Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भाजप ‘तिथे’ आंदोलन का करत नाही ? सुषमा अंधारेंनी केला सवाल !
    राजकारण

    भाजप ‘तिथे’ आंदोलन का करत नाही ? सुषमा अंधारेंनी केला सवाल !

    editor deskBy editor deskNovember 21, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    २०१५ मध्ये नीतेश राणे यांनी सावरकरांच्या विरोधात ट्विट केले होते. आता भाजपमध्ये आल्यावर सावरकरांवरून बोलणारे शेंड्यावरून शहाणे झालेले बोलायला लागले की, असे नाही बोलायचे तसे नाही बोलायचे, भाजपमध्ये हिंमत असेल तर त्यांनी नारायण राणेंच्या कणकवलीमधील घरी जात आंदोलन करावे, असे आव्हान शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केले आहे. ​​​​​​
    सुषमा अंधारे म्हणाल्या की, तुम्ही सावरकरांचा अपमान करताय असे आता म्हणणारे राणे यांनी 2015 मध्ये सावरकरांनी माफी मागितली होती, असे ट्विट केले होते. त्यावर अंधारे म्हणाल्या की, भाजपने कणकणवलीमध्ये जात राणेंच्या घरात घुसून आंदोलन करावे आणि नीतेश राणेंना बाहेर काढत पालथा घालून तुडवावा. मग आम्ही मानू, असे अंधारेंनी म्हटले आहे. तर आम्हाला शहाणपणा सांगू नये असे म्हणत नीतेश राणेंना टोला लगावला आहे. ‘जिनके घर शीशे के होते हैं, वे दूसरों पर पत्थर नहीं फ़ेंका करते, हे लक्षात असेलच देवेंद्र फडणवीस यांना असा टोला ही शायरीच्या माध्यमातून लगावला आहे.

    औरंगाबादमधील 5 आमदार गेले, पण जनता ही बाळासाहेबांच्या सोबतच आहे. ज्या झाडाच्या खाली बसले त्यांच झाडाच्या मुळावर घाव घालायला निघाले आहे. जैस्वाल यांच्या संपत्ती विरोधात कायदेशीर कारवाई करणार असे म्हणतांना जैस्वाल असो की शिरसाट असो एकही जण पुन्हा निवडून येणार नाही, असे म्हणताना अंधारेंनी टीकास्त्र डागले आहे.
    किरीट सोमय्या यांनी माझ्या केवळ 4 प्रश्नांची उत्तरे द्यावी. हे मी त्यांना अनेक दिवसांपासून प्रश्न विचारते आहे, पण ते माझ्या प्रश्नाचे उत्तर देत नाही. मी शिवबंधन सोडत तुमचा गंडा बांधायला तयार आहे. पण सोमय्यांनी माझ्या 4 प्रश्नांची उत्तरे द्यावी असे म्हणत

    2014 मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या नेत्यांना तुमच्याकडे घेतले. यांच्यावर तुम्ही आरोप केले होते. मात्र, भाजपमध्ये आल्यानंतर त्यांच्यामागे लागलेल्या चौकशी आणि तुमच्या आरोपाचे काय झाले, त्यांचा चौकशीचे काय झाले असा सवाल सुषमा अंधारेंनी विचारला आहे. नोटीस पाठविल्यानंतर भावना गवळी, सचिन जोशी प्रताप सरनाईक यांच्यावर चार्जशीट कधी दाखल करणार आहे. भाजपकडे कोणती वॉशिंगमशीन आहे, की विरोधक भाजपमध्ये आला की इतका निर्मळ होतो असा सवालही सुषमा अंधारेंनी विचारला आहे. ती आम्हाला पाहिजे, मला ओवाळतील ती वॉशिंग मशीन द्यावी.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    वाढदिवसाचा अनोखा आदर्श! नगरसेवक इंजि. नरेंद्र पाटील यांनी गरजूंना रेनकोट वाटून दिला सामाजिक संदेश

    July 30, 2026

    जिल्ह्यातील ६३८ शिक्षकांचे शालार्थ आयडी मनोजच्या माध्यमातून: कोट्यवधींच्या मायाजालाचा धक्कादायक खुलासा?

    July 30, 2026

    बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळा; मनोजसह तीन मराठा नेते SITच्या रडारवर?

    July 29, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.