लाईव्ह महाराष्ट्र न्युज : जामनेर व मुक्ताईनगर मध्ये लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येलाच फटाके फुटले असून तू माझ्याकडे येऊ नको मी तुझ्याकडे येणार नाही अशा सांकेतिक शब्दात सेटलमेंट झाले असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. मुक्ताईनगर मतदारसंघात गुजर समाज मोठ्या प्रमाणात आहे याचा फटका मागच्या वेळेस 2019 ला आत्ताच्या मुक्ताईनगर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार असलेल्या ताईंना बसला होता. हा पुन्हा धोका होऊ नये म्हणून मुक्ताईनगर व जामनेर मध्ये अंतर्गत हात मिळवणे झाले असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. जामनेर तालुक्यात तुतारी चिन्हावर मराठा समाजाच्या शिक्षकाला घोड्यावर बसवले गेले आणि ऐन वेळेस जामनेर मध्ये माझा काही संबंध नाही अशा शब्दात सरांना सुनावले गेले. एकंदरीत मुक्ताईनगर ची जागा भाऊ तुम्ही…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
जळगाव ग्रामीण मतदार संघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पुन्हा खिंडार !जळगाव प्रतिनिधी – म्हसावद येथिल प्रचार दौरा आटोपल्यावर विटनेर येथे ग्रा.पं.चे विद्यमान सरपंच स्नेहा ललित साठे, सोसायटीचे चेअरमन तथा माजी सरपंच ललित साठे, ग्रामपंचायत सदस्यांनी शिवसेनेचे नेते तथा महायुतीचे उमेदवार गुलाबराव पाटील यांच्या कार्यकर्तुत्व व झंझावाती नेतृत्वामुळे अक्ख्या ग्रामपंचायतीने शिवसेनेत प्रवेश करून गाव एकजुटीचे असल्याचे दाखवून दिले आहे. त्यामुळे जळगाव ग्रामीण मतदार संघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार पडल्याचे पुन्हा दिसून आले.यांचा झाला प्रवेश विटनेर हे गाव राजकीय दृष्ट्या निवडणुकीचे नेहमीच केंद्रबिंदू ठरले आहे. स्व. भिलाभाऊ सोनवणे यांच्यामुळे त्या कालखंडात विटनेर येथे प. स. सभापती, उपसभापती अशी विविध पद मिळाली होती. विद्यमान…
चाळीसगावात दोन जीवलग मित्र निवडणुकीच्या आखाड्यात चाळीसगावात मविआ मित्रपक्षांमध्ये नाराजी; राष्ट्रवादी अपक्ष उमेदवार देण्याच्या तयारीत ! लाईव्ह महाराष्ट्र प्रतिनिधी । चाळीसगाव विधानसभा निवडणूकीत नेहमी राष्ट्रवादी काँग्रेसला जागा मिळालेली आहे. असे असतांना महाविकास आघाडीच्या उबाठातर्फे ही जागा सुटल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते नाराज झाले आहे. शरद पवार गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची चिंतन बैठक झाली. या बैठकीत अपक्ष उमेदवार देण्याचा विचारात असल्याचे समोर आले असून आता मित्र पक्षातील उमेदवाराच चिंता वाढविणारी ठारणार असल्याचे पहायला मिळणार आहे.आमदार मंगेश चव्हाण व माजी खासदार उमेश पाटील हे दोघे एका काळाचे खास जिवलग मित्र. या जिवलग मित्रांनी २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी…
राज्यात गेल्या काही दिवपासून महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा तिढा सुरु होता. आज शरद पवार यांनी आपली पहिली यादी जाहीर केली आहे यात जळगाव जिल्ह्यातील देखील जळगाव ग्रामीण, मुक्ताईनगर व जामनेर विधानसभा मतदार संघात उमेदवार उभे केले असून आता उद्धव ठाकरे यांच्याकडून जळगाव शहरात माजी महापौर जयश्रीताई महाजन यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.जळगाव शहर विधानसभा मतदार संघासाठी जोरदार मोर्चे बांधणी ठाकरे गटात सुरु होती. गेल्या दोन दिवसापासून महाविकास आघाडीत जागा वाटपाचा तिढा सुरु असताना हा तिढा अखेर पूर्ण झाला असून जळगाव शहर विधानसभा मतदार संघासाठी आता माजी महापौर जयश्रीताई महाजन यांना उमेदवारी फायनल झाली आहे. याबाबत माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन…
जळगाव ग्रामीण मधून माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना जाहीर ! लाईव्ह महाराष्ट्र : राज्यात गेल्या काही दिवसापासून महाविकास आघाडीत जागा वाटपा बाबत खलबते सुरु होते. आज अखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. जयंत पाटील यांनी पहिल्या यादीत शरद पवार गटाच्या एकूण 44 उमेदवारांची नावे जाहीर केली. यामध्ये बारामती मतदारसंघाचा देखील समावेश आहे. यात जळगाव ग्रामीण मतदार संघातून माजी मंत्री गुलाबराव देवकर याना संधी मिळाली आहे. इस्लामपूर – जयंत पाटीलकाटोल – अनिल देशमुखघनसावंगी – राजेश टोपेकराड उत्तर – बाळासाहेब पाटीलमुंब्रा-कळवा – जितेंद्र आव्हाडकोरेगाव – शशिकांत…
लाईव्ह महाराष्ट्र न्युज : एरंडोल प्रतिनिधी 50 खोके एकदम ओके असे ब्रीद वाक्य महाराष्ट्रात गाजले आहे एरंडोल तालुक्यातील फरकांडे फाट्याजवळ पारोळा येथील गद्दाराच्या एका कार्यकर्त्याच्या गाडीत दीड कोटी रुपयांची रोकड मिळून आल्याने खंडबड उडाली आहे. रात्री उशिरापर्यंत ही रोकड नेमकी कशासाठी आणली होती हा खुलासा होऊ शकला नाही परंतु हे दीड कोटी रुपये पारोळा येथील गद्दाराच्या मुलाच्या जवळच्या कार्यकर्त्याच्या असल्याचे समजते. महसूल विभागाचे पथकही घटनास्थळी दाखल झाले आहे. राज्यात आज पाच कोटी रुपये कॅश पकडल्याचे उदाहरण समोर असताना जळगाव जिल्ह्यात देखील दीड कोटी रुपये एका गाडीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
धरणगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात विधानसभा निवडणूकीची रणधुमाळीला सुरूवात करण्यात आली आहे. जळगाव ग्रामीण विधानसभा निवडणूकीसाठी पहिल्याच दिवशी २० इच्छुक उमेदवारांनी अर्ज घेतले आहे. अशी माहिती धरणगाव निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली आहे. यात पालकमंत्री गुलाराव पाटील आणि माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचा समावेश आहे.जळगाव ग्रामीण विधान सभेच्या निवडणूकीसाठी मंगळवारी २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळपर्यंत निवडणूक कार्यालयात इच्छुकांनी पहिल्याच दिवशी अर्ज विकत घेण्यास सुरूवात केली आहे. यात पहिल्यांच दिवशी पहिला अर्ज शिंदे गटातर्फे गुलाबराव पाटील -१, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे गुलाबराव देवकर-२, विशाल देवकर-२, अपक्ष प्रसाद लिलाधर तायडे-१, शिवाजी पथरू हटकर-१, राहूल लालसिंग राजपूत-१, उन्मेश राजेश वाडेकर-१, साधना निलेश पाटील-१,…
लाईव्ह महाराष्ट्र न्युज : जळगाव शहराचे आमदार राजू मामा भोळे यांच्या विरुद्ध मोट बांधण्यासाठी औरंगाबाद रोडवरील एका शोरूम वर काल रात्री डिनर डिप्लोमा सी झाले असल्याचे विश्वासनीय सूत्रांकडून समजते. विशेष म्हणजे या डिनर डिप्लोमशीला प्रतिष्ठित जळगाव शहराचे उद्योजक, माजी मंत्री, जिल्हा बँकेचे संचालक तथा काही राष्ट्रवादी व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. आजारपणानंतर डिनर डिप्लोमाशी असे निमित्त या पार्टीचे असले तरी राजकीय चर्चा मात्र जोरात सुरु आहे.राजू मामाच्या विरुद्ध मोट बांधली गेली असल्याचे समजते. विशेष म्हणजे या डिनर डिप्लोमाशीला राजू मामाच्या विरुद्ध जे उमेदवार असणार आहेत ते स्वतः उपस्थित होते. भाजपामध्ये व जनतेमध्ये राजू मामाचे जोरदार वजन आहे परंतु काहींना हे…
परंपरा खंडित होणार की अबाधित राहणार विजय पाटील : जळगाव जिल्ह्यामधील अमळनेर हा विधानसभा क्षेत्र एक वेगळेच रसायन आहे या रसायनामध्ये कधी पक्षाला तर कधी अपक्षाला विजय मिळत असतो या विजयात महत्त्वाची भूमिका निभावतात ते जिल्हा परिषदेचे गट या गटातटाचे राजकारणावर सर्व अंमळनेर विधानसभा क्षेत्राचे राजकारण अवलंबून आहे. अमळनेर ची विशेष परंपरा असलेले ज्याला एक वेळा आमदारकीची संधी दिली त्याला दुसऱ्यांदा कधीच देत नाही ही परंपरा यावर्षी अबाधित राहणार की खंडित होणार याकडे सर्वांचे उत्सुकतेचे लक्ष लागलेले आहेत. जिल्ह्यातील राष्ट्रवादी अजित पवार गटाची एकमेव आमदार व नामदार असलेले अनिल भाईदास पाटील यांना पुन्हा जनता संधी देणार की अपक्षाला पुन्हा डोक्यावर…
जळगाव – शहराला केंद्र व राज्य शासनाची अमृत पाणीपुरवठा योजनेचे कामाचे लोकार्पण मंगळवारी आचारसंहिता लागण्याच्या काही मिनिटा आधी महापालिकेने अचानक घाई गडवडीतून उरकावण्यात आल्याने या योजनेबाबत तसेच प्रशासनाच्या कारभाराबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. जळगाव शहराला नवीन जलवाहिनीतून पाणीपुरवठा करण्याची अमृत योजनेचे काम 2018 मध्ये शहरात सुरू झाले. दोन वर्षाचा कालावधी जाऊन सुद्धा गेली सहा वर्ष ही अमृत योजना पूर्ण न झाल्यामुळे महापालिका प्रशासन तसेच जैन इरिगेशन कंपनीने घेतलेल्या या कामावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. तसेच महापालिकेच्या महासभांमध्येही अमृत योजनेच्या कामावरून खडाजंगी अनेक वेळा पहावयास मिळाली. त्यात अमृत योजनेचे घाईगडबडीत लोकार्पण कार्यक्रम आज खासदार स्मिता वाघ, भाजपचे काही मोजके…

