• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

भुजबळांनी घेतला राहुल सोलापूरकरांचा समाचार : …… त्या बुद्धीचा चांगला वापर !

editor desk by editor desk
February 10, 2025
in राजकारण, राज्य, राष्ट्रीय
0
भुजबळांनी घेतला राहुल सोलापूरकरांचा समाचार : …… त्या बुद्धीचा चांगला वापर !

नाशिक : वृत्तसंस्था

गेल्या काही दिवसापासून राज्यातील अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर आता त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी देखील भाष्य केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. यावर आता अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी अभिनेता राहूल सोलापूरकर यांचा समाचार घेतला आहे.

छगन भुजबळ यांनी यावेळी अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानांवरही भाष्य केले. राहुल सोलापूरकर हे भांडारकर संस्थेमध्ये कुणीतरी सदस्य होते. ते विद्वान ग्रहस्थ आहेत. पण त्यांनी कुठपर्यंत बोलायचे याच्या मर्यादा पाळल्या पाहिजेत. ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाला लाच देऊन आग्र्ह्याहून सुटले. यामुळे डोक्यात तिकीड निर्माण झाली. हे कोण लोक आहेत? औरंगजेब अख्ख्या हिंदुस्थानचा राजा होता. त्याला कोण लाच देणार? समजा लाच दिली असती तर लहानशा संभाजीला महाराजांनी काशीमध्ये कशासाठी लपवून ठेवले होते. महाराज जेव्हा गडावर पोहोचले तेव्हा माता जिजाऊंनी त्यांना संभाजी कुठे आहेत? असा प्रश्न केला. त्यांच्या डोळ्यात पाणी आले होते. शिवाजी महाराज खरेच लाच देऊन आले असते तर ते उघडपणे आले असते. हे लोक काहीही बरळतात. या लोकांना इतिहास बदलण्याचा कुणी अधिकार दिला.

राहुल सोलापूरकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयीही वादग्रस्त विधान केले. पुराणमध्ये विद्गवान पुरुष ब्राह्मण असतात असे लिहिले असेल. परमेश्वराने सर्वांना बुद्धी सारखीच दिली आहे. त्या बुद्धीचा चांगला वापर जे लोक करतात मग ते कोणत्याही समाजाचे का असेना खूप मोठी झाली आहेत. बाबासाहेब दलित समाजात जन्माला आले हे खरे आहे. पण ते प्रचंड विद्वत्ता घेऊन जन्माला आले. त्यांना अनेकांनी मदत केली. त्यांनी त्यांच्या विद्वत्तेचा वापर केवळ पैसे कमावण्यासाठी केला नाही. त्यांनी त्याचा वापर दलित समाजाच्या उत्थानासाठी केला. त्यांनी जगातील एक अतिशय उत्तम संविधान तयार केले. या संविधानाचा अभ्यास करून इतरही देश आपल्या देशाची राज्यघटना तयार करत आहेत. बाबासाहेबांविषयी असे चागंले सांगितले पाहिजे. उगीचच काहीही बोलले तर लोकांना वाईट वाटणारच. त्यांनी यापुढे अशी वादग्रस्त विधाने करू नये. त्यांना इतिहास बदलण्याचा कोणताही मक्ता नाही, असे भुजबळ म्हणाले.

 

Previous Post

राज्यात फुटले नव्या वादाला तोंड : राहुल सोलापूरकरांचे पुन्हा वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल !

Next Post

अंजली दमानियांचे आ.सुरेश धस यांच्यावर गंभीर आरोप !

Next Post
अंजली दमानियांचे आ.सुरेश धस यांच्यावर गंभीर आरोप !

अंजली दमानियांचे आ.सुरेश धस यांच्यावर गंभीर आरोप !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोठी बातमी : बच्चू कडू यांची उपोषण स्थगित करण्याची घोषणा !
कृषी

मोठी बातमी : बच्चू कडू यांची उपोषण स्थगित करण्याची घोषणा !

June 14, 2025
अहमदाबाद विमान दुर्घटनेत आत्तापर्यंत २७४ जणांचे मृतदेह हाती !
क्राईम

अहमदाबाद विमान दुर्घटनेत आत्तापर्यंत २७४ जणांचे मृतदेह हाती !

June 14, 2025
जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू !
क्राईम

जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू !

June 14, 2025
विद्यार्थिनीला आधी मिठी मारली अन मग गोळी मारली !
क्राईम

हॉटेल मालकाला खंडणी मागत सोन्याची चैन केली लंपास !

June 14, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

भुसावळात किरकोळ कारणावरून काका-पुतण्याला मारहाण !

June 14, 2025
वरणगावनजीक दोन दुचाकीची धडक : एक ठार तर पाच जखमी !
क्राईम

वरणगावनजीक दोन दुचाकीची धडक : एक ठार तर पाच जखमी !

June 14, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group