जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात पुष्पक एक्सप्रेसच्या एका कोचला आग लागल्याच्या भीतीने प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी रेल्वे रूळावर उड्या घेतल्या मात्र त्याचवेळी समोरून येणार्या बंगळुरू एक्सप्रेसने अनेक प्रवाशांना चिरडले. ही घटना पाचोराजवळील परधाडे रेल्वे स्थानकाजवळ बुधवारी दुपारच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत नेमक्या किती प्रवाशांचा मृत्यू झाला वा जखमी झाले याबाबतची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही मात्र या घटनेने रेल्वे प्रशासनासह जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली असून स्थानिक पोलीस प्रशासनासह जिल्हाधिकारी तसेच रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.मिळालेल्या माहितीनुसार पुष्पक एक्सप्रेसच्या एका कोचमधून धूर येत असल्याने कोच आग लागल्याचे वाटून काही प्रवाशांनी उड्या…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
चाळीसगाव प्रतिनिधी । चाळीसगाव शहरातील पोद्दार इंटरनॅशनल स्कूल जवळ मंगळवारी ७ जानेवारी रोजी रात्री अज्ञात व्यक्तींनी हवेत गोळीबार करत घरावर दगडफेक करण्यात आली. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात दुचाकीवरील अज्ञात ६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी दिली आहे.पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, सारंग अशोक बेलदार वय ४९ रा. पोतदार हायस्कूल चाळीसगाव याच्या घरासमोर मंगळवारी ७ जानेवारी रोजी ११.४५वाजेच्या सुमारास तीन दुचाकींवर सहा जण आले. सर्वांनी तोंडाला रूमाल बांधलेला होता. बुलेट मोटारसायकलवर मागे बसलेल्या एकान हवेत गोळीबार केला. तर सारंग बेलदार याच्या घराच्या पार्चमध्ये उभ्या असलेल्या दुचाकीवर दगड टाकून नुकसान…
जळगाव प्रतिनिधी । विद्यापीठात मेस चालविणारे पंकज शालीग्राम शर्मा (वय ५५, रा. प्रेमनगर) यांना मागून भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रॅक्टरने धडक दिली. या अपघातात शर्मा यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास खोटेनगर ते मानराजपार्कदरम्यान, उड्डाणपुलावर घडली. यावेळी मिटींग आटोपून जळगावात येत असलेल्या जिल्हा परिषदेचे सीईओ श्री.अंकीत यांना अपघात झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ रुग्णवाहिकेतून जखमीला जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. परंतू याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत मयत घोषीत केले.जळगाव तालुक्यातील बांभोरी येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात मेस चालविणारे पंकज शर्मा हे नेहमीप्रमाणे बुधवारी रात्री काम आटोपून विना क्रमांकाच्या बुलेटने घराकडे निघाले. खोटे नगर उड्डाणपुलावरुन…
मुक्ताईनगर प्रतिनिधी । मुक्ताईनगर पोलिसांनी गुरांची निर्दयतेने वाहतूक करणाऱ्या प्रकरणात महत्त्वपूर्ण कारवाई करून एक संशयित आरोपीस अटक केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. प्राण्यांवरील अत्याचारांबाबत जनतेत जागरूकता वाढवण्याची गरज या घटनेने पुन्हा अधोरेखित केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, वाहन क्रमांक (एमएच ४८ एवाय ०३५६) या चारचाकी वाहनामध्ये बैलांना निर्दयतेने वाहतूक केली जात होती. गुरांना वाहनात कोंबून ठेवून त्यांची सुरक्षितता धोक्यात टाकण्यात आली होती. मुक्ताईनगर ते मलकापूर राष्ट्रीय महामार्गावर खडसे फार्म हाऊस जवळ वाहनाची तपासणी करण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला होता. गोपनीय माहितीवर तातडीने कारवाई करत, पोलिसांनी वाहनाला थांबवले आणि वाहनातून निर्दयतेने कोंबलेल्या बैलांची सुटका केली. या घटनेतील मुख्य आरोपी…
मुक्ताईनगर प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे. कालच जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील तलाठ्याला ३ हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली होती. आज, मुक्ताईनगर तालुक्यातील काकोडा येथे ५ हजार रुपयांची लाच घेताना तलाठी आणि त्याच्या दोन खाजगी साथीदारांना रंगेहात पकडण्यात आले आहे.लाचेची मागणी:तक्रारदार हे जळगाव शहरातील रहिवासी असून, त्यांचे मूळ गाव कुऱ्हा (ता. मुक्ताईनगर) आहे. 1997 मध्ये त्यांच्या आजोबांच्या निधनानंतर त्यांच्या वडील, काका, आत्या आणि इतर नातेवाईकांची नावे 7/12 उताऱ्यावर नोंदवण्यात आलेली नव्हती. या कामासाठी तलाठी प्रशांत प्रल्हाद ढमाळे (वय-42, रा. चिखली, ता. मलकापूर, जि. बुलढाणा) यांनी शासकीय शुल्क भरण्याऐवजी…
लाखो रूपयांचे मोठे नुकसान; आगीचे कारण अस्पष्टजळगाव प्रतिनिधी । । एमआयडीसीतील मानराज सुझुकी शोरूममधील सोलार ईलेक्ट्रीक पॅनलला बुधवारी ८ जानेवारी रोजी सकाळी अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. ही आग लागल्याची माहिती मिळताचा जळगाव महानगर पालिकेचे अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान ही आग कश्यामुळे लागली याची माहिती समोर आलेली नाही. या आगीबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद घेण्याचे काम सुरू होते.जळगाव जिल्ह्यात आज राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन याचा विद्यापीठात दौरा आहे. यानिमित्ताने जळगाव विमानतळ येथे त्यांचे आगमन झाले. त्याचा ताफा या मार्गावरून असतांना महामार्गावरील मानराज सुझुकी कारच्या शोरूमच्या सोलर इलेक्ट्रिक पॅनलमध्ये बिघाड झाल्यामुळे आग लागली…
बांगलादेशी तरुणीला पोलिसांनी घेतले ताब्यात६ जानेवारी २०२५: एमआयडीसी पोलीस स्टेशन, जळगावचे पोलिस निरीक्षक संदिप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी एक मोठी कारवाई केली. पोलीस स्टेशनला गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की, जळगाव शहरातील सागर हॉटेल व लॉजमध्ये वेशा व्यवसाय चालवला जात आहे. या माहितीच्या आधारे, पोलीस स्टेशनला तातडीने कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले.त्यानंतर, पोलीस निरीक्षक संदिप पाटील यांनी पोलिसांच्या एक पथकाची रचना केली आणि त्यात पोसई राहुल तायडे, सफौ दत्तात्रय बडगुजर, पोहेकॉ २७४५ राजेंद्र कांडेकर, मपोहेका सुनंदा तेली, पोकों इम्रान बेग, पोकों तुषार गिरासे, पोकों राहुल घेटे आणि पोकॉ छगन तायडे यांच्यासह दोन पंच आणि एक डमी ग्राहक देखील पथकात सहभागी…
बालदिनानिमित्त आ. भोळेंनी भरवली मिठाई जळगाव (प्रतिनिधी) : आ. राजूमामा भोळे यांना बालदिनी दि. १४ नोव्हेंबर रोजी एका चिमुरडीने “विजयी भव” “आमचे मामा, राजूमामा” असे आशय असलेले व विजयासाठी सदिच्छा देणारे ग्रीटिंग कार्ड भेट दिले. प्रसंगी चिमुरडीचे कौतुक करून आ. राजूमामा भोळे यांनी तिला धन्यवाद दिले. पिंप्राळा भागातील निवृत्ती नगरातील रहिवासी आरोही निकम या ७ वर्षीय चिमुरडीने “बालदिनी” आ. राजूमामा भोळे घरी भेटीला आले असता, त्यांना शुभेच्छांपर ग्रिटींग कार्ड भेट दिले. ग्रीटिंग कार्डच्या पहिल्या पानावर “विजयी भव” व उघडल्यावर “आमचे मामा, राजूमामा” असे लिहून आरोहीने आ. भोळे यांना सदिच्छा दिल्या. प्रसंगी आरोही हिला मिठाई भरवून आ. राजूमामा भोळे यांनी बालदिनानिमित्त…
लाईव्ह महाराष्ट्र न्युज : जामनेर विधानसभा मतदारसंघात राज्याचे संकट मोचक चांगलेच अडचणीत सापडले असून केवळ 11000 फूलीच्या भरोसे तक दुरून उभे आहेत. मात्र मतदार हा संकट मोचकाचा कष्टाचा पैसा घेऊन तुतारी वाजवणार असल्याचे बोलले जात आहे. मतदार संघात अनेक लोक संकट मोचकाचे स्टेटस ठेवतात आणि अंतर्गत सुर मात्र लावत आहे तुतारी वाला माणूस पाहिजे. असे चित्र या मतदारसंघात निर्माण झाले आहेत. स्टेटस लावणं म्हणजे कोणीही बगलबच्चे संकट मोचकाजवळ आपल्याविषयी कान भरणार नाहीत व आपल्याला त्रास होणार नाही म्हणून स्टेटस लावून अंतर्गत फील्डिंग लावली जात आहे. सामाजिक गणित या मतदारसंघात बिघडलेले आहे अनेक लोक लांब चालले गेलेले आहेत. मोठ्या प्रमाणात फेरबदल…
लाईव्ह महाराष्ट्र न्युज : राज्याचे संकट मोचक यांचे परवा मध्यरात्री मराठा समाजाच्या एका युवकाने पाय धरून भाजपाला कामाला लागण्याची विनंती केली. परंतु गेल्या दहा वर्षात एरंडोल तालुक्यातील भाजपाच्या नेत्यांना तर संपवलं त्याचबरोबर काँग्रेस राष्ट्रवादी व शिवसेनेचे नेतेही संपवले मग यांच्यावर विश्वास कसा ठेवणार. परदेशींच्या विनवण्या सुरू आहे परंतु नगरपालिका निवडणुकीत परदेशी ना बाजूला सांगायचं काम या गद्दार सेनेकडून होईल म्हणून काडकरांची सुपारी आता चालेल का हा प्रश्न एरंडोलकरांना पडलेला आहे. भाजपाचे युवक मात्र वेटिंगवर आहे नको रे बाबा तो नाहीतर सहकार मध्ये देखील तालुक्याला नेतृत्व करू देत नाही त्यामुळे ही वेळ आता त्याला हाकलण्यात आले आहे. अशी जाणकारांची मते निर्माण…

