“महामातांचा जागर ” ही ऐतिहासिक कामगिरी लक्ष्मणराव पाटील लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : तालुक्यातील भवरखेडे गावात ३ जानेवारी ते १२ जानेवारी दरम्यान संपन्न झालेल्या प्रबोधन जागराचा समारोप काल भवरखेडे येथे संपन्न झाला. राजमाता जिजाऊ ते क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महिला शिक्षण दिन, बालिका दिन, महिला मुक्ती दिन, जिजाऊ जयंती, युवा दिनाचे औचित्य साधून महामातांचा जागर करण्यात आला. या वैचारिक प्रबोधन व्याख्यानाचे प्रास्ताविक हेमंत माळी सर यांनी केले. लहान माळी वाडा धरणगाव, विवरे, पष्टाने, बांभोरी, गंगापुरी, गारखेडे, धानोरा, सोनवद आणि आज भवरखेडे येथे शेवटचे पुष्प आम्ही गुंफत आहोत, अशी माहिती हेमंत माळी यांनी दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावच्या सरपंच रुपाली किरण पाटील…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाने दिलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात २६६ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर ३९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्स डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे. आजच्या कोरोना अहवालात दिवसभरात एकुण २६६ कोरोना बाधित रूग्ण आढळले आहे. तर ३९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. कोराना अहवालानुसार जळगाव शहरात-१११, जळगाव ग्रामीण-१, भुसावळ-७१, अमळनेर-६, चोपडा-३५, पाचोरा-२, भडगाव-०, धरणगाव-१, यावल-३, एरंडोल-१, जामनेर-१, रावेर-२, पारोळा-२, चाळीसगाव-२९, मुक्ताईनगर-०, बोदवड-० आणि इतर जिल्ह्यातील १ असे एकुण २६६ बाधित रूग्ण आढळले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकुण २ लाख ४४ हजार ४२८ कोरोना रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख…
जळगाव प्रतिनिधी । राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना कोरोनाची बाधा झाल्याचे आज समोर आले आहे. त्याची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली असून त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्यांनी कोरोनाची चाचणी करून घेण्याचे आवाहन. अधिक माहिती अशी की, काही दिवसांपूर्वीच राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हेसहभागी झाले होते. या अधिवेशनाच्या नंतर राज्य मंत्रीमंडळातील सुमारे २० मंत्री आणि ७० आमदारांना कोरोनाची बाधा झाली होती. दरम्यान, ना. गुलाबराव पाटील यांना सौम्य लक्षणे जाणवू लागल्याने त्यांनी कोरोनाची चाचणी करून घेतली. आज शुक्रवारी १४ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.ना. गुलाबराव यांनी…
यावल प्रतिनिधी । तालुक्यातील चुंचाळे येथील या तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार १४ जानेवारी रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी यावल पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. असलम सायबु तडवी (वय-३० ) असे मयत तरूणाचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, असलम तडवी हा आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. हातमजूरी करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतो. शुक्रवारी १४ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता असलम तडवी यांचे कुटुंबिय थंडीचे दिवस असल्यामुळे घराबाहेर उन्हात बसले होते. त्यावेळी असलम तडवीने राहत्या घरात साडीने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास उघडकीला आला. असलमचा सहा वर्षाचा मुलगा आशु तडवी हा…
यावल प्रतिनिधी । यावल तालुक्यातील निमगाव रोडवर अज्ञात दोन जणांनी पोलीस असल्याचे सांगत दुचाकी आडवून वृध्दाच्या हातातील १० ग्रॅमची अंगठी जबरी हिसकावून दुचाकीने पसार झाल्याची घटना घडली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, दिलीप पुरूषोत्तम बऱ्हाटे (वय-६८) रा. पाडळसे ता. यावल हे कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. गुरूवार १३ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता कामाच्या निमित्ताने निमगाव येथे दुचाकीने जात असतांना त्यांच्या मागून अज्ञात दोन जण दुचाकीवरून येवून त्यांची दुचाकी अडविली. आपण दोघे पोलीस असल्याचे सांगत दिलीप बऱ्हाटे यांच्या हातातील १० ग्रॅमची सोन्याची अंगठी जबरी हिसकावून दुचाकीने भुसावळकडे पसार झाले. दिलीप बऱ्हाटे यांनी यावल…
जळगाव प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील किनोद येथे मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घरातून सोन्याचे दागिने व रोकड असा एकुण १ लाख रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. मंगलेश्वर दिनकर पाटील (वय-३२) रा. किनोद ता. जि.जळगाव हे कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. १२ जानेवारी ते कुटुंबियांसह जेवण करून झोपले असता मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरातील सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकुण १ लाख रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचा प्रकार १३ जानेवारी रोजी सकाळी उघडकीला आला. याप्रकरणी मंगलेश्वर पाटील यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या…
जळगाव प्रतिनिधी । आव्हाणे शिवारातील गिरणानदी पात्रातून वाळू उपसा करून शेतातून वाहने जावून न दिल्याने वाळूमाफियांनी शेतकऱ्याला मारहाण केल्याचा प्रकार आज सकाळी घडला. घटनास्थळी नातेवाईकांसह ग्रामस्थांनी धाव घेतल्याने ट्रक्टर चालकांनी नदीपात्रात ट्रॅक्टर सोडून पळ काढला आहे. या मारहाणीत मनोहर चौधरी रा. आव्हाणे ता.जि.जळगाव असे जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, मनोहर चौधरी यांचे गिरणा नदी पात्राच्या काठवर शेत आहे. वाळू माफिया हे गिरणा नदीतून वाळूचा उपसा करून त्यांच्या शेतातून ट्रक्टर व डंपर नेत होते. यामुळे त्यांच्या शेतात रस्ता तयार होत होत. याबाबत शेतकरी मनोहर चौधरी यांनी शेतातून वाहनांना जाण्यास मनाई केली. याबाबत शेतकरी आणि वाळूमाफिया यांच्या वाद…
जळगाव प्रतिनिधी । जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून आलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात २७० जण कोरोना बाधित आढळले आहे. तर १४ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे. जिल्ह्यात आज नव्याने २७० रूग्ण आढळले आहे. यात जळगाव शहर- ६६, जळगाव ग्रामीण-२, भुसावळ-१३७, अमळनेर-०, चोपडा-८, पाचोरा-१०, भडगाव-१, धरणगाव-३, यावल-२, एरंडोल-३, जामनेर-२, रावेर-४, पारोळा-१, चाळीसगाव-१३, मुक्ताईनगर-१४, बोदवड-० आणि इतर जिल्ह्यातील ४ अशी रूग्ण संख्या आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १ लाख ४४ हजार १६२ रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार २९४ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आज दिवसभरात १४ बाधित रूग्ण बरे…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : शिरसोली रोडवरील रायसोनी महाविद्यालयात गुरूवार १३ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता कोविड लसीकरण शिबीर घेण्यात आले. यावेळी अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना कोवीड लस देण्यात आले. कोरोनावर मात करण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने १५ वर्ष वयोगटातील कोरोना लसीकरणाला सुरूवात करण्यात आली आहे. या अनुषंगाने शिरसोली रोडवरील जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालय व शिरसोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या सहकार्याने लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. गेल्या दोन वर्षांपासून महाविद्यालये बंद राहिल्याने विध्यार्थांच्या गुणवत्तेवर परिणत होतांना दिसत आहे. यावर उपाय म्हणुन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे लसीकरण झाले पाहिजे, या उद्देशाने संचालक प्रितम यसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, अकॅडमिक डीन प्रा.…
जळगाव प्रतिनिधी । सामाजिक कार्यकर्ता दीपक कुमार गुप्ता यांच्यावरील पोलीस संरक्षण कमी करून त्यांना दोन वर्षांकरीता जिल्हा हद्दपार करावा या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया युवक महानगर आघाडी वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीयाचे युवक महानगराध्यक्ष मिलींद सोनवणे यांच्या नेतृत्वात हे निर्दशने करण्यात आले. रिपाइंने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांच्यावर असलेल्या राज्यभरातील गंभीर गुन्ह्यांच्या अनुषंगाने त्यांना देण्यात आलेले पोलीस संरक्षण काढून त्यांना जिल्ह्यातून दोन वर्षांकरीत हद्दपार करावे या मागणीसाठी ७ जानेवारी रोजी पासून रिपाइंचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने साखळी उपोषणाला बसले आहे. परंतू प्रशासनाने…

