लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । गुजराती गल्ली राहणारे जगन्नाथ मोतीराम धनगर यांना त्यांची तीनही मुले त्यांना संभाळत नसून शेतजमीन परस्पर नावे केल्याबाबत तक्रार स्वत: जगन्नाथ धनगर यांनी धरणगाव तहसीलदार नितीनकुमार देवरे यांच्याकडे तक्रार दिली होती. त्या तक्रारीची दखल घेत तीनही मुलांना एरंडोल प्रांताधिकारी यांच्या समोर उभे केल्यानंतर चौकशी केली असता खरचं माझी मुले माझा संभाळ करत असून माझी मानस्थिती ठिक नसल्याची कबुली जगन्नाथ धनगर यांनी दिली. सविस्तर माहिती अशी की, गुजराथी गल्लीमधील वृद्ध इसम जगन्नाथ मोतीराम धनगर यांनी त्यांची मुले दिलीप जगन्नाथ धनगर, अरुण जगन्नाथ धनगर व गोविंदा जगन्नाथ धनगर यांचे विरुद्ध सांभाळ करत नसल्याचे व त्यांना अंधारात ठेवून जमीन बळकावल्या…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
जळगाव प्रतिनिधी । भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना कानळदारोडवर घडली. याबाबत तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकास लीलाधर चौधरी वय ५२ रा आव्हाणे ता. जळगाव हे जखमी झाले आहे. आव्हाणे येथील विकास चौधरी व त्यांची पत्नी वंदनाबाई हे दोघे जण ३ जानेवारी रोजी त्यांच्या एम.एच.१९ ऐ.वाय ५८१६ या क्रमांकांच्या दुचाकीने चोपड्याकडे जात होते. यादरम्यान कानळदा गावाजवळ एम.एच.४८ ए.टी. १३३९ या क्रमांकाच्या कारने विकास चौधरी यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात विकास चौधरी यांच्या उजव्या पायाला, तसेच कमरेला व हाताला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच दुचाकीचेही नुकसान झाले आहे. अपघातानंतर कार सोडून चालक घटनास्थळाहून पसार…
जळगाव प्रतिनिधी । गिरणा नदीपात्रातून विनापरवाना वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या विना नंबरच्या ट्रॅक्टरवर आज सकाळी तालुका पोलिसांनी धडक कारवाई करत ट्रॅक्टर व ट्रॉली जप्त केली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात अधिक असे की, गिरणा नदीपात्रातून विनापरवाना वाळूची मोठ्या प्रमाणावर वाहतूक निमखेडी शहरातील कचरा फॅक्टरी भागातून होत असल्याची गोपनीय माहिती जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना मंगळवारी ११ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला निमखेडी शिवारात कारवाई करण्याचे सूचना दिल्या. पोलिस उपनिरीक्षक नयन पाटील, पोलीस नाईक सुशील पाटील, भूषण सपकाळे, प्रशांत ठाकूर यांनी विनानंबर असलेल्या ट्रॅक्टरवर कारवाई केली. दरम्यान…
धरणगावात तालुकास्तरीय समितीची सभा संपन्न लाईव्ह महाराष्ट्र न्यूज- येथे काल तालुकास्तरीय पीक विमा समितीची सभा तहसिलदार धरणगाव नितीनकुमार देवरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी धरणगाव तालुक्यातील एकूण ७००५ शेतकऱ्यांचे पिक विमा बाबत पंचनामे झाले असून ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन अथवा ऑफलाइन तक्रारी दाखल केलेल्या आहेत अशा शेतकऱ्यांचे नुकसान यादीतील नावे तपासून आयसीआयसीआय लोम्बार्ड या पिक विमा कंपनीमार्फत शेतकऱ्यांच्या खाती २८ जानेवारीपर्यंत पीक विम्याचे पैसे जमा होणार असल्याचे पिक विमा प्रतिनिधी सागर पाटील यांनी सभेमध्ये सांगितले तसेच तालुक्यातील उर्वरित शेतकऱ्यांना मार्चअखेर रक्कम कंपनीकडे प्राप्त होताच त्यांनाही याबाबत लाभ मिळणार असल्याचे सांगितले. तसेच शेतकऱ्यांनी यानंतर पिकाचे नुकसान असल्यास ७२ तासाच्या आत तालुका कृषी…
प्रतिनिधी प्रविण पाटील। जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल असलेल्या ६१ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी एमआयडीसी पोलीसांशी संपर्क साधावा असे आवाहन एमआयडीसी पोलीसांनी सोमवारी १० जानेवारी रोजी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहेयाबाबत माहिती अशी की, सुनिल साळुंखे (पुर्ण नाव माहिती नाही, वय-६१) रा. अयोध्या नगर जळगाव हे आजारी असतांना स्वत:हून एकटे जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ६ जानेवारी रोजी दाखल झाले होते. त्याचा उपचारादरम्यान रविवारी ९ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता मृत्यू झाला आहे. याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ. अच्छाव यांच्या खबरीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. दरम्यान दिलेल्या पत्त्यावरून पोलीसांनी नातेवाईकाचा शोध घेतला असता कुणीही…
जळगाव प्रतिनिधी । शहरातील उस्मानिया पार्क येथे मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी सलग तीन घरे फोडून सोन्याचे दागिन्यांसह रोकड मुद्देमालाची चोरी झाल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. याबाबत माहिती अशी की, ममुराबाद रोडवरील उस्मानियॉ पार्क येथे रविवारी ९ जानेवारी मध्यरात्री सलग तीन घरे अज्ञात चोरट्यांनी फोडल्याचे सोमवारी १० जानेवारी सकाळी ७ वाजता उघडकीला आले आहे. यात फिरोज मोहम्मतद रफिक बागवान रा. उस्मानिया पार्क यांच्या घराच्या मागच्या घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश करत घरातील लोखंड कपाट तोडून घरातील ४ तोळ्याच्या दोन सोन्याचे पोत, १० हजार रूपये रोख आणि पैशांचा गल्ला चोरून नेला, त्यांच्या घराच्या बाजूला…
जळगाव (प्रतिनिधी) : कोरोना महामारीची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता पूर्वतयारी म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील सी- २ हा कक्ष सुरू करण्याच्या सूचना अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी दिल्या आहेत. सोमवारी दि. १० जानेवारी रोजी त्यांनी कक्षाची पाहणी करीत अधिकारी-कर्मचाऱ्यांना विविध सूचना दिल्या. कोरोना महामारीची तिसरी संभाव्य लाट लक्षात घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तयारी सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार सी-२ हा कक्ष पूर्वीसारखा सुरु करण्याबाबत अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी सोमवारी पाहणी करीत सूचना दिल्या. येथे पूर्णपणे साफसफाई करीत खाटांचे नूतनीकरण करण्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच, गादी व चादरी स्वच्छ असाव्या. वेळोवेळी बदलल्या गेल्या पाहिजे, इतर अनावश्यक…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । शहरातील लक्ष्मीनगर परिसरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेण्याचा प्रकार उघडकीला आला आहे. या संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या लक्ष्मीनगर परिसरात १७ वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबियांचा वास्तव्याला आहे. ६ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता अल्पवयीन मुलगी ही टायपिंगच्या क्लासला जाऊन येते असे आईला सांगून क्लासला गेली. सायंकाळी उशिरापर्यंत ती घरी न आल्याने तिच्या आई व नातेवाईकांनी तिच्या क्लास आणि मैत्रिणींकडे शोधाशोध केली परंतु ती आढळून आली नाही. यासंदर्भात अल्पवयीन मुलीच्या आईने रविवार ९ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता…
जळगाव प्रतिनिधी । सिंधी कॉलनी परिसरातील लक्ष्मीनगर भागात हनुमान मंदिरासमोर पैशांच्या वादातून तरूणावर चाकूने वार करत जखमी केल्याची घटना समोर आली आहे. या संदर्भात ४ जणांवर एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर माहिती अशी की, समतानगर भागातील रहिवासी आकाश भोला राठोड वय २० हा तरुण कामानिमित्ताने शनिवारी सायंकाळी सिंधीकॉलनी परिसरातील लक्ष्मीनगर भागात गेला होता. यादरम्यान संदीप कोळी याच्यासह इतर तीन जणांनी आकाश सोबत पैशांवरून वाद घातला. या वादातून संदीप कोळी याने आकाशला दगड मारला तर संदीपचा भाऊ याने धारदार शस्त्राने आकाशच्या मांडीवर वार करून दुखापत केली. इतर दोन जणांनाही आकाशला शिवीगाळ करत मारहाण केली तसेच जिवे ठार मारण्याची धमकी…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । पारोळा शहरासाठी नवीन जलकुंभ उभारण्याच्या कामासाठी मंजूर १ कोटीचा निधीतून वेळेत काम सुरू करून निधी खर्च करण्याची मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने यांनी मुख्याधिकारी यांना निवेदन दिले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पारोळा नगरपरिषद क्षेत्रात वाढीव लोकसंख्या पाहता पिण्याच्या पाण्याची साठवणूक क्षमता वाढविण्यासाठी सध्या असलेली जलकुंभ व जलशुध्दीकरणाची क्षमता वाढविण्याची आवश्यकता आहे. याकरीता शासनाकडून १ कोटी रूपयांची निधी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूर केला आहे. पारोळा शहरासाठी लागणारे पिण्याचे पाणी तामसवाडी धरणातून जलवाहिनीद्वारे पारोळा शहराला पुरविले जाते. धरणात पाण्याचा पुरेसा साठा असतांना शहरातील नागरीकांना ८ ते १० दिवसा आड पाणी पुरवठा केला जातो.…

