Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पक्षाचा प्रचार करण्यासाठी अजित पवार देणार नवी कोरी चारचाकी !
    राजकारण

    पक्षाचा प्रचार करण्यासाठी अजित पवार देणार नवी कोरी चारचाकी !

    editor deskBy editor deskDecember 28, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    देशभरात आगामी काळात लोकसभेच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार असून त्यानंतर लगेच राज्यात विधानसभेची निवडणूक असणार आहे. तसेच त्यापाठोपाठ प्रलंबित असणाऱ्या महापालिका निवडणुकांचं देखील बिगूल वाजण्याची भविष्यात शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाकडून निवडणुकीची जोरदार तयारी केली जात आहे. पक्षाचा प्रचार करण्यासाठी कार्यकर्ते आणि पदाधिकारी खूश असायला हवेत. त्यांच्या मनात पक्षाबद्दल निष्ठा असणं अपेक्षित आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाकडून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने खूश करण्याचा प्रयत्न केला जातो. या दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून एक मोठी बातमी समोर आली आहे. अजित पवार गटाच्या सर्व जिल्हाध्यक्षांना नव्या कोऱ्या चारचाकी गाडी मिळणार आहेत.

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या प्रत्येक जिल्हाध्यक्षाला आपल्या जिल्ह्यात पक्षाचा प्रचार करण्यासाठी आणि फिरण्यासाठी पक्षाकडून चारचाकी वाहनं देण्यात येणार आहेत. याबाबतची घोषणा अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच केली होती. तब्बल 40 हून अधिक गाड्या अजित पवार गटाकडून विकत घेण्यात येत आहेत. या गाड्या आज स्टेट ड्राईव्हसाठी पक्षाच्या कार्यालयात दाखल झाल्या. त्यानंतर चर्चांना उधाण आलंय. या गाड्यांच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे.

    “प्रत्येकाला गाडीला बांधून ठेवायचं म्हणजे पळून जाणार नाही. पळणाऱ्यांची भीती खूप आहे ना, कधी काय होईल सांगता येत नाही. निवडणुका जाहीर होऊ द्या. मग बघा पळापळ. ते 40 गाड्या काय 400 गाड्या घेतील. ते कालांतराने प्रत्येक आमदारालाही गाडी देणार आहेत. गाडीबरोबर दोन माणसंही देणार आहेत. ड्रायव्हरही देणार आहेत. कारण नजर ठेवायला लागेल ना, निवडणूक जाहीर झाल्यावर कुणी पळून जायला नको”, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    एएचटीयू पथकाने टाकला छापा : होमगार्डच्या घरात सुरु होता कुंटणखाना !

    November 19, 2025

    कॅन्टीनमधील समोशातून मुलांना उलट्या-चक्कर; दोन विद्यार्थी रुग्णालयात दाखल

    November 18, 2025

    मुख्यमंत्र्यांच्या मंत्रीमंडळ तापले : शिवसेनेचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार

    November 18, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.