
जळगाव : प्रतिनिधी
शहरातील महाबळ परिसरातील संत गाडगेबाबा चौकात दि.१० सप्टेंबर रोजी तयार खाद्यपदार्थ विक्रीच्या दुकानावरून नेलेली वरण, बट्टी खराब असल्याबाबत विचारणा केल्याने पंकज सुरेश बारी (३८, रा. माऊली नगर) यांना वरण, बट्टी सेंटर चालकासह दोन जणांनी मारहाण केली.
पंकज बारी यांनी दुकानावरून वरण, बट्टी नेल्यानंतर ती खराब निघाली होती. त्याविषयी ते दुकानमालक दिनेश सपकाळ यांच्याशी बोलले असता त्यांनी बारी यांना ढकलून दिले. तसेच तुषार सोनवणे नामक व्यक्तीला बोलवून घेत दोघांनी मारहाण केली. या प्रकरणी पंकज बारी यांनी रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून दिनेश सपकाळ व तुषार सोनवणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



