Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

धरणगावात बालकवी जयंती उत्साहात साजरी : औदुंबराचे केले रोपण धरणगाव (प्रतिनिधी) : ;- बालकवी म्हणजे धरणगावचे भुषण आहे. त्यांच्या स्मृती जतन करणं हे प्रत्येक धरणगावकरांचं कर्तव्य आहे. बालकवी स्मारकाचे काम रखडलेले असले तरी पुढील काळात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नातून आपण स्वतः त्यास गती देवू असे प्रतिपादन लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश सुरेश चौधरी यांनी केले. स्मारकाचे किरकोळ सुशोभिकरण नपातर्फ तात्काळ करुन देण्याची हमी त्यांनी घेतली. ते साहित्य कला मंच आयोजित बालकवींच्या १३१ व्या जयंती कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कबचौउमविचे सिनेट सदस्य प्रा. डी. आर. पाटील होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक मंचचे अध्यक्ष प्रा. बी.एन.चौधरी यांनी केले. स्मारकासाठी साहित्य कला मंच गेल्या…

Read More

जळगाव (प्रतिनिधी ) ;- धरणगाव तालुक्यातील दोनगावमध्ये गेल्या काही दिवसांपासून सर्रास पणे मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्री सुरू आहे. त्यामुळे गावातील तरुण पिढी दारूच्या आहारी जात असुन गावातील शांतता आणि सुव्यवस्था दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. यामुळे गावातील अनेक महिला भगिनी त्रस्त आहेत. गावात अनेक वर्षांपासून दारू बंदी होती परंतु गेल्या काही दिवसांपासून सर्रास पणे मोठ्या प्रमाणात दारु विक्री सुरू आहे. दारू विक्री ताबडतोब बंद होण्यासाठी शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय पाटील यांनी पाळधी पोलिस स्टेशनचे सहा. पोलिस निरीक्षक यांना आज रोजी निवेदन दिले. दारू विक्री बंद न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. त्यांच्या सोबत निवेदन देण्यासाठी किशोर पाटील , उपसरपंच…

Read More

जळगाव;- भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्ह्यातील 265 गावांचा जल जीवन मिशन योजनेत नव्याने समावेश करुन या योजनांच्या खर्चासाठी लागणाऱ्या 58 कोटी 16 लाख रुपयांच्या निधीस राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आज मंजूरी देण्यात आली. पालकमंत्रीस्तरीय जल जीवन मिशन समितीची बैठक येथील अजिंठा विश्रामगृहात पालकमंत्री ना. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, यावेळी वरीलप्रमाणे मान्यता देण्यात आली. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजनाताई पाटील, आमदार अनिल पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता शिवशंकर निकम, डॉ हर्षल माने यांचेसह जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा…

Read More

जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांचे आवाहन जळगाव ;- जिल्हा पोलिस दलाच्या आस्थापनेवर पोलिस शिपाईपदाच्या १२८ रिक्त पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन सादर केलेल्या अर्जात आवश्यक तो बदल करण्यासाठीच्या कालावधीत २२ ऑगस्ट रोजी रात्री १२ वाजेपर्यंत वाढ करण्यात करण्यात आली आहे. उमेदवारांनी महापोलिस या संकेतस्थळावर पोलिस कॉर्नर बटनला क्लिक करुन पासवर्ड बदलावा, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी केले आहे. पोलिस शिपाई पदाच्या १२८ रिक्त पदांची भरतीसाठी ३ सप्टेंबर रोजी जाहीरात देण्यात आली होती. शासनाने मराठा समाजासाठी निर्माण केलेला एसईबीसी प्रवर्गासाठी काही जागा राखीव ठेवण्यात आलेल्या होत्या. सुप्रीम काेर्टाने मराठा आरक्षण रद्द ठरवल्याने मराठा समाजाच्या उमेदवारांना खुला किंवा…

Read More

जळगाव;- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदारांमध्ये जनजागृती करण्यात येत असून नवीन मतदार नोंदणी करताना एकल (Unique) मोबाईल क्रमांक नोंदविलेल्या मतदारांना ई-मतदान ओळखपत्र (e-EPIC) डाऊनलोड करण्यासाठी सर्व मतदार नोंदणी अधिकारी यांच्यामार्फत शनिवार, 14 ऑगस्ट, 2021 रोजी सकाळी 11 ते दुपारी 12 वाजेपर्यंत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्या मदतीने संबंधित मतदान केंद्रावर शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे. यासाठी पात्र मतदारांची यादी BLO यांना उपलब्ध करुन देण्यात आलेली असून 14 ऑगस्ट, 2021 रोजी शिबीराव्दारे तसेच जानेवारी, 2021 नंतर नोंदणी केलेल्या नविन मतदारांशी व्यक्तीगत संपर्क साधून जिल्ह्यातील 9 हजार 292 मतदार BLO यांचे मदतीने एकाचवेळी e-EPIC डाऊनलोड करणार आहेत. तरी जळगाव जिल्ह्यातील पात्र मतदारांनी…

Read More

जळगाव,;- कठोरा, ता. जळगाव येथील गावठाण विस्ताराबाबत शासन नियमाप्रमाणे आवश्यक ती कार्यवाही एक महिन्याच्या आत पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिलेत. कठोरा, ता. जळगाव येथील गावठाण विस्ताराबाबत आढावा बैठक येथील अजिंठा विश्रामगृहात पालकमंत्री ना. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, यावेळी त्यांनी वरील निर्देश दिलेत. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजनाताई पाटील, आमदार अनिल पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया, जळगावचे प्रांताधिकारी प्रसाद मते, जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, राजेंद्र चव्हाण, माजी उपसभापती मुरलीधर पाटील, सरपंच सौ. सत्वशील पाटील, उपसरपंच सरलाबाई सपकाळे, डॉ. सत्वशील पाटील, रामचंद्र…

Read More

जळगाव;- महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील कलम 7 नुसार, 15 ऑगस्ट, 2021 रोजी ग्रामसभा आयोजित केली जाते. मात्र सद्य:स्थितीत कोविड-19 विषाणूच्या अनुषंगाने आवश्यक त्या उपायोजना राबविण्याकामी शासन व जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी आवश्यक ते निर्बंध लागू करण्यात आलेले आहे. शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग दिनांक 11 ऑगस्ट, 2021 रोजीचे ‘ब्रेक द चेन’ सुधारीत मार्गदर्शक सूचना आदेशान्वये कोविड प्रादुर्भावास प्रतिबंध करणेच्या अनुषंगाने यापूर्वी घालण्यात आलेले निर्बध काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत. ही बाब लक्षात घेता, जळगाव जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या ठिकाणी 15 ऑगस्ट रोजी वैधनिक सभेचे/ग्रामसभेचे आयोजन करण्यात येणार आहे. या ग्रामसभेत नागरिकांची अनावश्यकरित्या गर्दी होण्याची शक्यता आहे. याकरीता अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा…

Read More

जळगाव;- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज राज्य शासनाने जाहीर केलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यात अनलॉकचे नवीन नोटिफिकेशन जाहीर केले आहे. यानुसार अनेक क्षेत्रांमध्ये शिथीलता देण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच १५ ऑगस्टपासून निर्बंध शिथील करण्यात येतील याचे सूतोवाच केले होते. या अनुषंगाने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज अनलॉकचे नवीन नियम जाहीर केले आहेत. यात खालील प्रकारे शिथीलता मिळणार आहे. १) उपहारगृहे / बार – खुल अथवा बंदिस्त उपहारगृहे बैठक क्षमतेच्या ५०% क्षमतेने खालील अटी व शर्ती नुसार सुरु राहतील. अ) ग्राहकांना उपहारगृह / बार मध्ये प्रवेश करतांना, प्रतिक्षा कक्षात अथवा जेवण मिळेपर्यंतच्या कालावधीत चेहर्‍यावर मास्कचा वापर करणे बंधनकारक राहील.…

Read More

जळगाव;- दरवर्षी जागतिक कौशल्य स्पर्धांचे आयोजन केले जाते. त्याकरिता जिल्हास्तर, विभागीयस्तर आणि राज्यस्तरावर परिक्षा होवून निवड झालेल्या उमेदवारांची देशपातळीवरील स्पर्धेसाठी निवड केली जाते. यावर्षी दिनांक 17 व 18 ऑगस्ट, 2021 रोजी जिल्हास्तरावर, दिनांक 23 व 24 ऑगस्ट रोजी विभागीय स्तरावर आणि दिनांक 3 ते 5 सप्टेंबर, 2021 दरम्यान राज्यस्तरावर स्पर्धा घेण्याचे निश्चित झालेले आहे. जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी या स्पर्धेत सहभागी होण्याकरीता 15 ऑगस्ट, 2021 पर्यंत “महास्वयंम” पोर्टलवरील लिंकव्दारे नोंदणी करणे आवश्यक आहे. सर्व नोंदणी केलेल्या उमेदवारांच्या स्पर्धा घोषीत कार्यक्रमानुसार होतील. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांनी “महास्वयंम” पोर्टलवरील लिंकव्दारे स्पर्धेत आपला सहभाग नोंदवावा. अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या दुरध्वनी क्रमांक 0257-2959790 वर संपर्क…

Read More

जळगाव;- भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम रविवार, 15 ऑगस्ट, 2021 रोजी सकाळी 9.05 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. या कार्यक्रमास जळगाव शहरातील स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, शहिद जवानांच्या पत्नी व वीरमाता, वीरपिता तसेच कोरोनायोध्दा डॉक्टर, सफाई कामगार, आरोग्य सेवक यांनी उपस्थित राहावे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता सर्वांनी मास्क परिधान करणे व सामाजिक अंतर राखणे आवश्यक आहे.यादिवशी सकाळी 8.30 ते 9.35 वाजता या वेळेत ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय अथवा निमशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये. जर एखाद्या कार्यालयाला अथवा…

Read More