Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

धरणगाव (प्रतिनिधी) – महसूल व वन विभागाच्या दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व महिलांच्या दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी तसेच शासनाच्या विविध विभागांशी संबंधित तक्रारी तातडीने निकाली काढण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मंडळ स्तरावर ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान’ राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या अनुषंगाने धरणगाव तालुक्यातील सोनवद मंडळात प्राथमिक आरोग्य केंद्र, सोनवद बु. येथे शनिवार, ७ मार्च २०२६ रोजी सकाळी ९ वाजता हे शिबिर आयोजित करण्यात आले. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते, तसेच जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध शासकीय योजनांचे लाभ नागरिकांना प्रत्यक्ष वाटप करण्यात आले. या…

Read More

जळगाव विजय पाटील : जळगाव महानगरपालिकेत लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपल्यानंतर लागू करण्यात आलेल्या प्रशासकीय राजवटीच्या काळात घेतलेल्या सर्व निर्णयांचा सविस्तर आणि लेखापरीक्षित अहवाल श्वेतपत्रिकेच्या स्वरूपात जनतेसमोर जाहीर करावा, अशी मागणी प्रभाग क्रमांक १३ च्या नगरसेविका वैशाली अमित पाटील यांनी केली आहे. प्रशासकीय राजवटीच्या कालावधीत महानगरपालिकेचा संपूर्ण कारभार प्रशासकीय पातळीवर चालविण्यात आला असून या काळात अनेक आर्थिक, प्रशासकीय, धोरणात्मक आणि विकासकामांशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असल्याचे त्यांनी नमूद केले. स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार हा लोकशाही तत्त्वांवर आधारित असल्याने जनतेच्या निधीचा वापर, निर्णय प्रक्रिया आणि त्याची अंमलबजावणी पारदर्शक व उत्तरदायी असणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पाटील यांनी प्रशासनाकडे केलेल्या मागणीत प्रशासकीय…

Read More

धरणगाव, जि. जळगाव : धरणगाव ते एरंडोल दरम्यान हायब्रीड अॅन्युटी पद्धतीअंतर्गत सुरू असलेल्या काँक्रिटीकरण रस्त्याच्या कामामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. अपूर्ण सर्विस रोड, नियमित पाणीफवारणीचा अभाव आणि कामातील संथ गती यामुळे वाहनचालक व स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून संभाव्य अपघातांची भीती व्यक्त केली जात आहे. सदर मार्गावरील मुख्य रस्त्याबरोबर उभारण्यात येणारे सर्विस रोड अनेक ठिकाणी अपूर्ण अवस्थेत आहेत. काही भागांत सर्विस रोड तयार करण्यात आले असले तरी ते व्यवस्थित समतल न केल्याने आणि नियमित पाणी न मारल्याने मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. परिणामी वाहनचालकांना समोरील रस्ता स्पष्ट दिसत नाही. दुचाकीस्वार, पादचारी आणि व्यापारी…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्युज : सोनवद येथे ७ मार्च रोजी ‘महाराजस्व समाधान शिबीर’ धरणगाव (जि. जळगाव), दि. १ मार्च : नागरिकांना महसूल विभागाच्या विविध सेवा थेट गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान (टप्पा-१) अंतर्गत सोनवद येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.तहसील कार्यालय धरणगाव यांच्या वतीने आयोजित हे शिबिर शनिवार, दि. ७ मार्च २०२६ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र परिसर, सोनवद येथे सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत पार पडणार आहे.या शिबिरात नागरिकांना १५ पेक्षा अधिक महसुली सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामध्ये प्रलंबित फेरफार प्रकरणांचा निपटारा, विद्यार्थ्यांसाठी दाखले वाटप, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे…

Read More

प्रतिनिधी जळगाव : जळगाव शहर महानगरपालिकेमध्ये पूर्वीप्रमाणे ‘नगरसेवक डायरी’ योजना तात्काळ पुन्हा सुरू करावी, अशी मागणी प्रभाग क्र. १३ च्या नगरसेविका सौ. वैशाली अमित पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात त्या उद्या मा. महापौर यांना सविस्तर निवेदन सादर करणार असून प्रशासनातील पारदर्शकता, जबाबदारीची जाणीव आणि वॉर्डनिहाय कामांचा स्पष्ट लेखाजोखा नागरिकांसमोर येण्यासाठी ही योजना अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, सन २०१३ मध्ये करण्यात आलेल्या मागणीनुसार २०१३ ते २०१८ या कालावधीत महानगरपालिकेमार्फत ‘नगरसेवक डायरी’ ठेवण्यात येत होती. या डायरीच्या माध्यमातून प्रत्येक वॉर्डात होणाऱ्या फवारणी, गटार साफसफाई, रस्ते स्वच्छता आदी कामांची नोंद संबंधित कर्मचाऱ्यांकडून केली जात होती. काम पूर्ण…

Read More

जळगाव प्रतिनिधी :Devagiri Nagari Sahakari Bankच्या चाळीसगाव शाखेतून Umang White Gold Private Limited या कंपनीच्या नावाने काही वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपयांचे औद्योगिक कर्ज घेण्यात आले होते. मात्र मुदतीत परतफेड न झाल्याने संबंधित खाते एनपीए घोषित करण्यात आले. त्यानंतर बँकेने कायदेशीर कारवाई सुरू करत कंपनीशी संबंधित शिवसेना (ठाकरे गट) नेते तथा माजी खासदार Unmesh Patil यांची चाळीसगाव येथील मालमत्ता जप्त केली आहे. या संदर्भात बँक प्रशासनाने आणखी एक जाहीर नोटीस प्रसिद्ध केली आहे. कर्ज थकीत; कारवाईची प्रक्रियाउद्योग कर्जाची परतफेड न झाल्याने बँकेने कंपनीला अतिरिक्त मुदत दिली होती. तरीही थकबाकी न भरल्याने कायदेशीर पावले उचलण्यात आली. दरम्यान, कंपनीचे संचालक उन्मेश पाटील यांच्यासह संजय…

Read More

सरपंच परिषदेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून भाजपा–शिवसेना युती सरकारने विद्यमान सरपंचांना प्रशासक म्हणून सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रलंबित कामांना गती मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सरपंच परिषदेचे तालुका अध्यक्ष निर्दोष पवार, उपाध्यक्ष कैलास पाटील, सुरेश पवार तसेच बांभोरीचे सरपंच सचिन भाऊ बिराडे यांनी या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त करत सर्व सरपंचांच्या वतीने आभार मानले. त्यांनी सांगितले की, ग्रामविकासाची कामे अर्धवट राहू नयेत आणि प्रशासनात सातत्य राहावे यासाठी परिषदेकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. याबाबत सर्व पदाधिकारी व सरपंचांनी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विशेष…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्युज वृत्तसंस्था : धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील नीलकंठ नगरात लग्नसमारंभादरम्यान झालेल्या भीषण हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला असून तिघे गंभीर जखमी झाले आहेत. दुपारी सुमारे एक वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विजय गोसावी यांच्या मुलीचा विवाहसोहळा सुरू होता. हळदीच्या कार्यक्रमासाठी नातेवाईक मोठ्या संख्येने जमले होते. साखरपुड्यापूर्वी साक्री व सोनगड येथून आलेल्या काही नातेवाईकांमध्ये जुन्या वादावरून बाचाबाची झाली. सोशल मीडियावर प्रसारित आक्षेपार्ह संदेश व व्हिडिओ यावरून आधीपासून तणाव असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. वाद चिघळल्याने काही जणांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेत देवेंद्र…

Read More

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहर महानगरपालिका येथे प्रभाग क्रमांक १३ मधील वाढत्या तक्रारींवर अखेर बुधवारी (१८ रोजी) महापौर दालनात विशेष आढावा बैठक पार पडली. महापौर दीपमाला काळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत नगरसेवकांनी आरोग्य, पाणीपुरवठा आणि पथदिवे विभागाच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. बैठकीच्या सुरुवातीलाच आरोग्य विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. नगरसेविका सुरेखा तायडे यांनी घंटागाडी व्यवस्थापनातील गोंधळ मांडत, “घंटागाडीचे चालक कोण? त्यांचे निश्चित मार्ग कोणते? याची सविस्तर माहिती नगरसेवकांना द्यावी. अनेक भागांत सफाई कामगार नियमित येत नाहीत,” अशी तक्रार केली.वैशाली पाटील यांनी गटारींच्या स्वच्छतेचा मुद्दा उपस्थित करत, “गटारी साफ केल्या जात नाहीत. काढलेला कचरा…

Read More

जळगाव शहरातील Deokar College of Pharmacy येथे शिक्षण घेत असलेल्या २० वर्षीय श्याम प्रभाकर पाटील या विद्यार्थ्याच्या मृत्यूने शहरात हळहळ व्यक्त होत आहे. कॉलेजमध्ये कथित मारहाण आणि सार्वजनिक अपमान झाल्यानंतर त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. मृत विद्यार्थ्याच्या नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, काही दिवसांपूर्वी कॉलेजचे प्राचार्य योगेश पवार यांनी सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांसमोर पीव्हीसी पाईपने मारहाण करून शिवीगाळ केली. या घटनेमुळे श्याम मानसिकदृष्ट्या खचला होता, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली. १४ फेब्रुवारी रोजी श्यामने आपल्या वडिलांना आणि काकांना फोन करून आपल्यावर अन्याय झाल्याचे सांगितले होते. त्यानंतर नेहरूनगर येथील राहत्या खोलीवर त्याचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळावरून पोलिसांनी सुसाईड नोट जप्त केली असून…

Read More