Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

जळगाव ;- एका किराणा दुकानांतून सुमारे अडीच लाखांचा मुद्देमाल लांबविण्याची घटना रामेश्वर कॉलनी परिसरातील तुळजामाता नगर येथे घडली होती . एमआयडीसी पोलिसांनी तातडीने चक्रे फिरवून ती जणांना पहूर येथून अटक केली . विशाल मुरलीधर दांभाडे, योगेश उर्फ पप्ता राजेंद्र चौधरी आणि विकास उर्फ विक्की नारायण खोडके रा. रामेश्वर कॉलनी असे अटक केलेल्या तिनही संशयित आरोपींची नावे आहेत. तुळजामाता नगरात सुरेश तानाजी पाटील हे पत्नी, मुलगा, सून व नातवंडे यांच्यासह राहतात . त्याच्या घरातच सुनंदा किराणा स्टोअर्सचे दुकान शनिवार, ४ सप्टेंबर रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे सुरेश पाटील यांनी दुकानातील दागिणे व रोकड व्यवस्थित असल्याची खात्री करुन दुकान…

Read More

जळगाव ;- महापालिकेत आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यात १५ तक्रार अर्ज प्राप्त झाले आहेत. महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीत दुसऱ्या मजल्यावर लोकशाही दिनाचेसकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत आयोजन करण्यात आले होते. यात एकूण १५ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यात नगररचना विभाग -३, पाणीपुरवठा विभाग १, आरोग्य विभाग १, सार्वजनिक बांधकाम विभाग २, विद्युत विभाग २, अतिक्रमण विभाग १ तर नगररचना विभाग व अतिक्रमण विभागाच्या संयुक्त ५ अशा एकूण १५ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यावेळी अतिरिक्त आयुक्त विद्या गायकवाड, शहर अभियंता अरविंद भोसले, पाणीपुरवठा अभियंता सुनील साळुखे, विद्युत विभाग उपभियांता एस. एस. पाटील, प्रभाग…

Read More

जळगाव ;- सामाजिक चळवळीचे ऊर्जा केंद्र असलेल्या नागपूर मधील अंबाझरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्र उध्वस्त करणाऱ्या नागपूर महानगरपालिकेच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रचंड घोषणा देत जोरदार निदर्शने केली. नागपूर येथील अंबाझरी परिसरात असलेले डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्र १८ एकर विस्तीर्ण जागेवर आहे. देशभरातील सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांना प्रेरणा देणाऱ्या या केंद्रात सुसज्ज ग्रंथालयासह भव्य सभागृह होते. मात्र, जातीय विद्वेष मनात बाळगणाऱ्या संघ धार्जिण्या नागपूर महानगरपालिकेच्या सत्ताधारी भाजपा सरकारने कोणतीही पूर्वसूचना न देता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्र उध्वस्त केले. यामुळे आंबेडकरी समाजासह‌ सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांच्या अस्मितेला आव्हान देण्यात आले आहे. याचा निषेध व्यक्त करण्यासाठी जळगाव शहरातील विविध सामाजिक…

Read More

जळगाव ;- गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालय परिसरात आज सर्जाराजाचा पोळा ह्या सणानिमित्‍त बैलजोडींचे पूजन करत त्यांना नैवेद्य अर्पण करण्यात आला. याप्रसंगी बळीराजाचा शाल, श्रीफळ देवून सन्मान करण्यात आला तसेच पोळा सणाच्या शुभेच्छा देण्यात आल्यात. भारत हा कृषीप्रधान देश आहे. जमिनीतून उत्पादन घेण्यासाठी बळीराजासोबत सर्जाराजा देखील राबत असतो, या सर्जाराजाचे महत्व अधोरेखित करणारा पोळा हा सण यंदा ६ सप्टेंबर रोजी गोदावरी फाऊंडेशन येथे साजारा करण्यात आला. याप्रसंगी शेतकर्‍यांनी आपल्या बैलजोडींची सजावट करत त्यांना पूजनाच्या ठिकाणी आणले होते. गोदावरी फाऊंडेशनच्या सचिव डॉ.वर्षा पाटील, सदस्या डॉ.केतकी पाटील यांनी बैलजोडीचे पूजन केले. यावेळी गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, कृषी महाविद्यालयाचे परिसर…

Read More

जळगाव ;- – ५ सप्टेंबर, भारतरत्न तसेच माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन हा संपूर्ण भारतात शिक्षक दिन म्हणून सन १९६२ पासून साजरा करण्यात येतो. एका राष्ट्रपतींचा वाढदिवस तो मूलत: शिक्षक असल्यामुळे ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा होतो, या भारतातील फारच सुसंस्कृत व दर्जेदार घटनेचे जळगाव येथील पोदार इंटरनॅशनल स्कुल येथे सन्मानपूर्वक स्वागत करण्यात आले. याप्रसंगी (हेडगर्ल)व्रजेषा सेठ व(हेडबॉय) आदित्य कुलकर्णी ह्या विद्यार्थ्यांनी कार्याक्रमाची रूपरेषा मांडली. शाळेचे प्राचार्य श्री गोकुळ महाजन यांनी शिक्षक पालक संघाच्या प्रतिनिधींचे स्वागत केले.शाळेचे उपप्राचार्य श्री.दिपक भावसार यांनी पालक शिक्षक संघाचे पदाधिकारी,सन्माननीय पालक,विद्यार्थी तसेच उपस्थितांचे शब्दसुमनांनी स्वागत केले. शाळेचे प्राचार्य श्री गोकुळ महाजन यांच्या हस्ते डॉ.…

Read More

चोपडा (प्रतिनिधी) – घरगुती भांडणाच्या वादातून पतीने आपल्या पत्नीची संतापाच्या भरात हत्या केल्याची घटना घडल्याने शहरासह तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, शहरातल्या फुले नगरातील रहिवासी संजय पुंजू चव्हाण (वय ४८) याचे रविवारी सायंकाळी पत्नी मीराबाई चव्हाण हिच्यासोबत भांडण झाले. त्याने संतापात पत्नीवर विळ्याने वार केले. तिच्या मांडीला जखम झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला . जखमी मीराबाई चव्हाण (वय ४०) यांना चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान मीराबाईंचा मृत्यू झाला. या दाम्पत्याचा मुलगा सागर चव्हाण याच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read More

लाईव्ह महाराष्ट्र: तालुक्यातील खेडी येथील तरुणांचा वाढदिवस असल्याने रावेर तालुक्यातील पाल ठिकाणच्या काही अंतरावर पोहण्यासाठी उतरले असता  दोन जणांचा बुडून मृत्यू झाला आहे याबाबत वृत्त असे की, अक्षय उर्फ उज्ज्वल राजू पाटील (वय २४, रा. खेडी) या तरूणाचा  5 रोजी वाढदिवस असल्याने त्याचे सर्व मित्र हे रावेर तालुक्यातील पाल येथे गेले होते. दरम्यान, सायंकाळच्या सुमारास हे तरूण पाण्यात पोहण्यासाठी उतरले. यात उज्ज्वल पाटील आणि त्याचा एक मित्र हे पाण्यात बुडाले. यामुळे भेदरलेल्या त्याच्या मित्रांनी तातडीने ही माहिती घरच्यांना दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, या तरूणांच्या नातेवाईकांनी देखील घटनास्थळी धाव घेतली असून त्यांचा शोध सुरू केला. रात्री उशीरापर्यंत या…

Read More

जळगांव प्रतिनिधी : अखिल भारतीय जिवा सेना जिल्हा जळगाव याच्या कडून 4रोजी  संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी करण्यात आली. जळगाव शहरात  पॉपूलर मेन्स पार्लर टॉवर चौकात 4 रोजी 11.30वाजेला  संत सेना महाराज पुण्यतिथी निमित्त संत सेना महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या प्रसंगी समाजातील मान्यवर म.ना.म.चे  राज्य संपर्क प्रमुख किशोर भाऊ सूर्यवंशी ,म.ना.म.चे जिल्हा कार्या अध्यक्ष. व माजी नगरसेवक पृथ्वीराज भाऊ सोनवणे,अखिल भारतीय जिवा सेना जिल्हा अध्यक्ष देविदास भाऊ फुलपगारे, जनता बँकेचे गणेश कॉलनी शाखा मॅनेजर बापूसाहेब महाले , पॉप्युलर मेन्स पार्लर चे बापूसाहेब जगताप , बारा बलुतेदार शहर अध्यक्ष चंद्रशेखर जी. कापडे , अखिल भारतीय जिवा सेना जिल्हा निरीक्षक…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र | मध्यस्थ व दलालांच्या मार्फत नागरिकांना परस्पर भेटून रेशन कार्ड तयार करून देण्यासाठी अतिरिक्त पैशाची मागणी करून लुबाडत असल्याचा प्रकार धरणगाव तहसील कार्यालयात घडत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. या संबंधात धरणगाव तहसीलदार नितीन कुमार देवरे यांनी रेशन कार्ड बनवण्यासाठी तसेच धान्य विषयक इतर कामकाजासाठी नागरिकांनी प्रत्यक्ष धरणगाव पुरवठा शाखा अथवा माझी भेट घ्यावी. तसेच अतिरिक्त पैशांची मागणी करत असलेल्यांची तात्काळ तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.स्वस्त धान्याच्या मिळकतीसाठी नागरिक रेशन कार्ड तयार करून घेण्यास तहसील कार्यालयात येत असतात. मात्र त्या ठिकाणी मध्यस्थ व दलालांमार्फत गरजू नागरिकांची पैसे घेऊन आर्थिक लुबाडणूक केली जात असल्याचा प्रकार घडत आहे. याविरोधात तहसीलदार…

Read More

धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील चमगाव शिवारात मध्यरात्री बिबट्याने गायीवर हल्ला करून फडशा पडला आहे. हा प्रकार सकाळी उघडकीला आल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण तयार झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील चमगाव येथील शेतकरी हनुमंतराव सावंत याचे चमगाव शिवारात शेत असून त्यांनी शेतात काल शनिवारी ४ सप्टेंबर रोजी गाय बांधली होती. दरम्यान मध्यरात्री बिबट्याने गायीवर हल्ला करून फडशा पाडला आहे. दोन दिवसांपुर्वी देखील परिसरातील काही शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन झाले होते. आज सकाळी गायीचा मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर हनुमंतराव सावंत यांनी तलाठी आशिफ शेख आणि एरंडोल वनविभागाचे अधिकारी राजकुमार ठाकरे यांनी घटनास्थळी पंचनामा केला. हा हल्ला बिबट्यानेच केल्याचे स्पष्ट झाले. या घटनेमुळे परिसराती शेतकऱ्यांमध्ये…

Read More