लाईव्ह महाराष्ट्र न्यूज;एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेविरोधात बंडखोरी केलेल्या आमदारांना सोबत घेऊन भाजप सरकार स्थापन करण्याच्या तयारीला लागलीये. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्षाचं महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर शिंदे यांनी सकाळी १० वाजता दोन ट्विट केले आहेत. या दोन ट्विटमध्ये शिंदे यांनी मंत्रिपदाच्या वाटपाबद्दल सुरू असलेल्या चर्चेवर भाष्य केलं आहे. यावर एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत स्पष्टीकरण दिलं आहे. शिंदे यांनी म्हटलं आहे की, भाजपसोबत कोणती आणि किती मंत्रीपदे याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, लवकरच होईल. तोपर्यंत कृपया मंत्रिपदाच्या याद्या आणि याबाबत पसरलेल्या अफवा यावर विश्वास ठेवू नका, असं शिंदे यांनी म्हटलं आहे. एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे की,…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज:एकनाथ शिंदे यांच्या सोबत अपक्ष आमदार आणि राज्यमंत्री बच्चू कडू हे देखील होते. प्रहार जनशक्तीचे प्रमुख बच्चू कडू यांना रस्ता गैरव्यवहार प्रकरणात क्लीन चीट दिल्याचे आता समोर आले आहे. तिकडे मविआ सरकार कोसळले आणि इकडे बच्चू कडू यांची फाईल बंद झाली, त्यामुळे अनेक चर्चा सध्या राजकारणात रंगत आहेत. प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांना एका गैरव्यवहार प्रकरणी क्लीन चीट देण्यात आली आहे. एकूण १ कोटी ९५ लाख रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार बच्चू कडू यांनी केला होता. हे . बच्चू कडूंना तीन रस्त्यांच्या कामात गैरव्यवहार केल्याच्या प्रकरणातून क्लीनचीट मिळाली आहे. बच्चू कडू यांच्यावर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी फकवणुकीचा गुन्हा देखील…
मुंबई, प्रतिनिधी । महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज अखेर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. जनतेशी त्यांनी सायंकाळी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. राजीनामा देण्यापुर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादीच्या राज्यातील नेत्यांचे आभार मानले. त्याचबरोबर आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत आम्ही शिवसेनेचे केवळ चारच मंत्री उपस्थित होतो, अशा शब्दात खंत व्यक्त केली. याप्रसंगी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या बंडखोर आमदारांवर उद्धव ठाकरे यांनी टीका केली. न्यायालयाचा निकाल आम्हाला मान्य आहे. शेवटी तो न्यायादेवतेचा निकाल आहे, असं अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केल.उद्धव ठाकरे…
जळगाव (प्रतिनिधी) गुलाबराव वाघ माझ्या भावासारखे आहेत. त्यांनी कायमच मला सहकार्य केलेय. सोमवारच्या मेळाव्यातही जाण्याबाबत त्यांनी मला विचारले होते, असा गौप्यस्फोट गुलाबराव पाटील यांनी केला आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालेले शिवसेनेचे फायरब्रँड नेते गुलाबराव पाटील यांनी आज एका दैनिकाशी साधलेल्या संवादात आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी गुलाबराव पाटील याना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी जळगाव आणि धरणगावच्या शिवसेनेच्या मेळाव्यात केलेल्या टीकेबद्दल विचारले असता, गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, सोमवारी शिवसेनेच्या मेळाव्यात जाण्याबाबत गुलाबराव वाघ यांनी मला फोन केला. तसेच मी मेळाव्यात जात आहे, याबाबत त्यांनी सांगितले. गुलाबराव वाघ हे भावासारखे असून, त्यांनी आतापर्यंत मला मदतच…
मुंबई-वृत्तसंस्था । राज्यातील ६२ तालुक्यातील २७१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका जाहीर करण्यात आली असून ४ ऑगस्ट रोजी मतदार होणार असल्याची घोषणा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्तांनी केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणूका जाहीर झाल्याने आजपासून संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. ४ ऑगस्ट रोजी मतदान, ५ ऑगस्ट रोजी मतमोजणी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली. ते म्हणाले की सर्वोच्च न्यायालयाच्या १७ मे रोजीच्या आदेशानुसार पावसामुळे निवडणूक कार्यक्रम बाधित होण्याची शक्यता कमी असलेल्या तालुक्यांत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. त्यामध्ये ६२ तालुक्यांतील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार संबंधित तहसीलदार ५ जुलै २०२२…
जळगाव तालुका पोलीसात गुन्हा दाखल जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील आव्हाणे शिवारातून वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या टॅक्टरवर कारवाई करत असतांना चालक हा ट्रॅक्टर घेवून पसार झाल्याची घटना घडली आहे. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील आव्हाने शिवारात असलेल्या कचरा फॅक्टरी रोडवरून मंगळवार मंगळवारी २८ जून रोजी सकाळी ११ वाजता ट्रॅक्टर क्रमांक (एमएच ३३, एफ ३५३९) मधून बेकायदेशीर वाळूची वाहतूक करत असताना गस्तीवर असलेले तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांना दिसून आले. दरम्यान, ट्रॅक्टर चालकाजवळ जावून वाळू वाहतूकीचा परवाना असल्याची माहिती पोलीसांनी विचारले असता वाळू वाहतूकीचा कोणताही परवाना नसल्याचे दिसून आले आहे. दरम्यान…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी । शहरातील शिव कॉलनीजवळील राष्ट्रीय महामार्गाजवळ गुवाहाटीला गेलेले आमदार गुलाबराव पाटील यांच्या समर्थनार्थ शिवसैनिकांनी पाठींबा देत जोरदार घोषणाबाजी केली. तर खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला आहे. शिवसैनिक सुनील ज्ञानेश्वर पाटील यांनी सांगितले की, आमदार गुलाबराव पाटील यांनी गेल्या ३ वर्षांपासून शिवसेनेसाठी भरपूर काम केले तसेच ३० ते ३५ केसेस अंगावर घेतल्या आणि संपूर्ण जिल्हा नव्हेच तर उत्तर महाराष्ट्रामध्ये शिवसेना मजबुतीसाठी अहोरात्र काम केले. तसेच शिवसेनेचे संजय राऊत यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर अतिशय खालच्या पातळीवर टीका केल्याबद्दल सर्व शिवसैनिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे व त्यांनी त्यांचा निषेध याठिकाणी व्यक्त केलेला आहे. याप्रसंगी त्रिमूर्ती कॉलेजचे…
दोन्ही मालवाहू वाहन चक्काचूर झाल्या, तीन जण उड्डाणपुलावरून थेट खाली कोसळलेजळगाव ; फैजपूर येथील बाजारासाठी बोलेरो पीकअप वाहनातून बकर्या घेऊन जाणार्या वाहनाला भरधाव वेगाने रॉंग साईडने येणार्या ट्रकने उडविले. यानंतर हाच ट्रक आणखी एक ट्रकवर धडकून या भिषण अपघातात यात चार जण ठार झाले आहे. बुधवारी पहाटे साडेसात वाजेच्या सुमारास जळगाव तालुक्यातील नशिराबाद ते साकेगाव दरम्यान सिमेंट फॅक्टरीजवळ रेल्वे उड्डाणपुलावर हा भिषण अपघात झाला. जुनेद सलीम खाटीक (वय-१८) रा आझाद चौक,भडगाव , अकील गुलाब खाटीक (वय-४२) रा.फैजपूर हल्ली मुक्काम सुप्रीम कॉलनी जळगाव, व नईम अब्दुल रहीम खाटीक (वय-५५) बिलाल चौक जळगाव, फारुख मजिद खाटीक ( वय 40 रा. भडगाव आझाद…
राज्याच्या राजकारणात नवीन हालचाली सुरू महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. राज्याच्या राजकारणात खळबळ माजली. सध्या एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे ही तणावाची परिस्थीती निर्माण झाली आहे. आज बैठकीत अजित पवार गैरहजर राहिले त्यामुळे अजित पवार यांच्यावर सर्वाचे लक्ष लागले आहे. एकनाथ शिंदे आणि इतर बंडखोर आमदारांच्या सर्वाधिक तक्रारी या अजित पवार यांच्याबाबत पक्षातून आहेत. अजित पवार शिवसेनेच्या आमदारांना निधी देत नसल्याचा आरोप या आमदारांनी केला आहे. या घडत असलेल्या प्रकरणात अडचणी प्रसंगी ते दोन तास सुरक्षेशिवाय गायब होते, असा खळबळजनक दावा महाविकास आघाडीमधल्याच एका वरिष्ठ मंत्र्याने केला आहे. मंत्रिमंडळ बैठकीलाही दांडी अजित पवार मंत्रिमंडळाच्या बैठकीला येत नाहीत, असं फारच कमी…
मुंबई वृत्तसंस्था राज्यातील सत्तासंघर्ष दिवसेंदिवस आणखी गडद होत चालला आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाविकास आघाडी सरकारने बहुमत गमावल्याचे मानले जाते. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तर या सर्व प्रकारात शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना सल्ला दिला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर स नवीन वळण लागले आहे. निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदेंचं नाराजीनाट्य सुरु झालं. आधी आमदारांसह शिंदे 21 तारखेला सुरतला पोहोचले नंतर आसामच्या गुवाहटीला मुक्काम ठोकला. शिवसेनेकडून शिंदेंची समजूत काढण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची विचारधारा थोडीशी वेगळी आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राजीनामा न देता बहुमत चाचणीला…

