लाईव्ह महाराष्ट्र: एरोडल तालुक्यातील अंजनी मध्यम प्रकल्प च्या क्षेत्रात पाऊस सुरू आहे त्यामुळे धरणात पाण्याच्या पातळीत वाढ होऊं शकते अति वृष्टी झाल्यास पुराचे पाणी नदी पात्रात सोडण्यासाठी धरणाचे दरवाजे केव्हाही उघडून पुराचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येईल अंजनी धरणाचे खालील नदी काठावरील गावांमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहेअंजनी मध्यम प्रकल्प एरंडोल ता. एरंडोल जि. जळगावअंजनी धरणाची सध्याची पाणी पातळी 52%असून धरण फक्त 4ते 5फूट खाली असून सायंकाळी अंजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरु झालेला असल्याने धरणात 52% टक्के पाणीसाठा झालेला आहे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होतआहे, व हवामानखात्याच्या अंदाजा नुसार अति वृटीचा अंदाज असल्याने धरणाचे सुरक्षितेच्या दृष्टीने पुराचे पाणी नदी पात्रात…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
तापी नदीकाठावरील व वाघूर नदीकाठारील नागरीकांना जिल्हा प्रशासनाचा सावधानतेचा इशाराजळगाव प्रतिनिधी: हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रावरील भागात पाऊस सुरु असून धरणातील आवक सतत वाढत असल्याने सायंकाळपर्यंत धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडावे लागणार आहे. असे कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग, जळगाव यांनी कळविले आहे. तर वाघुर धरणाचे पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणाची पाणी पातळी सातत्याने वाढत आहे. रात्रीपर्यंत वाघूर धरणातून पाण्याचा विसर्ग होऊ शकतो त्यामुळे तापी नदी व वाघूर नदी काठावरील गावातील नागरीकांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रावरील भागात पाऊस सुरु असून पूर्णा नदीलाही पूर येत आहे. त्यामुळे पाणी पातळी सतत वाढल्याने धरणातील…
जळगाव प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टी बोदवड तालुक्याने आतापर्यंतचे सर्वात मोठे पाऊल उचलले आहे. महापौर, नगरसेवक, ४ पं.स सदस्य, व १ जी.प सदस्यांसह १३ जणांना पक्षाचा कार्यक्रम सोडून इतर पक्षाच्या कार्यक्रमांना उपस्थित दिलेल्यामुळे कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.दिलेल्या माहितीनुसार, आपण भारतीय जनता पार्टीचे चिन्हावर निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहात आणि आपण जाणून आहात मागील ६ महिन्यापासून आजतागत म्हणजेच मार्च २०२१ ते ऑगस्ट २०२१ पर्यंत भारतीय जनता पार्टी बोदवड तालुका व शहराच्या वतीने प्रदेशावरून आलेले अनेक समाजभिमुक व जनतेच्या हिताचे कार्यक्रम राबविन्यात आले. त्यात आपण यापैकी एकाही कार्यक्रमास जाहीर आव्हानानंतरही उपस्थितीत राहू शकला नाही. जे की पक्षचिन्हावर निवडणूक लढवून लोक- नियुक्त होऊन…
जळगाव प्रतिनिधी : जामनेर तालुक्यातील अनेक गावांना रात्री चक्रीवादळासह मुसळधार पावसाने झोडपले असून यामुळे मोठी हानी झाल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच चाळीसगाव तालुक्याला अतिवृष्टीचा फटका बसला होता. याच्या पाठोपाठ आता काल रात्री जामनेर तालुक्याला अतिवृष्टीने झोडपले आहे. तालुक्यातील अनेक गावात अतिवृष्टी व चक्रीवादळामुळे भागदरा तोंडापूर ओझर या गावांमध्ये पावसाचे पाणी घुसले असून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे त्यामुळे शासन स्तरावर तात्काळ पाहणी करावी अशी मागणी होत आहे. तालुक्यातील ओझर गावांमध्ये सोमवार रोजी रात्रीच्या सुमारास चक्रीवादळ अतिवृष्टी झाली यामध्ये सुमारे ९० टक्के गावातील नागरिकांचे घरावरील पत्रे उडाले. घराची पडझड झाली. त्याचबरोबर संसार उपयोगी साहित्य यांचे मोठे नुकसान झाला…
जळगाव प्रतिनिधी : शेतक-यांचे ट्रक्टर ट्रॉली चोरून त्याच्या माध्यमातून वाळू वाहतूक होत असल्याची माहिती स्थानिकगुन्हे शाखेला माहिती मिळाली असता पथकाने ट्रक्टर ट्रॉलीसह आरोपींना अटक केली.सध्या जळगांव जिल्हायात शेतक-यांचे ट्रक्टर व ट्रॉली चोरीचे प्रमाण वाढल्याने होते. शेतक-यांचे ट्रक्टर ट्रॉली चोरी होत असल्याने शेतकर्यांचे नुकसान होत होते.पो नि किरणकुमार बकाले यांना मिळालेल्या गुप्त बातमीदारा कडुनमिळाली की ,ट्रक्टर ट्रॉली चोर चोरून त्यामाध्यमातून ते वाळू वाहतूक करीत आहे त्याआधारे स.फौअशोक महाजन, पोहेकॉ विजयसिंग पाटील पोहेकॉ जितेंद्र पाटील ,पोहेकॉ अकरम शेख,पोहेकॉसुधाकर अंभोरे ,पोना नितीन बाविस्कर ,पोना प्रीतमपाटील ,पोना राहुल पाटील,पोना परेश महाजन, पोकॉ हरीष परदेशी ,पोहेकॉ भारत पाटील, पोहेकॉ विजयचौधरी याचे पथक तयार केले . …
जळगाव प्रतिनिधी । शहरातील जुना आसोदा रोड परीसरात हातात तलवार घेवून दहशत माजविणाऱ्या संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज अटक केली आहे. त्याच्या ताब्यातील तलवार हस्तगत केली आहे. याप्रकरणी पुढील कारवाईसाठी शनीपेठ पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सविस्तर माहिती अशी की, शहरातील जुना आसोदा रोड काशीनाथ पाटील नगर जवळ संशयित आरोपी संजय सदाशिव कोळी (वय-४१) रा. जुना आसोदा रोड जवळ हा हातात धारदार तलवार घेवून आरडोओरड करत येणाऱ्या जाणाऱ्या लोकांमध्ये दहशत माजवित असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांचे पथकातील सहाय्यक फौजदार अशोक महाजन, अनिल इंगळे, पो.हे.कॉ. अनिल देशमुख, कमलाकर बागुल, चालक विजय चौधरी…
जळगाव प्रतिनिधी : शहरातील टीव्हीएस शोरूम मध्यरात्री फोडून अज्ञात चोरट्याने लॅपटॉप आणि मोबाईल चोरून नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. चोरी करतांना चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला असून शहरयाप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात करण्यात आला आहे शहर पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील कोंबडी बाजार चौकात योगेश अशोक चौधरी (वय-४५) रा. गणपती नगर जळगाव यांचे पंकज टीव्हीएस शोरूम आहे. याठिकाणी अज्ञात चोरट्याने सोमवारी ६ सप्टेंबर रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास गच्चीवरील चायनल गेटच्या लिप्टच्या माध्यमातून कुलूप तोडून आत प्रवेश करत शोरूमच्या कार्यालयात ठेवण्यात आलेले. लॅपटॉप आणि मोबाईल चोरून नेला. दरम्यान, लोखंडी लॉकरमध्ये रोकड असल्याचा अंदाजानुसार त्याने लोखंडी लॉकर तोडले. परंतू त्यात…
जामनेर प्रतिनिधी : तालुक्यातील अनेक गावांना काल मध्यरात्रीच्या सुमारास चक्रीवादळासह मुसळधार पावसाने तडाखा दिला असून पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी प्रशासनाला तातडीने मदतकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. अनेक गावांमध्ये पाणी शिरले असून शासकीय पातळीवर तात्काळ मदत करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या असून ते सातत्याने जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहेत. तहसीलदार अरूण शेवाळे हे आपल्या सहकार्यांसह आज पहाटेपासूनच आपत्तीग्रस्त गावांना भेटी देत असून त्यांनी मदतकार्यात सहभाग घेतला आहे.याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, काल रात्री जामनेर तालुक्याला अतिवृष्टीने झोडपले आहे. तालुक्यातील अनेक गावात अतिवृष्टी व चक्रीवादळामुळे भागदरा, तोंडापूर व ओझर या गावांमध्ये पावसाचे पाणी घुसले असून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यात प्रामुख्याने…
बहुळा ९, हतनूर ६ तर बोरी प्रकल्पाचे ७ गेट उघडून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावात सतर्कतेचा इशारा जळगाव प्रतिनिधी : जिल्ह्यात दोन तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून विविध प्रकल्प पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक होत असल्याने मध्यम लघूप्रकल्प पातळीत बर्याच प्रमाणात वाढ झाली आहे. जिल्ह्यातील हतनूर, गिरणा, वाघूर प्रकल्पांसह अन्य प्रकल्प पाणलोट क्षेत्रात गेल्या २४ तासात ११२ मि.मी पावसाची नोंद असून १८.६४ दलघमी पाण्याची आवक झाली आहे. गिरणा प्रकल्पात ०.५३ दलघमी पाण्याची आवक झाली असून ४७.८५ तर वाघूर प्रकल्पात ७४.९१ टक्के साठा आहे. जिल्ह्यातील ९६ मध्यम लघू व ३ मोठया प्रकल्पात सरासरी ५२.४१ टक्के उपयुक्त साठा आहे. मध्यम प्रकल्पापैकी पाचोरा…
जळगाव ;- ‘‘शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील हास्य हाच माझा सर्वोच्च पुरस्कार!’’ मानणाऱ्या श्रद्धेय भवरलालजी जैन यांनी जैन हिल्सवर भूमिपुत्र आणि सहकाऱ्यांसह पोळा साजरा करण्याची प्रथा सुरू केली. कोरोना पार्श्वभूमीवर जैन हिल्स येथे शासकीय नियम पाळून प्रातिनिधीक स्वरूपाचा छोटेखानी पोळा साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. भूमिपुत्रांशी बांधिलकी असणाऱ्या जैन इरिगेशनतर्फे बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन व सौ. ज्योती जैन तसेच कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन व सौ. शोभना जैन यांनी पोळ्याच्या सोहळ्यावेळी तेथेच मांडलेल्या सप्तधान्यासह बैल जोड्यांचे विधीवत पूजन करुन बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य भरविला. यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात सौ. ज्योती जैन व सौ. शोभना जैन यांच्या हस्ते पाच सालदार…

