गेली अडीच वर्ष सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकरला शिंदे गटाने केलेल्या बंडखोरीमुळे आपली सत्ता सोडावी लागली. यानंतर राज्यात शिंदे गट आणि भाजपचे नवीन सरकार स्थापन केलं आहे. नवीन सरकारमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री आहेत. पनवेलमध्ये आयोजित भाजपच्या कार्यकारिणीच्या बैठकीत चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आपण मनावर दगड ठेवून मुख्यमंत्री केलं, असं वक्तव्य भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. केंद्रातील नेत्यांनी आदेश दिला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले. आपण दुःख पचवून पुढे गेलो कारण आपल्याला गाडा पुढे ढकलाचा होता. नगरपालिका, पालिका निवडणुक लागली आहे. आपल्या मुंबई…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: शहरातील रायसोनी नगरात राहणाऱ्या विवाहितेला हुंड्याच्या पैशांची मागणी करत मानसिक व शारीरिक छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत शुक्रवारी २२ जुलै रोजी दुपारी पतीसह इतरांवर रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील रायसोनी नगर येथे माहेर असलेल्या कृतिका गिरीश गायकवाड (वय-२६) यांचा विवाह अहमदनगर येथील गिरीश प्रफुल्ल गायकवाड यांच्याशी रितीरीवाजानुसार झाला. लग्नाचे सुरुवातीचे दिवस चांगले गेल्यानंतर पती गिरीश गायकवाड यांनी हुंड्याच्या पैशांची मागणी केली. त्यानंतर विवाहितेने पैसे दिले नाही म्हणून तिला शारीरिक त्रास देऊन शिवीगाळ केली. त्यानंतर चापटाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. विवाहितेने पैसे आणले नाही…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज:दिपक केसरकरांनी पत्रकार परिषद घेऊन आदित्य ठाकरेंच्या टीकांना उत्तरं दिली. शिवसैनिकांनी शिवसेनेसाठी संघर्ष केला, कट्टर शिवसैनिकांची बदनामी केली जातेय, दीपक केसरकर यांनी आपल्या गटाची बाजू मांडली. शिवसैनिकांचा अपमान करू नका, ज्यांचा आदर केला त्यांच्याविरोधात बोलायची वेळ आणू नका,” असा सल्ला केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांना दिला.केसरकर पुढे म्हणाले, “संजय राठोडांचा विवाह असताना ते शिवसेनेसाठी तुरुंगात गेले होते. अनेकवेळा तुरुंगात गेले याला शिवसेना म्हणतात. या सगळ्यांमुळे सेना ताठ उभी आहे. बाळासाहेब एकवचनी होते. शिंदेसाहेबांना मुख्यमंत्रिपदाचं वचन दिलं होतं. त्यांना मिळालं नाही तरी शिंदेसाहेब गप्प राहिले. उद्धव ठाकरे यांनी पद देऊ करुनही त्यांनी मुख्यमंत्रिपद नाकारलं. पण राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसशी आघाडी…
पुणे येथील धनकवडी व बिबवेवाडी परिसरात दोन बंद सदनिकांवर डल्ला मारून चोरट्यांनी 5 लाख 60 हजार रुपयांचे दागिने, ऐवज चोरी केला. अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनवकडी परिसरातील गणेश व्हिला सोसायटीतील एका बंद खोलीत चोरट्यांनी हात साफ करून 5 लाख 60 हजार रुपये किंमतीचे दागिणे चोरी केले. याप्रकरणी नवनाथ कांबळे (वय 20, रा. धनकवडी) यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुरुवारी (दि.21) सकाळी अकरा ते दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास चोरी केली आहे. बिबवेवाडी येथील अनंत वसाहत येथीलही एका बंद सदनिकेवर चोरट्यांनी भरदिवसा डल्ला मारून रोकड, सोन्याचे दागिणे व परदेशी चलन असा 4 लाख रुपयांचा ऐवज…
स्वस्त धान्य दुकानदारांना दिले प्रशिक्षण लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: तहसिल कार्यालय धरणगाव येथे हर घर झेंडा अभियानाबाबत तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची आढावा सभा घेण्यात आली. या सभेत सर्व शासकीय यंत्रणांनी ऑगस्ट १३ते १५ ऑगस्ट दरम्यान हर घर झेंडा अभियानात आपला सहभाग नोंदवून सदर अभियानास तालुक्यात जास्तीत जास्त प्रसिद्धी देण्याच्या सूचना तहसिलदार नितीनकुमार देवरे यांनी दिल्या.या सोबतच पावर पॉईंट द्वारे स्वस्त धान्य दुकानदारांना प्रशिक्षण देण्यात आले.दुकानदार या अभियानात गावागावात नागरिकांना झेंडा विक्री करणार असल्याची माहिती देवरे यांनी दिली. याप्रसंगी स्वराज्य महोत्सव अंतर्गत विविध स्पर्धा,सांस्कृतिक कार्यक्रम,वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून याबाबत नियोजन करण्याचे निर्देश ही तहसीलदार देवरे यांनी सर्व उपस्थितांना दिले. तालुक्यात हा उपक्रम…
जळगाव प्रतिनिधी । उस्मानिया पार्क येथील माहेर असलेल्या विवाहितेला तिने घर बांधण्यासाठी माहेरुन पैसे आणावेत या कारणावरुन छळ करणाऱ्या पतीसह पाच जणांविरोधात रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार असे की, उस्मानिया पार्क येथील सुरैय्याबी शेख वय ३५ यांचा एरंडोल येथील शेख रहिस शेख सलीम यांच्याशी विवाह झाला आहे. सुरैय्याबी यांनी घरबांधण्यासाठी माहेरुन १ लाख रुपये आणावेत तसेच मुलीच झाल्या या कारणावरुन तिचा पतीसह सासरच्यांनी २००७ ते २०२२ दरम्यान वेळावेळी शिवीगाळ तसेच मारहाण करत शारिरीक व मानसिक छळ केला. छळ असह्य झाल्याने सुरैय्याबी या माहेरी निघून आल्या. व याप्रकरणी शहर पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरुन बुधवारी सुरैय्याबी हिचे…
चाळीसगाव प्रतिनिधी । चाळीसगाव-मालेगाव रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेत वेडसर अनोळखी महिला ठार झाल्याची घटना घडली आहे. याबाबत मेहुणबारे पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आह. मेहुणबारे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाळीसगाव-मालेगाव रोडवर असलेल्या वामन गुलाब पाटील यांच्या शेताजवळ एक अनोळखी वेडसर महिला बुधवारी २० जुलै रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास पायी जात असताना अज्ञात वाहनाने महिलेला जोरदार धडक दिली. या धडकेत अनोळखी महिला जागीच ठार झाली. या घटनेनंतर अज्ञात वाहन चालक हा वाहन न थांबवता फरार झाला. या संदर्भात शेतकरी विष्णू पाटील यांच्या तक्रारीवरून मेहुनबारे पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: सर्वेाच्च न्यायालयाने महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय आरक्षण बहाल करतानाच 15 दिवसांच्या आत निवडणूक जाहीर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले आहेत. राज्य निवडणुक आयोगाने जिल्ह्यातील नऊ नगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. तसेच जिल्हा परिषदेसह पंचायत समित्यांच्या निवडणुकीचीही प्रक्रिया सुरु झाली होती. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होवू नये अशी भूमिका राजकीय पक्षांनी घेतल्याने या प्रक्रियांवर स्थगिती आली होती. ओबीसी आरक्षणाच्या विषयावर आज सर्वोच्च न्यायालयाने निर्णय घेत, आरक्षणासह निवडणुका जाहीर करण्याचे निर्देश दिले. जळगाव जिल्ह्यात या पार्श्वभूमिवर निवडणुकांबाबत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, वार्ड रचना, मतदार यादी यांची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. तसेच मतदान…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी पुकारलेलं बंड हे आत्तापर्यंतचं सर्वात मोठं बंड ठरलं. विधानसभेतील आमदारांनी शिवसेनेपासून वेगळा गट स्थापन केल्यानंतर किमान १२ खासदारांनीही संसदेत वेगळा गट स्थापन केला आहे. लोकसभाध्यक्षांनी त्याला अधिकृत शिवसेना म्हणून मान्यताही दिली आहे. धनुष्य बाण हे चिन्ह पक्षप्रमुख अध्दव ठाकरे यांच्याकडे रहाणार का, याकडेही लक्ष लागले आहे. पक्षाचे नाव व निवडणूक चिन्ह आपल्याकडेच रहावे यासाठी उध्दव ठाकरे गटाने यापूर्वीच आयोगाककडे धाव घेतली आहे. शिवसेनेच्या घटनेत ‘शिवसेनाप्रमुख ते शाखाप्रमुख’ अशी एकूण १३ पदे आहेत. आमदार, खासदार, जिल्हाप्रमुख, जिल्हा संपर्क प्रमुख आणि मुंबईतील विभागप्रमुख यांची मिळून एक प्रतिनिधी सभा आहे. प्रतिनिधी सभेत एकूण २८२ सदस्य आहेत.…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमीच आक्रमक चित्रा वाघ यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नाना पटोलेचा एक व्हिडिओ पोस्ट करत खोचकपणे डिवचले आहे. यावर नाना पटोलीनी आता प्रतिउत्तर दिले आहे. तो भाजप उपाध्यक्ष चित्रा वाघांनी ट्विट केलेला व्हिडिओ, व्हिडीओमध्ये महिलेसोबत दिसत असलेली व्यक्ती ही नाना पटोले हेच असल्याचा दावा करत चित्रा वाघ यांनी तो नाना पटोले यांना टॅग केला आहे. तसाच टीशर्ट घातलेली एक व्यक्ती एका तरूणीसोबत हॉटेलमध्ये बसलेली दिसतेय. तसेच काय नाना, तुम्ही पण झाडी, डोंगार आणि हाटिलात? असा खोचक प्रश्न विचारला आहे. नानांचा हा व्हिडिओ आधी व्हायरल झाला, त्यानंतर आपण ट्विट…

