जळगाव प्रतिनिधी । शहरातील शिवाजीनगर रेल्वेउड्डाण पुलाचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करून ठेकेदारावर कारवाई करावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी नगर रेल्वेउड्डाण पुलाचे बांधकाम आला गेल्या तीन वर्षापासून सुरू आहे. या कामास फक्त १८ महिने कालावधी देण्यात आला होता, परंतु सव्वा तीन वर्षात ही सदर पूल वाहतुकीसाठी मोकळा झालेला नाही. आज काल तर कोणी येऊन मक्तेदाराला मुदतवाढ देऊन मोकळा होत आहे. सदर मक्तेदार राजकीय दबाव वापरून काम पूर्ण करण्यास वेळ काढून धोरण अवलंबून वेगवेगळी कारणे देत आहे. वास्तविक या ठेकेदाराला कोणत्याही कामाचा पूर्वानुभव नाही, आणि शर्ती व अटीचा भंग…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
भडगाव प्रतिनिधी । बसस्थानक परिसरात एटीएम कार्डच्या मध्यमातून शेतकऱ्याकडून पीनकोड विचारून ४० हजार रूपये लांबविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाख्ल करण्यात आला आहे. सविस्तर माहिती अशी की, भगवान गिरधर पाटील (वय-६०) रा. शिरसमणी ता. पारोळा जि.जळगाव हे शेतकरी असून शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. ५ एप्रिल रोजी कामाच्या निमित्ताने ते भडगाव शहरात आले होते. दरम्यान दुपारी २ वाजेच्या सुमारास भडगाव बसस्थानकासमोरील ॲक्सीस बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी अज्ञात तीन जन एटीएम जवळ आले. त्यांनी शेतकऱ्याचे कार्ड गोडबोलून अदलाबदली करून घेतले. त्यावेळी त्यांनी कार्डचा पासवर्ड विचारून घेतला. अज्ञात भामट्यांनी एटीएम कार्ड व पासवर्ड वापरून…
जळगाव प्रतिनिधी । शासकीय रूग्णालयात उपचार सुरू असतांना मजूराचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान हा मृत्यू डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. यावेळी शासकीय रूग्णालयात नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती. याबाबत माहिती अशी की, अवचित काळू तायडे (वय-४६) रा. समता नगर, जळगाव यांची सोमवारी ४ एप्रिल रोजी दुपारी अचानक प्रकृती खालवली. डाव्या बाजूने पॅरालिसीस सारखा त्रास होत होता. नातेवाईकांना त्यांना तातडने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, रात्री ११ वाजता रूग्णालयात उपचार सुरू असतांना अवचित तायडे यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे काळे याचा मृत्यू झाला आहे असा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला असुन संबंधितांवर…
जळगाव प्रतिनिधी । शहरातील धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचलित शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालय जळगाव व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विद्यार्थी विकास विभाग अंतर्गत विशेष उपक्रम मुले व मुली व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेचे उद्घाटन ४ एप्रिल २०२२ रोजी उद्घाटक सामाजित कार्यकर्ता भालचंद्र शंकर चौधरी यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी व व्याख्याते डॉ. स्नेहल फेगडे , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदे , विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. प्रियंका ब-हाटे , डॉ. राजकुमार लोखंडे हे उपस्थित होते. ४ एप्रिल ते ६ एप्रिल दरम्यान चालणाऱ्या या व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेत १० व्याख्यानांचे आयोजन करण्यात आलेले आहे. जातीय…
जळगाव प्रतिनिधी । विद्यापीठाने आयोजित केलेले युवारंग युवक महोत्सव उन्हाळ्यामुळे तुर्तास रद्द करण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष भुषण भदाने व माजी जिल्हाध्यक्ष ॲड. कुणाल पवार यानी कुलगुरू यांच्याकडे केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागातर्फे यंदा आंतर महाविद्यालयीन “युवारंग युवक महोत्सव” हा दि . १९ एप्रिल ते २४ एप्रिल २०२२ ह्या तारखांना होणार आहे . याचा कालावधीत भर उन्हाळ्या मध्ये सुमारे ४४ ते ४५ अंश सेल्सियस तापमान ज्यामुळे सध्या महाराष्ट्रात जळगाव जिल्हा रोज चर्चेत आहे त्या तापमानामध्ये ऐन परिक्षांच्या तोंडावर विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा व शैक्षणिक हिताचा विचार न करता विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागातर्फे युवारंग…
जळगाव प्रविण पाटील । तालुक्यातील वावडदा येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या पंचवार्षीक निवडणूकीत रविंद्र कापडणे यांचे नम्रता पॅनलचे १३ उमेदवार विजयी झाले असून विकासोवर आपले वर्चस्व सिध्द केले आहे. या संदर्भात असे की, जळगाव तालुक्यातील वावडदा विविध कार्यकारी सेवा सोसायटी पंचवार्षिक निवडणूक ३ एप्रिल रोजी पार पडली. यात रविंद्र कापडणे यांचे नम्रता पॅनल व राजेश वाडेकर यांचे शेतकरी राजा विकास पॅनल हे समोरा समोर होते. या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत नम्रता पॅनलने आपले वर्चस्व प्रस्थापित केले. यात नम्रता पॅनलचे १३उमेवार विजयी झाले. विजयी उमेदवार व कंसात मिळालेली मते जनरल मतदार संघ भोळे अनिल बारसु (२४८), राठोड मिश्रीलाल प्रेमा(२४७), पाटील मोतिलाल माधव (२४६), पाटील…
जळगाव प्रतिनिधी । गेल्या आठवड्यात खूनाची घटना ताजी असतांना आज सांयकाळी पुन्हा एका तरूणाचा चॉपरने खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. खूनाचे कारण अद्याप समजू शकले नाही. महंमद मुसेफ शेख इसाक (वय-४०) रा. शिवाजी नगर जळगाव असे मयत तरूणाचे नाव आहे. सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शिवाजी नगर हुडको परिसरात राहणारा तरूण महंमद मुसेफ शेख इसाक या तरूणावार चॉपरने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खून करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. अज्ञात हल्लेखोर हे खून करून पसार झाले आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी धाव घेतली असून पंचनामा करण्याचे काम सुरू…
लाईव्ह महाराष्ट्र विशेष : खान्देशवासियांनो जळगाव, धुळे आणि नंदुरबार या आपल्या खान्देशात उन्हाची तीव्रता राज्यात सर्वाधिक जाणवते. त्यातल्या त्यात आपल्या जळगाव जिल्ह्याचा पारा हा मे महिन्यात तर चाळीशी ओलांडून ४७ ते ४८ अंशांवर तापमान जाऊन पोहचते . आतातर एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच तापमानाने ४४ अंशांची पातळी गाठली असल्याने उन्हाच्या तीव्र झळा सकाळपासून ते सायंकाळी ७ वाजे दरम्यान जाणवत आहे. बाहेर पडणेही कामानिमित्त असह्य झाले आहे. या तीव्र उन्हापासून आपला आणि आपले कुटुंबीयांचा बचाव करणे अधिक महत्वाचे आहे. तप्त दुपार आणि गरम हवा शरीरावरही परिणाम करतेच. त्यामुळे उन्हाळा आल्यानंतर तुमच्या जेवणाच्या दिनचर्येतही बदल गरजेचा आहे.उन्हाळ्यात अधिक तेलकट खाणे नुकसानदायक ठरू शकते. त्यामुळे…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज;- शहरासह जिल्ह्यात उष्णतेची लाट नेहमीप्रमाणे आली असून पारा ४२ ते ४४ अंशावर गेला असल्याने सकाळी १० वाजल्यापासूनच चटके बसण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच आता जळगाव जिल्ह्यात उष्माघाताचा दुसरा बळी गेला असून मेहुणबारे येथील ४८ वर्षीय शेतमजुराचा उष्मघाताने मृत्यू झाला आहे. सुंदरलाल सुकदेव गढरी असे मयताचे नाव आहे . मात्र त्यांचा मृत्यू हा उष्माघाताने झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथील सुंदरलाल गढरी हा शेतमजूर बकऱ्या चारण्यासाठी मेहूणबारे परिसरात गेले होते. सकाळी नेहमीप्रमाणे बकऱ्या चारण्यासाठी गेला असता दुपारी दोन वाजेच्या सुमारास त्यांना अचानक चक्कर आल्याने ते घरी परतले. . त्यांना डॉक्टरकडे नेले असतानाच त्यांचा मृत्यू झाला.…
पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील आडगाव शिवारातील शेतातील झोपडीला अचानक लागलेल्या आगीत ३ लाख रुपये किमतीचा कापूस जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. पारोळा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रविण गुलाबराव पाटील (वय-३०) रा. आडगाव ता.पारोळा यांचे आडगाव शिवारातील शेत गट क्रमांक ४७ मध्ये शेत आहे. शेतात त्यांनी झोपडी बनवली असून त्या झोपडीमध्ये त्यांनी ३० क्विंटल कापूस भरून ठेवला होता. दरम्यान १ एप्रिल रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास अचानक झोपडीला आग लागल्याने आगीत जवळपास २५ क्विंटल कापूस जळून खाक झाला आहे. यामध्ये जवळपास ३ लाख रुपये किमतीचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. याबाबत पारोळा…

