लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: गेल्या अनेक दिवसांपासून रामदास कदम नाराज असल्याची चर्चा होती. शिवसेना नेते रामदास कदम यांनी अखेर आपल्या नेतेपदाचा राजीनामा देत रामराम ठोकला. भावूक होत रामदास कदम यांनी आपल्या भावना व्यक्त केला. शिवसेनेत तेढा निर्माण झाल्याने आता सर्वांचे लक्ष धनुष्य बाणाचा चिन्हावर लागले आहे. 52 वर्षे मी कामं केलं पण माझ्यावर नेतेपदाचा राजीनामा देण्याची वेळ येईल असं कधी स्वप्नात देखील वाटलं नव्हतं.पक्षाच्या कारवाईनंतर मी खूप अस्वस्थ असून, राजीनामा दिल्याने मी समाधानी नाही. “आज शिवसेना प्रमुख असते तर तुम्हाला राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जाऊन मुख्यमत्री होऊ दिलं असतं का? हे तुमच्या मनाला विचारून पाहा. बाळासाहेबांनी आपल्यासाठी कोणतंही पद घेतलं नाही. भाजपनं…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
शिंदे गटातील 3 नगरसेवक भाजपमध्ये दाखल लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: शिवसेनेशी बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. शिंदे गटामध्ये आमदार आणि खासदारांचा प्रवेश सुरू असताना, अशातच भाजपचे आमदार गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांना धक्का दिला आहे. पण नवी मुंबईमध्ये भाजपनेच शिंदे गटाला धक्का दिला आहे. राज्यातील सामान्य नागरिक या सर्व घटनांना वैतागून गेली आहे. शिंदे गटातील 3 नगरसेवक भाजपमध्ये दाखल झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी करून सेनेला हादरा दिला होता परंतु तीच वेळ शिंदेंच्या वाटेला आली. नवीन गवते, अपर्णा गवते आणि दीपा गवते हे पुन्हा एकदा भाजपमध्ये दाखल झाले आहे. आमदार गणेश नाईक…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: शिवसेनेच्या ४० आमदारांचे बंड घडवून आणल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला. शिवसेनेचे राज्यातील १८ पैकी १२ खासदार वेगळा गट स्थापन करण्याची शक्यता आहे. शिंदे गटाकडून जोरदार हालचाली सुरु असताना उद्धव ठाकरे गटही आक्रमक झाला आहे. ठाकरे गट शिवसेना आमचीच असल्याचा दावा करणार आहेत. उद्धव ठाकरे आणि शिंदे गाटाकडून शिवसेना आमचीच असल्याचा दावा करण्यात येत आहे. यामुळे शिवसेना कुणाची? असा प्रश्न उपस्थित केला जात असताना शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटातील वाद महाराष्ट्रातून दिल्लीत पोहचला आहे. जे विधानसभेत झाले तेच आता संसदेत होणार आहे. शिवसेना आमचीचच असल्याचे पत्र ठाकरे गटातील खासदार लोकसभा…
अन्…. चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सुखरूप लाईव्ह महाराष्ट्र न्यूज- रावेर तालुक्यातील सुकी नदीपात्रात आज सायंकाळी अडकलेल्या नऊ पर्यटकांना चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सुखरूप बाहेर काढण्यात प्रशासनास यश आले आहेत. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील सुखी (गारबर्डी) धरणाचा वेस्ट वेअर ओसंडून वाहत असून या जलप्रवाहाच्या विळख्यात ९ पर्यटक अडकल्याची माहिती सायंकाळी 6.30 वाजता स्थानिकांनी प्रशासनाला दिली. हे नऊ पर्यटक नदीच्या मधोमध उभे असून पाण्याचा वेढा त्यांच्या दोन्ही बाजूने पडला आहे. तसेच पाण्याचा प्रवाह वाढतच असल्याने हे सर्व जण वाहून जाण्याची भीती व्यक्त केली जात होती. याबाबतची माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. बेहरे, सावदा येथील उपविभागीय अभियंता यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाला देऊन…
रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील सुखी गारबर्डी धरणामध्ये दहा पर्यटक पाण्यामध्ये अडकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे पर्यटक पर्यटनासाठी या ठिकाणी गेले होते. जिल्हा प्रशासनाच्या वतीने वचावाचे कार्याला सुरूवात करण्यात आली आहे. रावेर तालुक्यातील सुखी घरबर्डी धरणामध्ये दहा पर्यटक अडकल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. अडकलेल्या पर्यटकांना वाचवण्याचे बचाव कार्य हाती घेण्यात आले आहे. यासंदर्भात तहसीलदार उशाराणी देवगुणे यांच्यासह पथक घटनास्थळी रवाना झाले आहे. पर्यटकांना या ठिकाणी मदत कार्याचे काम केले जात असल्याचे सांगितले. विभागीय अधिकारी व तहसीलदार साहित्य व मनुष्यबळासह याठिकाणी रवाना झाले आहेत.त्याच प्रमाणे सीआरपीएफ जवानांना देखील पाचारण करण्यात आल्याचे विश्वसनिय सुत्रांकडून माहिती मिळाली आहे.
शिवसेनेची नवीन कार्यकारिणी जाहीर, महत्वाचे नेते पदावर ! लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: शिवसेनेचे बंडखोर नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला आहे.एकनाथ शिंदे गटाने नवीन कार्यकारणी जाहीर केली आहे. यामुळे आता शिवसेना मोठा धक्का बसला आहे. बंडखोर आमदारांनमुळे शिवसेनेत फुट पडलीं आहे. शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. तर, दीपक केसरकर यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आली. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे गटाने शिवसेना पक्षप्रमुखपदाला मात्र हात लावलेला नाही. शिंदे गटाने शिवसेनेची नवीन कार्यकारणी जाहीर करताना नेतेपदी रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची निवड केली आहे. काही तासांपूर्वीच नेत्यांची शिवसेनेतून पक्षविरोधी कारवाई…
“काळ आला पण वेळ आली नाही” लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: पहाटे इंदूरवरून अमळनेर येथे येणारी अमळनेर डेपोची बस ही मध्यप्रदेशातील खरगोन आणि धार जिल्ह्याच्या सीमेनजीक नर्मदा नदीत कोसळून दुर्घटना घडली. “काळ आला पण वेळ आली नाही” कळमसरे येथील दर्शन मोतीलाल चौधरी हा युवक देखील अपघात झालेल्या इंदोर -अमळनेर याच बसने प्रवास करणार होता. काळजी घेणाऱ्या बहिणीच्या वेडी मायेने दर्शन चौधरीचे जीव वाचवला.सकाळी पाऊस सुरू असल्याने त्याला बहिणीने थांबविले नसते तर वाईट घटना दर्शनसोबत झाली असती. कळमसरे येथील रहिवासी दर्शन चौधरी हा गेल्या एक आठवडा इंदोर येथे असलेल्या बहिणीला भेटायला गेला होता. बरेच दिवस झाल्याने त्यानुसार अमळनेर- इंदोर बसने सकाळी येतो; असे…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यामुळे खासदार, आमदार आणि पदाधिकारी शिंदे गटात सामील होत आहे. अनेक दिवसांपासून नाराज असलेले शिवसेनेचे नेते आणि माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा दिला आहे.रामदास कदम यांनी शिवसेनेबद्दल आपली नाराजी पत्रात दाखवली आहे. शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी आज शिवसेनेला रामराम केला आहे. कदम यांनी एक पत्र लिहून आपण नेतेपदाचा राजीनामा देत असल्याचे सांगितले आहे. ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी माझी शिवसेना नेतेपदी नियुक्ती केली होती. बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसेना नेते पदाला कुठल्याही प्रकारची किंमत दिली नाही. हे मला पाहण्यास मिळाले, अशी टीका कदम यांनी केली. शिवसेना नेत्यांना विश्वासात घेऊन काम…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अमळनेर आगाराची इंदोर- अमळनेर बस अपघातात १३ मृतदेह नदीतून काढण्यात आले असून यामध्ये ८ पुरूष, ४ स्त्रिया व एका बालकाचा समावेश आहे. जिल्हाधिकारी जळगाव व जळगाव जिल्हा प्रशासन हे स्थानिक प्रशासनाच्या मदतीने अपघातस्थळी मदत व बचाव कार्य सुरू आहे. एसटी महामंडळाकडून प्राप्त माहितीनुसार 1.चेतन चे वडील राम गोपाल जांगिड़ निवासी नांगल कला गोविंदगढ़ जयपुर राजस्थान,2.जगन्नाथ यांचे वडील हेमराज जोशी उम्र 70 वर्ष निवासी मल्हारगढ़ उदयपुर राजस्थान,3.प्रकाश यांचे वडील श्रवण चौधरी वय 40 वर्षे निवासी शारदा कॉलोनी अमलनेर जलगांव महाराष्ट्र,4.नीबाजी यांचे वडील आनंदा पाटिल उम्र 60 साल निवासी पीलोदा अमलनेरगां,5. कमला भाई पति…
अमळनेर प्रतिनिधी । अमळनेर डेपोची बस इंदूरहून अमळनेर कडे येत असतांना नर्मदा नदीत कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यात ४० प्रवासी असल्याचे प्राथमिक माहिती मिळाली आहे. मध्यप्रदेशातील खरगोन आणि धार जिल्ह्याच्या सीमेनजीक नर्मदा नदीत इंदूरकडून अमळनेरकडे येणारी बस क्रमांक (एमएच ४० एन ९८४८) ही नदीपात्रात रात्री कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुमारे ४० प्रवासी असून यातील काही प्रवासी बेपत्ता झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान, एस.टी. खात्याचे विभागीय नियंत्रक भगवान जगनोर यांनी या अपघाताला दुजोरा दिला आहे. या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली आहे.

