Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

१२ लाखांचा मुद्देमाल जप्त; वेगवेगळे ४२ गुन्हे दाखललाईव्ह महाराष्ट्र न्यूज : राज्य उत्पादन शुल्क विभागाने भुसावळ, मुक्ताईनगर, बोदवड, यावल आणि रावेर या तालुक्यांमध्ये छापेमारी करून सुमारे १२ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर जिल्ह्यात वेगवेगळे एकुण ४२ गुन्हे दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागीय निरीक्षक सुजित कपाटे यांनी दिली. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, मुक्ताईनगर, बोदवड, यावल आणि रावेर तालुक्यात बेकायदेशीररित्या अवैध ढाबे, हातभट्टी दारू निर्मिती व विक्री केंद्र, हातभट्टी दारूची वाहतूक आणि बनावट मद्य निर्मिती होत असल्याच्या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भुसावळ विभागाने धडक कारवाई केली आहे. यामध्ये ४ हजार २०० लिटर रसायन, ६५३ लिटर…

Read More

धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील चोरगाव येथील दिव्यांग अशोक बुधा सोनवणे या निराधार तरूणाच्या मदतीसाठी धरणगाव तहसील कार्यालयाचे तहसीलदार नितीनकुमार देवरे यांच्यामाध्यमातून किरणा साहित्याचे कीट प्रदान करण्यात आले. याबाबत माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील चोरगाव येथील ७५ टक्के दिव्यांग असलेले अशोक बुधा सोनवणे हे पूर्णतः निराधार व दिव्यांग आहेत. अशोककडे उदरनिर्वाहासाठी कोणतेच साधन नाहीत. किवा कोणता व्यवसाय करू शकण्याची क्षमता त्यांच्यात नाही. त्याचे दोघे पाय दिव्यांग झाले असल्याने ते बसून राहतात, त्यांना ऊठ-बस देखील करता येत नाही. त्यांचे चुलत भाऊ प्रकाश सोनवणे हे त्यांना लहान बाळाला कडेवर घ्यावे त्या पद्धतीने कडेवर घेऊन आज गुरूवार ३ फेब्रुवारी रोजी दुपारी धरणगाव तहसील कार्यालयात…

Read More

जळगाव प्रतिनिधी । आशा व गट प्रवर्तक यांच्या थकीत मानधन, मोबदला आणि प्रलंबित मागण्यांसाठी सीटूच्या वतीने महापालिका समोर निदर्शने करण्यात आली व विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. सीटूच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव महापालिका अंतर्गत आरोग्य विभागातील दवाखान्यात कोरोना महामारीच्या काळात आपला जीव धोक्यात घालून जनतेची घरोघरी जावून सेवा करण्याचे काम करणाऱ्या आशा वर्कर्स व गट प्रवर्तक यांना नोव्हेंबर पासून सुरू केलेला जोखीम भत्ता मार्च नंतर बंद करून नये, आरोग्य खात्याच्या बजेटमध्ये आरोग्य खात्यावरील खर्चात वाढ करावी, आशांना कायम योजना कर्मचारी म्हणून कायम सेवेत घेण्यात यावे, कोरोना काळात मयत झालेल्या आशांना ५० लाखांची आर्थीक मदत करावी, आशा व…

Read More

प्रतिनिधी लाईव्ह महाराष्ट्र न्यूज प्रविण पाटील। तालुक्यातील वसंतवाडी तांडा येथील प्राथमिक शाळेत पहिले ते चौथीच्या वर्गासाठी तीन शिक्षक मंजूर आहे. परंतू प्रत्यक्षात एका शिक्षकावर ८८ विद्यार्थ्यांची शाळा चालविली जात असल्याने विद्यार्थ्यांच शैक्षणिक नुकसान होत आहे. शिक्षक मिळेल का शिक्षक ! अशी अवस्था येथील शाळेची झाली आहे. एकीकडे शैक्षणिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर प्रगती होत आहे. त्याच डिजीटलचे शिक्षण देण्यावर अधिक भर दिला जात आहे. असे असतांना दुसरी कडे जिल्हा परिषदेच्या भोंगळ कारभारामुळे अनेक शाळांमध्ये मोजक्या कमी शिक्षकांवर चालविली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. जळगाव तालुक्यातील वसंतवाडी तांडा येथील प्राथमिक शाळेत एकुण पहिली ते चौथी असे चार वर्ग आहे. चार वर्गांसाठी…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । तालुक्यातील बांभोरी येथे हळदीच्या कार्यक्रमात नाचण्याच्या कारण आणि जुन्या वादाची किनार यातून झालेल्या चाकू भोसकून तरूणाला गंभीर जखमी केले. जखमी झालेल्या अतुल विजय कोळी (नन्नवरे) (वय-२५) या तरूणाचा आज पहाटे मृत्यू झालाय. या गुन्ह्यातील चार संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. सविस्तर माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील नितीन साहेबराव बाविस्कर याच्या लग्नाच्या हळदीच्या कार्यक्रमात नाचण्याच्या कारणावरून जुन्या वादाची किनार यातून धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील अतुल विजय कोळी (नन्नवरे) (वय-२५) या तरूणावर गावातील अजय विनोद नन्नवरे रा. बांभोरी ता. धरणगाव याने पोटात चाकू भोसकून गंभीर रित्या जखमी केल्याची घटना २७ जानेवारी रोजी मध्यरात्री घडली होती.…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । शिवाजी नगरातील भारत नगर येथील कोमल ज्ञानेश्वर कांबळे (वय-२०) रा. भारत नगर, शिवाजी नगर परिसर जळगाव या तरूणीने राहत्या घरात ओढणीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी उघडकीला आली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत माहिती अशी की, कोमल कांबळे ती युवती आपल्या आई, वडील व दोन भावांसह वास्तव्याला आहे. वडील खासगी लक्झरी चालवून कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. बुधवारी २ फेब्रुवारी रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास घरी कुणीही नसतांना कोमल हिने राहत्या घरात ओढणीने गळफास घेवून आत्महत्या केली. हा प्रकार शेजारी राहणाऱ्या एका मुलीच्या लक्षात…

Read More

तालुका पोलीसात गुन्हा दाखल जळगाव प्रतिनिधी । अनैतिक संबंधातून शहरातील एका भागातील राहणाऱ्या ३५ वर्षीय तरूणाचा ममुराबाद रोडवर गळा आवळून खून करण्यात आला होता. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली होती. दोघांना बुधवारी दुपारी न्यायालयात हजर केले असता ३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील एका भागात राहणारा मयत ३५ वर्षीय तरूण आपल्या आईवडील, पत्नी व भाऊ यांच्यासह वास्तव्याला होता. ममुराबाद रोडवर मयत तरूणाचा मृतदेह २७ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता आढळून आला होता. पोलीसांनी मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी यांनी गळा आवळून खून करण्यात आल्याचा अहवाल यांनी दिला. त्यानुसार जळगाव…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : भुसावळ -येथील बाजारपेठ पोलिसांनी गावठी कट्टा बाळगणाऱ्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, वांजोळा रोड भागात काही तरुण संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार तुषार किशोर खरारे व कमलेश किशोर खरारे (दोन्ही रा.विघ्नहर्ता नगर, जामनेर रोड, भुसावळ) हे दोन्ही भाऊ व विजय संजय निकम (रा.चोरवड, ता.भुसावळ) यांना अटक करण्यात आली. तिघांची अंगझडती घेतली असता १५ हजार रुपये किंमतीचे गावठी पिस्तूल, ३० हजारांची दुचाकी (एमएच.१९-डीसी.८८६०) जप्त करण्यात आली. पोलिस नाईक नीलेश चौधरी यांच्या फिर्यादीनुसार तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय मंगेश गोंटला, गणेश…

Read More

जळगाव (प्रतिनिधी ) -तालुक्यातील शिरसोली येथील रेल्वे स्टेशन जवळ आज सकाळी १०:३० ते ११ वाजेच्या दरम्यान ३५ ते ४० वर्षीय इसम पडल्याने तो जागीच ठार झाल्याची घटना आज येथे उघडकीस आली असून याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरु होते. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, जळगाव पाचोरा दरम्यान शिरसोली रेल्वे स्टेशन जवळ खांबा क्रमांक ४०९/२४ ते २६ दरम्यान गोवा एक्सप्रेसमधून पडल्याने अनोळखी ३५ ते ४० वर्षीय इसमाचा मृत्यू झाला.स्टेशन प्रबंधक योगेश खांबे यांनी शिरसोली येथील पोलीस पाटील श्रीकृष्ण पाटील यांना खबर दिली . त्यानुसार पोलीस पाटील यांनी एमआयडीसी पोलिसांना खबर दिल्यावरून तात्काळ पोलिसांनी धाव घेत रुग्णवाहिकेतून अज्ञात इसमाचा…

Read More

जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय पथकाला यश जळगाव प्रतिनिधी । जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल असलेल्या ४० वर्षीय महिलेच्या पोटातून चक्क १५ किलो वजनाचा गोळा काढण्यात वैद्यकीय पथकाला यश आले आहे. मंगळवारी १ फेब्रुवारी रोजी दुपारी यशस्वी उपचार करण्याऱ्या वैद्यकीय पथकाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी अभिनंदन केले आहे. यासंदर्भात माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील गडखांब येथील ४० वर्षीय कमलबाई रमेश भिल या महिलेला पोटात दुखत होते. तसेच, वेदना असह्य होत होत्या. नातेवाईकांनी तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले. स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागात डॉक्टरांनी तपासणी केली असता, तिच्या पोटात अनावश्यक मांसाचा गोळा वाढत असलेला दिसून…

Read More