Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » शेतकरी सापडला संकटात : बदलत्या हवामानाचा कपाशीवर गंभीर परिणाम
    राजकारण

    शेतकरी सापडला संकटात : बदलत्या हवामानाचा कपाशीवर गंभीर परिणाम

    editor deskBy editor deskAugust 22, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    पावसाळा सुरु झाल्यापासून सतत पाऊस सुरु होता. दरम्यान पावासने काहीशी उसंत घेतली मात्र यंदा पिकांना आवश्यक प्रमाणात ऊन मिळत नसल्यामुळे पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याचे दिसून येत आहे. अश्यात आता ढगाळ वातावरण कायम असल्यानेआणि वातावरणात होत असलेल्या बदलाने कपाशी पिकावर रोगाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.

    वाशिम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सोयाबीनचे पिक घेतले जाते. मात्र मागील दोन- तीन वर्षापासून सोयाबीनच्या उत्पन्नामध्ये शेतकऱ्यांना घट येत असून उत्पादन खर्च अधिक होत आहे. शिवाय हमी भावापेक्षा सुद्धा कमी दर मिळतं असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी कपाशी पिकाकडे वळले आहेत. यंदाच्या खरिपात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सुमारे २४ हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशी पिकांची लागवड केली आहे.

    मात्र, मागील पंधरा दिवसापासून ढगाळ वातावरण व सततचा पाऊस या बदलत्या वातावरणामुळं कपाशी पीकांवर मोठ्या प्रमाणात रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. फुलं, पाते गळून जात असून पानं लाल पडतं असल्याने कपाशी पिकं धोक्यात आली आहेत. कपाशीवर हा रोग वाढत असल्याने शेतकऱ्याची चिंता वाढली आहे. शिवाय कपाशीच्या उत्पन्नावर देखील परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अक्षय्य तृतीयेवर बालविवाह रोखण्यासाठी राज्यभर कडक बंदोबस्त; प्रशासनाचे सतर्कतेचे आदेश”

    April 19, 2026

    भोंदू बाबा खरात प्रकरणाला राजकीय वरदहस्त? श्याम मानवांचे स्फोटक आरोप; तपासावरही उपस्थित केले प्रश्नचिन्ह !

    April 19, 2026

    अशोक खरात प्रकरणात भक्कम पुरावे गोळा करा; मुख्यमंत्र्यांचे पोलिसांना कडक निर्देश !

    April 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.