Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » १५ ऑगस्टपर्यंत काम करा; अन्यथा ‘रस्ता रोको’! GPS मित्र परिवाराचा NHAI ला अल्टिमेटम
    जळगाव

    १५ ऑगस्टपर्यंत काम करा; अन्यथा ‘रस्ता रोको’! GPS मित्र परिवाराचा NHAI ला अल्टिमेटम

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रAugust 3, 2026Updated:August 3, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पाळधी-तरसोद सेवा रस्त्यावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
    GPS मित्र परिवाराचे NHAI ला निवेदन; १५ ऑगस्टपर्यंत उपाययोजना न झाल्यास ‘रस्ता रोको’ आंदोलनाचा इशारा


    पाळधी, ता. धरणगाव : पाळधी ते तरसोद या सेवा रस्त्यावर सातत्याने होत असलेल्या अपघातांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर सेवा रस्त्यावर आवश्यक सुरक्षाविषयक सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी मागणी GPS मित्र परिवार, पाळधी यांच्या वतीने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) जळगाव कार्यालयाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.


    निवेदनात म्हटले आहे की, पाळधी-तळसोड सेवा रस्त्यावर गेल्या काही वर्षांत अनेक गंभीर अपघात घडले असून, त्यात अनेक निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे या मार्गावरील सुरक्षाव्यवस्था बळकट करणे अत्यंत आवश्यक झाले आहे.


    GPS मित्र परिवाराने निवेदनातून तीन प्रमुख मागण्या केल्या आहेत. यामध्ये संपूर्ण सेवा रस्त्यावर रात्रीच्या वेळी पुरेशी स्ट्रीट लाईट व्यवस्था उभारणे, साई मंदिर व गणपती मंदिर परिसरात सुरक्षित क्रॉसिंग (ओपन ॲक्सेस) उपलब्ध करून देणे तसेच संबंधित टोल नाक्यावर रुग्णवाहिका, क्रेन व इतर आपत्कालीन मदत सुविधा कायमस्वरूपी उपलब्ध ठेवण्याचा समावेश आहे.


    सध्या सुरक्षित क्रॉसिंग नसल्यामुळे नागरिकांना महामार्ग ओलांडण्यासाठी अनेक किलोमीटरचा वळसा घालावा लागत असून, त्यामुळे वेळ आणि इंधनाचा अपव्यय होत आहे. तसेच आपत्कालीन सुविधा तातडीने उपलब्ध नसल्यामुळे अपघातग्रस्तांना वेळेवर मदत मिळत नसल्याची खंतही निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.


    या सर्व मागण्यांवर प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच १५ ऑगस्ट २०२६ पर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्यास पाळधी ग्रामस्थांच्या वतीने ‘रस्ता रोको’ आंदोलन करण्यात येईल, असा इशारा GPS मित्र परिवाराने दिला आहे.


    सदर निवेदन भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक यांना सादर करण्यात आले असून, त्याच्या प्रती धरणगाव पोलिस ठाणे, दुचाकी पोलीस चौकी (पाळधी) तसेच हायवे ट्रॅफिक विभागाला देण्यात आल्या आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    धरणगावात शांतता समितीची बैठक; सण-उत्सव शांततेत साजरे करण्याचे आवाहन, आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्टवर कारवाईचा इशारा

    August 2, 2026

    कर्जमाफीसाठी ई-केवायसी अनिवार्य; शेतकऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांचे तातडीचे आवाहन

    July 30, 2026

    वाढदिवसाचा अनोखा आदर्श! नगरसेवक इंजि. नरेंद्र पाटील यांनी गरजूंना रेनकोट वाटून दिला सामाजिक संदेश

    July 30, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.