Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

धरणगाव प्रतिनिधी (लक्ष्मण पाटील) येथील तहसिल कार्यालयात माहिती अधिकार दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तहसिलदार नितीनकुमार देवरे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण पाटील यांनी माहिती अधिकार अधिनियम २००५ बाबत माहिती दिली.याबाबत सविस्तर माहिती अशी की, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सुचनेनुसार माहिती अधिकार कायद्याच्या बाबतीत जनजागृती व्हावी या हेतूने धरणगाव तहसिल कार्यालयात कार्यक्रम घेण्यात आला. सर्वप्रथम तहसिलदार नितीनकुमार देवरे यांनी माहिती अधिकार कायद्याची प्राथमिक माहिती दिली. ६ ते १२ ऑक्टोबर दरम्यान माहिती अधिकार सप्ताह साजरा करण्यात यावा परंतु त्याआधी सर्व प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यात यावा, अशा सूचना प्रास्ताविकातून व्यक्त केल्यात. या कार्यक्रमात ई – पीक पाहणीत उल्लेखनीय…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: अतिवृष्टीमुळे या वर्षी शेतीतून उत्पन्न मिळणार नसल्याच्या तणावात धरणगाव तालुक्यातील पथराड येथील कर्जबाजारी शेतकऱ्याने काल विष प्रश्न करून आत्महत्या केली.याबाबत अधिक माहितीनुसार किशोर सुरेश जाधव (वय ४४ , रा. पथराड ता. धरणगाव ) काल रात्री घरातील कडी लाऊन झोपला होता. आज सकाळी पत्नी व कुटुंबीयांनी किशोर यास आवाज दिल्यावर दरवाजा उघडत नसल्याने काही लोकांच्या मदतीने दरवाजा तोडला यावेळी किशोर हा विषारी कीटकनाशक औषध पिऊन पडलेला होता असे लक्षात आले . डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले .किशोर जाधव यांच्याकडे ३ बीघे शेती आहे. यावर्षी पाऊस जास्त झाल्यामुळे सर्व पिक खराब झाले किशोरवर कर्ज आहे. यामुळे त्याने आत्महत्येचे पाऊल…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: धरणगाव तालुक्यातील निंभोरे गावातून मुरलीधर भालेराव सोनवणे वय 62 हे 26 रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास कोणालाही काहीही न सांगता घरून निघून गेलेले आहे त्यांच्या अंगावर बंडी व सफेद पेंट त्यांनी परिधान केलेले आहे. याबाबत कोणाला काहीही माहिती आढळल्यास मच्छिंद्र मुरलीधर सोनवणे यांच्या 8888175777 या मोबाईलवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे किंवा पोलीस स्थानकाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: तालुक्यातील आव्हाने येथील बस फेऱ्या बंद असल्याने नागरिकांना त्यातून प्रवास करावा लागत आहे यात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी घे शहरात शिक्षण घेण्यासाठी ये-जा करीत असल्याने त्यांना आर्थिक भुर्दंड बसत आहे याकरिता जळगाव ते आव्हाने बस फेरा सुरू करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे बस आगारात निवेदन देण्यात आले. तालुक्यातील आव्हान हे गाव पंधरा हजार लोकवस्तीचे आहे या गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात जळगाव शहर नोकरीनिमित्त दररोज ये-जा करीत असतात यात विद्यार्थ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे.मागील दीड वर्षापासून एसटी बसेस बंद असल्यामुळे सामान्य जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. गावातील बहुसंख्य विद्यार्थी हे शहरात शिकण्यासाठी येत असतात शहरात येण्या-जाण्यासाठी त्यांना दोन वेळा रिक्षा…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला असून जळगाव जिल्ह्याला मंगळवारी रेड अलर्ट दिला होता सोमवारी  रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे डोंगरी आणि तितूर नदीला पुर आला आहे.चाळीसगाव  शहरातील पुलावरून पाणी वाहू लागले आहे. यामुळे अलीकडेच आलेल्या महापूराच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या आहेत. याबाबत वृत्त असे की हवामान खात्याने जळगाव जिल्ह्यातील काही भागात रेट अलर्ट जाहीर केले होते मुसळधार पाऊस होईल याची चेतावणी दिली होती सोमवारी रात्री चाळीसगाव शहरासह तालुक्यातील बहुतांश भागांमध्ये जोरदार वृष्टी झाली. यामुळे तितूर आणि डोंगरी नद्यांसह परिसरातील सर्व नाल्यांना मोठा पूर आला आहे. विशेष बाब म्हणजे डोंगरी आणि तितूर या दोन्ही नद्यांना एकाच…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जिल्हा परिषदेच्या कामांचा आढावा घेण्यासाठी पंचायत राज समिती सोमवारपासून तीन दिवसांच्या जिल्हा दौऱ्यावर आहे. दरम्यान विविध विभागांची माहिती या काळात घेतली जाणार असून ही समिती उद्या धरणगाव तालुक्यात भेट देणार आहे.या समितीच्या धरणगाव भेटीदरम्यान समितीचे अध्यक्ष संजय रायमुलकर यांच्याकडे झुरखेडा ग्रामपंचायतीच्या तक्रारीचा अर्ज दाखल करण्यात आला असून यामुळे उद्याची पंचायत राज समितीची भेट नेमके कोणते वळण घेते यावर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, समितीने भेट दिल्यानंतर करण्यात आलेल्या तक्रारींची दखल समिती तर्फे घेतली जाईल की याकडे समितीचे दुर्लक्ष होईल यावर ग्रामपंचायत परिसरात चर्चांना उधाण आले आहे.

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज (प्रवीण पाटील) तालुक्यातील विटनेर शिवारात शेतात राहणाऱ्या १३ वर्षीय मुलीच्या अंगावर वीज कोसळल्याने जागीच मृत्यू झाल्याची दुदैवी घटना आज सायंकाळी घडली. सोनाली राजेंद्र बारेला (वय-१३) रा. विटनेर ता. जि.जळगाव असे मयत मुलीचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील विटनेर येथील तरूणी विटनेर शिवारातील शेतात आपल्या कुटुंबियांसह राहायला आहे. आज २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास शेतात असतांना तिच्या अंगावर कोसळली त्यात तीचा जागीच मृत्यू झाला आहे. जळगाव येथील एस.यु.पाटील यांच्या शेतात राहणारा रविंद्र भिमसिंग बारेला  यांच्याकडे साधारण एक ते दीड महिन्यापासून सोनाली राजेंद्र बारेला राहत होती. त्याच्या मृत्यूने परीसरात हळहळ व्यक्त होत आहे. विटनेर पोलिस…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: भुसावल रस्त्यावर असलेल्या बोदवड शहरातील बिल्डिंग मटेरियल सप्लाय त्या दुकानातून शटर उचकटून रात्री अडीच वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी सहा लाखांची रोकड घेऊन पसार झाले याप्रकरणी बोदवड पोलिसांमध्ये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.बोदवड शहरात चोरट्यांचा उच्छाद कायम असून बडगुजर यांचे भुसावळ रस्त्यावर बडगुजर ट्रेडर्स नाम बिल्डींग मटेरीयलचे दुकान असून सोमवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास तीन चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकावत दुकानात प्रवेश केला व ड्रावरमध्ये ठेवलेली तब्बल सहा लाखांची रोकड लांबवली. चोरट्यांची छबी सीसीटीव्हीत कैद झाली असून त्या आधारे पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. घटना सोमवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर मोठी खळबळ उडाली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात बोदवड…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: आज दुपारच्या सुमारास रावेर तालुक्यातील  विवरे खुर्द येथे विजेच्या धक्क्याने एका २५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून तिची दोन वर्षांची मुलगी जखमी झाल्याची घटना घडली आहे. याबाबत वृत्त असे की, आज दुपारी अचानक वातावरणात बदल होऊन विजांच्या कडकडात पावसाला सुरुवात झाली रावेर तालुक्यातील  विवरे खुर्द शेती शिवार मध्ये राजू पाटील यांच्या शेतात मजूरी करणारे वागले कुटुंब मजूरी करत होते.अचानक वातावरणात प्रचंड बदल होऊन विजा कडकड्याला लागले व  मयत मुर्खी इडा वागले (वय २५) हीच्यावर विज पडून तिचा जागेच मृत्यु झाला तर तिच्या दोन वर्षीय रवीना किरकोळ जखमी झाली आहे.यामुळे वागले कुटुंबावर नैसर्गिक संकट कोसळलेले असून हातमजूरी करणारी…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज (प्रवीण पाटील) तालुक्यातील वसंतवाडी  येथील नागरिकांसाठी  ग्रामपंचायत मध्ये उद्या सकाळी८:३०वाजेला  कोरोना लसीकरणाच्या कार्यक्रम आयोजीत केला आहे.यासाठी नागरिकांनी आपल्या कागदपत्र सह उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.वसंतवाडी ग्रामपंचायत कार्यालयात कोरोना आजाराच्या पाश्र्वभूमीवर सकाळी ८:३०वाजेपासुन लसीकरणला सुरुवात होणार आहे .लसीकरण केंद्रावर २५०डोस उपलब्ध होतील ते सर्व लस प्रथम डोस वाल्यानसाठी असतील अशी माहिती आरोग्य विभाग आरोग्य सेवक पिंजारी यांनी दिली हे लसीकरण यशस्वी होण्यासाठी वसंतवाडी ग्रामपंचायत सरपंच  वत्सलाबाई पाटील, उपसरपंच ईश्वर चव्हाण, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर चव्हाण सर्व ग्रामपंचायत सदस्य प्रयत्नशील राहतील. तरी आपल्या वसंतवाडीतांडा गाव व जळके येथील नागरिकांनी लसीकरण केंद्रावर जाऊन लसीकरण करून घ्यावे यासाठी प्रत्येकाने…

Read More