Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

जळगाव प्रतिनिधी । शहरातील गेंदालाल मिल परिसरात राहणाऱ्या एका ४० वर्षीय व्यक्तीने मध्यरात्री राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सकाळी समोर आले आहे. शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यााबाबत माहिती अशी की, सुनिल नारायण सोनवणे (वय ४०) रा. गेंदालाल मील परिसर जळगाव हे पेंटरचे काम करून उदरनिर्वाह करतात. घरी आई व मुलगा यांच्यासह वास्तव्याला आहे. सोमवारी रात्री जेवण करून एफएमवर गाणे ऐकत असतांना झोपले. मध्यरात्री त्यांनी घरात सर्वजण झोपलेले असतां गळफास घेवून आत्महत्या केली. मंगळवारी सकाळी त्यांचा मुलगा मोहित हा शाळेत जाण्यासाठी उठला असता हा प्रकार लक्षात आला. सोनवणे यांनी आत्महत्या का केली याचे कारण स्पष्ट…

Read More

दोषींवर कारवाईची मागणी : वृक्षमित्र राजेंद्र वाघ धरणगाव प्रतिनिधी । शहरापासून वनविभागाच्या राजवड परिमंडळ अंतर्गत गट क्रमांक १२८० क्षेत्रा मंगळवारी ७ फेब्रुवारी रोजी दुपारी दीड वाजता लागलेल्या आगीत मिश्ररोपण आगीत जळुन खाक झाली. आग इतकी भयानक होती की आगीच्या क्षेत्राला लागून असलेल्या शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहचली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, सन २०२१-२२ ह्या वर्षी जळगाव वनविभाग धरणगाव अंतर्गत, वनक्षेत्र एरंडोल च्या नियतक्षेत्र राजवड गट क्र १२८० येथे राज्य योजना अंतर्गत वनीकरण भरगच्च कार्यक्रम राबविण्यात येऊन मिश्र रोपवन पावसाळ्यात १५.०१ हेक्टर जागेमध्ये लावण्यात आले दोन रोपांचे अंतर ३×३ मी एवढे होते. या रोपवणात एकूण ९२३७ खड्ड्यात अनेक प्रजातीचे रोपे लावण्यात आले…

Read More

जळगाव प्रतिनिधी । ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत प्राप्त तक्रारीची जनसुनावणी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवार ७ फेब्रुवारी रोजी दुपारी घेतली.यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया यांची उपस्थिती होती. श्रीमती चाकणकर म्हणाल्या कि, राज्य शासन महिला आयोगातर्फे अन्याय अत्याचार प्रतिबंधात्मक उपाय योजनांसाठी समिती कार्यरत आहे, जिल्ह्यात कोविड संसर्ग काळात विधवा, एकल महिलांच्या तसेच पालकत्व गमावलेल्या 20 मुलांना 5 लाख रुपये शासन स्तरावरून मदत देण्यात आली. 569 महिलांना लाभ देण्यात आला आहे. तसेच अन्य निराधार महिलांना शिलाई मशीन, रेशन लाभ, वृद्धापकाळ पेन्शन आदी लाभ देण्यात आले आहेत. शिवाय…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज | पन्नास रूपयाचा उधारीसाठी काका पुतण्यांमध्ये झालेल्या हाणामारीत काका गटारीत पडल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीसात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. यासंदर्भात अधिक असे की, धरणगाव तालुक्यातील कंडारी येथे राजू मानसिंग भिल (वय २८) आणि भारत सुकडू भिल (वय ४४) या दोघांमध्ये ५० रुपयांच्या उधारीवरून सोमवारी ७ फेब्रुवारी रोजी रोजी रात्री आठ साडेआठ वाजेच्या सुमारास शाब्दिक चकमक सुरू झाली. थोड्याच वेळात शाब्दिक चकमकीचे रूपांतर हाणामारीत झाले. या हाणामारीत राजुने आपले काका भारत यांना जोराचा धक्का दिला. या धक्क्यात भारत हे जवळच्या गटारीत जाऊन पडले. गटारीत पडल्यामुळे त्यांच्या डोक्याला जबर मार बसून…

Read More

शनीपेठ पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद जळगाव तालुक्यातील तूरखेडा येथील ४० वर्षीय तरूणाने शहरातील कांचन नगर येथे पत्नीच्या घरी दरवाजा बंद करून आत्महत्या केल्याची घटना आली. याबाबत शनीपेठ पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शनीपेठ पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार, रविंद्र केशव सुर्यवंशी (वय-४०) रा. तुरखेडा ता. जि.जळगाव हे मुलगा दिपक सुर्यवंशी यांच्यासह तुरखेडा येथे वास्तव्याला आहे. इमारतीचे बांधकाम करून उदरनिर्वाह करतात. तर पत्नी सुरेखा सुर्यवंशी ह्या जळगाव शहरातील कांचन नगरात वास्तव्याला आहे. त्या भाजीपाला विक्री करून उदरनिर्वाह करतात. गेल्या चार ते पाच दिवसांपासून मुलगा दिपक हा पत्नी सुरेखाकडे राहण्यासाठी आला होतो. त्यामुळे त्याला घेण्यासाठी रविंद्र सुर्यवंशी हे सोमवारी ७ फेब्रुवारी रोजी…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : मुक्ताईनगर तालुक्यातील चिखली येथील रेशनदुकान धारकाने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत मिळणारे मोफत धान्याची परस्पर काळ्याबाजारात विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात रेशनदुकानदारावर गुन्हा झाला आहे. यामुळे रेशनदुकानदारांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. मुक्ताईनगर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील चिखली येथील स्वस्त धान्य दुकान क्रमांक (22) चे परवानाधारक आजाबराव सिताराम पाटील रा. चिखली ता. मुक्ताईनगर यांना शासनाकडून प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत एप्रिल २०२० ते नोव्हेंबर २०२० या काळात लाभार्थ्यांसाठी मोफत धान्य वाटप करण्यासाठी धान्य वितरीत करण्यात आले होते. पुरविण्यात आलेल्या धान्यांपैकी ७० क्विंटल गहू, ३६ क्विंटन तांदूळ आणि साडे आठ क्विंटल दाळ यांची…

Read More

जळगाव प्रतिनिधी । पाळधी येथे जेवणासाठी गेलेल्या द्वारका नगरातील तरूणाचा भरधाव कारने धडक दिल्याने मृत्यू झाल्याची दुदैवी घडली. याबाबत पाळधी दुरक्षेत्र पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश सुखदेव महाजन (वय-३०) रा. द्वारका नगर, जळगाव असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे. गणेश महाजन हा आपल्या आईवडील, पत्नी व दोन मुलांसह द्वारका नगर येथे वास्तव्याला आहे. गणेश महाजन हा महावितरण कंपनीत नोकरीला होता. द्वारका नगर परिसरात गणेशच्या मावस भावाचे लग्न असल्याने रविवारी ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी हळदीचा कार्यक्रम होतो. जेवण करून कुटुंबासह सर्वजण आनंदाने नाचले. नाचण्याचा कार्यक्रम आटोपल्यानंतर रात्री १०.३० वाजेच्या सुमारास गणेश नातेवाईकांसह मोठा भाऊ, पाहणे आणि मित्र परिवार…

Read More

अमळनेर प्रतिनिधी । बारावीची परिक्षा देण्यासाठी पुण्याहून अमळनेरात आलेल्या अल्पवयीन मुलीला एकाने फूस लावून पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर माहिती अशी की, पुणे जिल्ह्यात एका गावात १७ वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. अमळनेर येथे तिचे बारावीची परिक्षा असल्याने मुलगी ही आई भाऊसह अमळनेर येथे मामाच्या घरी आले होते. ६ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री पुणे येथील राहणारा रावसोहब पांडूरंग साळुंखे याने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले. याबाबत पीडीत मुलीच्या आईने अमळनेर पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी रावसाहेब पांडूरंग साळुंखे याच्या विरोधात…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । तालुक्यातील उखळवाडी गावाजवळील अंजनी नदीजवळ धरणगाव पोलीसांनी जुगार अड्ड्यावर धरणगाव पोलीसांनी छापा टाकून चार संशयित आरोपींना अटक केली आहे तर १६ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत धरणगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धरणगाव पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील उखळवाडी गावाजवळील अंजनी नदीजवळ काही जण जुगार खेळत असल्याची गोपनिय माहिती धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांना मिळाली. त्यानुसार पो.नि. शेळके यांनी स्वत: एक पथक तयार करून रविवारी ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यात पोलीसांनी जुगार खेळाणारे चार जणांना ताब्यात घेतले आहे. तर या कारवाईत एकुण रोकड आणि…

Read More

मुंबई वृत्तसंस्था । भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवार ७ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.यासंदर्भात काढण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, आज रविवार ६ फेब्रुवारी २०२२ रोजी भारतरत्न लता मंगेशकर यांचे दुःखद निधन झाले असून त्यांच्या निधनामुळे संगीत आणि कला विश्वाची अपरिमित हानी झाली आहे. या महान गायिकेला श्रद्धांजली वाहण्यासाठी, परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१( सन १९८१चाअधिनियम २६ ) च्या कलम २५ खाली महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून सोमवार दिनांक ७ फेब्रुवारी रोजी राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.

Read More