Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

जळगाव – मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी जळगाव गुन्हे शाखेचे निलंबित निरीक्षक किरणकुमार बकाले हे गेल्या दिड वर्षांपासून फरार होते. पोलिसांकडून शोध सुरू असतानाही ते सापडत नसल्याने पोलिस यंत्रणेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता. मात्र आज अचानक सकाळी किरणकुमार बकाले हे स्वतःहून पोलिस अधीक्षक कार्यालयात शरण आले. मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी विनोद देशमुख यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात एलसीबीचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होता. तेव्हापासून बकाले हे फरार होते. पोलीस प्रशासनाने ही बकाले यांना निलंबित करून नाशिक येथे हजर होण्यास सांगण्यात आले होते. मात्र, हजर न होता त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला मात्र,…

Read More

चाळीसगाव प्रतिनिधी । क्रिकेट स्पर्धेच्या झालेल्या वादातून मुंबई पोलीस दलात कर्मचारी असलेल्या तरूणाचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार शहरातील पीर मुसा कादरी दर्गा परिसरात घडला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या गुन्ह्यात चार जणांना संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. शुभम अर्जुन आगोणे (वय-२८ रा. चाळीसगाव) असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे. चाळीसगाव पीर मुसा कादरी बाबा दर्गा जवळ पाटणादेवी नाक्याजवळ रविवारी १२ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास शुभम आगोणे या तरुणावर काही जणांनी धारदार शस्त्राने वार करीत हल्ला केला. घटनेत शुभम गंभीर जखमी झाल्याने त्याला खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असता उपचार…

Read More

बांधकाम मटेरीयलची वाहतूक करणाऱ्या व्यावसायीकाचा डंपर अडवून 30 हजारांची लाच मागून ती खाजगी पंटराच्या माध्यमातनू स्वीकारताना अमळनेर पोलिस ठाण्यातील हवालदारासह खाजगी पंटराला धुळे एसीबीने रंगेहाथ अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. हवालदार घनश्याम अशोक पवार व खाजगी पंटर इम्रानखान शब्बीरखान पठाण असे अटकेतील लाचखोरांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 30 हजारांची लाच भोवली तक्रारदार हे अमळनेर शहरातील रहिवासी असून त्यांचा बांधकाम मटेरीयलचा व्यवसाय आहे. अमळनेरचे हवालदार घनश्याम पवार यांनी 7 जानेवारी तक्रारदार यांचा डंपर अडवत त्यांच्याकडे पोलिस निरीक्षक विजय शिंदे व स्वतःसाठी दरमहा हप्ता म्हणून 30 हजारांची लाच मागितली व त्याबाबतची तक्रार तक्रारदाराने धुळे एसीबीकडे दूरध्वनीवरून केली. धुळे एसीबीने…

Read More

जळगाव : धरणगाव येथील धरणगाव जळगाव रस्त्यावरील प्रवेशद्वारचे काम पूर्ण झाले असून हे प्रवेशद्वार उद्या दुपारपासून या वाहतुकीसाठी खुले केले जाणार आहे. या प्रवेशद्वाराची पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज पाहणी केली आहे.धरणगाव येथील जळगाव रस्त्यावर भव्य स्वागत प्रवेशद्वार उभारण्यात आलेले आहे. या प्रवेशद्वाराचे काम पूर्ण झाले असून या प्रवेशद्वाराची पाहणी आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली प्रवेशद्वाराचे काम उत्कृष्ट झाले असल्याचे त्यांनी समाधान व्यक्त केले. हे प्रवेशद्वार वाहतुकीसाठी उद्या खुले करण्यात यावे असे पालकमंत्री यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना सूचना दिल्या. त्यानुसार सोमवार (उद्या) दि ८ रोजी दुपारपासून हे प्रवेशद्वार खुले केले जाणार आहे. या भव्य प्रवेशद्वारामुळे धरणगाव शहरातील सौंदर्यात भर पडणार…

Read More

मराठा सर्वेक्षण कामकाजात जिल्हाधिकारी स्वतः सहभागी जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज स्वतः धरणगाव तालुक्यातील मुसळी गावातील मराठा कुटुंबास भेट देऊन प्रश्नावली भरून घेत संवाद साधला. राज्य मागासवर्ग आयोगाने जिल्हा प्रशासनाला घरोघरी जाऊन मराठा कुटुंबाचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जळगाव जिल्ह्यात सर्वेक्षणास सुरूवात झाली आहे. याप्रसंगी मराठा – कुणबी शोध मोहीमेचे जिल्ह्याचे नोडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, धरणगाव तहसीलदार महेंद्र सुर्यवंशी आदी उपस्थित होते. सर्वेक्षणासाठी शासनाकडून प्राप्त प्रश्नावलीनुसार मराठा कुटुंबाशी संवाद साधत सर्वेक्षण करून घेण्यात आले. जिल्हा व तालुकास्तरावर सर्वेक्षणात सहभागी होणाऱ्या शासकीय अधिकारी – कर्मचाऱ्यांनी मराठा कुटुंबाचे सर्वेक्षण करतांना कोण-कोणत्या‌ गोष्टींचा समावेश केला पाहिजे तसेच आस्थेवाईकपणे…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  तालुक्यातील बेळी गावातील झेंडू जी महाराज संस्थान मध्ये सुरू असलेल्या हरिनाम सप्ताह ठिकाणी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज भेट दिली. यावेळी त्यांनी संस्थांमधील गोशाळेची पाहणी करून गोमातेची पूजन केले तसेच कुंडलेश्वर महादेव मंदिरात पूजा करून संस्थांना व मंदिराच्या विकासासाठी शासन स्तरावर निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन यावेळी उपस्थित त्यांना दिले. झेंडूजी महाराज संस्थान बेळी येथे शनिवारी सायंकाळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भेट दिली. झेंडू जी महाराज संस्थान मध्ये हरिनाम सप्ताह सुरू असून याप्रसंगी पालकमंत्री यांनी भक्तगणाशी संवाद साधून संस्थांमधील गोशाळा याची पाहणी केली.  तसेच गोमातेचे पूजन करून क वर्गात असलेली ही गोशाळा ब व वर्गात आणण्यासाठी…

Read More

जळगावभुसावळ तालुक्यातील कुऱ्हे पानाचे गावात १ रुग्णाचा काल दि. २५ रोजी कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळून आला आहे. 3 दिवसांत एकूण 794 चाचण्यांमधून १ रुग्ण आढळला आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे कि, 13 डिसेंबर रोजी ताप, खोकला व श्वासाचा त्रास जाणवू लागला, त्यांनी दि 20 रोजी एका खाजगी डॉक्टरकडे उपचार घेत असलेल्या व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. रुग्ण हा 6 ते 10 डिसेंबर च्या कालावधीत नेपाळ येथे गेल्याचे समजते. त्यांना सध्या घरीच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. मात्र एक महत्वाची बाब म्हणजे त्यांच्या संपर्कातील १४ जन हे निगेटिव्ह आले आहे.रूग्णांची प्रकृती उत्तम आहे. एचआरसीटी रिपोर्ट २४ आहे. त्यामुळे चिंतेचे कारण नाही. या…

Read More

पाळधी – येथील सुप्रसिद्ध जीपीएस मित्र परिवार सध्या परिसरात खूप चर्चेत आहे, कारण पण तसेच आहे जीपीएस मित्र परिवार म्हणजे आपुलकी, स्नेह, सामाजिक एकोपा या साठी प्रसिद्ध आहे.ग्रुप साठी कायम झटणारे जीप सदस्य प्रतापराव पाटील यांनी ग्रुपच्या सदस्यांसाठी सुरक्षा विमा कवच स्वतःच्या खर्चाने काढून देत ग्रुप मधील सदस्यांची काळजी कशी घ्यावी याचा प्रत्यय आज दाखवून दिला. अल्पावधीतच पाळधी येथील GPS ग्रुप ने इतके नाव कमविले की परिसरातील नागरिक पण याची दखल घेत आहे. ग्रुप तर्फे सार्वजनिक गणेशोत्सव त्यात सर्व सिद्ध केलेले रुद्राक्ष वाटप असो, नवरात्र उत्सव तर पाळधी परिसरात खूप चर्चिला गेला कारण तरुणी, महिला वर्ग यांच्या कला गुणांना वाव…

Read More

प्रिंप्राळा रेल्वे उड्डाणपूलाचे नागपूरहून केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण जळगाव येथून पालकमंत्री गुलाबराव पाटील व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थिती जळगाव शहर व जिल्ह्यातील विकासाचा ध्यास घेऊन विविध विकास प्रकल्पांना गती देण्यात येत आहे. प्रिंप्राळा रेल्वे उड्डाणपूलाचे वेळेत काम पूर्ण होऊन लोकार्पण होत आहे. निम्न-तापी-पाडळसे सारखे अनेक प्रकल्प जिल्ह्यात वेळेत मार्गी लागणार आहेत. त्यामुळे नुसतं जळगाव शहराचा विकास होत आहे असे नाही तर संपूर्ण जळगाव जिल्हा बदलतोय, विकासाकडे मार्गक्रमण करत आहे. असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज येथे काढले. जळगाव शहराचा विकासाचा…

Read More

जळगाव लाईव्ह महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील समता नगर येथील वंजारी टेकडी जवळ जुन्या किरकोळ वादातून एका -२६ वर्षे तरुणाचा कोयता व चॉपर वार करून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना आज सायंकाळी समोर आली आहे. या घटनेत इतर दोन जण गंभीरित्या जखमी झाल्याचे समोर आले आहे. जखमींना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. अरुण बळीराम सोनवणे (वय-२६) रा.समता नगर जळगाव असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की, अरुण सोनवणे याचे काही दिवसांपासून त्याच परिसरात राहणारे इतर तरुणांसोबत किरकोळ वाद होता. दरम्यान या वादाच्या अनुषंगाने आज सकाळी देखील हा वाद झाला त्यानंतर हा वाद काही…

Read More