मुंबई-वृत्तसंस्था । राज्यातील ६२ तालुक्यातील २७१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका जाहीर करण्यात आली असून ४ ऑगस्ट रोजी मतदार होणार असल्याची घोषणा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्तांनी केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणूका जाहीर झाल्याने आजपासून संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. ४ ऑगस्ट रोजी मतदान, ५ ऑगस्ट रोजी मतमोजणी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली. ते म्हणाले की सर्वोच्च न्यायालयाच्या १७ मे रोजीच्या आदेशानुसार पावसामुळे निवडणूक कार्यक्रम बाधित होण्याची शक्यता कमी असलेल्या तालुक्यांत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. त्यामध्ये ६२ तालुक्यांतील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार संबंधित तहसीलदार ५ जुलै २०२२…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
जळगाव तालुका पोलीसात गुन्हा दाखल जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील आव्हाणे शिवारातून वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या टॅक्टरवर कारवाई करत असतांना चालक हा ट्रॅक्टर घेवून पसार झाल्याची घटना घडली आहे. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील आव्हाने शिवारात असलेल्या कचरा फॅक्टरी रोडवरून मंगळवार मंगळवारी २८ जून रोजी सकाळी ११ वाजता ट्रॅक्टर क्रमांक (एमएच ३३, एफ ३५३९) मधून बेकायदेशीर वाळूची वाहतूक करत असताना गस्तीवर असलेले तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांना दिसून आले. दरम्यान, ट्रॅक्टर चालकाजवळ जावून वाळू वाहतूकीचा परवाना असल्याची माहिती पोलीसांनी विचारले असता वाळू वाहतूकीचा कोणताही परवाना नसल्याचे दिसून आले आहे. दरम्यान…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी । शहरातील शिव कॉलनीजवळील राष्ट्रीय महामार्गाजवळ गुवाहाटीला गेलेले आमदार गुलाबराव पाटील यांच्या समर्थनार्थ शिवसैनिकांनी पाठींबा देत जोरदार घोषणाबाजी केली. तर खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला आहे. शिवसैनिक सुनील ज्ञानेश्वर पाटील यांनी सांगितले की, आमदार गुलाबराव पाटील यांनी गेल्या ३ वर्षांपासून शिवसेनेसाठी भरपूर काम केले तसेच ३० ते ३५ केसेस अंगावर घेतल्या आणि संपूर्ण जिल्हा नव्हेच तर उत्तर महाराष्ट्रामध्ये शिवसेना मजबुतीसाठी अहोरात्र काम केले. तसेच शिवसेनेचे संजय राऊत यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर अतिशय खालच्या पातळीवर टीका केल्याबद्दल सर्व शिवसैनिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे व त्यांनी त्यांचा निषेध याठिकाणी व्यक्त केलेला आहे. याप्रसंगी त्रिमूर्ती कॉलेजचे…
दोन्ही मालवाहू वाहन चक्काचूर झाल्या, तीन जण उड्डाणपुलावरून थेट खाली कोसळलेजळगाव ; फैजपूर येथील बाजारासाठी बोलेरो पीकअप वाहनातून बकर्या घेऊन जाणार्या वाहनाला भरधाव वेगाने रॉंग साईडने येणार्या ट्रकने उडविले. यानंतर हाच ट्रक आणखी एक ट्रकवर धडकून या भिषण अपघातात यात चार जण ठार झाले आहे. बुधवारी पहाटे साडेसात वाजेच्या सुमारास जळगाव तालुक्यातील नशिराबाद ते साकेगाव दरम्यान सिमेंट फॅक्टरीजवळ रेल्वे उड्डाणपुलावर हा भिषण अपघात झाला. जुनेद सलीम खाटीक (वय-१८) रा आझाद चौक,भडगाव , अकील गुलाब खाटीक (वय-४२) रा.फैजपूर हल्ली मुक्काम सुप्रीम कॉलनी जळगाव, व नईम अब्दुल रहीम खाटीक (वय-५५) बिलाल चौक जळगाव, फारुख मजिद खाटीक ( वय 40 रा. भडगाव आझाद…
राज्याच्या राजकारणात नवीन हालचाली सुरू महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. राज्याच्या राजकारणात खळबळ माजली. सध्या एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे ही तणावाची परिस्थीती निर्माण झाली आहे. आज बैठकीत अजित पवार गैरहजर राहिले त्यामुळे अजित पवार यांच्यावर सर्वाचे लक्ष लागले आहे. एकनाथ शिंदे आणि इतर बंडखोर आमदारांच्या सर्वाधिक तक्रारी या अजित पवार यांच्याबाबत पक्षातून आहेत. अजित पवार शिवसेनेच्या आमदारांना निधी देत नसल्याचा आरोप या आमदारांनी केला आहे. या घडत असलेल्या प्रकरणात अडचणी प्रसंगी ते दोन तास सुरक्षेशिवाय गायब होते, असा खळबळजनक दावा महाविकास आघाडीमधल्याच एका वरिष्ठ मंत्र्याने केला आहे. मंत्रिमंडळ बैठकीलाही दांडी अजित पवार मंत्रिमंडळाच्या बैठकीला येत नाहीत, असं फारच कमी…
मुंबई वृत्तसंस्था राज्यातील सत्तासंघर्ष दिवसेंदिवस आणखी गडद होत चालला आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाविकास आघाडी सरकारने बहुमत गमावल्याचे मानले जाते. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तर या सर्व प्रकारात शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना सल्ला दिला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर स नवीन वळण लागले आहे. निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदेंचं नाराजीनाट्य सुरु झालं. आधी आमदारांसह शिंदे 21 तारखेला सुरतला पोहोचले नंतर आसामच्या गुवाहटीला मुक्काम ठोकला. शिवसेनेकडून शिंदेंची समजूत काढण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची विचारधारा थोडीशी वेगळी आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राजीनामा न देता बहुमत चाचणीला…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज मुंबई- मंत्री आणि बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांनी गुवाहाटीत बंडखोर आमदारांशी संवाद साधत शिवसेनेचे नेते संजय राऊताना सडेतोड टीका केली. सर्व वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादमुळे या पदापर्यंत पोहचलो. कार्यकर्त्यांच्या वेळीप्रसंगी आम्ही त्यांच्यासोबत असतो असा टोला लगावला आहे. आपण सर्व एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी आले आहोत. आपल्या सर्वांवर जिल्ह्यातून विविध आरोप चालू आहे. तसेच आपल्या पाठीशी देखील अनेक लोक उभे राहत असल्याचे दिसून येत आहे. आपल्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. गुलाबराव पाटलांना आम्ही पानटपरीवर बसवू, असं संजय राऊत म्हणाले. मात्र त्यांना पानटपरीवर चुना कधी लावून जाईल हे त्यांना कळणार नाही, अशी टीका…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: पती-पत्नीच्या कौटुंबिक वादात दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी 4 हजार रूपयांची लाच स्वीकारतांना येथील सहायक फौजदारासह पोलीस कर्मचार्याला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने मंगळवारी 28 जून रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास रंगेहात पकडल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत आला आहे या संदर्भात वृत्त असे की, एका ५५ वर्षाच्या व्यक्तीच्या मुलीला विवाहानंतर सासरी त्रास होत होता. यामुळे तिने सासरच्या मंडळीच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. या खटल्यात आम्ही मदत करून यासाठी तिच्या वडिलांकडे सहायक फौजदार अनिल रामचंद्र अहिरे आणि पोलीस नाईक शैलेश आत्माराम पाटील यांनी 5 हजार रूपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर 4…
मुंबई प्रतिनिधी । मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली. ठाकरेंनी घेतलेल्या निर्णयाला राष्ट्रवादी व काँग्रेसच्या मंत्र्यांनी पाठींबा दिला आहे. बैठक आटोपल्यानंतर उध्दव ठाकरे यांनी तातडीने आमदार आणि पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. एकीकडे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अमित शहा आणि जे.पी. नड्डा यांची भेट घेवून मुंबईत दाखल झाले आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी आता शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना थेट सवाल करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात विशेष अधिवेशनात महाविकास आघाडीला बहूमत सिध्द करावे लागणार आहे. या सर्व घडामोंडीनंतरही मुख्यमंत्री बंडखोर झालेल्या आमदारांना उद्धव ठाकरे आमदारांना परत येण्याचे आवाहन करत आहेत.…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: बंडखोर आमदार दादा भुसे शिंदे गटात दाखल झाल्याने शिवसेनेचा बुरुज ढासळला आहे. धर्मवीर चित्रपटातून दादा भुसे आणि एकनाथ शिंदे यांची मैत्री सर्वांसमोर आली. दादा भुसे यांनी पक्षनिष्ठा पेक्षा त्यांनी मित्रप्रेमाला प्राधान्य देत शिंदे गटात दाखल झाल्याचे बोलले जात आहे. पक्षनिष्ठा पेक्षा त्यांनी मित्रप्रेमाला प्राधान्य देत शिंदे गटात दाखल झाल्याचं म्हटलं जात आहे. धर्मवीर चित्रपटातून दादा भुसे आणि एकनाथ शिंदे यांची मैत्री सर्वांसमोर आली. त्यात ठाणे येथील खासदार राजन विचारे हे भुसे यांचे व्याही आणि एकनाथ शिंदे यांचे तरुणपणाचे मित्र आहेत. भुसेंना शहरातून विरोध, मतदार संघातून समर्थन – मालेगाव व परिसरातील भुसे समर्थकांनी पाठिंब्यासाठी सोशल मीडियावर ‘सदैव आपल्या…

