Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

जळगाव प्रतिनिधी : तालुक्यात राहणाऱ्या 14 वर्षीय मुलीवर  तिच्या आतेभावाने हातपाय बांधून तिच्यावर अत्याचार केला त्यात ती मुलगी गर्भवती झाली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी गुरुवारी संशयित तरुणाला अटक केली आहे. घटना मे-जून २०२१ दरम्यान घडली आहे.नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना जळगाव तालुक्यात घडली आहे. पीडितेचे आई, वडील एके दिवशी शेतात गेलेले असताना गावातच राहणारा पीडितेचा आतेभाऊ दुपारी घरी आला. तोंडाला रुमाल व साडीने हातपाय बांधून त्याने पीडितेवर अत्याचार केला. या घटनेची कुठे वाच्यता केली तर मारुन टाकण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडितेने भीतीपोटी कोणालाच सांगितले नाही. आता गेल्या आठ दिवसांपासून उलट्यांचा त्रास होत असल्याने गुरुवारी आईने जिल्हा रुग्णालयात मुलीला…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र: भडगाव तालुक्यातील शिंदी गावी येथील तरुणाचे लग्न लावून आलेल्या नवरी लग्नाचे ५० हजारांचे दागिने घेवून पसार झाल्याची धक्कादायक घडना उघडकीला आली आहे.  याप्रकरणी तरुणाच्या फिर्यादीवरून भडगाव पोलीस ठाण्यात नवरीसह जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भडगाव तालुक्यातील शिंदी येथील २८ वर्षीय तरूण हा विवाह योग्य झाला होता. मुलगी मिळत नसल्याचे विवंचनेत असतांना सोनाली गोकुळ सोनार, गोकूळ रविंद्र सोनार दो.  रा. साकेगाव ता. भुसावळ, आशा नानासाहेब निकम रा. नाशिक, अशोक वीरसिंग खाडे रा. मालदा ता. शहादा जि.नंदुरबार आणि गुड्डीबाई समाधान शिंपी रा. गाळण ता. पाचोरा यांनी भेट घेवून तरूणाचा विश्वास संपादन करून आमच्या ओळखीची मुलगी असल्याचे सांगितले. त्यासाठी दीड लाख…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र : रावेर तालुक्यातील पाल येथे मध्यप्रदेशातील एका गावात राहणाऱ्या  तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत माहिती अशी की, रावेर तालुक्यातील पाल येथील गुलाम रसुल नवाज तडवी (वय-२५)  याची ओळख मध्यप्रदेशातील एका गावात राहणाऱ्या २० वर्षीय तरूणी बरोबर ओळख झाली.त्यानंतर एकमेकांशी मोबाईलवर संपर्क झाला. तीन महिन्यापुर्वी गुलाम तडवी याने पिडीत मुलीला ०२ जून २०२१ रोजी भेटण्यासाठी बोलाविले. त्यानुसार मुलगी रावेर येथे भेटण्यासाठी आली. गुलाम तडवी याने मुलीला दुचाकीवर बसवून पाल येथील त्याच्या घरी घेवून गेला. तेथे लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केला. ही गोष्ट घरच्यांना…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र : धरणगाव तालुक्यातील चमगाव गावातील रहिवाश्यांना घरासमोर डबके निर्माण झाले असून यामुळे पाणी साचत असून डासांचा त्रास वाढला आहे यामुळे डेंगू रोगाची साथ पसरू शकतो गावातील रहिवाशांनी तुंबलेल्या   पाण्यामुळे नागरीक हैराण झाले आहेत.  तरी प्रशासनाने याकडे लक्षद्यावे अशी मागणी होत आहेचामगाव परिसरात राहत असलेल्या नागरिकांना घरासमोरपाणी  तुंबले असून त्यात  पावसाच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे. या साचलेल्या पाण्यामुळे रोगराई पसरण्यास वाव मिळत आहे. सध्या या साचलेल्या पाण्यामुळे डेंगू व मलेरिया यांसारख्या आजारांची वाढ झाली असून मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी निर्माण झाली आहे.  नुकतीच कोरोना महामारी संपली असून त्यानंतर लगेचच सुरु झालेल्या पावसाळ्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी साचत असून त्यातून…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र : दोन तरुण गावठी पिस्तुले जिवंत कारतूस सह फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली असता दोन्ही आरोपींना मुद्देमालासह धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथून अटक करण्यात आलीस्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना गोपनीय माहिती मिळाली की हे दोन तरुण गावठी पिस्तूल व जिवंत कारतूस घेऊन फिरत आहे या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेकडील सफौ अनिल जगन्नाथ जाधव, पोहकॉ अशरफ शेख निजामोददीन, पोकॉ दिपककुमार फुलचंद शिंदे, वाहन चालक पोहेकॉ विजय गिरधर चौधरी यांनी बांभोरी गावांत जाऊन सागर देवीदास सोनवणे, भास्कर अशोक नन्नवरे दोन्ही (रा. बांभोरी ता धरणगांव) याची माहिती काढण्यास सुरुवात केली असतं दोन्ही आरोपी आव्हाने गावात असल्याची…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र: धरणगाव तालुक्यातील मुख्य रस्ता हा खड्डेमय झाला आहे तरी याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत असल्याने काँग्रेस च्या वतीने आज सार्वजनिक बांधकाम विभागात निवेदन देण्यासाठी गेले असता सहाय्यक अभियंता उपस्थित नसल्याने खुर्चीला हार घालीत असताना उपस्थित कर्मचाऱ्यांनी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना अरेरावी केल्याने तू तू मै मै हूँ पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला . धरणगाव शहरातून उड्डाणपूल यापासून ते चोपडा रस्त्या पर्यंतच्या मुख्य रस्ता हा खड्डेमय आहे की खड्ड्यात रस्ता आहे असे कोडे शहरवासीयांना व येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना प्रश्न पडलेला आहेत या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नेहमीच अपघात होऊन वाहनचालकांना आपला जीव गमवावा लागत आहे शुद्ध सार्वजनिक बांधकाम विभाग या रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष…

Read More

टीम लाईव्ह महाराष्ट्र: शासकीय योजनेचा लाभ मिळत  नसल्याने  ती पुन्हा सुरू करण्यासाठी व तहसीलदारांना आपले म्हणणे मांडण्यासाठी  आलेल्या  धरणगाव तालुक्यातील मौजे पिपळे गावाचा अंध रायसिग  व  वृद्ध  आत्या आल्यावर त्याची चौकशी केली असता  गाण्याच्या माध्यमातून आपला उदरनिर्वाह करीत आहे हे समजताच तहसीलदार यांनी  गणपती समोर भक्ती गीते सादर केली . त्याला तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांनी पैश्यानी मदत करून त्याच बरोबर महिन्या भरचा किराणा सुद्धा देऊन सरकारी वाहनातून घरी पोहचविले धरणगाव तालुक्यातील  मौजे पिंपळे येथे  एकनाथ दुर्गा रायसिंग व त्याची आत्या जनाबाई हे राहतात .एकनाथ हा 100% अंध आहे.ते दोन्ही आज धरणगाव तहसिल कार्यलयात शासकीय योजनेचा लाभ मिळत नसल्याची कैफियत घेऊन आले…

Read More

जळगाव प्रतिनिधी : एक व्यक्ती गावठी बनावटीचे पिस्तूल घेवून फिरणाऱ्या तरूणाला पोलीसांनी पाठलाग करून वाल्मिक नगरातून दुपारी अटक केली आहे. त्याच्याकडील गावठी पिस्तूल हस्तगत केली असून त्याच्या विरुद्ध  शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून  मिळालेली माहिती अशी की,  राकेश उर्फ लिंबू राक्या चंद्रकांत साळुंखे (वय-२६) रा. कांचन नगर हा तरूण वाल्मिक नगरातील बगीचाच्या परिसरात गावठी बनवटीचे पिस्तूल घेवून दहशत माजवित असल्याची   माहिती मिळाली. शनीपेठ पोलीस ठाण्याचे पोहेकॉ परिष जाधव, राहूल पाटील, अमोल विसपूते, प्रमोद पाटील, शरद पाटील यांनी दुपारी ३ वाजता संशयित आरोपी लिंबू राक्याचा वाल्मिक नगर भागातील बगीचाजवळ पाठलाग करून अटक केली. त्यांच्या ताब्यातील चार हजार…

Read More

जळगाव प्रतिनिधी: शहरातील पांझरपोळ परिसरात राहणाऱ्या तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीला आली आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, दिनेश कमलाकर ठाकूर(22) हा आपल्या आई कल्पनाबाई यांच्यासह राहतो. तो एमआयडीसीतील स्टार फेब्रिकेटरमध्ये कामाला आहे. मोठा विवाहित भाऊ गोपाल हा पत्नीसह धुळे येथे राहतो. दरम्यान, गेल्या दोन महिन्यांपासून त्याचा मुतखडाचा आजार जडला होता. काल बुधवारी १५ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास मित्र गावाहून येत आहे त्याला भेटण्यासाठी जातो असे आईला सांगून घराबाहेर पडला होता. रात्री उशीरापर्यंत घरी आला नव्हता. सकाळी त्याचा मित्राला काशीबाई कोल्हे महाविद्यालयाजवळी…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र : केंद्र सरकारने संमत केलेल्या तीन कृषी कायद्यांना रद्द करण्यात यावे या मागणीसाठी आज येथे किसान मोर्चातर्फे धरणगाव शहरातून रॅली काढून याच्या विरोधात निवेदन देण्यात आले.याबाबत वृत्त असे की, आज किसान मोर्चाच्या पदाधिकार्‍यांनी धरणगाव शहरातून मोर्चा काढला. यानंतर प्रशासनाला निवेदन देण्यात आले. या निवेदनात केंद्र सरकारने काही महिन्यांपूर्वी संमत केलेल्या तीन कृषी कायद्यांना रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासोबत शेतकर्‍यांच्या कृषी उत्पादनांना किमान हमी रक्कम इतका भाव मिळावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात, नवीन शैक्षणिक धोरण अंमलात आणावे, देशभरातील निवडणुकांमध्ये ईव्हीएमचा वापर टाळून आधीप्रमाणेत मतपत्रिकेने निवडणुका घेण्यात याव्यात आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.याप्रसंगी राष्ट्रीय किसान मोर्चाचे शहराध्यक्ष…

Read More