लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे बेकादेशीर गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या महिलेवर एमआयडीसी पोलीसांनी रविवारी ३० जानेवारी रोजी दुपारी १ वाजता छापा टाकून १ हजार २५० रूपये किंमतीची दारू हस्तगत केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे बेकायदेशीर गावठी हातभट्टीची दारू विक्री होत असल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना रविवारी ३० जानेवारी रोज दुपारी मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक अनिस शेख, पोहेकॉ गफार तडवी, पोकॉ शांताराम पाटील, महिला पोलीस आलका माळी, पोकॉ. सिध्देश्वर लटपटे यांनी दुपारी १ वाजता कुसुंबा येथे छापा टाकला. यात…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
प्रतिनिधी लक्ष्मण पाटील : स्थानिय सुवर्णमहोत्सवी शाळा – महात्मा फुले हायस्कूल धरणगांव येथे अहिंसेचे पुजारी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. सांस्कृतिक विभाग प्रमुख एस.एन. कोळी यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी शाळेतील पर्यवेक्षक जे.एस.पवार यांच्या शुभहस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. याप्रसंगी शाळेतील पर्यवेक्षक जे.एस.पवार , एस.एन.कोळी , हेमंत माळी , व्ही.टी.माळी, पी.डी.पाटील, अशोक पाटील तसेच शिक्षक बंधु – भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.
महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त अभिवादन आणि हुतात्म्यांना आदरांजली लक्ष्मण पाटील प्रतिनिधी : येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधी पुण्यतिथी दिनानिमित्त शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांच्या हस्ते प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले. तत्पुर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास मान्यवरांनी माल्यार्पण केले. तद्नंतर गांधीजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. याप्रसंगी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी अभिवादनपर मनोगतातून व्यक्त केले की, गांधीजींनी दिलेल्या अहिंसेचा संदेश नक्कीच प्रेरणात्मक आहे. देशासाठी गांधीजींनी अतुलनीय कामगिरी केल्याने त्यांना व त्यांच्या कार्याला कधीही विसरता येणार नाही. असे श्री .वाघ म्हणाले. याप्रसंगी नगराध्यक्ष निलेश चौधरी, चर्मकार महासंघाचे कार्याध्यक्ष भानुदास विसावे,…
जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील शिरसोली येथील जवानाच्या बँक खात्यातून अज्ञात भामट्याने ॲप्लीकेशन डाऊनलोड करण्याचे सांगून १४ हजार रूपयांचा ऑनलाईन चूना लावल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, रोहित राजाराम पाटील (वय-२९) रा. शिरसोली ता. जि. जळगाव हे इंडोतिबेटीयन बॉर्डर पोलीस फोर्स मध्ये नोकरीला आहे. रोहीत पाटील हे २८ जानेवारी रोजी शिरसोली येथे घरी असतांना एका अनोळखी नंबरवरून त्यांना एक मॅसेज आला. मॅसेजनुसार त्यांनी एक ॲप्लीकेशन डाऊनलोड करण्यास सांगितले. आणि त्यात डेबीट कार्ड, क्रेडीट कार्ड, आधार कार्ड आणि पासबुकचे फोटो अपडेट केले. अज्ञात व्यक्तीने त्यांच्या संमतीवाचून बँक खात्यातून १३ हजार…
जळगाव प्रतिनिधी । तुमचे सिमकार्ड बंद होणार असल्याचे सांगून गणपती नगरातील एकाची केवायसीच्या नावाखाली ७४ हजार रूपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केलाय. यशोधन अरूण व्यवहारे (वय-४६) रा. गणपती नगर जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. गुरूवार २७ जानेवारी रेाजी सायंकाळी ५ वाजता ते घरी असतांना त्यांना अनोळखी मोबाईल क्रमांकावरून मोबाईल समिकार्ड च्या केवायसीच्या नावाखाली कागदपत्रांची पुर्तता करण्याचे सांगून कस्टमर केअरला संपर्क साधण्याचे सांगितले. त्यानुसार यशोधन व्यवहारे यांनी लागलीत दिलेल्या नंबरवर संर्क साधला असता अनोळखी व्यक्तीने मोबाईलवर १० रूपयाचे रिचार्ज करण्याचे सांगितले. यासाठी एक…
जळगाव प्रतिनिधी । शहरातील वाल्मिक नगरातील २८ वर्षीय महिला पती सोबत राहायचे नाही असे सांगून घरात कुणालाही काहीही न सांगता बेपत्ता झाल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. शनीपेठ पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, योगेश शिवाजी सपकाळे (वय-३०) रा. वाल्मिक नगर जळगाव हे पत्नीसह वास्तव्याला आहे. ते रिक्षा चालक असून रिक्षा चालवून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. त्यांची पत्नी रूपाती योगेश सपकाळे (वय-२८) रा. वाल्मिक नगर जळगाव हे शनिवारी २९ जानेवारी रोजी दुपारी घरात कुणाला काहीही न सांगता निघून गेल्या आहे. त्यांचे पती योगेश सपकाळे यांनी परिसरासह नातेवाईकांकडे शोधाशोध केली परंतू कोठेही आढळून आलेल्या…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : यावल तालुक्यातील कोळन्हावी येथे बेकायदेशीर वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकावर शुक्रवार २८ जानेवारी रोजी सायंकाळी ८ वाजता यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील कोळन्हावी गावातील मुख्य चौकात यावल पोलिसाचे कर्मचारी सुशील घुगे हे शुक्रवार २८ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता गस्तीवर असताना विना नंबरचे असलेले ट्रॅक्टरमधून अवैधरित्या वाळूची वाहतूक करत असताना आढळून आले. पोलिस कर्मचारी सुशील घुगे यांनी ट्रॅक्टर थांबवून वाळू वाहतुकीची परवाना बाबत चौकशी केली असता ट्रॅक्टर चालक चेतन मच्छिंद्र सोळुंके वय-30 रा. कोळन्हावी ता. यावल यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिले. या कारणावरून पोलीस कॉन्स्टेबल यांनी ट्रॅक्टर यावल पोलिसात…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : यावल तालुक्यातील सांगवी येथील १९ वर्षीय तरुणी घरात काहीही न सांगता बेपत्ता झाल्याची घटना शुक्रवार २८ जानेवारी रोजी सकाळी उघडकीला आले आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. यावल पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसा, पूजा धनराज बाविस्कर (वय-१९) रा. सांगवी बुद्रुक ता. यावल जि. जळगाव हे आपल्या कुटुंबीयांसह राहते. शुक्रवार २८ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता कोणाला काहीही न सांगता राहत्या घरातून निघून गेली. नातेवाईकांनी दिवसभर आणि सायंकाळपर्यंत शोधाशोध केली परंतु तरुणी कुठेही आढळून आली नाही. यासंदर्भात धनराज दगडू बाविस्कर (वय-४५) रा. सांगवी ता. यावल यांनी यावल पोलिसात धाव घेऊन माहिती दिली. याबाबत यावल…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : जळगाव तालुक्यातील एका गावात येथे 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना १४ जानेवारी रोजी घडली होती. या गुन्ह्यातील संशयित आरोपीला शनिवार नशिराबाद पोलिसांनी मध्यप्रदेशातून अटक केली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेने फिर्याद दिली की, १४ जानेवारी रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास संशयित आरोपी परमानंद कैन्हैया गोरे (वय 24 रा. गुलई ता. खालवा जि. खंडवा, मध्यप्रदेश याने ४ वर्षीय अल्पवयीन मुलगी हिला खेळण्याच्य बहाण्याने तो रहात असलेल्या पत्र्याच्या खोलीत बोलावुन घेवुन लैगिक अत्याचार केला आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयित आरोपी हा मध्यप्रदेशात असल्याची गोपनिय…
पालकमंत्र्यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालयासह विविध विकासकामांचे लोकार्पण लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : गाव कारभार्यांचा कारभार चांगला असल्यास गावचा विकास गतीने होतो. ” आमचं गाव, आमची एकी, अजून बरंच काम बाकी ” हा ध्यास घेऊन काम केलेल्या कारभार्यांच्या गावांनी विकासाचे तीर्थक्षेत्र म्हणून महाराष्ट्रात लौकीक मिळविला आहे. प्रत्येक गाव कारभाऱ्यानी निर्धार केल्यास आदर्श गाव होऊ शकते. हाच निर्धार सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी करावा असे आवाहन ना. गुलाबराव पाटील यांनी केले. ना. गुलाबराव पाटील यांनी ग्रामपंचायत सदस्यांनी विकासाचा निर्धार करण्याचे आवाहन केले. टीकाकारांनी टिका करण्या आधी आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे सांगितले. हिंगोणे गावाला व्यायामशाळा साठी 10 लक्ष, ग्रामपंचायत कार्यालय बांधकामासाठी 22 लाख मंजूर करणार असल्याचे…

