Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

जामनेर प्रतिनिधी : शहरातील बेस्ट किराणा या दुकानातून चोरट्यांनी सात लाख रूपया किमतीचे गोडेतेलाचे डबे चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत वृत्त असे की,जामनेर  येथील पाचोरा रोडवर अभय चंपालाल बोहरा यांचे बेस्ट किराणा हे होलसेल व रिटेल किराणा दुकान आहे. येथून चोरट्यांनी गोडे तेलाच्या डब्यांची चोरी केली. या प्रकाराबाबत मुकेश बोहरा यांनी पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांना माहिती दिली. शिंदे यांनी सहकार्‍यांसह तत्काळ घटनास्थळ गाठून श्वानपथकाला पाचारण केले. मात्र, पाऊस व वाहनाचा वापर झाल्याने श्वान पथकाचाही उपयोग झाला नाही. याप्रकरणी अभय बोहरा यांनी जामनेर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Read More

श्री सत्यसाई सेवा समिती व डॉ सुनील राजपूत यांचा पूरग्रस्त बांधवांसाठीचा मदतीचा ओघ आजही सुरूच. लाईव्ह महाराष्ट्र : चाळीसगाव तालुक्यातील अनेक गावांचे अतिवृष्टीमुळे खूप प्रचंड नुकसान झालेले आहे.त्यातच तालुक्यातील बाणगावात देखील शेतकऱ्यांचे अतिशय प्रचंड नुकसान झालेले आहे.गावातील घरांमध्ये संपूर्ण पुराचे पाणी आल्यामुळे अन्न व इतर जीवनावश्यक वस्तू सडक्या झालेल्या आहेत.त्यात अनेकांचे गुरे,घरे,संसार उपयोगी साहित्य वाहून गेले तर इतर शेतकऱ्यांचे देखील शेतीचे फार मोठे नुकसान झालेले आहे. अशा बाधित बांधवांना आज मदतीची व सहकार्याची गरज निर्माण झालेली आहे.अशा बाधितांसाठी श्री सत्यसाई आपत्ती व्यवस्थापन,मेडीकेअर प्रोजेक्ट व डॉ सुनील राजपूत मित्र मंडळ यांचा मदतीचा ओघ आजही सुरूच असून आज बाणगावात फिरता दवाखाना ॲम्बुलन्सच्या…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र | शिरसाड ता.यावल येथील ग्रामपंचायतीची ग्रामसभा गावाच्या विकासाच्या व ग्रा.पं.च्या भ्रष्टकारभाराच्या मुद्यावरून चांगलीच गाजली. गावाच्या विकासाच्या व भ्रष्टकारभाराच्या मुद्यावरून गावाच्या ३० वर्षाच्या इतिहासात प्रथमच ग्रामसभा तहकूब करण्याची वेळ आली असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.प्रशासनाच्या निर्देशानुसार दि.३० रोजी सदर शिरसाड ग्रा.पं.ची ग्रामसभा योजिली होती.दरम्यान सभा सुरू झाल्या पासून ग्रामपंचायतीचे माजी सरपंच प्रविण (गोटू) सोनवणे तसेच माजी उपसरपंच धनंजय एकनाथ पाटील, सामाजिक कार्यकर्ते नानाभाऊ सोनवणे व ग्रामपंचायत सदस्य तेजस धनंजय पाटील यांनी सत्ताधारी गटाला धारेवर धरून १४ व्या वित्तआयोगाचे २५ लाख रुपये खर्च करून खोटे बिले टाकल्यामुळे गावाचा पाहिजे त्या खर्चाच्या तुलनेत विकास झाला नाही या मुद्यावरून विरोध प्रदर्शित…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र दि. १ | जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून पुराच्या तडाख्याने अनेक शेतकऱ्यांची पशु संपत्ती मृत्युमुखी पडली आहे. तसेच शेतीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेकांची शेती पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे. काही ठिकाणी जीवितहानीही झाली असून या पूरग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित भरपाई रक्कम मिळण्यासंदर्भात अखिल भारतीय छावा संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, पुरामुळे नुकसान ग्रस्त गावातील शेतकऱ्यांच्या आर्थिक तसेच जीवित नुकसानीचा त्वरित पंचनामा करून शेतकऱ्यांना दर एकरी दोन ते तीन लाख रुपये नुकसानभरपाईची मागणी करण्यात आली आहे. पुरात मृत्युमुखी पडलेल्या गाईला ७० हजार, म्हशींसाठी एक…

Read More

जळगांव प्रतिनिधी: शहरातील पांडे चौकात रंगकाम करतांना ४० वर्षीय तरूणाला विजेचा शॉक लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडलीआहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेली माहिती अशी की, बाबुलाल बनीमियॉ पटेल (वय-४०) रा. तांबापूरा हे पेंटरचे काम करतात. घरामध्ये आईवडील तीन भाऊ, पत्नीसह राहतात. पेंटर काम करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. नेहमीप्रमाणे बुधवारी १ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता सहकारी सिकंदर तडवी यांच्यासोबत पांडे चौकातील सुरेंद्र नथमल लुंकड यांच्या पत्र्याच्या शेडला रंगकाम करण्याचे काम करत होते. दुपारी साडे चार वाजेच्या सुमारास रंगकाम करून पत्र्याच्या शेडवरून सीडीने खाली उतरत असतांना त्यांचा हाताला इलेक्ट्रीक वायरला धक्का लागल्याने त्यांना विजेचा…

Read More

जळगाव प्रतिनिधी: शहरातील अतिक्रमण असो हॉकर्सबाबत मुख्य लेखा परीक्षक तथा उपायुक्त संतोष वाहुळे  यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे सिंघम  म्हणूम  ओळख निर्माण झाली होती त्याची मुबई येथे उपसंचालक पदी बदली झाली आहे.महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा उपसंचालक संवर्गातील राज्यातील ६ अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यात जळगाव महानगरपालिकेचे मुख्य लेखा परीक्षक संतोष वाहुळे यांचाही समावेश आहे. यात जळगांव शहर महानगरपालिकेचे मुख्य लेखा परीक्षक तथा उपायुक्त संतोष वाहुळे यांची मुंबई  येथे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागात उपसंचालक, वित्तीय सल्लागार व उपसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बदलीचे आदेश बुधवारी महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव माधवी गांधी यांनी काढले आहेत. मनपात मुख्य लेखा परीक्षक…

Read More

धरणगाव प्रतिनिधी : तालुक्यातील बोरखेडा येथील शेतकऱ्याने घरातील मंडळी झोपल्या नंतर मध्यरात्री शेतात जाऊन आत्महत्या करण्याची तयारी केल्यानंतर नातेवाईकांना ‘मी जग सोडतोय’ अशी माहिती दिल्यानंतर आत्महत्या केली यासंदर्भात अधिक असे की, धरणगाव तालुक्यातील बोरखेडा येथील कैलास धनसिंग पाटील (५५) वर्षीय शेतकऱ्यारी   आहे. त्यांने मध्यरात्री दीडच्या सुमारास घरातील सर्वजण झोपल्याचं पाहून घराबाहेर पडल्यावर  रात्री पावणे तीनच्या सुमारास त्यांनी आपल्या मुलासह जवळच्या चार नातेवाईकांना फोन करून ‘मी जग सोडून जातोय’ अशी माहिती दिली. झोपेत असणारे हे चारही जण खडबडून जागे झाले. त्यांनी कसलाही विचार न करता, बॅटरी घेऊन काळोखातून मार्ग काढत शेताच्या दिशेनं धाव घेतली. दरम्यान शेताच्या दिशेनं बॅटरी चमकल्याचं दिसताच पाटील…

Read More

धरणगाव प्रतिनिधी(अमोल पाटील):  शासनाने शेतकऱ्यांसाठी मीच नोंदविणार माझा पीक पेरा असे अँप सुरू केले या अँप वर शेतकऱ्यांना आपला स्वतः चा पेरा नेदविता यावा यासाठी धरणगांव तालुक्यातील दोनगांव खु येथील तलाठी व पोलीस पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी  प्रशिक्षण आयोजित केले होते.धरणगांव तालुक्यातील दोनगांव खु येथे माझी शेती माझा सातबारा ,मीच नोंदविणार माझा पीक पेरा या धर्तीवर राज्यांतील प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आपल्या स्वतः चा पीक पेरा मोबाईल द्वारे लावता यावा यासाठी  उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे, प्रांतधिकारी विनयजी गोसावी,तहसिलदार नितीनकुमार देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली धरणगाव तालुक्यातील  प्रत्येक गावात ई पिकपेरा प्रशिक्षण घेण्यात येत आहेदोनगांव खु येथे देखील याच पद्धतीने प्रत्यक्ष शेतात जाऊन दोनगांव खु पोलीस…

Read More

जळगांव प्रतिनिधी: जिल्ह्यातील चाळीसगाव शहरासह गावांना पुराने वेढले होते मात्र पावसाने उसंत घेतल्याने नागरिकांना दिलासा मिळाला असून प्रशासनाने जोमाने कामे व मदत कार्य सुरू केले आहे पूरपश्‍चात परिस्थितीत स्वच्छता, मदत आणि पुनर्वसनाचे मुद्दे महत्वाचे ठरणार असून तितुर,डोगरी नदीला आलेल्या पुरामुळे चाळीसगाव, पाचोरा आणि भडगावमधील एकूण ३८ गावे बाधीत झाली आहे. 661पशूंहानी झालिअसून 675 घराची अंशतः व पूर्ण घराची पडझड झाली आहे 300 दुकानांमध्ये पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे.अतिवृष्टीमुळे काल चाळीसगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये हाहाकार उडाला असतांना रात्रभरापासून पावसाने उसंत घेतल्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.काल दिवसा तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाऊस पडतच असल्याने सर्वच जण धास्तावले होते. तथापि, सायंकाळपासून पावसाने बर्‍याच…

Read More

जळगांव प्रतिनिधी : शहरासह गावांना पुराने वेढले आहे यामुळे नागरिकांना उघड्यावर किंवा मंगल कार्यालयात आश्रय घ्यावा लागला आहे घरात पाण्यात शिरल्या ने खाण्यासाठी काहीच नसल्याने या नागरिकांच्या मदतीसाठी पोलीस प्रशासन धावून आले असून त्यांच्यासाठीअन्नाच्या पाकीट व पाण्याचे बाटल्या चाळीसगावला रवाना केल्या आहेत. चाळीसगाव येथे तीतुर नदीला आलेल्या महापूर मुळे बरेच लोक पुराचे संकटात अडकले असलेने पोलीस अधिक्षक प्रवीण मुंडे ,अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी ,उपविभागीय पोलीस अधिक्षक कुमार चिंता सो यांचे मार्गदर्शनाखाली चाळीसगाव येथे आलेले पुरामुळे निर्माण झालेले संकटात मदत करने साठी सूचना दिल्या होत्या त्या नुसार पोलीस निरिक्षक जिल्हापेठ,पो नी जळगाव शहर ,पो नि MIDC,पो नि रामानंद नगर पोलीस…

Read More