Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पद्मालय मंदिराच्या 14 कोटी रुपयांच्या विकास कामांमध्ये पारोळ्याच्या गद्दाराच्या मुलाने ठेकेदारकडून उकडले इतके कोटी
    एरंडोल

    पद्मालय मंदिराच्या 14 कोटी रुपयांच्या विकास कामांमध्ये पारोळ्याच्या गद्दाराच्या मुलाने ठेकेदारकडून उकडले इतके कोटी

    editor deskBy editor deskOctober 24, 2024Updated:October 24, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    खानदेशातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र पद्मालय गणपती मंदिर च्या विकासासाठी तीर्थक्षेत्र विकास अंतर्गत कोट्यावधी रुपयांचा निधी राज्य शासनाने मंजूर केला यात 14 कोटी रुपयांच्या विकास कामांमध्ये ठेकेदाराला काम मिळून देण्यासाठी त्याच्याकडून तीन कोटी रुपये उकळले असल्याची चर्चा सुरू असून पारोळा येथील गद्दाराच्या मुलाने हा पराक्रम केला असल्याचे ठेकेदारांमध्ये व प्रशासनामध्ये चर्चा आहे.

    समाजामध्ये देवस्थानच्या विकासा साठी लोक वर्गणीतून विकास केला जातो अनेक भाविक दानधर्म करीत असतात परंतु श्री क्षेत्र पद्मालय गणपती मंदिर येथे शासनाने तीर्थक्षेत्र विकास अंतर्गत कोट्यावधी रुपयांचा निधी दिला हे काम दर्जेदार व्हावे यासाठी प्रशासनाने पाठपुरावा केला परंतु टक्केवारीसाठी अनेक ठेकेदारांना झुलवत ठेवले शेवटी गद्दाराच्या मुलाने बाजार मांडला आणि तीन कोटी रुपये घेऊन हे काम मराठा समाजाच्या एका प्रतिष्ठित ठेकेदाराला दिले असल्याचे सांगण्यात आले.

    विशेष म्हणजे टक्केवारीचा पारोळा एरंडोल तालुक्यात बाजार मांडला आहे. पैशांच्या जीवावर सर्व काही करू लोकांना विकत घेऊ महिलांना विकत घेऊ अशी भाषा गद्दाराच्या मुलाकडून वापरली जात आहे स्वाभिमानी जनतेने आता जागृत होण्याची वेळ आली आहे. एरंडोल तालुक्यातील अनेक नामवंत पुढाऱ्यांना संपविण्याचा डाव देखील यशस्वी झाला आहे अनेकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्वार्थी राजकारण केले जात आहे. टक्केवारी व दहशतीमुळे हे तालुके चर्चेत आलेले आहेत. असे अनेक किस्से या गद्दाराच्या मुलाचे बाहेर येत असून लोकांच्या मनात चीड निर्माण व्हायला लागली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे चाळीसगावात जोरदार स्वागत !

    April 29, 2026

    अमृत भारत एक्सप्रेसचा भुसावळ व जळगाव येथे शुभारंभ

    April 29, 2026

    फैजपूर-वरणगावमध्ये गोडाऊन फोडून सिलेंडर चोरी करणारी टोळी उघड; लाखोंचा मुद्देमाल जप्त!

    April 29, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.