पाळधी दुरक्षेत्र पोलिस चौकीजवळ घटली घटना जळगाव शहरापासून नजीक असलेल्या पाळधी दुरक्षेत्र पोलिस चौकीजवळ अचानक ट्रक थांबविल्याने मागून येणाऱ्या तरुणाची दुचाकी ट्रकवर आदळल्याने तरूण जागीच ठार झाल्याची घटना सोमवार दि.19 रोजी सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे संदीप गोरख देसले हा तरुण पत्नी व दोन मुलांसह रहिवासी होता. नेहमीप्रमाणे त्याने सुरत ते कासोदा येथून लक्झरीची ट्रिप आणून सकाळी 6 वाजता कासोदा येथे प्रवाशांना सोडले. त्यानंतर कासोदा येथून जळगावकडे येण्यासाठी संदीप दुचाकीने सोमवारी 19 जून रोजी सकाळी निघाला. दरम्यान सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास जळगाव शहराजवळील पाळधी गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पोलिसांनी धरणगांकडून जळगावकडे येणार्या ट्रकला…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला गुलाबराव पाटलांनी जोपासली माणूसकी जळगाव – धरणगाव रस्त्यावर पाळधी गावानजीक असलेल्या महामार्गावर हॉटेल सुगोकी जवळील रात्री 8 वाजेच्या सुमारास लक्झरी पलटी होवून 30 ते 35 प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त आहे. यावेळील जिल्हापालकमंत्री गुलाबराव पाटील आपल्या पाळधी येथील निवासस्थानी जात असतांना त्यांना हा अपघात दिसून आला. यावेळी त्यांनी तत्काळ पलटी झालेल्या लक्झरीमधून जखमी प्रवाश्यांना बाहेर काढत मदतीचा हात देत रुग्णवाहिकेला बोलवून तत्काळ रुग्णालयात दाखल केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार शहरातून धरणगावकडे जाणाऱ्या महामार्गावर पाळधी गावानजीक असलेल्या सुगोकी हॉटेलजवळील महामार्गावर रात्री 8 वाजेच्या सुमारास 55 शिटर लक्झरी खड्याच्या कारणाने पलटी झाली असता, पालकमंत्री गुलाबराव पाटील सुध्दा याच रस्त्याने वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आपल्या…
जळगाव- आर्थिक अडचणीत असलेल्या मेव्हण्याला मदत करण्यासाठी शालकाने काम करत असलेल्या स्टेट बँकेत दरोडा टाकण्याचा कट रचला आणि तेथेच त्यांचा गेम फसला.शहरातील कालींका माता मंदिर परिसरातील स्टेट बँकेच्या शाखेत १ दरोडा प्रकरणी पोलिसांनी संशयित तीन आरोपींना अटक केली असून त्यांनी कोणाची कबुली देत त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी दिली. जुने जळगाव रस्त्यावरील कालींका माता मंदिर परिसरातील काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालयाच्या जवळ स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. १ जून गुरुवार सकाळी नऊ वाजता बँकचा नियमीतपणे कारभार सुरू झाला होता. साडेनऊच्या सुमारास दोन युवक दुचाकीवरून बँकेत आले. त्यांच्याकडे कोयत्यासारखे धारदार शस्त्र…
जळगाव जिल्ह्यातील गुन्हेगारांची गेल्या काही दिवसापासून सातत्याने हिम्मत वाढत चालली असताना दिसून येत आहे जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून नियमित होत असलेल्या घरफोड्या त्यानंतर आज पहाटे दिवसाढवळ्या भर चौकात स्टेट बँकेच्या शाखेत टाकलेला दरोडा हा पोलिसांना आव्हान देणारा आहे. मिळालेल्या माहितीनुसार शहरातील कालिंका माता मंदिर परिसरात असलेल्या स्टेट बँक शाखा शाखेत आज सकाळी दहा ते अकरा वाजेच्या सुमारास भर दिवसा शस्त्रास्त्रच्या बळावर दरोडा टाकीत 15 ते 17 लाख रुपये लुटण्याची घटना घडल्याने परिसरासह शहरात खळबळ उडाली आहे. काय घडली घटना जळगाव शहरातून भुसावळ कडे जाणाऱ्या जुन्या खेडी रोड परिसरात असलेल्या काशीबाई उखाजी कोल्हे कोल्हे या शाळेजवळ स्टेट बँक ऑफ इंडिया ची…
जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर असलेले संभाजी राजे छत्रपती यांची जळगाव शहरातील अजिंठा विश्रामगृह येथे भेट घेत चर्चा केली. जळगावत आज एका वृत्तपत्राच्या वर्धापन दिनानिमित्त शहरात संभाजीराजे छत्रपती यांचा दौरा असल्याने जळगाव शहरातील अजिंठा विश्रामगृह जिल्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांची भेट घेत विविध विषयांवर चर्चा केली .
आमदार लताताई सोनवणे आणि माजी आमदार प्रा. चंद्रकांत बळीराम सोनवणे यांच्या वाहनाला करंज गावाजवळ अपघात झाला असून यात ते किरपोळ जखमी झाल्याचे वृत्त आहे.या संदर्भातील वृत्त असे की, आमदार लताताई सोनवणे आणि माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे हे आज आपल्या वाहनाने चोपडा तालुक्यातील कार्यक्रम आटोपून जळगावकडे येत असतांना करंज गावाजवळ त्यांच्या वाहनाला अपघात झाला. त्यांच्या कारला एमएच १९- झेड ६२४५ क्रमांकाच्या डंपरने धडक दिली. यात कारचे नुकसान झाले असून सोनवणे दाम्पत्यासह कारच्या चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे. सुदैवाने या अपघातात कुणाला गंभीर दुखापत झाली नाही. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच परिसरातून नागरिकांनी तेथे धाव घेतली. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पोलिसांनी…
धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एका मुख्य रस्त्यावर आयशरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाल्याची घटना आज २६ रोजी घडली आहे. मिळालेल्या महितीनुसार, धरणगाव तालुक्यातील पिंप्री जवळ मुख्य रस्त्यावर दुचाकीस्वार तरुणाला आयशर क्र. एम.एच.१८.बी.झेड.०६२२ याने जोरदार धडक दिल्याने रस्त्यावरच तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनास्थळी धरणगाव पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक उद्धव ढमाडे यांच्यासह खुशाल पाटील, दीपक पाटील, समाधान भागवत यांच्यासह कर्मचारीसह भेट देत आयशर पोलीस स्थानकात जमा केली होती. या तरुणाचा मृतदेह धरणगाव रूग्णालयात आणण्यात आल्याचे समजते. हा तरुण धरणगाव तालुक्यातील वाघळूद गावातील गजानन ईश्वर पाटील(४३) असल्याचे देखील समजते. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल…
मुुंबई : आरबीआयने २ हजार रूपयांच्या नोटेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. 30 सप्टेंबर पर्यंत दोन हजाराच्या नोटा चलनात राहणार असून या नोटा बँकेत ग्राहक जमा करू शकता. तसेच दोन हजाराचा नोटा ग्राहकांना बँकेने न देण्याच्या सूचना आरबीआयने केल्या आहेत.भारतीय रिझर्व बँकने 2018-19 मध्येच २ हजार रुपयांच्या नोटांची छपाई थांबवण्यात आली. बाजारातून दोन हजाराच्या नोटा मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत नोटा वापरता येणार आहे. आरबीआयने म्हटले आहे नागरिकांना 2 हजाराच्या रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी ४ महिन्यांचा कालावधी नागरिकांना मिळणार आहे. नोट व्यवहारात राहणार आरबीआयने बाजारात असलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटा व्यवहारासाठी वापरता येणार असल्याचे म्हटले आहे. या…
जळगाव – जिल्हा बँक निवडणूक तसेच कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणूकीत राष्ट्रवादीचे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संजय पवार पक्ष विरोधी कारवाया केल्या. त्यात भाजपा मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिसाच्या शुभेछा जाहिरातीत चक्क शरद पवार, अजित पवार यांचा फोटो वापरल्याने अखेर संजय पवार यांना बडतर्फ राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे सरचिटणीस शिवाजी गर्गे यांनी बडतर्फ केल्याचे पत्र काढले. सतत पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संजय मुरलीधर पवार यांना बडतर्फे करण्यात आले आहे. पक्षाच्या नेत्यांचे आदेश न ऐकणे, पक्षविरोधात कारवाया करणे यासाठी पवार चांगलेच चर्चेत होते. आज तर त्यांनी चक्क भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतांना चक्क शरद…
भर उन्हाळ्यात नेते तापले तर उमेदवार होतोय फितूर धरणगाव – एरंडोल बाजार समितीच्या निवडणुकीत मतदार संभ्रमात विजय पाटील – राजकीय विशेष: शेतकरीचा आत्मा असलेली निवडणूक म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समिती या निवडणूकीत दोन ही पॅनलकडून एकमेकांना आव्हान देण्यासाठी निवडणूक प्रतिष्ठेची केली गेली आहे. यासाठी दोन्ही पॅनलचे नेते भर उन्हात दिवसभर प्रचारासाठी मैदान तुफान फटकेबाजी करतांना दिसून येत आहे. पण सायंकाळी मात्र त्यांचेच उमेदवार गावागावात फिरून पॅनलसाठी मत न मागता ‘कारे भो मनावर ध्यानं ठेवजो बाकी कोणले भी दे…’ असे चित्र एरंडोल-धरणगावात चर्चा सुरु झाली आहे. जिल्ह्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी मोठ्या धडाक्यात सुरु होती. आज सर्व प्रचाराच्या तोफा…

