Author: editor desk

मुंबई : वृत्तसंस्था भाजप नेते तथा माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार शब्दांत टीका करत राज ठाकरे यांच्या टोमण्याला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. “मी ठाकरे बंधूंप्रमाणे कागदी वाघ नाही, तर खरा वाघ आहे. मी डरकाळ्या मारत विधानसभा आणि लोकसभेत गेलो आहे,” असे म्हणत दानवेंनी राजकीय वातावरण तापवले आहे. ठाकरे गट आणि मनसे यांची बुधवारी बहुप्रतिक्षित युती जाहीर झाल्यानंतर या युतीवर प्रतिक्रिया देताना रावसाहेब दानवेंनी टीका केली होती. यावर उत्तर देताना राज ठाकरे यांनी “उत्तरे देवाला दिली जातात, दानवांना नाही,” असा टोला लगावला होता. त्याच पार्श्वभूमीवर गुरुवारी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना दानवेंनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या…

Read More

मुंबई : प्रतिनिधी राज्यभरात महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजले असून, राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. इच्छुक उमेदवार, पक्षनेते आणि कार्यकर्ते सक्रिय झाले असताना, सर्वाधिक लक्ष वेधून घेणारी निवडणूक म्हणजे मुंबई महानगरपालिकेची (बीएमसी). देशातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीएमसीच्या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले असते. याच पार्श्वभूमीवर काल मुंबईच्या राजकारणात मोठी घडामोड घडली. अनेक वर्षांच्या मतभेदांनंतर ठाकरे बंधू — उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे — एकत्र आले असून, आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक एकत्र लढवण्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. या घोषणेसह बीएमसी निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुटला असून, महायुती विरुद्ध ठाकरे बंधू असा थेट सामना रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या राजकीय…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यात बुधवारी रात्री उशिरा झालेल्या भीषण अपघातात स्लीपर बसला आग लागून १० हून अधिक प्रवासी जिवंत जळाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार मृतांचा आकडा १२ ते १७ दरम्यान असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हा अपघात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरील हिरियूर तालुक्यात रात्री सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास झाला. मिळालेल्या माहितीनुसार, बंगळूरूहून गोकर्णकडे जाणारी खाजगी सीबर्ड ट्रान्सपोर्ट कंपनीची स्लीपर बस या मार्गावरून जात होती. बसमध्ये ३० हून अधिक प्रवासी होते. दरम्यान, भरधाव वेगाने येणाऱ्या एका लॉरीने रस्त्यावरील दुभाजक तोडत विरुद्ध बाजूने जाऊन बसला जोरदार धडक दिली. धडकेनंतर बसला तात्काळ आग लागली. प्रत्यक्षदर्शींनी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील शाहू नगरात झालेल्या ड्रग्स कारवाईचे धागेदोरे हे मास्टर कॉलनीतील शेख अबरार शेख मुक्तार उर्फ अबरार जिलानी याच्यापर्यंत पोहचल्यानंतर तो पसार झाला होता. पोलिसांनी त्याचा शोध घेतला, मात्र तो दुबई पळून गेल्याचा पोलिसांना संशय होता. परंतू गेल्या मालेगावात ड्रग्सची विक्री करतांना शेख अबरार शेख मुक्तार उर्फ अबरार जिलानी (वय २७, रा. मास्टर कॉलनी, आक्सानगर) पोलिसांनी रंगेहाथ पकडले. त्याला न्यायालयीन कोठडीतून जळगाव उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या पथकाने नाशिक कारागृहातून ताब्यात घेतले. त्याला न्यायालयात हजर केले असता, त्याला दि. २९ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील शाहू नगरात शहर पोलीसांनी छापा टाकून साडेपाच लाख…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणात चाळीसगाव शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन मुख्य आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून दोन गावठी कट्टे व दोन जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. तसेच या आरोपींनी ज्या व्यक्तीकडून शस्त्रे घेतली होती, त्याच्या घरावर छापा टाकून आणखी एक गावठी कट्टा व दोन जिवंत राऊंड जप्त करण्यात आले आहेत. दि. १९ रोजी शहर पोलिस स्टेशन हद्दीत असलेल्या रेल्वे स्टेशन परिसरात गोळीबाराची घटना घडली होती. या प्रकरणाचा तपास करत पोलिस उपनिरीक्षक योगेश माळी, हवालदार विनोद पाटील, भूपेश वंजारी व पोकों. गोपाल पाटील यांच्या पथकाने सापळा रचून धुळे रोड परिसरातून दीपक सुभाष मरसाळे…

Read More

वरणगाव : प्रतिनिधी कच (खडी) घेण्यासाठी जाणारे ट्रॅक्टर उलटून त्याखाली दबून पिता आणि सात वर्षीय बालक ठार झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना बुधवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास वरणगाव-किन्ही (ता. भुसावळ) रस्त्यावर घडली. यात एक जण जखमी झाला आहे. संजय श्रवण साबळे (४८) आणि भूषण संजय साबळे (७ वर्षे, रा. सिद्धेश्वरनगर, वरणगाव) अशी मृतांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, वरणगाव शहरातील सिद्धेश्वरनगरमधील मोलमजुरी करणारे संजय साबळे आणि अक्षय संतोष मोरे (२७) सकाळी खडी आणि कच घेण्यासाठी ट्रॅक्टरने किन्ही, ता. भुसावळकडे जात होते. संजय यांच्यासोबत त्यांचा सात वर्षांचा मुलगाही होता. किन्ही गावाजवळ ट्रॅक्टर अचानक उलटले. त्याखाली संजय साबळे आणि भूषण साबळे हे दबले गेले.…

Read More

जळगाव | विजय पाटील  गेल्या काही दिवसांपासून जळगाव महापालिका निवडणुकीत महायुती होणार की नाही होणार याबाबत उलट सुलट चर्चा सुरू होत्या. या चर्चांना बुधवारी रात्री भारतीय जनता पार्टी व शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीनंतर पूर्णविराम मिळालेला असून महापालिकेच्या निवडणुकीत भाजप व शिंदे सेना हे महायुती म्हणून एकत्र लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यासोबत अजून चर्चा बाकी असल्यामुळे कोणाला किती जागा मिळणार याबाबत सस्पेन्स अद्यापही कायम आहेत. महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये बुधवारी रात्री बैठक झाली. या बैठकीला शिवसेनेचे नेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील, भाजपचे निवडणूक प्रमुख तथा…

Read More

आजचे राशिभविष्य दि.२५ डिसेंबर २०२५ मेष राशी आज नवीन प्रकल्प सुरू करण्याचा प्रयत्न करताना काही अडचणी येऊ शकतात. कुटुंबातील एखाद्याला आरोग्य समस्या येऊ शकतात. वृषभ राशी आरोग्याच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला असेल. कामाच्या ठिकाणी यश मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही एखाद्या सहयोगी जोडीदारासोबत नवीन व्यवसाय सुरू करण्याची योजना आखू शकता. मिथुन राशी आजचा दिवस आनंदाच्या बातम्यांनी भरलेला असेल. एक नवीन नोकरी तुमची वाट पाहत आहे. एखादा मित्र तुम्हाला एखाद्या मोठ्या संस्थेत काम करण्याची संधी देऊ शकतो. कर्क राशी आज तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही बदल करावे लागतील. तुमच्या कामाच्या ठिकाणी बदल करणे तुमच्या हिताचे असेल. आज एखाद्या खास व्यक्तीशी संपर्क साधल्यास रखडलेले…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था ईशान्य भारतातील आसाम राज्याच्या कार्बी आंगलोंग जिल्ह्यात पुन्हा एकदा हिंसाचार उसळला असून, या घटनेत अनेक जण जखमी झाले आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने परिसरात कर्फ्यू लागू केला असून, आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमारासह अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर करावा लागला आहे. पश्चिम कार्बी आंगलोंग जिल्ह्यातील व्हिलेज ग्राझिंग रिझर्व्ह (व्हीजीआर) आणि प्रोफेशनल ग्राझिंग रिझर्व्ह (पीजीआर) जमिनींवरील बेकायदेशीर कब्जा हटवण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू होते. मात्र या आंदोलनाला अचानक हिंसक वळण लागले. संतप्त जमावाने तीन दुचाकींना आग लावली, त्यामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. परिस्थिती अधिक चिघळू नये, तसेच हा हिंसाचार इतर जिल्ह्यांमध्ये पसरण्याची शक्यता लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाने भारतीय न्याय…

Read More

जळगाव : प्रतिनिधी राज्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे व राज ठाकरेंची मनसेच्या युतीची घोषणा ठाकरे बंधू यांनी केल्यानंतर आज जळगावच्या राजकारणातही उमटले. या युतीच्या स्वागतासाठी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते जळगावात एकत्र आले आणि फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोष साजरा केला. राज्यात युतीची घोषणा जाहीर होताच, जळगावातील आकाशवाणी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ मनसे आणि उबाठा गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे यांच्यासह उबाठा गटाचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करून आनंद व्यक्त करण्यात आला. कधीकाळी कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी असलेले हे दोन्ही पक्ष एकत्र आल्याने…

Read More