण्यात आले. कार्यक्रमात देशभक्तीपर गाण्यांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. प्रसंगी परिसरातील नागरिक उपस्थित आहे. आपला देश हा प्रत्येकाची जबाबदारी आहे. देश…

Read More

जळगाव ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने ज्येष्ठ नागरिकांचे उपक्रम राबविण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करून सामाजिक बांधिलकी जोपासली असल्याचे प्रतिपादन प्रभारी प्र-कुलगुरू प्रा.बी.व्ही.पवार यांनी केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन व अध्ययन व विस्तार विभागाच्यावतीने मंगळवार दि.१७ ते २१ ऑगस्ट,२०२१या कालावधीत ‘ज्येष्ठ नागरिक सहाय्यता दूत’ प्रशिक्षण शिबीराचे आयोजन विद्यापीठाच्या अधिसभागृहात करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी प्रा.बी.व्ही.पवार बोलत होते. यावेळी प्रभारी कुलगुरू प्रा.ई.वायुनंदन यांची ऑनलाईन अध्यक्ष म्हणून उपस्थिती होती. तहसीलदार जितेंद्र कुंवर, विभागाचे प्रभारी संचालक प्रा.मनिष जोशी यांची मंचावर उपस्थिती होती. लॉकडाऊनच्या काळात आजीवन अध्ययन व विस्तार विभागाने ज्येष्ठ नागरिकांसाठी मोलाचे काम केले. या नागरिकांच्या मदतीसाठी विद्यार्थी…

Read More

जळगाव – स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव रविवार, १५ ऑगस्ट रोजी गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तसेच जळगाव येथील गोदावरी इंग्लिश मिडीयम सीबीएसई स्कूलमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणांनी परिसर देशभक्‍तीमय झाला. गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, डीएम कार्डियोलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्‍त डॉ.उल्हास पाटील यांनी उपस्थीतांना शुभेच्छा दिल्यात. तसेच डॉ.वैभव पाटील यांनी देखील स्वातंत्र्य दिनानिमित्‍त मनोगत व्यक्‍त केले. याप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनचे उपाध्यक्ष सुभाष पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील, डॉ.केतकी पाटील यांच्यासह डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील स्टाफ उपस्थीत होता. कोरोना नियमांचे पालन…

Read More

पुणे;- पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (भक्त त्यांना काय उपमा देतील याचा नेम नाही, पुण्यात तर अशाच एका मोदी भक्ताने पंतप्रधान मोदींना चक्क देवाचा दर्जा देऊन त्यांचे मंदिरच उभारले आहे. अर्थात यामध्ये मोदी भक्तांना काही आश्चर्य वाटत नसले, तरी सर्वसामान्य लोकांसाठी मोदींचे मंदिर हा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. यापूर्वी आपण अनेकदा मोदी भक्त हा शब्द ऐकला आहे. मात्र, त्यामुळे पुण्यामध्ये एका मोदीभक्ताने यालाच साजेशी कृती केली आहे. पंतप्रधान मोदींना देवाच्या रूपात मानून त्यांचे मंदिर उभारले आहे. पुण्यातील औंध भागामधील मयूर मुंढे या भाजपच्या कार्यकर्त्याने स्वतःची मालकी असलेल्या जागेत हे मंदिर उभारले आहे. पिंपरी चिंचवड येथील मार्बल विक्रेते दिवानशु तिवारी यांनी…

Read More

जळगाव : शहरातील पिंप्राळा हुडको येथे शिवसेना अल्पसंख्यांक आघाडीतर्फे स्वतंत्र दिनानिमित्त आयोजि मोफत नेत्र तपासणी शिबिराचा २१० लोकांनी लाभ घेतला.हेरंब नेत्रालयचे डॉ.प्रवीण पाटील यांनी अत्यावश्यक शस्त्रक्रियेची गरज असलेल्या लोकांना सूट देऊन शस्त्रक्रिया करण्यासाठी तारीख देण्यात आलेले आहे. तसेच शिवसेना अल्पसंख्यांक महानगरप्रमुख जाकिर पठाण यांनी आवश्यकता असलेल्या लोकांना मोफत चष्मे वाटप केले. कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, माजी महापौर नितीन लढ्ढा, नगरसेवक सुरेश सोनवणे, नगरसेवक प्रशांत नाईक, गणेश गायकवाड, अतुल बारी, महिला आघाडीचे शोभा चौधरी, सरिता माळी, नीता सांगोरे, नीलू इंगळे, मंगला बारी, मनिषा पाटील, शिवसेना अल्पसंख्यांक आघाडीचे वसीम खान, इक्बाल शेख, जब्बार शेख, अशपाक बागवान, इक्बाल शेख,…

Read More

जळगाव, प्रतिनिधी – केंद्र शासनाचा उपक्रम असलेल्या नेहरू युवा केंद्र जळगावतर्फे शनिवारी स्वच्छता पंधरवडा अंतर्गत जळगावातील अंबरनील मैदानावर वृक्षारोपण करण्यात आले.केंद्र शासनाने १ ते १५ ऑगस्ट स्वच्छता पंधरवडा हाती घेतला आहे. नेहरू युवा केंद्रातर्फे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला महाबळ परिसरातील अंबरनील मैदानावर वृक्षारोपण करण्यात आले. नेहरू युवा केंद्राचे युवा अधिकारी नरेंद्र डागर, लेखापाल अजिंक्य गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात प्रत्येकाने एक वृक्ष संगोपनाची शपथ घेतली. प्रसंगी नेहरू युवा केंद्र सल्लागार समिती सदस्य विनोद ढगे, स्वयंसेवक हेतल पाटील, कोमल महाजन, दुर्गेश आंबेकर, रोहन अवचारे यांच्यासह दीपक परदेशी, आकाश धनगर आदी सहकारी उपस्थित होते. उपक्रमासाठी ट्री गार्ड के.के.कॅन्सचे रजनीकांत कोठारी, लक्ष्मी…

Read More

धरणगाव — येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडियम स्कुलमध्ये ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.याबाबत सविस्तर माहिती अशी की, आज गुड शेपर्ड स्कुल धरणगाव येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे व शाखा व्यवस्थापक जगन गावित यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शिरीन खाटीक यांनी भारताची महान संस्कृती व ऐतिहासिक परंपरा याचे वर्णन मनोज मुंतशिर यांच्या सुप्रसिद्ध कवितेतून केले. यामध्ये भारताच्या महान संस्कृतीचा प्राचीन इतिहास, अखंड राष्ट्र, परकीय आक्रमणे, वीर सुपुत्रांची भूमी, बलिदानाची परंपरा, स्वातंत्र्य संग्राम इ. विविध मुद्द्यांचा समावेश होता.याप्रसंगी शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे, शाखा व्यवस्थापक जगन गावित, जेष्ठ शिक्षिका रिबेका फिलिप, भारती तिवारी, अनुराधा…

Read More