जळगाव : प्रतिनिधी
शहरातील एका परिसरात घरात कोणीच नसतांना भूषण प्रभाकर माळी (वय २८) या तरुणाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. आत्महत्येचे कारण स्पष्ट नाही. रामानंद नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, व्यंकटेश नगरात भूषण माळी हा तरुण कुटुंबीयांसह वास्तव्यास होता. एका खासगी कंपनीत काम करुन तो कुटुंबाला हातभार लावित होता. गुरुवारी सकाळी घरात कोणीही नसतांना भूषण याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. कुटुंबीयांनी भूषणला खाली उतरवून तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी करीत मयत घोषीत केले. त्याच्या पश्चात आई, मोठा भाऊ, वहिनी असा परिवार आहे.