Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

जळगाव : शहरातील नामांकित संशोधक, सायंटिफिक रायटिंग क्षेत्रातील मानद संचालक आणि प्राचार्य प्रा. डॉ. हर्षल लिलाधर तारे यांना नुकतीच दुसरी पीएच.डी. पदवी प्राप्त झाली असून, त्यामुळे शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रात त्यांचे कौतुक होत आहे. छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम विद्यापीठाने ‘इको फ्रेंडली मार्केटिंग : ग्राहकांवर होणारा परिणाम’ या विषयावर सादर केलेल्या संशोधनासाठी त्यांना व्यवस्थापन आणि वाणिज्य या शाखेत पीएच.डी. पदवी बहाल केली आहे.या संशोधनात त्यांना विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. डॉ. आशिष गाडेकर यांचे मार्गदर्शन लाभले. यापूर्वी त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयात पीएच.डी. प्राप्त केली होती. त्यामुळे डॉ. तारे यांची डबल डॉक्टरेटधारक म्हणून नोंद झाली आहे.संशोधन कार्यकाळात त्यांनी…

Read More

धरणगाव : प्रतिनिधीधरणगाव – चोपडा मार्ग हा केवळ दोन तालुक्यांना जोडणारा नव्हे, तर महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील अनेक ग्रामीण आणि शहरी भागांना जोडणारा अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे. शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी आणि दैनंदिन प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांसाठी ही एक जीवनवाहिनी ठरते. मात्र या रस्त्याच्या नूतनीकरणासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करूनही प्रत्यक्षात कामाच्या दर्जात अत्यंत हलगर्जीपणा दिसून येत आहे.कालपासून पिपळे फाटा – साळवा फाटा मार्गावरील रस्त्यावर अनेक गाड्या खोल चिखलात फसल्याची दृश्ये समोर आली असून, नागरिकांना तासन्तास अडकून राहावे लागले. हा प्रकार केवळ गैरसोयीपुरता मर्यादित नसून, भविष्यात जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाहनांचे नियंत्रण सुटणे, रुग्णवाहिकांना अडथळा निर्माण होणे, शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा…

Read More

…जिल्ह्यातील भाजपातील दुसऱ्या गटाने महाजनांची काडी केली लाईव्ह महाराष्ट्र : वादग्रस्त प्रफुल लोढा प्रकरण चांगलेच गिरीश महाजन यांच्या अंगलट आले असून माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथराव खडसे यांनी रोज वेगवेगळ्या आरोप करून मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिमा समाज मनामध्ये डागळण्यात सुरुवात झाली आहे.काल भाजप नेते देवा भाऊ हे  दिल्लीत होते तसेच जिल्ह्यातील दोन खासदार देखील दिल्लीत होत्या या ठिकाणी मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या असून गिरीश महाजन यांच्याविरुद्ध मोठा राजकीय कट रचला गेला असल्याची माहिती पुढे आली आहे. आमदारांनी बचात्मक पवित्रा घेतला तर दुसऱ्या गटाने दिल्लीत मंत्री महाजन यांची काडी करण्यात यशस्वी झाले आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्या राजकीय…

Read More

धरणगाव प्रतिनिधी : सोनवद पिंप्री गटाचे शिवसेनेचे माजी जि प सदस्य गोपाल चौधरी यांचे नाव अचानक पिंप्री गावातील मतदार यादीतून गायब झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. याचा जाब विचारण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रशासनाकडे धाव घेतली आहे. गोपाल चौधरी यांनी निवडणूक अधिकारी यांच्याशी संपर्क करून स्वतःचा प्रकार लक्षात आणून दिला. तहसीलदार यांनी मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल असे आश्वासन दिले परंतु पिंपरी येथील बी एल ओ यांनी हा प्रताप केला असल्यास त्याचे समजते. ऐन निवडणुकीत तोंडावर हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Read More

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात वाढत्या अंमली पदार्थांची तस्करी आणि सेवनावर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. याचाच एक भाग म्हणून, स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) काल रात्री (२० जुलै २०२५) केलेल्या धडक कारवाईत ८ किलो १३० ग्रॅम गांजासह दोन आरोपींना जेरबंद केले आहे. या कारवाईत ₹२,६२,९५० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.वरीष्ठ पोलीसांचे आदेशजळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक (चाळीसगाव भाग) श्रीमती कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (चोपडा उपविभाग) श्री. आण्णासाहेब घोलप यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना अंमली पदार्थ विरोधी कारवाईबाबत वेळोवेळी मार्गदर्शन केले होते.पोलीसांनी मिळाली गोपनिय माहिती२० जुलै…

Read More

लोकप्रतिनिधी प्रशासनाला खिशात ठेवत कामाचा बट्ट्या बोळ लाईव्ह महाराष्ट्र न्युज : जळगाव, चोपडा धरणगाव रस्त्याचे काम सुरू आहे पारदर्शक सरकारने हे काम चांगल्या पद्धतीने व दर्जेदार व्हावे यासाठी कोट्यावधी रुपये मंजूर केले. परंतु टक्केवारीमुळे ठेकेदाराने हे काम निकृष्ट सुरू केले आहे जणू काही चोपडा धरणगाव रस्ता म्हणजे ठेकेदाराचा पैसा कमवण्याचे एटीएम आहे याची प्रचिती जनतेला येत आहे. चोपडा धरणगाव रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वर्दळ आहे जळगाव तसेच धुळे जिल्ह्याला कनेक्ट होणारा हा रस्ता आहे. विशेष म्हणजे काळीशार जमिनीतून या रस्त्याचे काम सुरू आहे. निविदा मध्ये टाकलेल्या नियमावलीनुसार दोन टक्केही काम ठेकेदार करताना दिसत नाही अक्षरशः शासनाच्या कोट्यावधी रुपयाचा निधी पाण्यात जाण्याची…

Read More

जळगाव, क्रांतिकारी ख्वाज्याजी नाईक यांचा पुतळा अनावरण कार्यक्रम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मान्यवरांसह मंत्री महोदय उपस्थित होते. या मतदारसंघात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते असून या कार्यक्रमाचे विशेष लक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथराव खडसे व नुकताच अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेले माजी मंत्री गुलाबराव देवकर यांची उपस्थिती होती. एकनाथराव खडसे यांनी मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो आहे अशी प्रतिक्रिया देत अनेकांच्या भुवया उंचावल्या तर माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे पूर्वा श्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून…

Read More

एरंडोल तालुक्यातील श्री सुकेश्वर येथील घटना जळगाव : प्रतिनिधी प्रवीण पाटील जळगाव जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार वाऱ्यासह विजेच्या कडकडाटाचे वातावरण असताना आता एक धक्कादायक बातमी एरंडोल तालुक्यातून समोर आली आहे. श्री.सुकेश्वर देवस्थान येथे आज दि.१६ मे रोजी सायंकाळच्या सुमारास एका ४० वर्षीय प्रौढांच्या अंगावर वीज पडून दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेची माहिती मयताच्या घरी पोहचताच एकच आक्रोश झाल्याचे बघायला मिळाले.सविस्तर वृत्त असे कि, एरंडोल तालुक्यातील व म्हसावद येथून जवळ असलेल्या श्री.सुकेश्वर देवस्थान येथे आज दि.१६ मे रोजी संध्याकाळी ४:३०ते ५:००च्या सुमारास धरणगाव तालुक्यातील कमतवाडी येथील रहिवासी शरद रामा भिल वय (वर्षे ४०) प्रौढ हे गेल्या दोन…

Read More

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश !जळगाव, प्रतिनिधी दि. ६ मे – जिल्ह्यात आज दुपारनंतर झालेल्या अवकाळी पावसामुळे तसेच गारा पडल्याने काही तालुक्यांमध्ये शेती पिकांचे, घरांचे व जनावरांचे नुकसान झाल्याच्या प्राथमिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर कोणतीही विलंब न करता नुकसानग्रस्त भागांतील पंचनामे तातडीने पूर्ण करावेत, असे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.काही भागांमध्ये रस्त्यांवर झाडे व वीज तारा पडल्याच्या तक्रारी असून, अशा ठिकाणी तातडीने झाडे हटवून रस्ते मोकळे करावेत तसेच वीज तारा दुरुस्त करून खंडित वीजपुरवठा सुरळीत करावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.सध्या पालकमंत्री पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चौंडी (जि. अहिल्यानगर) येथे त्यांच्या ३०० व्या जयंती वर्षानिमित्त…

Read More

अमळनेर प्रतिनिधी । अमळनेर पोलिसांनी तालुक्यातील कामतवाडी गावाच्या परिसरात सोमवारी सायंकाळी मोठी कारवाई करत अवैधरित्या गांजाची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे लाखो रुपये किंमतीचा साडेचार किलो वजनाचा प्रतिबंधित गांजा आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, अमळनेर पोलिसांनी अवैध धंद्यांविरुद्ध कठोर भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना गोपनीय सूत्रांकडून माहिती मिळाली होती की, अमळनेर ते कामतवाडी दरम्यानच्या रस्त्यावर दुचाकीवरून गांजाची वाहतूक होणार आहे. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक निकम यांनी तात्काळ एक विशेष पथक तयार करून कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार, पोलिसांनी कामतवाडी गावाजवळ…

Read More