धरणगाव प्रतिनिधी । तक्रारदारला जादा वेतन दिले गेल्याने जादा रकमेची परतफेड करण्यासाठी जिल्हा परिषदेला अनुकूल अहवाल पाठविण्यासाठी २ हजाराची लाच स्विकारणाऱ्या धरणगाव ग्रामविस्तार अधिकारीसह ग्रामसेवकास लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे. याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील एका गावातील ग्रामपंचायतीत तक्रारदार हे शिपाई म्हणून नोकरीला आहे. तक्रारदार यांना सन २०१५-१६ वर्षात जादा वेतन दिले गेल्याने सदर जादार देण्यात आलेली रक्कमची परतफेड करण्यासाठी तक्रारदार यांना नोटीस आली. नोटीसीचा अनुकूल अहवाल जिल्हा परिषदेला सादर करण्यासाठी धरणगाव येथील विस्ताराधिकारी सुरेश शालिग्राम कठाळे (वय-५१) रा. गंगूबाई नगर, पारोळा आणि कंडारी बुद्रुक ग्रामसेवक कृष्णकांत राजाराम सपकाळे (वय-४५) रा. बोरोले नगर, चोपडा यांनी २ हजाराची लाच मागितली. याबाबत…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जिल्हा बँक निवडणुकीच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे व भाजप नेते गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उद्या सोमवारी दुपारी दोन वाजता अजिंठा विश्रामगृह येथे सर्वपक्षीय बैठक होणार आहे. परंतु त्या अगोदरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चेअरमन पदाचे स्वप्न असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते आमदार गिरीश महाजन यांच्या संपर्कात असल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. राष्ट्रवादीचे वर्चस्व सहकारात आहे ऐनवेळी भाजपनेते गिरीश महाजन हे राजकीय खेळी खेळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जळगाव महापालिकेत भाजपा शिवसेना युती होणार असेच शेवटपर्यंत शिवसेनेला गाफील ठेवून ऐनवेळी भाजपाने सर्व जागा लढून शिवसेनेला पराभूत केले हीच खेळी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत खेळण्याची दाट शक्यता असून…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : आज जळगांव महानगर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत राष्ट्रवादी युवक व युवती कॉंग्रेस,राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस, अल्पसंख्यांक विभाग, सामाजिक न्याय विभाग तसेच इतर सेलचा आढावा घेण्यात आला. दरम्यान, जे कार्यकर्ते कार्यकारणीत असून पदाधिकारी आहेत व जे पक्षाचे काम करत नसून त्या पदाधिकारी यांना एक संधी देवून पदमुक्त करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. जळगांव महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली असलेली जळगांव महानगरची कार्यकारणी पुर्णपणे बरखास्त करण्यात आली असून नवीन कार्यकारणीची घोषणा येत्या काही दिवसात करणार असल्याचे संगण्यासत आले. आगामी महापालिका निवडनूकीसंदर्भातही या बैठकीत चर्चा करण्यात आली असून राष्ट्रवादी कॉंग्रेस चे जास्तीत जास्त नगरसेवक कसे…
स्वामी समर्थ नगर व गनाबाप्पा नगर मधिल रस्ते काँक्रीटीकरणला सुरुवात ! धरणगाव प्रतिनिधी : दळणवळणाच्या साधनांसाठी रस्ते हे नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील महत्त्वाचा मुद्दा असून शहरी व ग्रामीण भागाच्या विकासासाठी दर्जेदार रस्ते विकासाचा दुवा ठरत आहे असे प्रतिपादन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांनी धरणगाव येथे रस्ते भूमिपूजन प्रसंगी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे सह संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ हे होते. धरणगाव नगरपालिका हद्दीतील स्वामी समर्थ नगर गट क्रमांक 306 मध्ये रस्ते कॉंक्रिटीकरण करणे (६० लक्ष ) गनाबाप्पा नगर गट क्रमांक 305 मध्ये रस्ते कॉंक्रिटीकरण करणे (57 लक्ष) अशा दोन्ही रस्त्यांच्या काँक्रिटीकरण कामासाठी १ कोटी १७ लक्ष…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : धरणगाव तालुक्यातील बाभूळगाव येथे प्लॉटिंग भागात राहणाऱ्या रहिवाशांनी तुंबलेल्या तलावासह गटारीच्या पाण्यामुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून तहसीलदारांना निवेदन सादर केले आहे.निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, धरणगाव येथील बाभूळगाव परिसरात रहिवासी असलेल्या नागरिकांना घरासमोर तुंबलेल्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्रास होत असून या साचलेल्या पाण्यामुळे रोगराई पसरण्यास वाव मिळत आहे. सध्या या साचलेल्या पाण्यामुळे डेंगू व मलेरिया यांसारख्या आजारांची वाढ झाली असून मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी निर्माण झाली आहे. नुकतीच कोरोना महामारी संपली असून त्यानंतर लगेचच सुरु झालेल्या पावसाळ्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी साचत असून त्यातून आजारांची उत्पत्ती होत आहे. परिणामी बाभूळगाव परिसरातील नागरिकांनी प्रत्यक्ष ग्रामपंचायतच्या बोगस कामावर प्रश्न उपस्थित…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : अमळनेर येथील गुन्ह्यात फरारी 21 वर्षीय आरोपीला अटक करण्यास धरणगाव पोलिसांना यश मिळाले आहे. पेट्रोलिंग करत असताना हा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात फसलं आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, अमळनेर येथील पोलीस स्टेशन भाग 5 रजिस्टर नंबर 334/2020 भादवि कलम 363 अंतर्गत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी गणेश विक्रम सोनवणे (वय 21) रा. हनुमंतखेड, धरणगाव याला गोपनीय माहितीच्या आधारावर राहत्या घरून अटक करण्यात आली आहे. धरणगाव पोलीस निरीक्षक शंकर शिराळे यांच्या मार्गदर्शनानुसार पो.हे.कॉ राजेंद्र नामदेव कोळी, पो.ना. पराग पवार या पथकाने ही कारवाई केली आहे. सदर आरोपीला पुढील तपासाकामी वैद्यकीय तपासणीअंती अंमळनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले…
धरणगाव ;- तालुक्यातील चांदसर गावाच्या शिवपासून ते कवठळ शिवपर्यंत अडीच किलोमीटर शेतरस्त्याचे भूमिपूजन आज जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. मागील आठवड्यात महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वछता मंत्री तथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे चांदसर येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भूमीपूजनासाठी चांदसर येथे आलेले असता चांदसर, कवठळ गावातील १५० शेतकऱ्यांनी चांदसर गावाच्या शिवपासून ते कवठळ शिवपर्यंत अडीच किलोमीटर शेतरस्त्याची दुरवस्था झालेली आहे, अशी तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. रस्ता नसल्यामुळे कोणाच्या बांधावरून बैलगाडी, ढोरे नेल्यास दररोज वाद होतात. शेतकऱ्यांना खते वाहून नेण्यास अडचण होते. पीक तयार झाल्यास शेतातून घरी आणण्यास मोठे हाल होतात. सुमारे २०० ते २५०…
जळगाव;- प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना (PMFME) सन 2020-21 ते 2024-25 या पाच वर्षाच्या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या योजनेतंर्गत शेतकरी उत्पादक संघ/शेतकरी उत्पादक कंपनी/संस्था/स्वयंसहाय्यता गट आणि सहकारी उत्पादक किंवा विशेष उद्देश वाहन (S.P.V) यांना ब्रँडींग व मार्केटींग या घटकातंर्गत कच्चामालाची खरेदी ते विक्रीपर्यंत टप्याटप्पयाने हाती घ्यावयाच्या उपक्रमाचा तपशील, महत्वाचा नियंत्रणाच्या बाबी, गुणवत्ता नियंत्रण, उत्पादनाच्या जाहिरात व प्रचार संबंधित राबवयाचे उपक्रम, सहभागी होणाऱ्या उत्पादकांची संख्या व आर्थिक उलाढाल वाढविण्याचा तपशील असणे अपेक्षीत आहे. प्रस्ताव सादर करण्यासाठी सदर घटकाच्या खर्चाच्या 50 टक्के अनुदान देय राहील त्यात अंदाजे रक्कम 50 लाख रुपयांपर्यंतचा प्रस्ताव अपेक्षीत आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील उदयोजक, स्वयंसहायता गट,…
जळगाव,;- राष्ट्रीय अन्न्ा सुरक्षा अभियानातंर्गत सन 2021-22 मध्ये अन्नधान्य पिके व गळीतधान्यातंर्गत रब्बी हंगामामध्ये प्रमाणित बियाणे वितरण, पीक प्रात्यक्षिके, सुधारीत कृषि औजारे व सिंचन सुविधा साधने या बाबींसाठी इच्छुक शेतकऱ्यांचे महाडीबीटी प्रणालीव्दारे अर्ज मागविण्यात येत आहेत. पीक प्रात्यक्षिके शेतकरी गटामार्फत राबविली जाणार असल्याने पीक प्रात्यक्षिकांसाठी अर्ज करताना संबंधित कृषि सहाय्यकाशी संपर्क करुन 10 हेक्टर क्षेत्र असणाऱ्या गटांनी नोंदणी करावी. शेतकऱ्यांना नोंदणी करण्यासाठी 10 सप्टेंबर, 2021 पर्यंत मुदत देण्यात येत असून विहित मुदतीत नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांचाच विचार केला जाईल. असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी कळविले आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातंर्गत हरभरा बियाणासाठी 10 वर्षाआतील वाणास 25 रुपये प्रती…
जळगाव;- साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातर्फे सन 2020-21 या शैक्षणिक वर्षात 10 वी, 12 वी, पदव्युत्तर वैद्यकीय व अभियांत्रिकी इत्यादी अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना सरासरी 60% किंवा त्यापेक्षा जास्त टक्के गुण प्राप्त झाले असतील. अशा उत्तीर्ण झालेल्या मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील विद्यार्थी/विद्यार्थीनींना महामंडळाकडून ज्येष्ठता व जास्त गुणक्रमाकांनुसार जिल्ह्यातील प्रथम 3 ते 5 विद्यार्थ्यास निधीच्या उपलब्धतेनुसार शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात येणार आहे. यासाठी 15 सप्टेंबर, 2021 च्या आत संपूर्ण कागदपत्रांसह मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील विद्यार्थी, विद्यार्थीनींनी जिल्हा कार्यालयात संर्पक करावा, उशिरा प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. असे ताराचंद कसबे, जिल्हा व्यवस्थापक यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे. अर्जासोबत…

