Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

मुंबई ;- एकनाथ खडसे यांना परत एकदा ईडीने (ED) धक्का दिला आहे. ईडीने एकनाथ खडसे यांची मालमत्ता जप्त केली आहे.एकनाथ खडसे यांची 5 कोटी 73 लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. यामध्ये लोणावळा आणि जळगाव इथल्या मालमत्तेचा समावेश आहे. भोसरी एमआयडीसी जमीन कथित गैरव्यवहार प्रकरणात माजी महसूलमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीने नोटीस पाठवली होती. गेल्या महिन्यात खडसेंची तब्बल 9 तास चौकशी करण्यात आली होती. आणि आता ईडीने खडसे यांची 5 कोटी 73 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.

Read More

जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील रामेश्वर कॉलनी मधील तुळजाई नगरातील भाजीपाला व्यवसाय करणाऱ्या महिलेची आज पहाटे निर्घृण हत्या करण्यात आली आहे. याबाबत एमआयडीसी पोलिस पुढील तपास करीत आहेत. जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी मधील तुळजाई नगर मधील रमेश पुंडलिक वंजारी यांच्या घरात भाड्याने राहाणाऱ्या भाजीपाला व्यवसाय करणाऱ्या श्रीमती वंदना गोरख पाटील (वय42) हीचा आज पहाटे एका अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणारा वरुन डोक्यावर तिक्ष्ण हत्याराने हल्ला करुन निघृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस स्टेशनेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी धाव घेतली आहे. घटना घडली त्या घरात महिलेचा चेहरा छिन्नविच्छीन्न अवस्थेत…

Read More

जळगाव;- जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज २ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे ४ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज सुदैवाने एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. जळगाव शहर – ०१, जळगाव ग्रामीण-००, भुसावळ-००, अमळनेर-००, चोपडा-००, पाचोरा-००, भडगाव-००, धरणगाव-००, यावल-००, एरंडोल-००, जामनेर-०१, रावेर-००, पारोळा-००, चाळीसगाव-००, मुक्ताईनगर-००, बोदवड-००, इतर जिल्ह्यातील-०० असे एकुण २ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या १ लाख ४२ हजार ६९२ पर्यंत पोहचली असून १ लाख ४० हजार ०९४ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. त्यानुसार आतापर्यंत २५७५ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर…

Read More

नगराध्यक्षांच्या दालनात तासभर ठिय्या मांडून बांगड्या फोडून निषेध धरणगाव ;- येथील माजी नगरसेविका नर्मदाबाई एकनाथ माळी यांच्या नेतृत्वाखाली येथील प्रभाग क्र.५, लोहार गल्ली परिसरातील संतापलेल्या महिलांनी पाणी प्रश्नी नगरपालिकेवर मोर्चाकाडून नगराध्यक्षांच्या दालनात तासभर ठिय्या मांडून आणि बांगड्या फोडून निषेध करून आपला संताप व्यक्त केला . याबाबत सविस्तर माहिती अशी की, संतप्त झालेल्या महिला भगिनी लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांच्या दालनात तब्बल एक तास ठिय्या मांडून होते. जोवर नगराध्यक्ष येत नाही आणि आमच्या समस्या जाणून घेत नाही तोपर्यंत आम्ही दालनातून निघणार नाही असा आक्रमक पवित्रा महिलांनी यावेळी घेतला नगराध्यक्षांच्या दालनात आलेल्या मोर्चेकरांचे प्रभाग क्र. १० चे नगरसेवक अजय जंगलू चव्हाण यांनी…

Read More

जळगाव प्रतिनिधी;- तालुक्यातील शिरसोली गावात तलवार घेऊन दहशत माजविणार्‍या एकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून अटक केली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साहिल रज्जाक पिंजारी वय १९ रा. चिंचपुरा चौक शिरसोली असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून ४ हजार रुपये किमतीची तलवार जप्त करण्यात आली. हनुमान मंदिराजवळ साहिल पिंजारी हा बुधवारी दुपारी हातात तलवार घेऊन गावात दहशत माजवित असल्याची माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस नाईक प्रमोद लाडवंजारी यांच्यासह पथकाने शिरसोलीतुन साहिल पिंजारी यास अटक केली. त्याच्याकडून ४ हजार रुपये किंमतीची २९ इंच लांब व २३ इंच रुंदीची तलवार जप्त केली…

Read More

जळगाव प्रतिनिधी;- घरासमोर उभ्या असलेल्या महिलेच्या गळ्यातून धूमस्टाईलने दुचाकीवरून आलेल्या दोन जणांनी २० ग्राम किमतीची मंगलपोत लांबवितयाची घटना बुधवारी सायंकाळी घडली असून याप्रकरणी गुन्हाच दाखल करण्यात आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार प्रेमनगरात असलेल्या सप्तशृंगी माता मंदिराच्या मागे बेंडाळे नगरात प्रतिमा विवेक काटदरे वय ५२ या वास्तव्यास आहेत. बुधवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास दूध घेण्यासाठी दुचाकीने गणेश कॉलनीत गेल्या. दूध घेऊन पुन्हा घरी परतल्या घराच्या गेटसमोर उभे असताना विना नंबरच्या दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी मागे बसलेल्याने काटदरे यांच्या गळ्यातील पन्नास हजार रुपये किमतीची वीस ग्रॅमची मंगळपोत तोडून नेली. काही कळण्याच्या आत संशयित घटनास्थळावरून पसार झाले होते. याप्रकरणी प्रतिमा काटदरे यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात…

Read More

नवी दिल्ली – देशातील कोरोना लसीकरण मोहिमेला आता आणखी वेग येणार आहे. कारण, देशातील १२ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना आता लवकरच ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोना लस देण्यात येणार आहे. या वयोगटातील देशात मुलांची संख्या १२ कोटींपर्यंत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सर्वप्रथम गंभीर आजाराशी झुंज देणाऱ्या मुलांना ही लस दिली जाईल. डीसीजीआयकडून यासाठीची परवानगी मिळली असून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून मुलांना झायडस कॅडिला ही लस देण्यात येणार आहे. याबाबत माहिती देताना केंद्र सरकारच्या कोविड१९ वर्किंग ग्रुप कमिटीचे प्रमुख डॉ. एनके अरोरा यांनी सांगितले कि, देशात १२ ते १७ वयोगटातील सुमारे १२ कोटी मुले आहेत, त्यापैकी १ टक्क्यांपेक्षा कमी मुलांना आरोग्य समस्या असू…

Read More

देशातील कोरोनाच्या नवीन प्रकरणात पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. गेल्या 24 तासात म्हणजे बुधवारी 46 हजार 280 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. दरम्यान, 34 हजार 242 लोक उपचार घेत बरे झाले तर यामध्ये 605 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे 56 दिवसानंतर कोरोनाच्या नवीन प्रकरणात वाढ झाली आहे. यापूर्वी 1 जुलै रोजी 46 हजार 781 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. तर दुसरीकडे, केरळ राज्यात कोरोनाची चिंताजनक परिस्थिती आहे. राज्यात बुधवारी 31 हजार 445 कोरोना पॉझिटिव्ह आढळले. दरम्यान, 20 हजार 271 लोक उपचार घेत बरे झाले तर यामध्ये 215 लोकांचा मृत्यू आहे. राज्यात पॉझिटिव्हिटी रेट 19.03 टक्के आहे. देशात कोरोना…

Read More

धरणगाव ;- जिल्ह्यात २६ पोलीस निरीक्षक आणि सहाय्य्क निरीक्षकांच्या बदल्या झाल्या असून आज धरणगाव पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांनी यांच्याकडून स्वीकारला. यावेळी नूतन पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला . यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांनाही निरोप दिला.

Read More

जळगाव ;- भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या गौरवशाली अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने देशभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो, पुणे व क्षेत्रिय लोक संपर्क ब्युरो, जळगाव यांच्यावतीने जळगाव जिल्ह्यात 23 ते 29 ऑगस्ट दरम्यान जागर यात्रा फिरणार आहे. जळगाव जिल्ह्यात राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी देशाच्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण करण्याचे आवाहन पालकमंत्री श्री. पाटील यांनी केले. येणारे वर्षभर अमृत महोत्सवाचे निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन शासनस्तरावर करण्यात येणार आहे. कोविडचे संकट अजुन संपलेले नाही. त्यामुळे कोविडच्या सर्व नियमांचे…

Read More