मुंबई : वृत्तसंस्था देशातील मोदी सरकारच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज एनडीए सरकारचा अर्थसंकल्प सादर केला असून यात त्यांनी विविध क्षेत्रासंदर्भात मोठ्या घोषणा केल्या आहेत. परंतु, सर्वसामान्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय असलेल्या सोनं-चांदीच्या दरातही मोठी कपात या बजेटमधील निर्णयाने झाली आहे. त्यामुळे जळगाव आणि पुण्याच्या सराफ बाजारात याचा परिणाम देखील दिसून आला आहे. अवघ्या दोन तासांमध्ये प्रति तोळा 3 हजारांनी सोनं स्वस्त झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे सोने खरेदीसाठी ग्राहकांनी सराफा बाजारात गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्ममधील पहिला अर्थसंकल्प सादर केला आहे. यात सोन्याच्या कस्टम ड्युटीमध्ये मोठी कपात करण्याचा निर्णय घेण्यात…
Author: editor desk
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प आज दि. २३ सादर झाला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी सलग सातवा अर्थसंकल्प मांडला. आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात सीतारामन यांनी गरीब, तरुण, महिला, शेतकरी अशा महत्त्वाच्या घटकांवर लक्ष केंद्रित करण्याचा सरकारकडून प्रयत्न केला जात असल्याचे म्हटले आहे. यासह अर्थसंकल्पात सीतारामन यांनी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. ३ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त आयकर स्लॅबमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. नवीन कर प्रणालीमध्ये ० ते ३ लाख रुपयांपर्यंत कोणताही कर नाही. नव्या करप्रणालीत ३ लाख रुपयांपर्यंत करातून सूट देण्यात आली आहे. नवीन कर प्रणाली अंतर्गत करदर संरचना खालीलप्रमाणे सुधारित…
जळगाव : प्रतिनिधी राज्यातील अनेक जिल्ह्यात सध्या पावसाचा चांगलाच जोर वाढत असतांना दरम्यान हतनूर धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरण क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढली असून हतनूर धरणाचे १८ दरवाजे उघडण्यात आले आहे. यामुळे तापी नदीच्या दोन्ही तिरांवरील नागरिकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. सोमवारी हतनूर धरणाचे ४१ पैकी १२ दरवाजे १.० मी. उंचीने सकाळी दुघाज्ञात आले होते. तापी नदीपात्रामध्ये २३०९६ क्युसेक इतका विसर्ग करण्यात आला. पुढील काही तासांत ३५ हजार ते ४५ हजार क्युसेक पर्यंत विसर्ग हतनूर धरणातून होण्याची शक्यता वर्तविण्यात आली असल्याने सायंकाळी १८ दरवाजे उघडण्यात आले. यामुळे तापी काठच्या नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन कार्यकारी अभियंता जळगाव पाटबंधारे…
जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण जास्त असून ते कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासन मार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जानेवारी २०२१ मध्ये जिल्हा कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. बालविवाह मुक्त जिल्हा करण्यासाठी व त्याबाबत योग्य ते नियोजन, अंमलबजावणी व निर्णय या कृती दलामध्ये घेण्यात येतात. त्यानुसारच मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंकित सर आणि मा. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद सर यांच्या जिल्हा कृती दल बैठकीतील सूचनांनुसार सक्षम बालविवाह निर्मूलन कार्यक्रमांतर्गत महिला व बालविकास विभाग, युनिसेफ, एसबीसी-३ व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य,पंचायत,शिक्षण महिला व बालकल्याण आणि जिल्हा महिला व बालविकास विभाग मधील तालुकास्तरीय तसेच क्लस्टर मधील अधिकारी…
जळगाव : प्रतिनिधी दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार केलेल्या उदय रमेश मोची वय २६, रा. रामेश्वर कॉलनी हा कुठलेही परवानगी न घेता घरी मिळून आला. यापक्ररणी त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील रामेश्वर कॉलनीतील बांधाजवळील उदय मोची याला दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. परंतु त्याने पोलीस अधीक्षक किंवा शासनाची कुठलीही परवानगी न घेता, तो शहरातील त्याच्या घरी आलेला होता. पोलिसांनी त्याच्या घराची तपासणी केली असता, तो घरी मिळून आला. याप्रकरणी त्याने पोलीस अधीक्षक यांनी पारित केलेल्या आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलीस कर्मचारी किरण पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरुन संशयित उदय रमेश मोची याच्याविरुद्ध गुन्हा दाखल…
जळगाव : प्रतिनिधी मित्रांसोबत सोयगाव तालुक्यातील पळाशी येथील धारकुंड गेलेल्या गौरव नेरकर (२१, रा खंडेराव नगर) या तरुणाचा दगडावर साचलेल्या शेवाळावरून पाय घसरुन कुंडात बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली. सोमवारी त्याचा मृतदेह सापडला. मिळालेल्या माहितीनुसार, घटना मित्रांना समजताच त्यांनी आरडाओरड केली. काही तरुणांनी पाण्यात उड्या घेतल्या, मात्र गौरव सापडला नाही. घटनेची माहिती मिळताच सोयगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज बारवाल, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. रात्री शोधकार्यात अडचणी येत सोमवारी पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने शोधकार्य केले. त्यावेळी गौरवचा मृतदेह सापडला. बनोटी रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आला. सोमवारी सायंकाळी गौरवचा मृतदेह जळगावात आणण्यात आला व…
पाचोरा : प्रतिनिधी तालुक्यातील कुरंगी येथे पत्नी व अल्पवयीन मुलाने आपल्या जन्मदात्या पित्यास घरगुती वादातून लोखंडी रॉड व विटेने जबर मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या इसमास ग्रामस्थांच्या मदतीने पाचोरा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यामध्ये पत्नी व अल्पवयीन मुलाविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. पत्नी व अल्पवयीन मुलास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील कुरंगी येथील मयत हा कौटुंबिक वाद करत असे. २१ जुलै रोजी सायंकाळी ४:३० वाजेच्या सुमारास त्याचे पत्नी व अल्पवयीन मुलाशी भांडण झाले. या भांडणात मुलाने पित्याच्या कंबरेवर, पाठीवर व मानेवर…
भुसावळ : प्रतिनिधी साकेगाव शिवारात नवोदय विद्यालयाच्या मागे शेतात सुमारे १२ वर्षांच्या मुलाचा मृत्यूदेह आढळून आला होता. चार दिवस उलटूनही ओळख पटलेली नाही. त्या बालकाचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे शवविच्छेदनाच्या अहवालानुसार निष्पन्न झाले आहे. मात्र खून का करण्यात आला अद्याप स्पष्ट झालेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, साकेगाव शिवारातील नवोदय विद्यालयामागील शेतात मुलाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. मृत्यूदेहाच्या शेजारीच गुलाबी व काळ्या रंगाच्या पानाची डिझाईन असलेला शर्ट तसेच निळ्या रंगाची पॅन्ट आढळून आली आहे. याप्रकरणी तालका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र शवविच्छेदनानंतर या मुलाचा गळा आवळून खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हवालदार संजय भोई यांच्या…
भुसावळ : प्रतिनिधी अवैध वाळू वाहतूक प्रकरणी जप्त केलेला डंपर लंपास केल्याची घटना १९ रोजी घडली. तहसील कार्यालयाच्या आवारातून हा डंपर पळविण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या सर्वत्र सुरू असलेल्या अवैध गौण खनिज व वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी तहसीलदारांनी पथके तयार केली आहेत. तहसील कार्यालयाच्या वतीने १२ जुलै रोजी नाहाटा कॉलेज भुसावळजवळ डंपर (क्र. एमएच १९ झेड ५३०१) हा अवैध वाळू वाहतूक करताना पकडला होता. या पथकात मंडल अधिकारी रजनी तायडे, मंडल अधिकारी एस. एफ. खान, मंडल अधिकारी प्रफुल्ल कांबळे, कोतवाल शरद पवार, वाहनचालक विलास नारखेडे हे होते. मात्र हा डंपर दि.१९ जुलै रोजी तहसील कार्यालयाच्या आवारातून चोरी…
पुणे : वृत्तसंस्था अनैतिक संबंधातून गरोदर राहिलेल्या विवाहितेचा गर्भपातादरम्यान मृत्यू झाल्यानंतर मृतदेह नदीत फेकून देण्यात आला. त्यानंतर आरडाओरडा करणाऱ्या तिच्या दोन लहान मुलांनाही नदीत जिवंत फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मावळ तालुक्यातील या हत्याकांडाने परिसरात खळबळ उडाली आहे. समरीन निसार नेवरेकर (२५, रा. समता कॉलनी, वराळे, ता. मावळ), इशान (५), इजान (२) अशी मृतांची नावे आहेत. याप्रकरणी गजेंद्र दगडखैर (३७, मावळ), रविकांत गायकवाड (४१,अहमदनगर), मदत करणारी एजंट महिला, कळंबोली (नवी मुंबई) येथील अमर हॉस्पिटलमधील संबंधित डॉक्टर व मदत करणाऱ्या सर्वांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. समरीन ही बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत आली होती. पोलिसांना तिचे घराजवळ राहणाऱ्या गजेंद्र याच्याशी…

