Author: editor desk

धरणगाव : प्रतिनिधी धरणगाव-सोनवद रोड परिसरातील रहिवासी आणि गुंतवणूकदारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आकर्षक बातमी आहे. मौजे धरणगाव शिवारात गट नं. २७८ येथे ‘जगदंबा डेव्हलपर्स अॅण्ड प्रमोटर्स’तर्फे ‘जगदंबा नगर’ या नावाने संपूर्ण सुविधांनी सुसज्ज सरकारमान्यताप्राप्त (N.A.T.P.) लेआऊटचे धन्वंतरी त्रयोदशीच्या (धनोत्रयोदशी) शुभमुहूर्तावर प्लॉट बुकिंग सुरू करण्यात आले आहे. ‘श्री स्वामी समर्थ’ यांच्या आशीर्वादाने सुरू झालेल्या या प्रकल्पाकडे भविष्यासाठी सर्वोत्तम गुंतवणूक म्हणून पाहिले जात आहे. ‘जगदंबा नगर’मध्ये आधुनिक आणि सुरक्षित जीवनशैलीसाठी आवश्यक असलेल्या सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या लेआऊटच्या प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये संपूर्ण लेआऊटला एकच मुख्य प्रवेशद्वार असून, सुरक्षिततेसाठी पूर्ण वेळ सेक्युरिटी सुविधा पुरवण्यात आली आहे. अंतर्गत वाहतुकीसाठी प्रशस्त…

Read More

जळगाव : प्रतिनिधी महिला स्वावलंबी होऊन स्वतःच्या पायावर उभ्या राहाव्यात आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हाव्यात, यासाठी शासन सतत प्रयत्नशील आहे. बचतगटांच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण हे शासनाचे प्राधान्य असून, ग्रामीण व शहरी भागातील महिलांना रोजगार आणि त्यांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे, असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत दिवाळी निमित्त आयोजित केलेल्या बचतगटांच्या विविध खाद्यपदार्थांच्या स्टॉलचे उद्घाटन जीएस ग्राउंड, जळगाव येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजू…

Read More

नागपूर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार झालेल्या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. महायुती सरकारवर विरोधकात आरोप प्रत्यारोप करीत असताना आता राज्य सरकारने शेतकऱ्यांना भरघोस मदत करणार असे सांगत 31 हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा केली. आज (दि.१७) दिवाळीला सुरुवात झाली. तरी प्रत्यक्षात मात्र 1800 कोटी पर्यंतच्या मदतीचे जीआर आले आहेत. राज्य सरकारने केवळ हेक्टरी १० हजार रुपये मदत दिली. ही मदत तुटपुंजी असून ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे. सरकारमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची ही काळी दिवाळी ठरणार आहे; अशी टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी बोलतांना केली. राज्यातील २५३ तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर कालावधीत अतिवृष्टीमुळे नुकसान झाले. सरकारने दिवाळीपूर्वी मदत करू…

Read More

बीड : वृत्तसंस्था राज्यातील मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बीडमधील ओबीसी मोर्चावर तीव्र टीका केली आहे. हा मोर्चा ओबीसी समाजाचा नसून एका विशिष्ट जातीचा आहे, असा थेट आरोप त्यांनी केला. त्याचबरोबर, यामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करण्याचा ‘मोठा गेम’ असू शकतो, अशी शंकाही जरांगे पाटील यांनी व्यक्त केली आहे. अंतरवाली सराटी येथे बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, “आजचा (बीडमधील) मोर्चा ओबीसीचा नसून तो एका विशिष्ट जातीचा मोर्चा आहे. त्यात तुम्हाला विशिष्ट जातीचेच लोक दिसतील. त्यामुळे हा ओबीसींचा मोर्चा नाही आणि ओबीसींच्या हिताचं यांना काही देणं-घेणं नाही.” जरांगे पाटील यांनी या आंदोलनामागे राजकारण असल्याचा संशय व्यक्त करत मुख्यमंत्री…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. महायुती काही ठिकाणी एकत्र तर काही ठिकाणी स्वतंत्र लढणार असल्याच्या चर्चा आहेत. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भाष्य केले आहे. “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका स्वबळावर लढायच्या की महायुतीच्या स्वरूपात, याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील. निवडणुकांचे वातावरण निर्माण झाले असून दिवाळीनंतर कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होऊ शकते. निवडणूक स्वबळावर लढायच्या की महायुतीतून याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल. कार्यकर्त्यांची इच्छा, भावना आणि संघटनात्मक तयारी यांचा विचार करून निर्णय घेतला जाईल,” रवींद्र चव्हाण यांनी सांगितले…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जेवण केल्यानंतर झोपण्यासाठी खोलीत गेलेल्या प्रकाश गायकवाड (वय ४२, रा. कुसुंबा, ता. जळगाव) यांनी झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना दि. १५ रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. वडीलांनी गळफास घेतल्याचे दिसताच मुलाने मनहेलावणारा आक्रोश केला. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे राहणारे प्रकाश गायकवाड हे एमआयडीसी परिसरातील एका कंपनीत कामाला होते. दि. १५ रोजी रात्री त्यांनी रात्री ८ वाजता जेवण केले आणि त्यानंतर ते आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेले. रात्री १० वाजता त्यांचा मोठा मुलगा राहुल वडिलांच्या खोलीत गेला असता, त्यांना वडील तिथे दिसले नाहीत.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी रेल्वेच्या दरवाजात बसून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा मोबाईल पाडणाऱ्या चोरट्याला एलसीबीने ताब्यात घेतले. त्याला कारवाईसाठी जिल्हापेठ पोलिसांच्या स्वाधीन केले. परंतू पोलीसांकडून चौकशी सुरु असतांना कारवाईपुर्वीच पोलिसांच्या हातावर तूरी देवून चंद्रकांत दिलीप पाटील (रा. नंदुरबार) हा चोरटा पोलीस ठाण्यातून पसार झाला. हा प्रकार पोलिसांच्या लक्षात येताच पोलिसांना समजताच पोलिसांनी पाठलाग करीत संशयिताला ताब्यात घेतले. ही घटना गुरुवारी सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे पोलिसांमध्ये खळबळ माजून गेली होती. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील प्रेमनगराजवळ धावत्या रेल्वेच्या दरवाजाजवळ बसलेल्या प्रवाशाचा हाताला झटका मारुन संशयित चंद्रकांत पाटील याने मोबाईल पाडला. प्रवाशाने गाडी हळू झाल्यानंतर त्याने रेल्वेतून खाली उतरून चोरट्याचा पाठलाग सुरु केला. चोरटा…

Read More

एरंडोल : प्रतिनिधी पोलिस स्टेशनमधील कर्मचारी बापू लोटन पाटील हा ३ हजाराची लाच स्विकारताना धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकाच्या जाळ्यात अडकला. त्यास लाच घेताना रंगेहाथ पकडल्यानंतर धुळ्याला नेण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी घडलेल्या अपघातात जप्त केलेली दुचाकी परत देण्याकरिता नुकत्याच काही दिवसांपूर्वी जळगावहून एरंडोल येथे बदली होऊन आलेला पोलिस हवालदार बापू लोटन पाटील याने म्हसवे (ता. पारोळा) येथील तक्रारदाराकडून पैशांची मागणी केली. विशेष म्हणजे तक्रारदार हा स्वतः अपघातात जबर जखमी झालेला असतानाही त्याच्याकडून पैशांची अवास्तव मागणी करण्यात आली. तडजोडीअंती ३ हजार रुपयात प्रकरण मिटविण्याचे ठरले. त्यानंतर ठरल्याप्रमाणे तक्रारदार याने बापू पाटील याला एरंडोल हायवे चौफुली येथे रक्कम घेण्यासाठी…

Read More

आजचे राशिभविष्य दि. १७ ऑक्टोबर २०२५ मेष आज तुम्हाला एखाद्या राजकीय संबंधाचा फायदा होण्याची आशा आहे. तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेने आणि प्रतिभेने काही निर्णय घ्याल, जे तुम्हालाही आश्चर्यचकित करतील. घरातही तुमचे उत्कृष्ट सहकार्य राहील. कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपल्याबद्दल माहिती देऊ नका, अन्यथा कोणीतरी तुमचा विश्वासघात करू शकतो. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करावे. आळस तुमच्यावर हावी होऊ देऊ नका. कोणत्याही व्यवसायात गुंतवणूक करण्यापूर्वी विचार करा. वृषभ आज तुम्हाला अडकलेले पैसे मिळू शकतात, त्यामुळे प्रयत्न करत राहा. दिवसाच्या पहिल्या भागात आपले महत्त्वाचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. या काळात ग्रहमान उत्कृष्ट राहील. दुपारनंतर कोणतीही अप्रिय बातमी किंवा सूचना मिळाल्याने घरात निराशा निर्माण…

Read More

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकार मधील उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एक मोठी घोषणा केली आहे. मागच्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने 31 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. या पॅकेजनुसार शेतकऱ्यांना संपूर्ण मदत दिली जाईल. मदत कशा प्रकारे दिली गेली आहे, याची सविस्तर माहिती ही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाल्यानंतर स्पष्ट होईल. दिवाळीपूर्वी ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासंदर्भात वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. विरोधी पक्ष याबाबत शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याची टीकाही त्यांनी या वेळी केली. विभागीय…

Read More