भुसावळ : प्रतिनिधी तालुक्यातील एका शेतकर्याच्या शेतातील इलेक्ट्रीक पंप चोरीला गेल्यानंतर गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात ६ हजारांची लाच मागून ती स्वीकारणार्या भुसावळ तालुका पोलीस ठाण्यातील हवालदाराला जळगाव एसीबीने गुरुवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास मांडवेदिगर फाट्याजवळ पकडताच भुसावळ तालुक्यातील लाचखोर पोलिसांच्या गोटात प्रचंड थरकाप उडाला आहे. या घटनेत गणेश पोपटराव गव्हाळे (जामनेर) असे अटकेतील हवालदाराचे नाव आहे. जळगाव एसीबीचे प्रभारी पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव व सहकार्यांनी हा सापळा यशस्वी केला. काय आहे घटना ? कुर्हे पानाचे परीसरातील 35 वर्षीय शेतकरी तक्रारदार असून त्यांच्यासह अन्य दोन शेतकर्यांच्या शेतात इलेक्ट्रीक मोटार असून अन्य शेतकर्याची पाच हजार…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था जून महिना संपत आला असला तरी मान्सून काही येण्याचे नाव घेत नसल्याने नागरिकांसह शेतकरी राजा हवालदिल झाला आहे. पावसाने कुठे दडी मारली याच प्रश्नाने सर्व चिंतातूर आहेत. मात्र हवामान खात्याकडून आता पुढील चार दिवसांमध्ये राज्यातील वातावरण बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज 22 जून रोजी मुंबईत मध्यम आणि 23 आणि 24 जून रोजी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर राज्यात पुढील चार दिवसांमध्ये राज्यात मेघगर्जनेसह मुसळधार ते हलक्या स्वरुपाचा पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. भारतीय हवामानशास्त्र पुणे विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी याबाबतची माहिती दिली आहे. केरळ आणि कर्नाटकच्या किनार्यावर दक्षिण-पश्चिम वाऱ्यांचा वेग मंदावला…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरात एका वकील महिलेचे रात्रीच्या सुमारास दुचाकी वर आलेल्यांनी मंगळसूत्र लांबविल्याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील गणपती नगर परिसरातील ऍड. शिल्पा विश्वेश रावेरकर (वय ४०) या महिलेचे दिनांक 20 जून 2023 रोजी रात्री च्या सुमारास दोन अनोळखी इसमाने दुचाकी वर येत महिलेच्या गळ्यातील पन्नास हजार रुपये किमतीचे २० ग्रॅम वजनाचे सोन्याची चैन व पेंडल व काळे मणी असलेले मंगळसूत्र जबरीने इसकावून महिलेच्या गाड्यावर दुखापत करून चोरून नेल्याप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार रामानंद नगर पोलीस स्थानकात दोन अनोळखी चोरट्याने विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप…
जळगाव : प्रतिनिधी महिलेने फेसबुकद्वारे रीक्वेस्ट पाठवल्यानंतर व्यापार्याने ती अॅप्सेप्ट करीत चॅटींग सुरू केल्याने महिलेने अश्लील व्हिडिओ कॉल केल्यानंतर व्यापार्यानेदेखील त्यास प्रतिसाद दिल्यानंतर आरोपींनी ती अश्लील चित्रफित बनवली व त्याआधारे नंतर ब्लॅकमेल करीत जळगावच्या 51 व्यावसायीकाकडून तब्बल सात लाख 77 हजार 777 रुपये उकळण्यात आले. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर व्यापार्याने सायबर पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवल्यानंतर त्या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 51 वर्षीय पीडीत व्यापार्याच्या तक्रारीनुसार, 16 ते 19 जून 2023 च्या त्यांच्या फेसबुकवर अनोळखी फेसबुक खातेधारक रीया अग्रवाल नामक महिलेने ओळख निर्माण केली. त्यानंतर मेसेंजवर चॅटींग व व्हिडिओ करीत कामोद्दीपक भावना उत्तेजीत केल्या व तक्रारदाराचा नग्न…
मुक्ताईनगर : प्रतिनिधी तालुक्यातील एका २० वर्षीय तरुणीला परिवारातील सदस्यांना मारण्याची धमकी देत घरात नेत अत्याचार केल्याची घटना घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर तालुक्यातील एका गावात २० वर्षीय तरुणी आपल्या परिवारासह राहायला आहे. दि जून महिन्यात तरुणी घरी जात असतांना तिला रस्त्यात गाठत तिला जबरीने ओढून नेत तिला मारहाण करीत आई, वडील, भाऊ यांना जीवे ठार मारण्याची धमकी देत तरुणाच्या राहत्या घरी घेवून जात तिच्यावर अत्याचार करीत त्याचे व्हिडीओ बनविला तर त्यानंतर २० दिवसांनी पुन्हा तरुणीला लग्नाची मागणी घालत तरुणीने लग्नास नकार दिल्याने मोबाईलमध्ये केलेले व्हिडीओ…
जामनेर : प्रतिनिधी जामनेर तालुक्यातील जांभूळ येथील 45 वर्षीय प्रौढ इसम महिनाभरापासून बेपत्ता असतानाच त्यांचा शोध सुरू असतानाच जळगाव गुन्हे शाखेने एका संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर उसनवारीच्या पैशातून संशयिताने प्रौढाचा खून केल्याची कबुली दिल्याने जामनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे. कैलास विठोबा वडाळे (45, रा.जांभूळ ता. जामनेर) असे खून झालेल्या प्रौढाचे नाव आहे तर संशयित आरोपी रमेश मोरे (वडाळी, ता.जामनेर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ मे २०२३ रोजी दुपारी तीन वाजेनंतर (वेळ निश्चित नाही) संशयित रमेश मोरे (रा.वडाळी ता. जामनेर) याने कैलास वडाळे यांच्याकडे उसनवारीचे पैसे परत मागितल्याच्या कारणावरुन कशानेतरी घातपात करुन मारुन खून केल्याचा आरोप मयताचा मुलगा…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात अनेक धर्मात आपापल्या पद्धतीने विवाह होत असतात हे विवाह एखाद्या सणापेक्षा कमी नसतात, लग्नाशी संबंधित कामे आठवडाभर आधी सुरू होतात. संगीताबरोबरच जेवणाची तयारीही सुरू होते. नातेवाईकही लग्नाच्या तयारीत गुंततात. सर्वत्र आनंद असतो, पण शेवटच्या क्षणी वराने आपला रंग बदलला तर वातावरणच बदलून जातं. आनंदाचं वातावरण दु:खात बदलतं. असाच एक प्रकार राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये समोर आला आहे. लग्नानंतर पाठवणीच्या वेळी वराने अशी मागणी केली की नवरीकडील लोकांना धक्काच बसला. वधू पक्षाने नवरदेवाला आपली बाजू पटवून देण्याचा खूप प्रयत्न केला, पण नवरदेवाकडील लोक त्यांच्या मागणीवर ठाम राहिले. यानंतर दोन्ही बाजूंमध्ये बाचाबाची झाली. लग्न होऊन 24 तासही उलटले…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत असतांना दिसून येत आहेत. काही भागात उष्णतेची लाट कायम आहे. तर राज्यात काही भागांमध्ये ढगाळ वातावरण दिसून येत आहे. मात्र, जून महिना संपत आला असला तरी अद्यापही मान्सूनने दडी मारली आहे. आता पुढील चार दिवसांमध्ये राज्यातील वातावरण बदल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे रेनकोट, छत्र्या तुम्हाला बाहेर काढव्या लागणार आहेत. राज्यात पुढील चार दिवसांमध्ये राज्यात मेघगर्जनेसह मुसळधार ते हलक्या स्वरुपाचा पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसेच मुंबईतही पाऊस चांगली हजेरी लावणार आहे. उद्या 22 जून रोजी मुंबईत मध्यम आणि 23 आणि 24…
धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातील रात्रीच्या सुमारास मार्केट परिसरात एका तरुणावर चार जणांनी प्राणघातक हल्ला चढविल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील पिंप्री खु या गावातील मुख्य रस्त्यावर दि.१८ जून रोजी रात्रीच्या सुमारास चार संशयित तरुणांनी गावातील दुकाने बंद करा असे जोरजोरात ओरडत आले व राहुल संतोष बोरसे हा तरूण घराबाहेर उभा असतांना त्यातील एकाने तु येथे कसा काय उभा आहे असे बोलून धक्काबुकी केली यानंतर या चार हि तरुणांनी राहुल बोरसे नामक तरुणाच्या डोक्यात लोखंडी दांडका टाकत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला व याठिकाणी परिसरातील काही लोकांनी…
भुसावळ : प्रतिनिधी शहरातील एका परिसरात घरात घुसत काही इसमांनी महिलेवर चाकू हल्ला तर मार्केट परिसरात महिलेच्या मुलावर देखील हल्ला केल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शनी मंदिर वार्डातील रहिवाशी बेबाबाई लक्ष्मण चौधरी यांच्या राहत्या घरी काही इसमांनी घरात घुसून चाकूने वार करीत त्यांचा मुलगा जीवन चौधरी यांच्यावर डेली मार्केट मधील मच्छी मार्केटच्या गेटवर काही अज्ञात इसमांनी वार केल्याची घटना रात्री अकरा वाजेच्या दरम्यान घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. शहरातील बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरून रात्री अकरा वाजेच्या सुमारास कोयत्याने वार केल्याची घटना घडली. यामध्ये (बेबाबाई लक्ष्मण चौधरी ) वय ५२ हिच्यावर अज्ञात इसमांनी कोयत्याने गालावर व…

