Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पिंप्राळा परिसरात एकाच रात्री तीन घरफोडी : लाखोंची रोकड गायब !
    क्राईम

    पिंप्राळा परिसरात एकाच रात्री तीन घरफोडी : लाखोंची रोकड गायब !

    editor deskBy editor deskAugust 26, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    देवाच्या कार्यक्रमासाठी भावाकडे मुक्कामी थांबलेल्या अर्चना प्रशांत मगर (वय ४०) यांच्या घरात चोरट्यांनी डल्ला मारला. याठिकाणाहून चोरट्यांनी ५ तोळे सोने, १५ भार चांदी व ३० हजारांची रोकड असा एकूण २ लाख ८५ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना दि. २३ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पिंप्राळा परिसरातील साई पाडुरंग सोसायटीमध्ये घडली. त्यानंतर चोरट्यांनी अन्य दोन घरांमध्ये देखील चोरी केली. एकाच रात्रीत तीन घरांमध्ये घरफोडी केल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार,  शहरातील पिंप्राळा परिसरातील साई पाडुरंग सोसायटीमध्ये अर्चना मगर या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. दि. २३ ऑगस्ट रोजी त्यांचे – मोठे भाऊ रविंद्र इंधाटे यांच्याकडे देवाचा कार्यक्रम असल्याने मगर कुटुंबिय कार्यक्रमासाठी गेले होते. – रात्री ते तेथेच मुक्कामी थांबल्यानंतर – दि. २४ ऑगस्ट रोजी अर्चना मगर या घरी परतल्या. घरी आल्यानंतर त्यांना घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तुटलेला दिसला. त्यांनी घरात जावून पाहणी केल्यानंतर घरातील लोखंडी कपाटाचे लॉक तुटलेले होते. त्यामुळे अर्चना मगर यांना घरात चोरी झाल्याची खात्री झाली.

    चोरट्यांनी अर्चना मगर यांच्या घरातील लोखंडी कपाटात ठेवलेले ४९ ग्रॅम सोन्याचे दागिने, १५ चांदी व ३० हजारांची रोकड असा ऐवज चोरुन नेला. घटनेची माहिती रामानंद नगर पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्यासह गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.अर्चना मगर यांच्यासह चोरट्यांनी त्याच परिसरात राहणाऱ्या सचिन अशोक चौधरी व संजय भगवान चौधरी याच्या घरात देखील चोरी केल्याचे समोर आले. एकाच रात्रीमध्ये चोरट्यांनी तीन घरांमध्ये चोरी केल्यामुळे पोलिसांनी परिसरात असलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली.चोरट्यांनी अर्चना मगर यांच्या घरातून १५ ग्रॅम सोन्याची शॉर्ट पोत, १२ ग्रॅमची चैन, १० ग्रॅमचे कानातले, १२ ग्रॅमचे मंगळसूत्र, ७ भार वजनाचे पायातील चांदीचे पैंजण, ३ भार वजनाची चांदीची चैन, २ भार वजनाची जोडवे व ३० हजरांची रोकड असा एकूण २ लाख ८५ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला.

    परिसरातील एका घरावर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोन चोरटे मध्यरात्रीच्या सुमारास तोंडाला रुमाल बांधून येत असल्याचे कैद झाले आहे. त्यांनीच तिघ घरांमध्ये चोरी केल्याचा पोलिसांना संशय असून त्या फुटेजवरुन पोलिसांकडून चोरट्यांचा कसून शोध घेतला जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    धक्कादायक : एकाच दिवशी दोन तरुणानी घेतला टोकाचा निर्णय !

    August 26, 2026

    धरणगाव तालुक्यात खळबळ : मध्यरात्री महिलेवर अत्याचार !

    August 26, 2026

    जिल्ह्यात खळबळ : लॉजमध्ये दिला अल्पवयीन मुलीला रूम; मॅनेजरसह तरुण अटकेत

    August 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.