Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

प्रतिनिधी(प्रवीण पाटील) तालुक्यातील वावडदा येथील पुलाचे बांधकाम सुरू असल्याने कच्च्या रस्त्याने वाहतूक सुरू होती मात्र आज सायंकाळी झालेल्या पावसामुळे रस्ताच वाहून गेल्यामुळे पाचोरा जळगाव रोडावर ची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असल्याने नागरिकांचा खोळंबा निर्माण झाला आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी की आज सायंकाळी ७:३०सुमारास वावडदा परिसरात जोरदार झालेल्या पावसामुळे बिलखेडा शिवारात भालाआबा यांच्या शेताजवळील पुलाचे बांधकाम सुरू होते. त्याठिकाणी वाहतुकीसाठी साइडला कच्चा रस्ता तयार केलेला होता तो या जोरदार पाऊसामुळे वाहुन गेल्याने पाचोरा जळगाव वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळें. नागरिकांची दोन्ही तालुक्यांमध्ये होणारी ये जा थांबली आहे.

Read More

प्रतिनिधी(प्रवीण पाटील) येथील सुनिल जगदेव बोबडे वय वर्षे ४० याने मानसिक तणावातून १० रोजी विश प्राशन केल्याने त्याला उपचारासाठी जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता त्याचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की सुनिल जगदेव बोबडे नैराश्यातुन १०सप्टेंबर रोजी विष प्राशन केल्याने त्यांना विटनेर पोलिस पाटील डॉ.साहेबराव धुमाळ व नातेवाईक यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते अखेर २७सप्टेबरला रात्री १२वाजेनंतर त्यांची मृत्यूशी झुंज संपली.सुनिल बोबडे यांचा काही वर्षांपूर्वी घटस्फोट झालेला होता त्याच्या पश्चात आई रुख्माबाई बोबडे मोठा भाऊ राजु बोबडे व एक लहान भाऊ असा परिवार आहे सुनिल बोबडे यांच्याकडे २एकर शेती आहे मात्र त्यांचेवर कोणतेही कर्ज…

Read More

अनेक तालुक्यांच्या पाण्याचा प्रश्न सुटणारजळगांव जिल्ह्यातील पाच तालुक्‍यांचा पाणीपुरवठा सह शेती शिवार ज्या पाणीवर अवलंबून असलेले गिरणा धरण (Girna dam) रात्रीपासून सुरु असलेल्या सतत धार पावसामुळे आज ८० टक्के भरले असून जिल्यातील पाच तालुक्यासह शेतीचा देखील काही प्रमाणात पाणी प्रश्न मिटला आहे.चाळीसगाव, भडगाव, पाचोरा , एरंडोल ,धरणगाव व अमळनेर सह जळगाव जिल्ह्यातील काही गावांना पाणीपुरवठा करणारे गिरणा धरण शंभरीकडे वाटचाल करत आहे, काल नाशिक जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू असल्यामुळे गिरणा धरण 80 टक्के भरले आहे. त्यामुळे प्रशासनातर्फे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Read More

धरणगाव प्रतिनिधी(लक्ष्मण पाटील) महान क्रांतिकारक, शहीदे आजम भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त शहीद भगतसिंग गणेश मित्र मंडळाच्या वतीने भगतसिंग यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व पुष्पांजली अर्पण करण्यात आली.याप्रसंगी लोकसभा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्र महाजन, नगरसेवक विनय भावे, नगरसेवक भागवत चौधरी, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे, विकल्प ऑर्गनायझेशनचे लक्ष्मण पाटील सर, तृप्ती रेस्टॉरंट चे संचालक प्रथम सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते नामदेव मराठे, प्रफुल पवार, हेमंत चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कार्यक्रम प्रसंगी लक्ष्मण पाटील व गुलाबराव वाघ यांनी आपल्या मनोगतातून शहीद भगतसिंग यांना आदरांजली अर्पण केली. याप्रसंगी भानुदासआप्पा विसावे यांच्या कडून मंडळाला दिलेल्या स्पिकर सेट…

Read More

धरणगाव प्रतिनिधी (लक्ष्मण पाटील) येथील तहसिल कार्यालयात माहिती अधिकार दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तहसिलदार नितीनकुमार देवरे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण पाटील यांनी माहिती अधिकार अधिनियम २००५ बाबत माहिती दिली.याबाबत सविस्तर माहिती अशी की, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सुचनेनुसार माहिती अधिकार कायद्याच्या बाबतीत जनजागृती व्हावी या हेतूने धरणगाव तहसिल कार्यालयात कार्यक्रम घेण्यात आला. सर्वप्रथम तहसिलदार नितीनकुमार देवरे यांनी माहिती अधिकार कायद्याची प्राथमिक माहिती दिली. ६ ते १२ ऑक्टोबर दरम्यान माहिती अधिकार सप्ताह साजरा करण्यात यावा परंतु त्याआधी सर्व प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यात यावा, अशा सूचना प्रास्ताविकातून व्यक्त केल्यात. या कार्यक्रमात ई – पीक पाहणीत उल्लेखनीय…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: अतिवृष्टीमुळे या वर्षी शेतीतून उत्पन्न मिळणार नसल्याच्या तणावात धरणगाव तालुक्यातील पथराड येथील कर्जबाजारी शेतकऱ्याने काल विष प्रश्न करून आत्महत्या केली.याबाबत अधिक माहितीनुसार किशोर सुरेश जाधव (वय ४४ , रा. पथराड ता. धरणगाव ) काल रात्री घरातील कडी लाऊन झोपला होता. आज सकाळी पत्नी व कुटुंबीयांनी किशोर यास आवाज दिल्यावर दरवाजा उघडत नसल्याने काही लोकांच्या मदतीने दरवाजा तोडला यावेळी किशोर हा विषारी कीटकनाशक औषध पिऊन पडलेला होता असे लक्षात आले . डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले .किशोर जाधव यांच्याकडे ३ बीघे शेती आहे. यावर्षी पाऊस जास्त झाल्यामुळे सर्व पिक खराब झाले किशोरवर कर्ज आहे. यामुळे त्याने आत्महत्येचे पाऊल…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: धरणगाव तालुक्यातील निंभोरे गावातून मुरलीधर भालेराव सोनवणे वय 62 हे 26 रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास कोणालाही काहीही न सांगता घरून निघून गेलेले आहे त्यांच्या अंगावर बंडी व सफेद पेंट त्यांनी परिधान केलेले आहे. याबाबत कोणाला काहीही माहिती आढळल्यास मच्छिंद्र मुरलीधर सोनवणे यांच्या 8888175777 या मोबाईलवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे किंवा पोलीस स्थानकाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: तालुक्यातील आव्हाने येथील बस फेऱ्या बंद असल्याने नागरिकांना त्यातून प्रवास करावा लागत आहे यात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी घे शहरात शिक्षण घेण्यासाठी ये-जा करीत असल्याने त्यांना आर्थिक भुर्दंड बसत आहे याकरिता जळगाव ते आव्हाने बस फेरा सुरू करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे बस आगारात निवेदन देण्यात आले. तालुक्यातील आव्हान हे गाव पंधरा हजार लोकवस्तीचे आहे या गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात जळगाव शहर नोकरीनिमित्त दररोज ये-जा करीत असतात यात विद्यार्थ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे.मागील दीड वर्षापासून एसटी बसेस बंद असल्यामुळे सामान्य जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. गावातील बहुसंख्य विद्यार्थी हे शहरात शिकण्यासाठी येत असतात शहरात येण्या-जाण्यासाठी त्यांना दोन वेळा रिक्षा…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला असून जळगाव जिल्ह्याला मंगळवारी रेड अलर्ट दिला होता सोमवारी  रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे डोंगरी आणि तितूर नदीला पुर आला आहे.चाळीसगाव  शहरातील पुलावरून पाणी वाहू लागले आहे. यामुळे अलीकडेच आलेल्या महापूराच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या आहेत. याबाबत वृत्त असे की हवामान खात्याने जळगाव जिल्ह्यातील काही भागात रेट अलर्ट जाहीर केले होते मुसळधार पाऊस होईल याची चेतावणी दिली होती सोमवारी रात्री चाळीसगाव शहरासह तालुक्यातील बहुतांश भागांमध्ये जोरदार वृष्टी झाली. यामुळे तितूर आणि डोंगरी नद्यांसह परिसरातील सर्व नाल्यांना मोठा पूर आला आहे. विशेष बाब म्हणजे डोंगरी आणि तितूर या दोन्ही नद्यांना एकाच…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जिल्हा परिषदेच्या कामांचा आढावा घेण्यासाठी पंचायत राज समिती सोमवारपासून तीन दिवसांच्या जिल्हा दौऱ्यावर आहे. दरम्यान विविध विभागांची माहिती या काळात घेतली जाणार असून ही समिती उद्या धरणगाव तालुक्यात भेट देणार आहे.या समितीच्या धरणगाव भेटीदरम्यान समितीचे अध्यक्ष संजय रायमुलकर यांच्याकडे झुरखेडा ग्रामपंचायतीच्या तक्रारीचा अर्ज दाखल करण्यात आला असून यामुळे उद्याची पंचायत राज समितीची भेट नेमके कोणते वळण घेते यावर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, समितीने भेट दिल्यानंतर करण्यात आलेल्या तक्रारींची दखल समिती तर्फे घेतली जाईल की याकडे समितीचे दुर्लक्ष होईल यावर ग्रामपंचायत परिसरात चर्चांना उधाण आले आहे.

Read More