जळगाव – स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव रविवार, १५ ऑगस्ट रोजी गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तसेच जळगाव येथील गोदावरी इंग्लिश मिडीयम सीबीएसई स्कूलमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणांनी परिसर देशभक्तीमय झाला. गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, डीएम कार्डियोलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त डॉ.उल्हास पाटील यांनी उपस्थीतांना शुभेच्छा दिल्यात. तसेच डॉ.वैभव पाटील यांनी देखील स्वातंत्र्य दिनानिमित्त मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनचे उपाध्यक्ष सुभाष पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील, डॉ.केतकी पाटील यांच्यासह डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील स्टाफ उपस्थीत होता. कोरोना नियमांचे पालन…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
पुणे;- पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (भक्त त्यांना काय उपमा देतील याचा नेम नाही, पुण्यात तर अशाच एका मोदी भक्ताने पंतप्रधान मोदींना चक्क देवाचा दर्जा देऊन त्यांचे मंदिरच उभारले आहे. अर्थात यामध्ये मोदी भक्तांना काही आश्चर्य वाटत नसले, तरी सर्वसामान्य लोकांसाठी मोदींचे मंदिर हा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. यापूर्वी आपण अनेकदा मोदी भक्त हा शब्द ऐकला आहे. मात्र, त्यामुळे पुण्यामध्ये एका मोदीभक्ताने यालाच साजेशी कृती केली आहे. पंतप्रधान मोदींना देवाच्या रूपात मानून त्यांचे मंदिर उभारले आहे. पुण्यातील औंध भागामधील मयूर मुंढे या भाजपच्या कार्यकर्त्याने स्वतःची मालकी असलेल्या जागेत हे मंदिर उभारले आहे. पिंपरी चिंचवड येथील मार्बल विक्रेते दिवानशु तिवारी यांनी…
जळगाव : शहरातील पिंप्राळा हुडको येथे शिवसेना अल्पसंख्यांक आघाडीतर्फे स्वतंत्र दिनानिमित्त आयोजि मोफत नेत्र तपासणी शिबिराचा २१० लोकांनी लाभ घेतला.हेरंब नेत्रालयचे डॉ.प्रवीण पाटील यांनी अत्यावश्यक शस्त्रक्रियेची गरज असलेल्या लोकांना सूट देऊन शस्त्रक्रिया करण्यासाठी तारीख देण्यात आलेले आहे. तसेच शिवसेना अल्पसंख्यांक महानगरप्रमुख जाकिर पठाण यांनी आवश्यकता असलेल्या लोकांना मोफत चष्मे वाटप केले. कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, माजी महापौर नितीन लढ्ढा, नगरसेवक सुरेश सोनवणे, नगरसेवक प्रशांत नाईक, गणेश गायकवाड, अतुल बारी, महिला आघाडीचे शोभा चौधरी, सरिता माळी, नीता सांगोरे, नीलू इंगळे, मंगला बारी, मनिषा पाटील, शिवसेना अल्पसंख्यांक आघाडीचे वसीम खान, इक्बाल शेख, जब्बार शेख, अशपाक बागवान, इक्बाल शेख,…
जळगाव, प्रतिनिधी – केंद्र शासनाचा उपक्रम असलेल्या नेहरू युवा केंद्र जळगावतर्फे शनिवारी स्वच्छता पंधरवडा अंतर्गत जळगावातील अंबरनील मैदानावर वृक्षारोपण करण्यात आले.केंद्र शासनाने १ ते १५ ऑगस्ट स्वच्छता पंधरवडा हाती घेतला आहे. नेहरू युवा केंद्रातर्फे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला महाबळ परिसरातील अंबरनील मैदानावर वृक्षारोपण करण्यात आले. नेहरू युवा केंद्राचे युवा अधिकारी नरेंद्र डागर, लेखापाल अजिंक्य गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात प्रत्येकाने एक वृक्ष संगोपनाची शपथ घेतली. प्रसंगी नेहरू युवा केंद्र सल्लागार समिती सदस्य विनोद ढगे, स्वयंसेवक हेतल पाटील, कोमल महाजन, दुर्गेश आंबेकर, रोहन अवचारे यांच्यासह दीपक परदेशी, आकाश धनगर आदी सहकारी उपस्थित होते. उपक्रमासाठी ट्री गार्ड के.के.कॅन्सचे रजनीकांत कोठारी, लक्ष्मी…
धरणगाव — येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडियम स्कुलमध्ये ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.याबाबत सविस्तर माहिती अशी की, आज गुड शेपर्ड स्कुल धरणगाव येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे व शाखा व्यवस्थापक जगन गावित यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शिरीन खाटीक यांनी भारताची महान संस्कृती व ऐतिहासिक परंपरा याचे वर्णन मनोज मुंतशिर यांच्या सुप्रसिद्ध कवितेतून केले. यामध्ये भारताच्या महान संस्कृतीचा प्राचीन इतिहास, अखंड राष्ट्र, परकीय आक्रमणे, वीर सुपुत्रांची भूमी, बलिदानाची परंपरा, स्वातंत्र्य संग्राम इ. विविध मुद्द्यांचा समावेश होता.याप्रसंगी शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे, शाखा व्यवस्थापक जगन गावित, जेष्ठ शिक्षिका रिबेका फिलिप, भारती तिवारी, अनुराधा…
दोनगाव ता. धरणगाव येथील गावात आणि परिसरात शिक्षणाची ज्ञानगंगा आणणारे , गावाच्या शैक्षणिक विकासासाठी ज्यांनी भगिरथासमान प्रयत्न केला असे आर. डी. पाटील यांचे ज्येष्ठ बंधू जगन्नाथ देवचंद पाटील यांच्या शुभहस्ते विद्यालयात ध्वजारोहण संपन्न झाले. त्याप्रसंगी माजी सरपंच गोरखनाथ पांडुरंग पाटील , माजी मुख्याध्यापक डी. एस . पाटील , मुख्याध्यापक डी.ई. पाटील , दोनगाव चे उपसरपंच भाऊसाहेब सुरेश पंढरीनाथ पवार सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर बंधू उपस्थित होते.
जळगाव (प्रतिनिधी) शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील उन्हाळी परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी फेर परीक्षेचे दि.२३ ते २५ ऑगस्ट, २०२१ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. दि.८ जून २०२१ पासून दि.३१ जुलै, २०२१ पर्यंत झालेल्या (उन्हाळी) झालेल्या परीक्षांचे निकाल जाहिर झाले असून या परीक्षेमधील बहिस्थ लेखी व बहिस्थ प्रात्यक्षिक परीक्षांना अनुपस्थित किंवा नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी फेर परीक्षेच आयोजन करण्याच्या निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. बहिस्थ लेखी परीक्षा दि.२३ ते २५ ऑगस्ट, २०२१ या कालावधीत सकाळी १० ते संध्याकाळी ६ या दरम्यान ऑनलाईन पध्दतीने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (एमसीक्यु) स्वरुपात स्मार्ट फोन/ लॅपटॉप/डेस्क स्टॉप वेब कॅमेरासह याद्वारे घेण्यात येणार आहेत. संबंधित विद्यार्थ्यांनी या कालावधीत विद्यापीठ संकेतस्थळावर…
जळगाव;- केंद्र शासनाचा उपक्रम असलेल्या नेहरू युवा केंद्र जळगावतर्फे शनिवारी स्वच्छता पंधरवडा अंतर्गत जळगावातील अंबरनील मैदानावर वृक्षारोपण करण्यात आले. केंद्र शासनाने १ ते १५ ऑगस्ट स्वच्छता पंधरवडा हाती घेतला आहे. नेहरू युवा केंद्रातर्फे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला महाबळ परिसरातील अंबरनील मैदानावर वृक्षारोपण करण्यात आले. नेहरू युवा केंद्राचे युवा अधिकारी नरेंद्र डागर, लेखापाल अजिंक्य गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात प्रत्येकाने एक वृक्ष संगोपनाची शपथ घेतली. प्रसंगी नेहरू युवा केंद्र सल्लागार समिती सदस्य विनोद ढगे, स्वयंसेवक हेतल पाटील, कोमल महाजन, दुर्गेश आंबेकर, रोहन अवचारे यांच्यासह दीपक परदेशी, आकाश धनगर आदी सहकारी उपस्थित होते. उपक्रमासाठी ट्री गार्ड के.के.कॅन्सचे रजनीकांत कोठारी, लक्ष्मी ऍग्रोचे…
जळगाव (प्रतिनिधी ) ;- जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण कमी होत असून आज दिवसभरात केवळ २ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ५ जण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या ३० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
जळगाव (प्रतिनिधी ) ;- आज 14 ऑगस्ट रोजी दिशा स्पर्धा परीक्षा केंद्रातर्फे व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यात प्रामुख्याने विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थींचा सहभाग होता. कार्यशाळेत प्रा.सुरेश पांडे यांनी मार्गदर्शन केले. व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक असणारे संभाषण कौशल्य, वैशिष्ट्यपूर्ण वर्तन, संवाद कौशल्य या महत्वपूर्ण बाबींवर मार्गदर्शन केले. सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला असंख्य अडचणींवर मात करण्यासाचे सामर्थ्य निर्माण करतो म्हणून कठीण प्रसंगी न डगमगता सकारात्मक विचाराने वाटचाल करावी . विचारात खूप सामर्थ्य असते म्हणून चांगले विचार करा तसेच व्यक्तिमत्व घडण्यात संगतीचा खूप मोठा वाटा असतो म्हणून केव्हाही चांगले मित्र निवडा असे अनमोल मार्गदर्शन केले आणि सोबतच स्मरणशक्ती वाढविण्यासाठी काही…

