• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

बिबट्याच्या हल्ल्यात पाच शेळ्या ठार

editor desk by editor desk
September 14, 2024
in क्राईम, चाळीसगाव
0
बिबट्याच्या हल्ल्यात पाच शेळ्या ठार

चाळीसगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील भऊर शिवारात झाडावरून बिबट्याने उडी घेत शेळ्यावर हल्ला चढविला यात पाच शेळ्या ठार झाल्या आहेत. गुरुवारी रात्री ही घटना घडली. याबाबत वन विभागाने पंचनामा केला आहे. परिसरात बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भऊर शिवारात जामदा स्टेशनजवळ ज्योती किशोर पाटील यांचे शेत आहे. त्या शेतातच राहतात. शेतात तारेच्या जाळ्यात शेळ्या बांधलेल्या होत्या. गुरुवारी रात्री बिबट्याने हल्ला केल्याचे त्यांनी पाहिले. बिबट्या गेल्यानंतर त्यांनी पाहिले असता चार शेळ्या मृत झालेल्या अवस्थेत आढळून आल्या. तर एका शेळीचा शुक्रवारी पहाटे मृत्यू झाला. त्यांनी या घटनेची माहिती वनविभागाला दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी बिबट्याचे ठसे आढळून आले आहेत. या घटनेचा पंचनामा कर्मचाऱ्यांनी केला.

चाळीसगाव तालुक्यातील पिंपरखेड, पिंपरखेड तांडा व शिवापूर या परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून अनेक ठिकाणी बिबट्याचे दर्शन शेतकऱ्यांना झाले आहे. शेतात, रस्त्याने जाताना बिबट्या आढळून आला आहे. यामुळे शेतकरी भयभीत झाला आहे. दोन दिवसांपूर्वी संध्याकाळी मनोज ठुबे हे गाडीवर जात असताना बिबट्याने त्यांच्या गाडीसमोरून उडी मारून दुसऱ्या शेतात पलायन केले. मंगळवारी दुपारी मच्छिंद्र ठुबे यांचेही शेतात तर रात्री पिंपरखेड तांडा परिसरात नदी जवळील शेत वस्तीजवळ बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आले आहेत. याबाबत चाळीसगाव वन विभागाला वेळोवेळी माहिती देऊनही दुर्लक्ष केले जात आहे. शेतकरी व पशुधनाला धोका निर्माण झाला आहे. वन विभागाने याबाबत दखल घ्यावी. परिसरात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी पिंपरखेड, पिंपरखेड तांडा, शिवापूर भागातील नागरिकांनी केली आहे. जर वन विभागाने काही कारवाई केली नाही तर आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.

Previous Post

धावत्या रेल्वेतून पडल्याने एकाचा दुर्देवी मृत्यू

Next Post

राष्ट्रीय महामार्गावर गतिरोधक टाकण्याचे काम वेगाने सुरू

Next Post
राष्ट्रीय महामार्गावर गतिरोधक टाकण्याचे काम वेगाने सुरू

राष्ट्रीय महामार्गावर गतिरोधक टाकण्याचे काम वेगाने सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : मुंबईतील विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर आग !
क्राईम

खळबळजनक : मुंबईतील विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर आग !

May 19, 2025
जळगावच्या खा.वाघ ठरल्या संसदरत्न २०२५ पुरस्काराच्या मानकरी
जळगाव

जळगावच्या खा.वाघ ठरल्या संसदरत्न २०२५ पुरस्काराच्या मानकरी

May 18, 2025
सुंदर त्वचेसाठी ‘या’ टिप्स आहे महत्वाच्या !
lifestyle

सुंदर त्वचेसाठी ‘या’ टिप्स आहे महत्वाच्या !

May 18, 2025
आरोग्य विभागाचे मुकुंद गोसावी बनले ‘ब्रँड अ‍ॅम्बेसडर’ !
Uncategorized

आरोग्य विभागाचे मुकुंद गोसावी बनले ‘ब्रँड अ‍ॅम्बेसडर’ !

May 18, 2025
टॉवेल कारखान्याला भीषण आग : तीन कामगारांचा होरपळून मृत्यू !
क्राईम

टॉवेल कारखान्याला भीषण आग : तीन कामगारांचा होरपळून मृत्यू !

May 18, 2025
मुख्यमंत्री फडणवीसांच्या  टीकेला शरद पवारांचे जोरदार प्रतिउत्तर !
राजकारण

मुख्यमंत्री फडणवीसांच्या टीकेला शरद पवारांचे जोरदार प्रतिउत्तर !

May 18, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group